vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज येथील परिवर्तन सभेकडे संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष!



  • राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा उद्या ३० जानेवारीला सोलापुर जिल्ह्यात येणार आहे . सोलापुर जिल्ह्यात पहिली सभा अकलूज येथे होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटीलांचे अकलूज हे होम ग्राऊंड असून उद्या अकलूजची सभा विजय चौकात जंगी होईल हे नक्की .  

    • सभेसाठी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे , अजित पवार हे येणार आहेत. विशेषतः अजितदादा उद्या  काय बोलतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . . . 
    • सभा तर जंगीच होईल पण या सभेत विजयदादांच्या उमेदवारीची घोषणा होईल का ?  हे पाहण्याची उत्सुकता आहे , उमेदवारीच्या घोषणेकडे 
    • विजयदादांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे . . 
    • सभेच्या तयारी साठी अकलूजला राष्ट्रवादीच्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक विजयदादा, धैर्यशील भैय्या , बाबाराजे दादा यांचे प्रमुख उपस्थितीत   घेण्यात आली . . 
    • उद्या तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक प्रचंड संख्येने परिवर्तन सभेसाठी जाणार असल्याचे समजते . माळशिरस सह संपुर्ण माढा लोकसभा  मतदारसंघात विजयदादांनी कामाचा जो   धडाका लावला आहे व विजयदादा कामाच्या बळावर आणि दांडग्या संपर्कावर उमेदवारीचे तेच  प्रबळ दावेदार आहेत तसेच विजयदादांच्या बाबतीत जनतेत प्रचंड  सहानुभूती सुद्धा आहे . . 
    • त्यामुळे बहुसंख्य मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हे  बहुसंख्येने उपस्थित राहतील  . 
    • सभेची तयारी पाहता सभा एकदम मोठी व जंगी होणार असे दिसते . .

    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे , मा श्री अण्णासाहेब डांगे यांचे कडून कौतुक

    सोमवार, २८ जानेवारी, २०१९

    शेतकरी टॅक्स भरतो का ?


    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील

    विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास हे समीकरण गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रातील जनता पाहते आहे . . . . . त्यामुळेच दादासाहेबांची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे व त्यातूनच लाखो कार्यकर्ते दादासाहेबांवर जीवापाड प्रेम करतात. . . . त्यामुळेच दादासाहेबांना "विकासरत्न " ही उपाधी जनतेने बहाल केली . . . लोकशाहीत कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना असंख्य स्पर्धक हे असतातच त्यात गैर काही नाही, काही स्पर्धक नव्याने राजकारणात आलेले असतात व ते सक्रिय असल्याचा अभास करत असतात, पण त्यांच्या कामाचे मुल्यमापण झालेले नसते मात्र कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला जनतेची नस माहित असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील नेतृत्वाची पारख असते , आणि हो ज्या व्यक्तीमत्वाला जनतेत मान असतो व जे व्यक्तिमत्व जनतेसाठी अहोरात्र झटत असते, अशाच व्यक्तीमत्वाचा विचार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करावा लागतो . . . . त्यामुळे दादासाहेबांना , ना उमेदवारी चिंता करायची गरज आहे , ना निवडणूक जिंकायची चिंता आहे , दादासाहेब निवडणूक लढवतील व विक्रमी लाखोंच्या मतांनी जिंकतील हे सुद्धा निश्चित आहे . त्यामुळे येणार्‍या कोणत्याही निवडणूकीत आदरणीय दादासाहेबांची भूमिका निर्णायक तर राहिलच पण राज्याच्या राजकारणावर सुद्धा त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच होतील. . . . लेखन:-विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

    दुष्काळाचा पंचनामा

    पंचनामा . . . दुष्काळाचा आणि शेतकरी समस्यांचा !

    जावे दुष्काळाच्या देशात. . . .

    आटलेल्या विहिरी फफुट्याने माखलेल्या पायवाटा  ,   पिके नसल्याने भकास उघड्या बोडक्या झालेल्या जमिनी , पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या लहान मुलं मुली , म्हातारी कोतारी माणसे व  बायका . . . चार्या  अभावी  जणावरांची खपाटीला गेलेली पोटं हाताला काम नसल्याने शेतकरी , मजूर यांची कामासाठी शोधाशोध जवळपास ७०% ग्रामीण भागातील हे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे . . कित्येक शेतकर्यांना आपली जणावरे एकतर सोडून द्यावी लागत आहेत किंवा येईल त्या किंमतीला विकावी लागत आहेत, आज, पशुधन वाचवण्यासाठी ना सरकार पुढे येतय ना कोणते लोकप्रतिनीधी पुढे येताना दिसत आहे , मुकी जित्राबं मालकाकडे बघून दिवसभर हंबरडा फोडत आहे पण असाह्य पणे पाहण्याशिवाय मालकही काहीच करू शकत नाही . .  कारण त्याच्या खिशात दमडाही नाही . .
    दुष्काळी अनुदान नाही , चारा छावण्या नाहीत, चारा डेपो नाहीत, रोजगारहमीची कामे नाहीत. . .
    ''नुसता ग्रामीण भाग होरपळतोय''
    मायबाप सरकारला कधी पाझर फुटणार देव जाणे . . .
    गावच्या गावं ओस पडू लागली आहेत , खेडीच्या खेडी  जणू रंडकी होत चालली आहेत  . . तरूण बायका मुलींनाही
    कपाळाला कुंकू लावायची सुद्धा आता लाज वाटू लागली आहे  ! कारण त्यांचा धनी कधी जीव देईल याचा काहीही  भरोसा राहिलेला  नाही . .
    सततच्या नापिकीने, दुष्काळाने, गारपिटीने , वादळी वार्याने बळीराजा खचून गेलाय. . त्याच्या हातात काय येतच नाही , दुकानदाराची उधारी  व सावकाराची कर्जे फेडायची कशी ??किराना सामान सुद्धा घ्यायची पत राहिली नाही ! जगायचं कसं  याचीच चिंता त्याला लागून राहिलीय। . .
    फसवी कर्जमाफी व फसवा हमीभाव!
     आजही इतक्या भयंकर दुष्काळात भाजीपाला , धान्य, कवडीमोल भावाने जातोय, ऊसाचे बील नाही , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके करपून जाताना बघवत नाही  !
    "कुणालाच पाझर फुटेना"
    काही जणांनी बँकेचा त्रास नको म्हणून वाट्टेल ते करून जमीन विकून, घाणवट ठेवून,उसने पासने करून,  सावकाराकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज,  ओटीएस मध्ये भरले , त्यामुळे  cbil रेकॉर्ड खराब झाले कित्येक शेतकर्यांचे . . .
    त्यामुळे कोणतीही बँक अशा शेतकर्यांना दारात उभी करत नाही . . . अशा विचित्र कात्रीत बळीराजा सापडलाय पण, त्यातून त्याला बाहेर कोण काढणार?
    आज राजकारण हे जाती धर्म आणि आरक्षण यापलीकडे जातच नाही . . प्रत्येक पक्ष हा एकमेकांची उणीधुनी काढण्यात मश्गुल आहे ,
    जातीय तेढ निर्माण करून मताच्या तुंबड्या भरल्या की राजकीय पक्षांचे भागतेय पण रोज शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या कुणालाही दिसत नाहीत, इतकेच काय परदेशातून बहुमोल परकीय चलन खर्चून
    तेल, डाळी , साखर, कांदा वेळोवेळी आयात करून इथल्या शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळले जातेय. .
    हजारो हेक्टर जमिनी भूसंपादन करून विकासाच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात कवडीमोल भावाने घालायचा गोरख धंदा खुलेआम चालू आहे . . त्याच जमिनी नंतर करोडो रुपयांना विकल्या जातात. .
     "न्यायासाठी शेकडो धर्मा पाटलांचे " बलिदान जात आहे . . पण
    कोण वाचा फोडणार याला ? कोण धावणार मदतीला कोण सोडवणार हे प्रश्न!
    कांदा चाळी ,
    शेततळी तोकड्या अनुदानामुळे परवडत नाहीत. .

    रोजगारा अभावी जगणं मुस्किल झालंय. . . स्थलांतर करावे तर मुक्या जित्राबाचे व घरातील बाया बापड्यांचं आणि म्हातार्या माणसांचं करायचं तरी काय?
    म्हणून हा माझ्या सारख्या दुष्काळाची जाणीव असणाऱ्या शेतकर्यांने केलेला हा व्यवस्थेचा  पंचनामा !
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

    गटबाजी संपली तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण

    गटबाजी मोडून काढून जेष्ठांनाही मानसन्मान दिला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी नक्कीच सत्तापरीवर्तन करेल. . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांनीच लक्ष घालून प्रत्येक मतदारसंघातील गटबाजी संपवली तर राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी घवघवीत यश मिळेल याची आम्हा सामान्य जनतेला व पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींना पुर्णपणे खात्री वाटते  . .
    महाराष्ट्रातील शेतकरी , शेतमजूर, सामान्य जनता दलित आदिवासी , कामगार, मुस्लीम या सर्वांनीच  या पाच वर्षांत बरेच भोगले आहे, शेतकर्यांना तर सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी अक्षरशः  वार्यावर सोडले , धनगर, मराठा या समाजाला खोटी अश्वासने दिली, शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, झाले नाही . . जातीय सलोखा यांनी जाणीवपुर्वक बिघडवण्याचे काम केले , भाजपाच्या धनंजय कुलकर्णी कडे शस्त्रांचा साठा सापडूनही लगेच जामीन दिला जातो व इतरांना नक्शलवादी ठरवून खोट्या गुन्ह्यात अडकून तुरूंगात डांबले जाते ,  शेतकरी आत्महत्या करत असताना , यांनी पाकिस्तान मधून साखर व कांदा आयात केला या व अशा असंख्य कारणांनी जनता यांना कंटाळली आहे . म्हणून जनतेला आता  बदल हवा आहे कारण भाजपा सरकारने सर्वच  घटकांना वार्यावर सोडल्यामुळे व शेतमालाच्या किंमती कवडीमोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला  अनकुल वातावरण तयार आहे . . त्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक जागेवर प्रचंड गटबाजी निर्माण झाल्याने अनुकूल वातावरण असतानाही त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत  आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा  पक्षातील गटबाजीमुळेच आजवर घात झाला आहे . .
    बारामती , माढा, सातारा , कोल्हापूर, भंडारा गोंदिया हे मतदारसंघ तर राष्ट्रवादी सहज जिंकू शकते फक्त या ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी द्यायला हवी कारण विद्यमान खासदारांचे काम चांगले आहे व त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे . . विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया ताई, उदयन महाराज हे तर पक्षाला सहज विजय मिळवून देवू शकतात,  त्यांना जनतेतूनच जास्त प्रेम  आहे पण पक्षातील विरोधकांना , हे सहन होत नाही , म्हणून ते विरोध करताना दिसत आहेत,  मात्र जनता विद्यमान खासदारांच्या पाठिशी आहे , हे मात्र नक्की . .
    वरिल पाच मतदारसंघा बरोबर, राष्ट्रवादीला . . नाशिक,
    शिरूर, रायगड, मावळ, नगर, परभणी , रावेर, बीड, जालना, नवी मुंबई,(ठाणे ) उस्मानाबाद, हे मतदारसंघ  सुद्धा अनुकूल आहेत आणि या आकरा  मतदारसंघापैकी किमान राष्ट्रवादी काँग्रेस  सात ते दहा  ठिकाणी सहज जिंकू शकेल अशीच स्थिती आहे , त्यामुळे यावेळी किमान  एकुण बारा  ते पंधरा  जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळतील  , फक्त राष्ट्रवादीने उमेदवार निवडताना जुने जानते व तगडे उमेदवार दिले पाहिजेत तरच यश मिळेल. . .
    आणि सगळ्यांत महत्वाचे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून ते जाहीर केले पाहिजेत,  उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचाराला मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. .
    राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपआपल्या  विधिसभा मतदारसंघात मजबूत आहेत, स्थानिक राजकारणात,  पंचायत समिती , जिल्हा परिषद, यातही बहुतेक ठिकाणी सत्तेवर आहेत, मात्र लोकसभेला एकमेकांची जिरवा जिरवी करण्याच्या नादात पक्षाच्या उमेदवारा विरूद्ध काम करतात आणि यामुळे पक्षाच्या  उमेदवारांचे पराभव होतात. . .
    त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनीच सर्वांना समज देऊन विद्यमान सर्वच  खासदारांना परत  संधी देऊन, संभ्रम संपुष्टात आणायला हवा . . . ग्रामीण भागातील
    जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व सत्तापरीवर्तनाची नितांत गरज आहे . . .
    कारण भाजपाच्या  काळात. दुध, सोयाबीन, तुर,कापूस  कांदा , ऊस, भाजीपाला , आंबा , डाळिंब उत्पादक शेतकरी भरडला गेला . . .
    शेतकर्यांना वार्यावर सोडले गेले . .
    सामान्य जनता पवार साहेब सत्तेवर यायची  वाट पाहतेय. . .
    फक्त विविध मतदारसंघात जे उमेदवारीवरून घोळ चालू आहेत एकमेकांची जिरवण्याची भाषा चालू आहे ति बंद झाली तर नक्कीच. . . महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होईल. . स्थानिक परिस्तिथी वरिष्ठांना  समजावी ,
    पक्षाला व जनतेला चांगले दिवस यावेत यासाठीच हा लेखन प्रपंच. . .
    एक कार्यकर्ता . . .
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . .

    सोलापुर जिल्ह्यात गटबाजीमुळे पोखरत चाललेली राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
    तिच खंत व्यक्त केलीय
    राष्ट्रवादीचे सामान्य
    कार्यकर्ते
    श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

    पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
    पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
    पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
    एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
    पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
     विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
    आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
    पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
    बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
    पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
     मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
    जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
      प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
     आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
    लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
    आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
    आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शनिवार, १९ जानेवारी, २०१९

    गटबाजीमुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे होणारे नुकसान

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
    तिच खंत व्यक्त केलीय
    राष्ट्रवादीचे सामान्य
    कार्यकर्ते
    श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

    पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
    पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
    पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
    एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
    पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
     विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
    आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
    पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
    बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
    पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
     मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
    जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
      प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
     आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
    लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
    आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
    आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    बुधवार, ९ जानेवारी, २०१९

    आरक्षण

    आरक्षण. . . . . . . . . 

    सध्या देशपातळीवर सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे आरक्षण, आजच्या परिस्तिथीत, सुशिक्षित बेरोजगारांची वाढत जाणारी संख्या आणि गरिब श्रीमंत यातील प्रचंड वाढती  दरी , महागडे व सामान्य, मध्यम वर्गाला सुद्धा न परवडणारे शिक्षण तसेच नोकरीचा अभाव यातून या देशातील बहुसंख्य वर्ग नाराज आहेत. 
    देशातील जवळपास सर्वच राजकीय  पक्ष सत्तेच्या गणिता शिवाय या विषयाकडे  गांभीर्याने पहाला तयार नाहीत, मुळात आरक्षणाची बिजे हि जातियवादामुळेच रोवली गेली हेही वास्तव नाकारता येत नाही , देशातील जवळपास ३५ ते ४० %लोकांना 
    जुन्या काळात जातीच्या आधारावर, हक्क नाकारले गेले, हीन वागणूक दिली गेली , साधन संपत्तितील न्याय वाटा नाकारला गेला , मानव जातीला लाजवतील अशी कामे करायला उच्च वर्गाने भाग पाडले ,  परिणाम एकसंघ समाज भावना न वाढता दरी वाढत गेली व तो मोठा समुदाय मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकला गेला , तो वर्ग  मागास होत गेला , त्याला गावकुसा बाहेर ठेवले गेले व त्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणन्यासाठी काहीतरी हक्काचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या भावनेतून आरक्षणाचा त्यावेळी विचार केला गेला . . . . पण त्या वर्गातील सुद्धा ठरावीक लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतला पण त्यातील सुद्धा गरिब हा गरिब राहिला , जातीय प्रतिनिधीत्व काही टक्के तर मिळाले पण संपुर्ण समाजाचा समतोल विकास व्हायला पाहिजे होता तसा झालाच नाही . नोकरीच्या किंवा राजकीय संधी या खर्या गरिबांना मिळाल्याच नाहीत तर फक्त मागास जातीच्या श्रीमंतांनाच मिळाल्या व मागासलेल्या जातीतील  श्रीमंतांनी त्याच वर्गातील  गरिबांना पुढे करून भरपूर मिळवले  पण वंचित हे वंचित राहिले . 
    तशीच परिस्तिथी सवर्ण किंवा तथाकथित उच्च जातीच्या वर्गामधील  सुद्धा श्रीमंतांनी गरिब सवर्णांची केली , त्यामुळे आज गरिब किंवा मध्यमवर्ग हा आरक्षणाची मागणी करतोय पण यात सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षणाचा लाभ खर्याच गरिबांना मिळणार आहे का ? 
    तर त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे . 
    जोपर्यंत जातीच्या भिंती कमजोर होत नाहीत, तोपर्यंत आरक्षण संपुष्टात येत नाही व भारत देशातील जातीच्या भिंती संपुष्टात येणार नाहीत हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे . . 
    त्यामुळे आरक्षण हे चालूच राहणार व नोकर्या उपलब्ध असो किंवा नसो ! 
    म्हणून या प्रश्नाची मलमपट्टी म्हणून आर्थिक निकषावरील आरक्षण ही पुंगी वाजू लागली़य  , मुळात किरकोळ स्कीम साठी रेशनकार्ड विभक्त करणारे लोक या देशात कमी नाहीत, इतकंच काय तर खोटे घटस्फोट सुद्धा दाखवून शासकीय लाभ पदरात पाडणारे या  देशात आहेत! 
    आर्थिक निकषावर दिलेले आरक्षण हे गरिबांना मिळणारच नाही .
    मग आरक्षणाचा विषय संपणार तरी कसा ? 
     त्यावर उपाय काय? कोणत्याही वर्गातील खर्या वंचित घटकांना न्याय मिळायचा  असेल,  योग्य प्रतिनिधीत्व द्यायचे असेल तर जातीय आरक्षणात सर्वच वर्गांचा समावेश करणे व आरक्षण हे प्रत्येक जातींची जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात वाटून टाकणे व त्यात क्रिमिलेअरच्या जाचक तरतूदी करणे तरच प्रत्येक वर्गातील खर्या  वंचितांना संधी मिळेल! 
    क्रिमीलेअरची मर्यादा ही दुर्दैवाने सातत्याने वाढतेय, इन्कम टॅक्सशी सुसंगत ही मर्यादा पाहिजे होती पण मताच्या राजकारणामुळे ति वाढत जाते आणि परिणामी मागास जातीच्या खर्या वंचितांनाही न्याय मिळत नाही . . . 
    यापुढे जातीय आरक्षण बंद होणारच नाही ,,व एकाच जातीच्या लोकांची दुसर्‍या जातीच्या जागा गिळंकृत करायची पद्धत चालू आहे ति थांबवायची असेल तर लोकसंख्या व क्रिमिलेअर हेच बेस पकडावे लागतील! 
    आज 
    Sc  , St, obc, किंवा ओपन मध्ये भरपुर जाती आहेत पण त्यातही त्या त्या वर्गात ज्या  जाती  पुढारलेल्या  आहेत  तिलाच आरक्षणाचे  जास्तीचे  लाभ मिळतात  व बाकीच्या जाती तशाच उपेक्षित रहातात. 
    म्हणून प्रत्येक गटात सुद्धा , अ ब क ड, असे वर्ग पाडले पाहिजेत  तरच सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळेल असे वाटते ! 
    ओपनमध्ये असलेल्या जाती असो कि मागासलेल्या जाती असो , त्यातील पुढारलेली जात वंचित जातीच्या सर्व सुखसोयी व लाभ गिळंकृत करते ! 
    म्हणून सर्व गटात अबकड करून राखीव जागांचे व शिक्षण व नोकरीतील  प्रमाण टक्केवारीच्या प्रमाणात दिले गेले पाहिजे ! 
    विजय पिसाळ नातेपुते 
    ९४२३६१३४४९

    सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

    धोरण लकवा व दुष्काळी महाराष्ट्र

    धोरण लकवा आणि दुष्काळी महाराष्ट्र. . . . .
    सगळीच सरकारे मोठं  मोठ्या घोषणा करतात विकासाच्या गप्पा मारतात मात्र काम कमी व गाजावाजा जास्त करतात, जनतेलाच आता कळेना नक्की कुणाला सत्ता द्यावी सगळेच कासवगतीने काम करणारे , भ्रष्टाचारात बरबटलेले . . . (प्रत्येकाची संपत्तीचे मार्ग काय व ति आमदार खासदार झाल्यावरचं वाढते कशी )
    महाराष्ट्रात विविध सरकारे  आली . . . . . . . . .   पाणी आडवण्याच्या,  पाणी जिरवण्याच्या विविध योजना आणल्या  गेल्या . . . पाणी कुठे जिरले कुणास ठावूक. . त्याला कधी पाणलोट विकास हे नाव होते . . . . . .
    तर कधी पाणी आडवा पाणी जिरवा ही घोषणा करण्यात  आली . . .
    तर कधी नाल बंडीग. . .
    कधी . . . . .
     कोल्हापुर पद्धतीचे बंधारे  करायचा घाट झाला . . . यातील काहीच कामे झाली नाहीत असे नाही पण. . ..झाली ती  कासवगतीने . . . .
    कधी पाझर तलाव झाले तर लघू व मध्यम व मोठेही सिंचन प्रकल्प झाले . . .
    या ही सरकारने मोठा गाजावाजा करत नेहमीप्रमाणेच  पुर्वीच्या योजनांचे नाव बदलत *जलयुक्त शिवार* ही योजना सुरू केली . . ..काम कमी व भ्रष्टाचार जास्त. . . याही योजनेने 
    पण महाराष्ट्रातील दुष्काळ काही  हटला नाही , व भ्रष्टाचार काही थांबला नाही. . . . . .  महाराष्ट्रातील सर्वच राज्यकर्ते ऐकमेकावर दुष्काळाचे खापर फोडून मोकळे होतात. . .
    पण ते प्रश्न तळमळीने शास्त्रीय दृष्ट्या योग्य प्रकारे हाताळत नाही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्नांचे गांभीर्य बिलकुल नसते , नको त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जातो , सभा मंडप, धार्मिक ठिकाणे  , कंपाऊंड, हे खर्च बिनकामाचे  केले जातात पण. . . . . . .
    पाणी , विज, रस्ते , हे सर्वात महत्त्वाचे विषय बाजूला ठेवले जातात. . . विज व
    पाण्याच्या बाबतीत तर सरकार उदासीन दिसून येते . . . *जलयुक्त शिवार योजनेत* तर
    ओढ्यातील गाळ काढून तो बाजूला टाकला गेला . . .  हजारो ब्रास वाळू ही संपत्ती खनीज संपत्ती  माती मिश्रीत केली  व संपुर्ण जनतेला वाळूचा तुटवडा निर्माण केला मुळात . .
    वाळू ही काही आभाळातून पडत नाही कि ती निर्माण सुद्धा  करता येत नाही . . .
    ति पाण्यावाटेच छाटे नाले , ओढे , नदी असा प्रवास करत असते मात्र सरकामधील लोकांनी सगळे ओढेच उपसून गाळ व वाळू एकत्र केले आज वाळू वाळू करून महाराष्ट्रातील जनता बोंब मारत आहे . . .
    नैसर्गिक ओढे खोल करायची गरज नसतेच तर त्या ठिकाणी आढवे बांध ठिक ठिकाणी टाकून पाणी आडवायचे असते ते पाणी वाळूत जास्त मुरत असते . . . .
    पण मलई खाणार्या राज्यकर्त्यांना त्याच कुठं काही पडलेलं असतय. . .
    जल तज्ज्ञ अनिल पाटील. .
    राजेंद्रसिंह यांनी सुचवलेल्या गोष्टींचा विचार केलाच नाही
    उलट ओढ्यात जेसीबी चालल्याने माती पोकळ झाली व ओढे मोठ्या प्रमाणात खचले गेले व हजारो ब्रास सकस पिकावू माती पाण्या बरोबर वाहून गेली व नुसती वाहूनच गेली नाही तर धरणांमध्ये जावून साठली . . . .
    पण मुख्यमंत्री A Cत बसून जलयुक्त शिवार मोठ मोठ्याने करत बसले . . .
    मुळात महाराष्ट्रातील जनतेला मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांची जास्त गरज आहे . . .
    त्या प्रकल्पास जमिनी कमी लागतात व पुनर्वसन जास्त करावेच लागत नाहीत किमान ५ ते १० गावांचे पाणी प्रश्न सुटतात व लोकांना दिर्घकालीन कायमस्वरूपी रोजगारही मिळतो व त्यातून अप्रत्यक्ष कर सुद्धा मिळतोच. . . . . .
    पण धोरण लकवा नसेल तर ना . . .

    धोरण लकवा व दुष्काळी महाराष्ट्र


    रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

    शेतकर्यांची परवड थांबेल कधी

    शेतकर्यांची परवड  थांबेल कधी ?

    कधी पाण्याची चिंता, कधी अनियमित वीज,कधी डीपीचा घोटाळा, कधी मोटारीचा घोटाळा,  तर कधी बेभरवशी बाजार भाव तर कधी ओले संकट तर कधी दुष्काळ, तर कधी
    भांडवलाची कमतरता,
    कधी वादळ तर कधी गारपीट
    कधी रोगराई तर कधी मजुर टंचाई तर कधी  जंगली जणावरे व उंदीर घुस यांचा त्रास कधी भेसळयुक्त खते तर कधी
    डुप्लिकेट बीयाने तर कधी
    बोगस खते शेकंडरीच्या नावाने २५० रु बॅग ७००रू शेतकर्यांना विकणे,

    या सर्व समस्यांचा सामना करत शेतकरी शेती करतो
    पण याची जाणीव कित्येक लोकांना नाहीच,
    बीगर चप्पलने अनवाणी फिरणारा शेतकरी, गाई, गुरे वासरे, शेळ्या मेंढ्या कोंबड्या सांभाळत संसाराची गाडी ओढणारा शेतकरी बांधव बघून वाईट वाटते, त्याच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत नाही, त्याला मोफत दवाखाना नाही, त्याच्या लेकी बाळींना संरक्षण नाही, सणासुदीला कपडे नाहीत, आनंदाचे काहीही नाही, वरून बँका सावकार यांचा जाच चालूच, शेतकर्यांना सगळे कायदे कडक,
    कित्येक वर्ष झाली महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी हात रुमाला खालून व्यापर होतोय, मुंबईत तर शेतकरी अक्षरशः लुटला जातोय,
    आडत मुक्तीची घोषणा झाली तरीही अनेक ठिकाणी डायरेक्ट रोख रक्कम पट्टीवर न दाखवता आडत वसूल केली जात आहे,
    शेतकर्यांची कोंडी केली जात आहे,
    जो पर्यंत शेतकर्यांचा माल बाजारांत येत नाही तो पर्यंत कोणताही माल दुप्पट तिप्पट किंमतीला ग्राहकाला विकला जातो,
    पण तोच माल शेतकर्या जवळ आला कि बाजारांत दर प्रचंड प्रमाणात घसरतात नव्हे पाडले जातात,
    यातूनही शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो,
    रात्रंदिवस कष्ट करून उत्पादन घेतो
    पण
    सरकारचा जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा,
    आयात निर्यात धोरण शेतकर्यांच्या  मुळावर उठते!
    शेतकरी मेला तरी चालेल पण
    फुकट खाणारा, लांखोंची कमाई असूनही फक्त शेतमालाच्या महागाई बाबतीत बोंबाबोंब करणारा वर्ग जगला पाहिजे हे धोरण
    शेतकर्यांच्या मुळावर उठते आहे,
    जगाच्या बाजार पेठेतून परकीय चलन घालवून शेती माल आयात केला जातोय, पण इथे शेतमाल कवडीमोल दराने जावूनही निर्यात  बंदी करून शेतकर्यांची कोंडी केली जाते आहे,  स्वदेशीचा पुरस्कर करणारे आपण
    विदेशी कंपण्यांना भारतात गुंतवनूक करायला पोत्साहन देत आहोत,
    हजारो कोटीचे कर्ज व टॅक्स उद्योजकांना माफ होतोय
    पण
    सामान्य शेतकरी यांची कर्जमाफी होत नाही,  मध्यम व छोटे व्यापारी यांची टॅक्स साठी वेगवेगळया नियमाने छळवणूक केली जात आहे,
    शेतकरी मालाची वाहतुक व आवक जावक करणारांकडून भरमसाठ टोल वसुली केली जात आहे,
    पण
    चैनीच्या लाखो रुपयांच्या कार गाड्यांचा टोल मात्र माफ होत आहे,
    आंतरराष्ट्रीय बाजारत क्रुड तेलाच्या किंमतही ७० %घटूनही
    ग्राहकाला मात्र पेट्रोल डीझेल महागाईनेच घ्यावे लागत आहे
    शेतकरी विकास फक्त भाषणात व थातूरमातूर योजणात निव्वळ दाखवला जातो आहे,
    शेतकरी व शेतमजूर गोरगरीब आज मरत आहेत व उद्योगपती मात्र आनंदात आहेत
    याचा शेतकर्यांच्या मुलांनी विचार करायला पाहिजे,
    जातीपातीच्या बंधना ऐवजी शेतीसाठी पुरक धोरणे राबणारे जे कोणी काम करेल त्यालाच साथ दिली पाहिजे,
    घरात पिठ नसल्यावर कोणी पावणा रावळा, आपल्या जाती धर्माचा म्हणून पिठ आणून देत नाही,
    शाश्‍वत शेतीचा विकासच देशाला प्रगती करू देवू शकतो

    विजयकाका पिसाळ नातेपुते

    रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

    मन

    मन. . . .

    मन तस प्रत्येकाचं वेगवेगळं असतं . .
    कुणाचं मन  प्रेमाचं भुकेलं असतं. .
    तर कुणाच  मन आपुलकीने भरलेलं असतं. . .
    काळोखात सुद्धा चांदण्याची चममच पाहतं . .
    तर लख्ख प्रकाशात अंधारात चाचपडतं . . .
    कधी कधी ते खोलवर
    तर कधी कधी ते दुरवर असतं . .
    कधी ते खूप भावनिक असतं. .
    कधी ते कठोर सुद्धा होतं . . शेवटी ते मनच असतं . .
    कधी खूप खूप हळवं होतं . .
    तर कधी फुलांपेक्षाही नाजूक होतं . . .
    कधी ते भुतकाळात रमून जातं. . .
    तर कधी भविष्याचा भला मोठा वेध घेतं . .
    आयुष्याचा प्रत्येक  निर्णय हे मनच घेतं . .
    सुंदर आनंदी  काळासाठी नुसती वाट पाहातं. . .
    कधी कधी एकांतात मजेशीर  गाणीही गातं . .
    तर कधी कधी जोडतं निरभ्र  आभाळाशी घट्ट नातं . .
    रमतं कधी स्वप्नात. . .
    कधी जोडतं भावनिक नातं कुणाच्या तरी ह्रदयात. .
    तर कधी हळुवार लपतं कुणाच्या तरी मनात. . .
    नाही अडकत कसल्याही परिघात. . . .
    जगण्याचा आनंद फक्त मानायला मिळते मनातल्या मनात. .
    होतं कधी कधी फुलपाखरू क्षणात. .
    हिंडत असते एकटच रानावनात. . .
    स्वप्नरंजन करतं कधी  जायचं काचेच्या महालात. .
    तर विसावतंं कधी लहाशा झोपडीतं. . .
    मनाला आवडतात नाती , म्हणून आपलेपण पाहतं प्रत्येकात. .
    कळत नकळत घर करतं रे कुणाच्या तरी ह्रदयात. .
    नसलं बळ जरी दमलेल्या शरीरात. .
    तरी खूप उंच उंच भरारी घेतं रे स्वप्नांच्या जगात. .
    मनाला  भास काय  किंवा  अभास काय? नसतो फरक कळलेला , गप्पा गोष्ठी फक्त होतात रे मनातल्या मनात. .
    कधी होतं ते व्यक्त क्षणात. .
    तर कधी गुंतून जातं खोल खोल विचारात . . .
    परिभाषाच वेगळी त्याची , शोधत आनंद स्वप्नात. .
    मनाला काहीच फरक पडत नसतो वास्तवात. .
    मनाची घालमेल ओळखायला सुद्धा प्रेमळ    विचार असावेच लागतात मनात. .
    मन जातं रे , मन येतं रे , मन बोलतं रे मन तोलत रे
    आयुष्याला शोधत शोधत सु़ख दुःख सर्व पाहतं आतल्या आत. .
    मन नसेल तर नसते रे मजा या जगण्यात. .
    विचार तर करा मनातल्या मनात. . . . विजय पिसाळ, नातेपुते . . . .
    ९४२३६१३४४९

    शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

    आमचा २०१६ चा गणेशोत्सव

    आमचा गणेशउत्सव!!!

    गणेशाचे आगमन होणार आणि सगळ्यांना आनंद होणार
    हे तर नक्कीच चित्र सर्वांच्या घरी असतेच
    आमच्या सौं नी घरातील आवरा आवर केली
    मि,माझी मोठी मुलगी विअर्ती,लहान मुलगी स्वेतश्री व छोटे चिरंजीव  हिंदवीर
    असे आम्ही चौघेजण मुर्ती आणायला गेलो आगोदरच ठरल्या प्रमाणेच सगळ्यांत लहान असणारी श्रींची मुर्ती किंमतीत घासाघीस न  करता खरेदी केली प्रसादासाठी
    घरच्या ओल्या नारळाचे मोदक करून व साधेपणाने सजावट इतर कोणताही खर्च न करता गणेश प्रतिष्ठापना केली.
    शेतातील दुर्वा आणि घरीच बनवलेला नैवेद्य व आरती व साधेपणा हे आमच्या कडील वातावरण असते
    मि घरात असो नसो आमच्या सौभाग्यवती नियमीतपणे दोन वेळा आरती व पुजा करतात आणि मुलांना सर्व कामात बरोबर घेतात
    मला आपल्या संस्कृतीत  असलेले सर्व सण उत्सव आवडतात
    आमच्या कडे सगळे सण सर्व सगळ्यां समाजातील लोकांना सहभागी करून साजरे केले जातात
    शक्यतो साधेपणा जपुन
    आपल्या आसपासच्या गरिबांचा विचार करून कोणताही माज न करता आम्ही परंपरा जपतो
    बहुसंख्य आपले बांधव दोन वेळच्या भाकरी साठी धडपडत असताना अनावश्‍यक खर्च करून आपण कशासाठी नसलेल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावे हाच विचार मनात असतो.
    आपल्या परंपरा जपताना सण उत्सव पारंपारिक पद्धतीनं व्हावेत हा आमचा प्रयत्न राहतो
    घरातील वातावरण भक्तिमय व प्रसन्न कसे  राहील आणि सर्वांना आनंद कसा मिळेल हे महत्त्वाचे वाटते
    रोजच्या जीवनातून आपणाला ताण कमी व्हावेत हाच सणावारांचा खरातर उद्देश असावा पण
    नको तिथे शेजारी आणि श्रीमंतांची बरोबरी करण्याच्या नादात आपला खर्च वाढतो व आपले बजेट कोलमडून जाते आणि आपण महागाई व परस्थितीला दोष देतो
    सर्वच मंडळे व लोकांनी कमित कमी खर्चात उत्सव केला,
    वर्गनीचा बोजा कमीतकमी सर्वांवर टाकला व अनावश्‍यक खर्च टाळला व गरीब,गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली
    पारंपारिक वाद्यांचा वापर केला
    कोणत्याही जाती धर्मावर टीका न करता कुणालाही नावे न ठेवता
    आपले उत्सव व परंपरा जपल्या आपल्या उच्च व महान संस्कृतीचे दर्शन घडवले तर मनाला व सर्वच लोकांना किती आनंद होईल!
    सर्व मंडळांनी जर कर्णकर्कश आवाजा ऐवजी सुमधूर आवाजातील भक्तिगीते,भावगीते,व संगीत कला याचा वापर केला तर किती आनंद होईल,
    सिनेमातील गाणी न लावता भक्तिमय वातावरण व व्यसनमुक्त तरुणाई हे चित्र दिसले तर,महान संस्कृतीचे दर्शन घडवत सण उत्सव केले तर
    , सर्वच मंडळांनी स्पर्धा न करता संघर्ष न करता आपल्या एकिचे व महान  संस्कृतीचे दर्शन घडवले  तर मला वाटतं आपण
    महापुरुषांनी घालुन दिलेल्या आदर्शा प्रमाणेच चाललो तर सर्व बांधव एकत्रित आले तर खर्या अर्थाने आपला ठेवा जगापुढे आदर्शवत आहे आणि पुढेही राहील आणि
    भारत जगात आदर्शवत राष्ट्र असेल

    विजयकाका पिसाळ
    आमचा गणेशउत्सव!!!

    गणेशाचे आगमन होणार आणि सगळ्यांना आनंद होणार
    हे तर नक्कीच चित्र सर्वांच्या घरी असतेच
    आमच्या सौं नी घरातील आवरा आवर केली
    मि,माझी मोठी मुलगी विअर्ती,लहान मुलगी स्वेतश्री व छोटे चिरंजीव  हिंदवीर
    असे आम्ही चौघेजण मुर्ती आणायला गेलो आगोदरच ठरल्या प्रमाणेच सगळ्यांत लहान असणारी श्रींची मुर्ती किंमतीत घासाघीस न  करता खरेदी केली प्रसादासाठी
    घरच्या ओल्या नारळाचे मोदक करून व साधेपणाने सजावट इतर कोणताही खर्च न करता गणेश प्रतिष्ठापना केली.
    शेतातील दुर्वा आणि घरीच बनवलेला नैवेद्य व आरती व साधेपणा हे आमच्या कडील वातावरण असते
    मि घरात असो नसो आमच्या सौभाग्यवती नियमीतपणे दोन वेळा आरती व पुजा करतात आणि मुलांना सर्व कामात बरोबर घेतात
    मला आपल्या संस्कृतीत  असलेले सर्व सण उत्सव आवडतात
    आमच्या कडे सगळे सण सर्व सगळ्यां समाजातील लोकांना सहभागी करून साजरे केले जातात
    शक्यतो साधेपणा जपुन
    आपल्या आसपासच्या गरिबांचा विचार करून कोणताही माज न करता आम्ही परंपरा जपतो
    बहुसंख्य आपले बांधव दोन वेळच्या भाकरी साठी धडपडत असताना अनावश्‍यक खर्च करून आपण कशासाठी नसलेल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावे हाच विचार मनात असतो.
    आपल्या परंपरा जपताना सण उत्सव पारंपारिक पद्धतीनं व्हावेत हा आमचा प्रयत्न राहतो
    घरातील वातावरण भक्तिमय व प्रसन्न कसे  राहील आणि सर्वांना आनंद कसा मिळेल हे महत्त्वाचे वाटते
    रोजच्या जीवनातून आपणाला ताण कमी व्हावेत हाच सणावारांचा खरातर उद्देश असावा पण
    नको तिथे शेजारी आणि श्रीमंतांची बरोबरी करण्याच्या नादात आपला खर्च वाढतो व आपले बजेट कोलमडून जाते आणि आपण महागाई व परस्थितीला दोष देतो
    सर्वच मंडळे व लोकांनी कमित कमी खर्चात उत्सव केला,
    वर्गनीचा बोजा कमीतकमी सर्वांवर टाकला व अनावश्‍यक खर्च टाळला व गरीब,गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली
    पारंपारिक वाद्यांचा वापर केला
    कोणत्याही जाती धर्मावर टीका न करता कुणालाही नावे न ठेवता
    आपले उत्सव व परंपरा जपल्या आपल्या उच्च व महान संस्कृतीचे दर्शन घडवले तर मनाला व सर्वच लोकांना किती आनंद होईल!
    सर्व मंडळांनी जर कर्णकर्कश आवाजा ऐवजी सुमधूर आवाजातील भक्तिगीते,भावगीते,व संगीत कला याचा वापर केला तर किती आनंद होईल,
    सिनेमातील गाणी न लावता भक्तिमय वातावरण व व्यसनमुक्त तरुणाई हे चित्र दिसले तर,महान संस्कृतीचे दर्शन घडवत सण उत्सव केले तर
    , सर्वच मंडळांनी स्पर्धा न करता संघर्ष न करता आपल्या एकिचे व महान  संस्कृतीचे दर्शन घडवले  तर मला वाटतं आपण
    महापुरुषांनी घालुन दिलेल्या आदर्शा प्रमाणेच चाललो तर सर्व बांधव एकत्रित आले तर खर्या अर्थाने आपला ठेवा जगापुढे आदर्शवत आहे आणि पुढेही राहील आणि
    भारत जगात आदर्शवत राष्ट्र असेल

    विजयकाका पिसाळ

    शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

    संघर्ष. . .

    संघर्ष. . . . . . .

    विजय पिसाळ नातेपुते . .

    कॉपीपेस्ट जरूर करा पण नीट वाचून करा. .
    कारण बर्याचदा माझ्याच पोस्ट नाव बदलून मला परत येतात तेंव्हा मनाला खूप हसू येते . .

    तर वाचा संघर्ष. . .

    आयुष्यात नुसते  बोलून काहीच उपयोग नसतो , त्यासाठी कठोर परिश्रम व मोठा संघर्ष करावा लागतो.
    असंख्य चढउतार तर हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, कठीण प्रसंग हे जणू परिक्षाच घेत असतात, जो डगमगत नाही , जो खचत नाही , जो अपयश पचवून पुढे पाऊल टाकतो तोच संघर्ष नायक होतो . तोच विजेता होतो, सहज व सोपे वाटेल असे जीवन नसते व जो जीवनाकडे सहज पाहतो तो कधीच यशस्वी होत नाही . नशीबाला व दुसर्‍याला दोष देणारी माणसे भेकड व भित्री असतात. स्वतःचा आत्मविश्वास गमावल्याने ति कधीच यशाला गवसणी घालत नाहीत. अशी माणसे सदैव दुसर्‍यांची गुलामगिरी पत्करून जीवन जगत असतात. जणू धन्याच्या दारात कुत्रे कसे तुकड्यावर समाधान मानते !
     अरे कधीतरी स्वतःच्या मेंदूचा वापर करा , कोण आपला वापर करते , कोण आपल्या जीवावर मोठे होते, याची पारख करा , तुमच्यात हिंमत असते तुमच्यात नेतृत्व करायची धमक असते तरीही तुम्ही मांडलिक म्हणून जगता आणि स्वतःला विसरून जाता.
    आजकाल नुसता विविध कारणांनी वापर करणे, माथी भडकवून, राजकीय, सामाजिक, आर्थिक फायदा करून घेणे जवळपास सगळीकडे चालू आहे . म्हणून जरा विचार करा सत्यता पडताळून पहा, म्हणून आयुष्यातील महत्त्वाच्या तारूण्यातच संघर्ष करायला शिका,   संघर्षा शिवाय यश तर मिळत नाही , शिवाय तुमची दखल सुद्धा कोणी घेत नाही ,
    राजकारणा शिवाय सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्व करु शकता, उद्योजक व्हा, व्यवसायिक व्हा, छोटा मोठा धंदा करा, प्रसंगी किरकोळ जॉब करून पैशाची बचत करून किरकोळ व्यवसायातून मोठे व्हायला बघा पण, गुलामगिरी व लाचारी सोडून जगा !
    उदाहरणच द्यायचे झाले तर,
    शेतीत यशस्वी होणे म्हणजे शेतीतील नेतृत्व, व्यवसायात यशस्वी होणे म्हणजे व्यवसायातील नेतृत्व, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम कराल त्या त्या ठिकाणी तुम्ही टॉपर व्हा संघर्षातून ओळख निर्माण  करा ,
    करोडोंची प्रॉपर्टी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असे नाही तर,  करोडो लोकांमध्ये तुमची ओळख झाली, तुमच्या नावाची परफेक्ट आयडेंटिटी झाली,  तुमच्या कार्याची कामाची प्रेरणा घेऊन नवी पिढी तयार झाली तरच तुम्ही यशस्वी झाला .
    आयुष्यात जगण्यासाठी जरूर पैसा लागतो मात्र पैसा हा सर्वस्व नसतो . . ..तर तो काहीकाळ माध्यम असतो . क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढू नका . खाजगी सावकार गाठू नका , वाटचाल हळूहळू पण शाश्वत करा . . यश तुम्हाला नक्कीच खुणावतेच. . . 
    या धावपळीच्या जीवनात अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो कारण त्यांना कसे जगावे याचा मुळात मार्ग सापडलेला नसतो .
    जो समाज, जो व्यक्ती  योग्य ध्येय ठेवून ते साकार करण्यासाठी संघर्ष करत नाही तो कधीच यशस्वी नसतो . अपयशाला घाबरने व परिस्थितीला दोष देणे यामुळे केवळ मनाचे समाधान होत असते .
    पण संघर्ष करत असताना , पुढे जाताना वाटचाल सोपी नसते, खडतर प्रवास करावाच लागतो , जबरदस्त इच्छाशक्ती ही पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असते , मात्र त्याच वेळी वेगवेगळ्या परिस्थितीमुळे प्रचंड अडचणी येत असतात, मागे खेचणारे सुद्धा समोर ठाकतात  , टिंगलटवाळी करणारेही कमी नसतात, कधी  कधी तर जवळ कुणीही रहात नाही , तोच काळ परिक्षेचा व येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा असतो, अपमान होत असतो, विविध गोष्टींचे शल्य मनाला बोचत असते.  आसपास जणू काळोख पसरलेला असतो , नियतीचे फासे उलटे फिरत असतात भूतकाळातील चुका सदैव  मनाला निगेटिव्ह करत असतात पण   मनगटात ताकद व मेंदूत जीगर असेल तर कितीही भयंकर काळोख असूद्या उद्याचा उषःकाल झाल्या शिवाय रहात नाही . मशाल पेटवायला एक काडी सुद्धा पुरेशी असते मात्र मशालीला पुरेसे तेल मात्र टाकत रहायची खबरदारी घ्यावी लागते .
    त्यासाठी हळूहळू पण मार्गक्रमण करत रहावेच लागते , पण हे करत असताना कुठेही लाचारी व स्वाभिमान घाण ठेवू नका , नक्कीच तुम्ही नायक असाल, दुसर्‍याने दिलेला
    मटणाचा तुकडा व दारूची बाटली याचा मोह टाळा, या क्षणिक मोहापायी जीवन उध्वस्त करू नका,  या पेक्षाही जीवन काहीतरी वेगळे आहे हे विचारात घ्या .
    'विनयशील व नम्र असने ही कमजोरी नाही तर भविष्यातील महान व्यक्तीमत्वाची ती प्रचिती आहे'
    मानवी जीवनात विनाकारण वाद घातल्याने व  किरकोळ लोभापाई असंख्य शत्रू निर्माण केल्याने मोठे होण्याची कल्पना तात्पुरती व क्षणिक यशस्वी होते मात्र दीर्घकाळासाठी तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही .
    फसवणूक करून करून किती लोकांची करता येते , दोन, चार, पाच,  फार फार तर पाच पंचवीस पण जर बदनामी  सुरू झाली तर, मात्र  बदनामी तुम्हाला खायला उठते , दुसऱ्यांना लुटून तुम्ही जगाला कधीच जिंकू शकत नाही ,
    म्हणून योग्य मार्गाने संघर्ष करा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचल्या शिवाय रहात नाही .
    परमेश्वरावर नितांत श्रध्दा व आदराची भावना असूद्या पण अमुक नवस केल्याने , तमुक मला फायदा होईल या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडा . .
    हातपाय नसलेली माणसे सुद्धा संघर्ष करतात, ध्येय निश्चित करून वाटचाल करतात व यशस्वी होतात मात्र शरीराने धडधाकट असणारे , समाजाचे थोडेफार पाठबळ असणारे  इतरांवर अन्याय करतात, असाह्य लोकांची पिळवणूक करतात, आयुष्यात दुसर्‍याच्या जीवावर जगण्याचा शॉर्टकट निवडतात पण असे लोक कधीच मोठे झालेले दिसत नाहीत. .
    म्हणून मार्ग निवडताना सत्याचा व कामावरील निष्ठेचाच असायला हवा .
    कधी कधी गोड फळ मिळायला सुद्धा उशीर लागतो म्हणून तुमचा मार्ग बदलू नका .
    जेंव्हा तुमचा मार्ग निश्चित असेल तेंव्हा तुमचा प्रवास खडतर असून सुद्धा पुर्ण झाल्या शिवाय रहाणार नाही . .
    मानवी जीवन हे साधे सोपे व सरळ असायला हवे , रोजच्या जीवनात  माणसे जोडायला हवीत, मतभेद असो कि विचारांत फरक असो पण मनभेद व दुरावा असता कामा नये .
    जाती धर्माचा, अभिमान बाळगा, देव देवतांचे उपासक व्हा मात्र त्या गोष्टींचे कुठेही अवडंबर माजवू नका, माज करू नका , आणि अनावश्यक कर्मकांडात गुंतून सुद्धा पडू नका, तुमचा संघर्ष हा  ध्येयप्राप्तीचा व सत्यमार्गाचा असायला हवा .

    विजय पिसाळ नातेपुते . .
    ९४२३६१३४४९

    बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

    संस्कृती

    संस्कृती . . .

    विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    संस्कृती म्हणजे काय तर साधे आणि सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर, आजच्या आधुनिक जगात बदलत्या वातावरणात आवश्यक थोडेफार बदल स्विकारून  आपल्या चालीरीती अबाधित ठेवून मानवी जीवनातील  उच्च मुल्ल्यांची जपणूक करणे यालाच आपण संस्कृती असे म्हणू शकतो !
    या संस्कृतीचा ठेवा हा विविधतेने नटलेला आपल्याला दिसून येतो !  संस्कारातून व
    संस्कृती मधून घरात, परिसरात जे घडते तेच आपल्या मनावर बिंबवले जाते , लहानपणापासून, ज्या समाजात आपण वाढतो , ज्या प्रकारे आपल्याला वातावरण मिळत जाते त्याच प्रकारचे संस्कार आपल्या मनावर होत असतात,
    धार्मिक गोष्टी असतील, उपासना असेल, किंवा होणारे घरातील छोटे मोठे कार्यक्रम असतील, त्या प्रमाणे आपली जडणघडण होत असते ,
    अमुक तमुक  केले तर काहीतरी मिळेल हेही आपल्या मनावर खोल रूजवले जाते , त्याचाही आपल्या आयुष्यावर बराच परिणाम होतो !
    आपल्या संस्कृती मध्ये सदैव सत्याचा मार्ग सांगितला जातो, पुण्यकर्म, दानधर्म  करायला शिकवले जाते, सेवा करणे हाच एक पुण्याचा मार्ग आपली संस्कृती सांगत असते , मग ति सेवा देवाची असो की, रंजल्या गांजलेल्यांची असो , त्यातून मनुष्याला परोपकारी करण्याचा मार्ग सांगितला जातो .
    भिती साठी का होईना पाप पुण्य सांगून मनुष्याला सत्यमार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केले जाते हीच आपली संस्कृती आहे , (अज्ञानाचा गैरफायदा घेणारे आजकाल सगळीकडे आहेत तो भाग निराळा)
    संस्कृती व संस्कार या नाण्याच्या दोन बाजू आहेत,
    दोन्ही पैकी एक गोष्ट जरी जीवनात नसेल तर मनुष्य परिपूर्ण बनुच शकत नाही . ज्या परिस्थितीतून, ज्या परिसरातातून, ज्या वातावरणातून आपण येतो त्याच   संस्कृती मधून जन्मताच काही गोष्टी लागू होतात तर संस्कार हे मानवाला परिपूर्ण करतात.
    आपल्या संस्कृती मध्ये अहिंसा व सहिष्णुता याला जास्त महत्व आहे व ते करण्यासाठी व तसे संस्कार होण्यासाठी विविध पुजा , उपवास, व अनमोल अशा विविध धर्म ग्रंथांचे वाचन करायचे असते किंवा ते कुणाकडून तरी कानी पडावे लागते !
    या सर्व गोष्टी मुळेच आपली संस्कृती टिकून आहे . ज्या ज्या राज्यकर्त्यांना संस्कृती कळली किंवा तसे त्यांच्या मनावर संस्कार झाले ते ते राज्यकर्ते किंवा राजे भारताच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटून गेले , त्यांनाच लोकांनी सदैव प्रेम दिले .
    आपल्या संस्कृती मध्ये , शिक्षण, धर्म, राजकारण, शेती अशा विविध विषयांवर मंथन होत आले आहे . सामाजिक जडणघडण व अभिसरण हे त्यातूनच होत असते . .
    भारतीय नागरिकांची विविध ठिकाणी , संस्कृती जरी थोड्याफार फरकाने विभिन्न असली तरी , सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना आहे , सहिष्णुता आहे , विविधते मध्ये एकता जपण्याची परंपरा आहे .
    विविध चालीरीती , विविध भाषा,विविध पेहराव, प्रदेशानुसार  शारिरीक व कलर मध्ये होणारे बदल हे जरी बाह्य रूपाने वेगवेगळे वाटत असले तरी गाभा मात्र एकच आहे , म्हणून आपल्या देशात विविधतेत एकात्मता दिसून येते .
    प्रांतीय वाद, भाषिक वाद, धार्मिक वाद, जातीयवाद, साधन संपत्तीच्या वाटनीतून निर्माण होणारे वाद, या सर्वांचा परिणाम जरी संस्कृतीवर होत असला तरी , ९५%जनता ही कोणत्या तरी देवाची , कोणत्या तरी पंताची उपासक आहेच. व त्यातूनच धार्मिकता येत गेलेली आहे . .
    म्हणूनच दक्षिणचा मनुष्य उत्तरेकडील देवांची यात्रा करतो किंवा उत्तरेकडील मनुष्य दक्षिणेतील मोठमोठय़ा मंदिरात जात असतो . .
    म्हणून आपण एकसंघ आहोत व एकसंघ असल्यानेच आपली संस्कृती महान आहे . 

    विजय पिसाळ नातेपुते .
    एम ए राज्यशास्त्र
    ९४२३६१३४४९

    सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

    आयुष्याचे सार्थक कधी होईल!

    **आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

    **भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
    **विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९
    **मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
    **आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
    मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
    **या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
    मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
    **आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
    **ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
    **मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
    दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
    **साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
    **कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
    **तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
    **यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
    **काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
    आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
    **प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
    आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
    लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
    बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
    शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
    जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
    म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
    या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
     विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    हिंदू धर्म

    हिंदू धर्म. . . .

    धर्माला , देवाला नावे ठेवणं तसं फार सोप्पं असतं त्यातल्या त्यात असंख्य लोकांना दुसर्‍याच्या धर्माला जास्त नावे ठेवायला आवडते !
    पण धर्म समजून घेणे त्याचे रोजच्या जीवनात आचरण करणे तसे महा कठीण काम!
    शिव्या घालायला थोडेच पैसे लागतात!
    म्हणून धर्म जाणून घ्या , वाईट प्रवृत्तींकडे लक्ष देवू नका , सर्वच धर्मात वाईट लोक असतात म्हणून धर्माला वाईट म्हणता येत नाही !
    आजही ९९% धर्माचे पालन करतात पण, ते स्वतःच्या पातळीवर करतात!
    काही मतभेद असतात, मात्र त्याचे रूपांतर मनभेदात होवू नये !
    चर्चा करताना धर्मातील अनिष्ट प्रथावर बोलताना कोणी मार्ग सांगितले म्हणून लगेच त्याला धर्मद्रोही म्हणू नये !

    हिंदू धर्म आहे की हिंदू संस्कृती आहे की, जीवन जगण्याची कला आहे हे निश्चित पणे मला तरी  सांगता येत नाही ,पण
     माझ्या मते
    मनःशांती साठी प्रार्थना करणे  माता पिता व संस्कृती या बद्दल कृतार्थ भाव असणे . .
    गुरू बद्दल आदर, पुर्वजा बद्दलचा अभिमान, जेष्ठांचा मानसन्मान, ज्या  चराचरात आपण रहातो खातो, पितो वाढतो , याच्या संवर्धनासाठी,  त्याचे जतन करण्यासाठी,  विविध मार्गाने त्याची उपासना करणे म्हणजे संस्कृती जपणे हीच ति संस्कृती आहे . .
    जिथे, सुर्य चंद्र तारे ग्रह यांची उपासना केली जाते !  देव देवतांना मानुन उपासना केली जाते, उपवास केले जातात,
    त्यामुळे शरीर व मन शुद्ध होते ! थकवा कमी होतो !
    देवाला नमस्कार केल्याने देव प्रसन्न होईल की नाही मात्र देवालयाच्या पायर्या चढताना , फेर्या मारताना निश्चित शरीराला फायदाच होतो . .
    देवाच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपल्याच गोडधोड मिळते , नव नवीन पदार्थ खावून आनंददायी जीवन जगता येते !
    हीच शिकवण सर्व  धर्मामध्ये असते . . .
    कारण  धर्मीक कार्यातून व सर्वच गोष्टीतून,
     प्रत्येकातून मानवाला आवश्यक अशी उर्जा प्राप्त होत असते . . त्यांचे मानवी जीवनात असाधारण महत्व आहे !
    या नैसर्गिक गोष्टीतून मानवी जीवन समृद्ध बनत असते . . जसे
    निसर्गातील उर्जा असेल तरच अन्न वस्त्र निवारा यांची निर्मिती होते म्हणून आपण निसर्गातील, वेली , पाने , फुले , फळे , याचा जगण्यासाठी उपयोग करत असतो . . तसेच
    परमेश्वराच्या नावाने आणलेले फुल देवघरात देवाला वाहिल्यानंतर संपुर्ण घरात सुगंध दरवळू लागतो हाच भाव देव पुजेमागे असावा असे मला तरी वाटते . .
    देव आहे की नाही यात न जाता . .
    त्याची पुजा अर्चा श्लोक पठण, आरती उच्चारण,  केल्याने मन तर प्रसन्न होतेच पण आपल्या वाणीमध्ये मधुरता येते , पाठांतराची आवड निर्माण होते . .
    एक प्रकारे  चांगले वागण्याचे मनावर संस्कार होत असतात!
    या साठी सर्व गोष्टी स्वतः करायच्या असतात,असतात,हो  केवळ स्वतःच!
    बाहेरील गुरूजी बोलावून पारायण केल्याने , किंवा पुजा घातल्याने स्वतःवर संस्कार ते काय होणार?
    कार्यक्रम केल्याने  लोकांना खायला घालून लोकांना सोबत घेतल्याने जरूर मनाला आनंद मिळतो पण तेही करताना आपली आर्थिक परिस्थिती बघून करावे . . .
    नुसते पुण्य लाभेल या भ्रमात न राहता . .
    असंख्य लोकांना गाव जेवण घालून थोडेच पुण्य लाभते ?
    त्यासाठी सत्कर्म करावे लागते . .
    रोजच्या जगण्यात सत्यपना लागतो , कुणाचीही फसवणूक आपल्या हातून होता कामा नये !
    हाच हिंदू धर्म सांगतो
    केवळ एखादा सत्यनारायण घातला तर फक्त. .
    गुरूजी येणार त्यांच्या वेळेच्या नुसार थोडेफार मंत्र उच्चारण करणार पण ते आपल्या डोक्यात काय जाणार?
    त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास. .
    जोपर्यंत एखादी गोष्ट आपण स्वतःहून आवडीने करत नाही , तिची सत्यता पडताळत नाही   तिचा सर्व कसोट्यावर  अभ्यास करत नाही , तोपर्यंत तिचा फायदा किंवा तोटा कधीच आपल्याला समजत नाही . .
    हिंदू संस्कृती ही देव, देवळे, पुजा अर्चा , अभिषेक, नारायण नागबळी या पुरती नुसती  मर्यादित नाही तर ति खूप महान व विशाल आहे , तसेही ही  कर्मकांडे करण्याची  गरज नाही ! हिंदू धर्मातील परंपरा थोर आहेत. .
    हिंदू  संस्कृती कितीतरी मोठी आहे , या संस्कृतीचा आणि भारतीय जनतेचा तसाही खूप मोठा संबंध आहे .
    हिंदू संस्कृती ही कृषी संस्कृती आहे म्हणून हिंदू संस्कृती मध्ये गायीला पवित्र स्थान आहेच  ,,मात्र  प्राण्यासाठी सुद्धा सण उत्सव आहेत,  गाईचे  दुध दुपते व तिच्या पासून मिळणारे पशूधन हे शेतीसाठी आवश्यक आहे!  यातील काही गोष्टी  खूप मनाला भावतात आणि कुठल्याही संस्कृती मधील ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच स्वीकारायच्या असतात. .
    वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो
    तसेच या हिंदू संस्कृती बाबतीत आहे
    यात काही चुकिची कर्मकांडे, चातुरवर्ण व्यवस्था , जातीभेद हे तसेही चुकच आहेत,
    कुणाला उच्च कुणाला नीच समजने हेही गैर आहे
    मात्र हिंदूच्या  सर्वच धर्मग्रंथामध्ये या वाईट गोष्टींचे कुठेही समर्थन दिसून येत नाही . . .
    काही ठिकाणी घुसखोरी झाली असेलही . .
    पण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . .
    आपली संस्कृती कोणत्याही समुदायाचा द्वेष करायला शिकवत नाही . . . कोणत्याही जातीचा द्वेष करणे हि आपली परंपरा नाही ,
    म्हणून आपली असलेली हिंदू संस्कृती अबाधित राहिली पाहिजे !
    ति आपली आहे , तिचे महत्व मोठे आहे ति संस्कृती परकीय  लोकांची नाही !
    या भुमिवरील पवित्र हिंदू धर्माचे कोण वाटोळ करत  तर नाही ना याचाही विचार करूया !

    धर्म हि गोष्ट पवित्र आहे, त्यात शांती असते, त्यात जीवन जगण्याचा मार्ग असतो . .
    धर्म हा अभ्यासाचा विषय आहे . .
    कुणी राजकीय फायद्यासाठी धर्मचा वापर करू नये, केवळ आणि केवळ राजकारण धर्मात आल्यामुळे धर्मात विविध विचार प्रवाह निर्माण झाले . . राजकारण विरहित धर्म जपला पाहिजे तरच सर्व हिंदू बांधव एकत्र येवून जगाला आदर्श असा हा देश बनवू शकतील!  पण .
    राजकीय लोकांमुळे धर्म बदनाम होत आहे ! 

    विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

    देव

    देव. . . .

    देव समजने . . देवावर भाष्य करणे तसे महा कठीण आहे पण एक विचार मनाला पडलेले प्रश्न देवापुढे मांडावे म्हणून हा लेखन प्रपंच. .

    मला माझ्यासाठी काहीही नकोय पण देवाच्या शोधात आहे . मि . .
    तसाही मि नास्तिक नाही , परमेश्वरावर माझी नितांत श्रद्धा आहे . मला तर  देवाचा शोध घ्यायचा आहे.  पण माझी तेवढी तपश्चर्या नाही , त्यामुळे मला देव भेटणार नाही पण माझी देवाच्या बाबतीत जी माझी विचारधारा आहे, जी  कल्पना आहे . ति तरी मांडवी म्हणतो . .
    मला तसाही कोणत्याही पोतीपुराणाचा ,धर्मग्रंथाचा   बिलकुल अभ्यास नाही,  त्यामुळे मग मला जो आजपर्यंत देव सांगण्यात आला तोच मि खरा माणत आलो . . .
    कुणी देवाचे नामस्मरण करायला सांगितले ते मि करायचा प्रयत्न केला , कुणी रात्रंदिवस जप तप करायला सांगितले तेही करण्याचा माझ्या परीने प्रयत्न  केला  ,
    कुणी मला देवासाठी प्रार्थना करायला सांगितल्या ते पण झाले , कुणी मला उपवास करायला सांगितले ते पण केले .
    कुणी सांगितले देवाला फुले आवडतात तिही वाहिली . .
    कुणी सांगितले अभिषेक घाला. . नारळ फोडा . . देवाला भरपुर दक्षिणा ठेवा तेही केले , अन्नदान करा तेही केले ,
    गोडधोड नैवेद्य करा ,
    एकादशी धरा, चतुर्थी करा, ते पण केले . .
    पण मला तरी अजून देव काही कळला नाही . .
    मि तरीही देवाची मनोभावे पुजा अर्चा जे जे सांगितले ते ते सर्व केले पण देव अजूनही कळालाच नाही . .
    सतत मन विचारात असते ,देव म्हणजे काय?  तो कसा असेल? मालिकेत दाखवलेला की , मंदिरात कोरलेला की, संत महात्मे , महाराज यांनी सांगितलेला . .
    पाप म्हणजे काय?
    पुण्य म्हणजे काय?
    कसं ठरवायचं हे , कुणी कुणी तर कुणाच्या तरी सांगण्यावरून  देवासाठी जागरण करतो  , कुणी गोंधळ घालतो (करतो ).  कुणी
    देवाच्या नावाने बोकड, कोंबडा याचा बळी देवून शांतता करायला सांगतो .
    अरे वेड लागायची वेळ आली पण देव समजेना . .
    कुणी शुभ्र वस्त्र परिधान करतो ओल्या कपड्याने पुजा घालतो व महाराज होतो, कुणी भगवी , कुणी हिरवी कपडे घालून देवाचा कट्टर भक्त असल्याचे, साधू बैरागी असल्याचे भासवतो . कुणी वेगवेगळ्या कथा सांगतो संदर्भ देतो . . भक्त करायला सांगतो !
    काहीजण आपल्या बुद्धी चातुर्यातून गोड ओजस्वी , मधाळ वाणीतून आपआपल्या परीने देव सांगत असतो !
    खरच कित्येक महाराज, कित्येक, प्रवचनकार, किर्तनकार, सन्यासी यांचे कडून देव ऐकला पण अजून नाही समजला ! प्रत्येकाची मांडणी वेगळी, सांगण्याची कला वेगळी, आणि स्वतःच्या कल्पनेतून  देव सांगण्या पाठीमागचा सुप्त हेतूही वेगळा . .
    पुरता गोंधळ निर्माण झाला , काय करावे , हिमालयात जावे कि आश्रमात जावे कि अजून कुठे कुठे शोधावे देवाच्या रुपाला . कोणती पुस्तके वाचावीत प्रत्येकात वेगळेच?
    खरचं नारळ फोडून देव पावतो का ?
    खरचं देवाला नवस केलेला चालतो का ?
    असे हजारो प्रश्न मनात काहूर निर्माण करतात,
    जगातील जवळपास ९० %लोक देवाला मानतात, तसा मिही देवाला मानतो .
    पण मन मात्र देवाच्या सानिध्यात कधी लागत नाही तर का बरं असे घडते ! मि भाग्यवंत नाही , मि लायक नाही !
    देवाच्या नावाने जे चालू आहे तेच देव कसे सहन करतो याच विचारांत मन  गुंतून जाते रे  !
    किती बोकडे, किती कोंबडे, कापले  किती तरी पाने फुले , झाडी कापली , तोडली यज्ञ झाले देवाच्या नावाखाली तरीही देव शांत असतो . ..मुक्या प्राण्यांचा छळ करून वेदना देवून दुध काढलेले , देवावर ओतले जाते, दही , तुप, बरेच काही !
    परमेश्वर, देव या एकाच गोष्टी मुळे मनात कधी श्रद्धा तर कधी भितीही उत्पन्न होते , देवापासून दुर गेले तर नास्तिक म्हणून संभावना व देव भेटण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देव काही भेटेना ! हे द्वंद्व कधी संपणार?
     प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना,  कल्पना , यातून होणारा गोंधळ हे सर्व   केले तरी देव कधी भेटेल याचाही कुणीही शाश्वत मार्ग  सांगत नाही,  जणू  मार्ग मिळणे कठीण?
    काय करावे . . . दुष्काळ पडला ,
    पुर आला , भुकंप आला . . नैसर्गिक आपत्ती आली कि काहीजण या भूमिवर पाप जास्त झाल्याचे कारण देतात व अंतिम सांगतात देवाचा प्रकोप झाला . . मन विषण्ण व्हावे असे काही तरी सांगितले जाते . .
    देवभूमीत जेंव्हा जेंव्हा प्रकोप होतो तेंव्हा सरसकट पापी पुण्यवंत असा कुठलाही भेदभाव झालेला आजपर्यंत तरी  पहायला मिळाले  नाही ,,पुण्यवंत वाचलेला दिसत नाही कि पापी दुराचारी संपलेला दिसत नाही ,  प्रचंड पुराचे पाणी असो की, अजून भूकंप असो लहान लहान चिमुकली बाळे . . आयुष्यभर कुणालाही कसलाही त्रास न देणारी चांगली माणसे हो जी माणसे रात्रंदिवस जप तप करत होती, पुण्याचा मार्ग सांगत होती तीही  क्षणात अर्तकिंकाळ्या देवून विव्हळत औषध पाण्याविना तडफडत मरत असताना नाही पहावत . . देव कसा असा प्रकोप करेल?
    त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा कसा विध्वंस करेल. . कित्येक उपासक साधक हे केदारनाथला वाहून गेले क्षणात सारे संपले . . होय का घडावे हे . . .
    मन सुन्न होते मन खिन्न होते ह्रदय पिळवटून जाते . .
    मला देव बघायचाय मला देव शोधायचाय. . या साठी काय करावे हेच सुचेना . .
    सुसंस्कृत देव भूमीवर  आज बलात्कारी, दहशतवादी , गुंड, पुंड, चिरीमिरी साठीही खून करणारे ,  माजलेले पाहतोय रोज. . पांढर्या पेशात पुढारी असो कि उद्योगपती लुट करतायत, ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत देशाची बिनबोभाट लुट होते , आणि सर्वच पक्षीय ति करत आले आहेत,  याच भूमीवर गरिबांच्या तोंडातून घास काढून, सरकारी बँका ,पतसंस्था ,  साखर कारखाने , मोठ मोठे सरकारी ,  उद्योग  सरकारी तिजोर्या लुटल्या गेल्या,  हजारो कोटी बुडवले गेले , कित्येकांची संपत्ती लाखो कोटींची झाली . .
    सत्तेवर जो असेल तो चार पाच वर्षात हजारो कोटींचा मालक होतोय, राजकारणी कुणीही असो ?  काबाडकष्ट कष्ट करणारा मात्र उपाशी राहतोय. .
    तरीही पाप पुण्याचा हिशेब लागेना देवा . .
    तरीही तुझ्यावरील माझी भक्ती , श्रद्धा तुसभर देखिल कमी होत नाही व होणारही नाही देवा . .
    पण मला तुला शोधायचय. .
    हो आज मला देव भेटला पाहिजे . .
    रस्त्यावर फिरणाऱ्या भिकार्याचे अश्रु पुसण्यासाठी, वेश्या गृहात जबरदस्तीने पळवून नेहून डांबून ठेवून रोज बलात्कार सहन करणार्‍या नाबालिकांना न्याय देण्यासाठी . . घरात घुशी उंदर खेळणार्या झोपडपट्टीतील बांधवांना किमान पाय लांबवुन झोपता यावे यासाठी . .
    रोज कर्जापाई कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मला देव भेटला पाहिजे . . कोणताही उपवास करेन मि, कोणताही नवस करेल पण मला देव भेटला पाहिजे . .
    बैलापेक्षाही काबाडकष्ट करणार्‍या पाट व पोट खापाटीला गेलेल्या व दोनवेळच्या घासासाठी ८० वय असतानाही धड चालताही येत नाही अशा अवस्थेत  जगण्यासाठी लोकांच्याकडे मोलमजुरी करणार्‍या वृद्ध आजी आजोबांसाठी मला देव शोधायचाय. .
    होय मि देवा तुझी आराधना करेल, होय सर्व कर्मधर्म करेल पण तु भेटला पाहिजेस. .
    दहा दहा किलोमीटर चिखलातून, झाडीझुडपातून काट्याकुट्यातून शाळेसाठी जेंव्हा मुले मुली जाताना पाहतो ना तेंव्हा इथल्या राजकीय नेत्यांना सुबुद्धी दे हेच मला सांगायचेय तुला . .
    गरिबांच्या रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजार बघवत नाही रे ,  घरकुलाच्या बिलासाठी चिरीमिरी खाणारे . . मुलांसाठी आलेला तांदूळ सुद्धा खातात रे देवा . .
    मि आवाज नाही उठवू शकत रे,  आवाज उठवणारा या ठिकाणी मारला जातो . .
    तुझ्या नावाने जो बाजार मांडलाय तो मला पहावत नाही त्यासाठी तुझीच मदत लागेल मला कारण मला कोण पाठिंबा देणार?  कारण मि असंख्य लोकांच्या जगण्यावर भाष्य करतो म्हणून तुच साथ दे बाबा . .
    कदाचित कुणीही मला काम करू देणार नाही .
    लगेच गुंड पुंड छळतील रे बाबा म्हणून तु साथ दे . .
    माझ्यावर आरोप लावले जातील मला बदनाम केले जाईल पण देवा जे चालू आहे ते तरी कसे पाहू . .
    तुझ्या नावाखाली गरिबांच्या अज्ञानाचा , कमी शिक्षणाचा अचूक फायदा घेऊन लुट चालू असते रे देवा . .
    देवा जे जास्त शिकलेले आहेत त्यांनाही वेडे केले जाते . त्यासाठीच संमोहण शास्त्र आहेच की , बदलत्या वातावरणामुळे होणारे आजार, घरातील कटकटी , विविध बाह्य घटकांचा होणारा रोजच्या जीवनातील बदल अचूक हेरला जातो, वाढती लोकसंख्या गंभीर समस्या निर्माण करते रे मग त्यातून एकतर तुझ्या नावाखाली किंवा पुर्वजांच्या नावाखाली किंवा वास्तुशास्त्रातील दोष सांगून तथाकथित सुशिक्षित लोकांनाही  वेडे बनवून, घरात मोडतोड करायला सांगून, विविध शांती करायला सांगून मोठा गोरखधंदा राजरोसपणे चालतोय देवा . .
    पण जो कोणी धारिष्ट्य दाखवेल तो वैकुंठाला तरी पाठवला जातोय किंवा मॉर्निंग वॉकला जाताना मारला तरी जातोय. ..मारली गेलेली तुच बुद्धी दिलेली लेकरे होती ना ?
    तु जशी बुद्धी दिली , तु जशी अज्ञा केली तसेच ति तुझी लेकरे लिहणार ना ?
    तुच या जगताचा चालक पालक व तुच त्राता आहेस ना ? मग तुझ्या लेकरांना मारताना तु का पाहतोस तु का तुझ्याच दोन लेकरांत वाद निर्माण होतात, तुझे नियंत्रण कमी झाले की काय? 
    हो देवा कसा उलघडा करावा याचा ? तुझ्याच एका लेकरांनी तुझ्याच दुसर्‍या लेकरांचे   कितीही खून केले ? किती खून  पचवले पण
    त्यांना का  नाही लागत पाप? का देत नाही शिक्षा ?
    देवा जागृत हो तु, तुझी ही पावन व पवित्र भुमी आज रक्त रंजीत होतेय रे ?
    मला तु भेटला पाहिजे देवा . .
    मन व्याकुळ आहे तुला भेटण्यासाठी . .
    तुझ्या नावाने लाखोंचे चढाव होतात. .
    लाखोंची वर्गनी गोळा होते . . तिचे काय होते कोण जाणे . . .
    करोडोंची उलाढाल चालते पण तुझाच पैसा तुझी मनोभावे पुजा उपासना करणार्‍या , ज्यांनी हा पैसा तुझ्या दानपेटीत टाकला , त्या गोरगरीब कष्टकरी, आत्महत्या करणारे शेतकरी यांच्यासाठी तु वापरायला कधीतरी सांग रे . . त्यांना . . .
    तुच निर्माण केलेली काही तुझीच लेकरे तुझ्या नावाखाली खूप मोठी होतात रे , बंगले,  गाड्या , तुप रोटी सर्व मिळते त्यांना व दुसरीकडे तुझीच लेकरे झोपडपट्टीत, स्वतःची जागाही नसते त्यांना वाईट अवस्थेत जगतात उपाशी मरतात. .
    कशासाठी त्यांची निर्मिती करतोस रे बाबा ?
    तु तर सर्वांची निर्मिती करतो तुच पालनपोषण करणारा , तुच दीनदुबळ्यांचा त्राता  , अरे हेच गरिब तुझ्यावर जास्त निष्ठा ठेवतात, सर्वकाही तुझी भक्ती करतात पण तु त्यांच्याकडे काहीतरी पहात जा ?
    अरे तुझ्याच लेकरातून कसाकाय भेदभाव करतोस  रे तु, कुणाला तु उच्च कुळीत!  कुणाला तु एकदम कमी लेखल्या जाणार्‍या जातीत कसे टाकतो ?
    तुच  का ही उच्च निचता नष्ट करत नाही . .
    कशासाठी हा माणसा माणसात भेदभाव करतोस. .
    तुझी पुजा, अभिषेक,  एखाद्या भिकार्याच्या हातून होवू देत की,
    व्हीआयपी पास, व्हीआयपी दर्शन रांगा यातही तु गरिब श्रीमंत असा का भेदभाव करतोस. .
    कुणाला शे पाचशे दिले की , तुझे डायरेक्ट दर्शन देतात रे करून हे लोक. .
    पायी चालणारा ३० दिवस घरदार सोडणारा , ऊन, पाऊस, वारा, याची तमा न बाळगणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी ४८ तास तुझी वाट पहावी लागते रे. मात्र जनतेला रोज फसवणारे, खोटे बोलून जनतेचा पैसा लुटणारे , शाळा कॉलेज महाविद्यालय स्थापन करून हजारो कोटी डोनेशन घेऊन मोठे झालेले तुझ्या जवळ लगेच कसे येतात? तुझ्याच मंदिर समितीचे अध्यक्ष सुद्धा होतात!  दर्शनाला तुलाही पायी चालणार्या भक्तापेक्षा श्रीमंत भक्त जास्त भावतात का ?
    पांडूरंगा कधीच वारीत न चालणरा तुझ्या पवित्र मंदिर समितीचा अध्यक्ष होतो . त्याची नियुक्ती करतानाही सरकारला तु सुबुद्धी देत नाही !
    असंख्य निःस्पृह असताना श्रीमंतच कसा अध्यक्ष होतो . .
    म्हणून मला देवाला भेटायचय. .
    मि ऐकांतात असतो तेंव्हा देवा मन व्यथित होते रे . .
    एकिकडे भरभरून असताना दुसरीकडे मात्र दोनवेळचे जेवण सुद्धा नसते रे या पवित्र भुमिवर कशासाठी निर्माण करतो गरिबांना ?
    ठेवायचे असेल तर सर्वांनाच समान ठेव ना ?
    नाहीतर फक्त श्रीमंतांनाच जन्माला घाल की ?
    माझी तक्रार नाही ही माझी तुला विनंती आहे . तुझ्या जवळ येण्यासाठी बरेच जण
     रात्रंदिवस नामस्मरण करायचा सल्ला देतात, जप तप करायला सांगतात, मग मला प्रश्न पडतो तुझ्या चरणी जागा मिळावी म्हणून सगळेच नामस्मरण करायला लागले तर शेती कोण पिकवणार  . . तुला लागणारे अभिषेकाच्या  दुधा साठी गायी कोण पाळणार?
    मजूरी कोण करणार, कारखाने कसे चालणार. .
    सगळे बंद पडल्यावर जनता काय खाणार?
    तु कष्ट करणार्‍यांना भेटणार नाही का ?  तुला फक्त नुसता जप करणारेच हवेत कष्ट करून कोट्यवधी लोकांची भुक भागवणारे नकोत? त्यांना तुझ्या ह्रदयात जागा नाही का ?
    त्यांना तु कधी प्रसन्न होणार नाही का ?
    देवा सांग मार्ग तुझ्या जवळ येण्याचा !
    अजून बरेच देवा तुझ्या कडे मागायचेय, तु जशी बुद्धी देशील तसे लिहायचंय, मि हे लिहतोय तेही तु दिलेल्या बुद्धीनुसार, तु दिलेल्या हातांनी राग नको मानु !
    मला तुच दिलेली बुद्धी आहे , तुच दिलेले हे शरीर आहे व तुच जे माझ्या बुद्धीला सुचवले तेच लिहतोय!
    माझे यात स्वतःचे काहीही नाही !

    विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

    आरक्षण का व कशासाठी ! दिले गेले ?

    आरक्षण का द्यावे लागले ?
    काही लोक म्हणतात की , सर्वांना समान संधी द्या , आरक्षण बंद करा , आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा . . वगैरे वगैरे बरीच चर्चा चालू असते !
    शेवटी ज्याची जशी विचार करण्याची पातळी तशी त्याती प्रतिक्रीया . .
    स्वतःच्या डोक्याचा वापर न करता , पुर्व इतिहास न तपासता , कसलाही अभ्यास न करता वाटेल बोलणारे लोक आपण विविध समाजात विशेषतः तथाकथित उच्चवर्णीय लोकात पहात असतो !
    भाग पहिला . .
    घटनेत आरक्षण का द्यायची वेळ आली . .
    भारत हा देश जातीच्या चौकटीत चातुरवर्ण व्यवस्थेत विभागला होता . .
    स्वतःला उच्चवर्णीय समजणारा काही वर्ग
    दलित आदिवासी व तत्सम मागासलेल्या जातींना हीन वागणूक देत होता , त्यांना रहायला सुद्धा गावकुसाबाहेर जागा दिली जात होती . .
    त्यांना सार्वजनिक ठिकाणी कमी लेखले जात होते . .
    त्यांना हालकी व कमी दर्जाची कामे दिली जात होती . .
    त्यांना अशाप्रकारे वागणूक दिल्याने तो वर्ग पुर्णपणे खचला होता, तो वर्ग सर्व साधनापासून उपेक्षित होता . .
    अशा कमजोर वर्गाला कुणीही सरकारी नोकरीत ठेवत नव्हते , कायम दुय्यम स्थान दिले जात होते . .
    अशा वर्गावर उच्चवर्णीय लोक अन्याय अत्याचार करत होते , त्यांचे विविध मार्गाने शोषण केले जात होते परिणामी या मागासलेल्या वर्गाला कुठेही प्रतिनिधीत्व मिळत नव्हते त्यामुळे त्यांना कुठेतरी जगता यावे मुख्य प्रवाहात येता यावे या साठीच प्रथमता कोल्हापूर चे  छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे संस्थानात आरक्षण चालू करून न्याय देण्याचा पहिला प्रयत्न चालू केला म्हणून त्यांना सर्वजण आरक्षणाचे जणक म्हणतात. . .
    त्या संस्थानातील आरक्षणाचा अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरवातीला फक्त
    मागासलेल्या जाती व मागासलेल्या जमातींना म्हणजेच sc व st या वर्गाला घटनेत आरक्षण दिले , नंतरच्या काळात इतर मागासवर्गांसाठी म्हणजेच obc आरक्षणासाठी  विविध आयोग नेमण्यात आले व त्या पैकीच एक आयोग म्हणजे मंडल आयोग किंवा मंडल कमिशन. .
    यात या आयोगाने सुरवातीला काही जातींचा समावेश करण्यासाठी एक सुची बनवली . .
    व त्या मंडल कमिशनच्या सुचितील लोकांना आरक्षण देण्यासाठीच्या शिफारसी  व्हीपी सिंग यांच्या सरकारने स्विकारल्या व मंडल आयोग स्वीकारला !
    परत विविध राज्याच्या सरकारांनी कोणतेही आयोग न नेमता विविध जातींचा हळूहळू समावेश इतर मागासवर्ग जातीत करून केंद्र सरकार कडे सिफारसी केल्या व ते ते वर्ग इतरमागासवर्गात समाविष्ट करण्यात आले त्याला कोणतेही जाचक पॅरामिटर लावले गेले नाहीत. . .
    आरक्षण हे लग्नातील पंक्ती सारखे नव्हते जेवढे येतील तेवढ्या सर्वांना जवायला पोटभर वाढावे आणि सर्वांचेच समाधान करावे !
    आरक्षण या साठी होते मर्यादित जागामध्ये प्रत्येकास काहीना काही प्रतिनिधीत्व मिळावे . .
    पण आज आरक्षणाची चर्चा वेगळ्याच अँगलने काही लोक जाणीवपुर्वक खोडसाळपणे करत असतात. . .
    आम्ही ९०%मिळवतो तरीही आम्हाला अॅडमिशन भेटत नाही , आम्हाला नोकरी लागत नाही व ७० %वाल्यांना नोकरी लागते वगैरे वगैरे . .
    पण अशी चर्चा करणारे हेही विसरून गेलेले असतात की ,
    १०० जागा पैकी आपल्या वाट्याला किती आल्या व त्यांना किती दिल्या !
    म्हणजे १००जागापैकी आरक्षित असलेल्या जागा ५२ असतात व त्यामध्ये जवळपास ७५ %लोकसंख्या समाविष्ट असते . . ओपन जागेत कुणालाही अॅप्लिकेशन करता येत असले तरी ओपनमध्ये असलेल्या उच्चवर्णीय लोकांशी स्पर्धा वंचित घटक करत नसल्याने जवळपास ७५%लोकसंख्या असलेला वर्ग ५२ %जागेपुरता मर्यादित जागेवर अॅप्लाय करतोय. . ४८%राहिलेल्या जागेवर २५ वर्ग जागा मिळवतो , खरेतर
    हा मागासवर्ग जातीवर अन्याय असतो मात्र
    उच्चवर्णीय लोक टक्केवारी पुढे करतात व बघा त्यांना कमी मार्क्स असूनही त्यांना नोकरी भेटते आम्हाला जास्त मार्क्स असूनही नोकरी भेटत नाही . .
    मुळात कॅटॅगीरीच्या लोकांची स्पर्धा ओपनच्या बरोबर नसते तर आपल्या आपल्या गटातील लोकांशी असते म्हणून ज्या गटात जास्त स्पर्धा किंवा शिक्षणाचे प्रमाण जास्त,  सोयी सुविधा जास्त त्या ठिकाणी आपोआपच तिव्र स्पर्धा असल्याने मेरीट जास्त राहणार!
    वंचित घटकां मध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी , सोयीसुविधा कमी त्यामुळेच मेरीटचे प्रमाण कमी म्हणून तर आरक्षण आले . . .
    इथपर्यंत साधक बाधक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की ,
    सर्व समाजातील लोकांना शिक्षण व नोकरीत  प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे , कोणताही समाज यापासून वंचित रहाता कामा नये . . .
    तसेही आरक्षण हा सर्वांनाच एका प्रवाहात आणायचा तेंव्हाचा  तो एकमेव मार्ग होता , लोकसंख्या मर्यादित होती,
    लोकांना शेतीतून बर्यापैकी रोजगार उपलब्ध होता काळ! त्यामुळे आरक्षणाची मागणी होत नव्हती . .
    बदलत्या काळाणूसार
    काही गोष्टी बदलाव्या लागतील,
    मुळ आरक्षण का निर्माण झाले तर
    त्याचे कारण जातीव्यवस्था व शोषण या पासी जाते !
    जातिव्यवस्था १००%बंद झाली नाही किंवा नजिकच्या काळात  सहजासहजी बंद होईल असे वाटत नाही . .
    आज जवळपास सर्व समाजातून आरक्षणाची एकतर मागणी होतेय किंवा आरक्षण बंद करा असेही काही उच्चवर्णीय म्हणत आहेत. .
    पण आरक्षण बंद केले तर
    आदिवासी , दलित, गोरगरीबांना , शिक्षणात नोकरीत व राजकारणात कोण संधी देईल का ? ति संधी न मिळाल्याने काय होईल व त्यांना मुख्य प्रवाहात  कशी संधी मिळेल हे कुणीही सांगत नाही केवळ थोड्याफार गुणांचा फरक दाखवून आरक्षणाला विरोध केला जातो !
    मु़ळात काळ बदलत गेला , लोकसंख्या वाढत गेली , प्रत्येकास काम मिळेना, रोजगार कमी पडू लागला . .
    शेती पिकेना, पिकली तर बाजारभाव भेटेना, मोठमोठय़ा कंपन्यात कमी पगारात कामगारांचे शोषण चालू झाले , व शिक्षण अतिशय महाग झाले !
    मग आता काय करायचे . .
    दलित आदिवासी ओबीसी यांच्या पेक्षाही भयंकर अवस्था कृषक समाजातील लोकांची झाली
    व आम्हालाही आरक्षण मिळावे ही मागणी पुढे आली . . .
    यात वावगे काही नाही . 
    या मागणीची पुर्तता कशी करायची हा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला ,
    त्याला एकच मार्ग आहे !

    प्रत्येकाचा वाटा प्रत्येकास समान  मिळालाच पाहिजे . . . 
    समजा माझ्याकडे पन्नास देशी गाईचा तबेला किंवा गोठा आहे असे समजू . . .
    मला जर प्रत्येक गाईची  काळजी घ्यावी असे वाटत असेल, प्रत्येकीस समान अन्नपाणी , समान चारा , समान खुराक द्यायचा झाला तर मि प्रत्येक गाईला व्यवस्थित सेप्रेट सेप्रेट  बांधून समान  सर्व अन्नपाणी देईल, ज्यामुळे प्रत्येक गाईची  तब्येत तर चांगली होईल च मात्र ति दुध सुद्धा भरपुर देईल आणि अन्नधान्याची नासाडी सुद्धा करणार नाही . . .

    हेच जर मि केवळ त्या गायीवर  दया दाखवण्यासाठी , त्यांना बांधल्यामुळे अन्याय होईल म्हणून मि जर एका मोकळ्या जागेत चारा टाकला . . .
    तर काय होईल. .? 
    त्यातील धष्टपुष्ठ व मोठ्या गाई या प्रथम चार्याच्या ढिगावर जातील तिथे यथेच्छ  भरपुर चारा खातील पण या दरम्यान कमजोर गाईंना त्या चार्याजवळ येवू सुद्धा  देणार नाहीत. ..स्वतः खावून वरून त्यांना मारतील हे आपण पाहतोच नेहमी व स्वतःचे  पोट भरल्यानंतर तो चारा पायाने तुडवतील. . त्यावरच नाचून घान सुद्धा  करतील. . .
    परिणामी चारा खराब होईल. . . व वाया सुद्धा जाईल. . .
    लक्षात येतय का ?

     आणि कुपोषित व कमजोर गाई अजून कमजोर होतील त्यांना यांचा उष्टा चारा सुद्धा मिळणार नाही . . परिणामी त्या दुध देणार नाहीत किंवा हळूहळू  मृत पावतील आणि कळपात ठराविक सशक्त गाईच भरपुर खावून जगतील पण
    मालकाला तर सर्व गाईचे संगोपन करून व्यवसाय चांगला करायचा असतो . . प्रगती करायची असते म्हणून. .
    कोणत्याही गाईला उपाशी ठेवायचे नसते . . .
    कारण त्याचे प्रेम सर्वच गाईवर सारखे असते . .
    मग आपण तर माणसे आहोत. . . माणसे . .
    कमजोर असो कि सशक्त प्रत्येकास समान पाहिजे वाटायला . . .
    कमजोरला जास्त वाटून सशक्त उपाशी नको आणि सशक्तला मोकळे सोडून माजू द्यायला नको . .
    यामुळेच
    मला असे वाटते आपल्या देशातील
    प्रत्येकास किमान चांगले जगण्यासाठी
    ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे . . .
    सर्वच जातींना  लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी , यात  ज्याचा त्याचा वाटा द्यावा आणि
    आज जो खूला प्रवर्ग आहे तोच नष्ट करावा
    म्हणजे कुणाचाही वाटा कुणी चोरणार नाही व
    कमजोर वर्गात बलदंड वर्गाची घुसखोरी बंद होईल
    लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा वाटला की आपोआपच जो तो स्वतःच्या हिस्साचं नीट खाईल व नासधूस करणार नाही . . . देश प्रगती करेल. .
    रोज बंद, संप टाळेबंदी , आंदोलने होणार नाहीत. .
    प्रत्येक वर्गाला समान संधी मिळेल. . .
    त्यातही प्रत्येक जातीतील, वर्गातील गरीबांनाच प्राधान्य क्रमाने  तो  वाटा मिळाला पाहिजे . .


    आर्थिक निकषावर आरक्षण ही पुडी सोडणार्यां पासून सावधान. . . आर्थिक निकषावरील आरक्षणाची चर्चा फक्त  एका वर्गाच्या फायद्यासाठी चालू आहे . 

    आर्थिक निकषावर आरक्षण हा फालतु प्रचाराचा धंदा  बंद करावा . . . .
    आर्थिक निकषावर आरक्षण लागू करायचे म्हटले तर सर्व लाभ उच्च व सवर्ण जातीतील लोकच गरीबी दाखवून गिळंकृत करतील
    ओबीसी , दलित,आदिवासी  मराठा , जाट, पटेल, यांना  व तत्सम जातींच्या लोकांना कुणीही नोकरी देणार नाही ,
    सगळे सवर्ण जातीतील लोकांचीच भरती केली जाईल!
    पारधी , भिल्ल, नंदीवाला, टोकरी , अशा कितीतरी जाती आहेत त्यांना तर कुणीही संधी देणारच नाही . . .
    या साठी 
    आज संपुर्ण देशातील, आदिवासी , दलित, मराठा , ओबीसी , जाट, रजपूत, पटेल, गुज्जर, किंवा असे बरेच समुदाय आहेत की, त्यांना आजही त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत हिस्सा किंवा प्रतिनिधीत्व मिळालेच नाही . . .
    मग ते  शिक्षण असो की,  नोकरी . . .  त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढे प्रतिनिधीत्व मिळालेच नाही . .
    त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांनाच समान प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे , मग तो सवर्ण असो की दलित, आदिवासी , किंवा , ओबीसी असो !
    वरील समुदायाच्या लोकांनी एकमेकाविरूद्ध भांडणतंटे करण्या ऐवजी ऐकमेकांच्या हातात हात घालून
    प्रत्येकास लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे या साठी भांडले पाहिजे . .
    ओपन कॅटॅगिरी संपुष्टात आणून लोकसंख्येच्या प्रमाणात संपुर्ण १००%आरक्षण वाटलेच पाहिजे . .
    म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय तर मिळेल व कुणाचीही कुणाच्या जागेवर घुसखोरी होणार नाही !
    त्यासाठी जातनिहाय ऑनलाइन, आधार व पॅनकार्ड लिंक करून जनगणना होणे गरजेचे आहे . .
    याला कोण विरोध करणार नाही . .
    आणि कुणी विरोध केला तर तो आपला सर्वांचाच विरोधक समजावा . . .
    विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

    समान वाटा

    प्रत्येकाचा वाटा प्रत्येकास समान  मिळालाच पाहिजे . . .
    विजय पिसाळ नातेपुते . .

    समजा माझ्याकडे पन्नास देशी गाईचा तबेला किंवा गोठा आहे असे समजू . . .
    मला जर प्रत्येक गाईची  काळजी घ्यावी असे वाटत असेल, प्रत्येकीस समान अन्नपाणी , समान चारा , समान खुराक द्यायचा झाला तर मि प्रत्येक गाईला व्यवस्थित सेप्रेट सेप्रेट  बांधून समान  सर्व अन्नपाणी देईल, ज्यामुळे प्रत्येक गाईची  तब्येत तर चांगली होईल च मात्र ति दुध सुद्धा भरपुर देईल आणि अन्नधान्याची नासाडी सुद्धा करणार नाही . . .

    हेच जर मि केवळ त्या गायीवर  दया दाखवण्यासाठी , त्यांना बांधल्यामुळे अन्याय होईल म्हणून मि जर एका मोकळ्या जागेत चारा टाकला . . .
    तर काय होईल. .? 
    त्यातील धष्टपुष्ठ व मोठ्या गाई या प्रथम चार्याच्या ढिगावर जातील तिथे यथेच्छ  भरपुर चारा खातील पण या दरम्यान कमजोर गाईंना त्या चार्याजवळ येवू सुद्धा  देणार नाहीत. ..स्वतः खावून वरून त्यांना मारतील हे आपण पाहतोच नेहमी व स्वतःचे  पोट भरल्यानंतर तो चारा पायाने तुडवतील. . त्यावरच नाचून घान सुद्धा  करतील. . .
    परिणामी चारा खराब होईल. . . व वाया सुद्धा जाईल. . .
    लक्षात येतय का ?

     आणि कुपोषित व कमजोर गाई अजून कमजोर होतील त्यांना यांचा उष्टा चारा सुद्धा मिळणार नाही . . परिणामी त्या दुध देणार नाहीत किंवा हळूहळू  मृत पावतील आणि कळपात ठराविक सशक्त गाईच भरपुर खावून जगतील पण
    मालकाला तर सर्व गाईचे संगोपन करून व्यवसाय चांगला करायचा असतो . . प्रगती करायची असते म्हणून. .
    कोणत्याही गाईला उपाशी ठेवायचे नसते . . .
    कारण त्याचे प्रेम सर्वच गाईवर सारखे असते . .
    मग आपण तर माणसे आहोत. . . माणसे . .
    कमजोर असो कि सशक्त प्रत्येकास समान पाहिजे वाटायला . . .
    कमजोरला जास्त वाटून सशक्त उपाशी नको आणि सशक्तला मोकळे सोडून माजू द्यायला नको . .
    यामुळेच
    मला असे वाटते आपल्या देशातील
    प्रत्येकास किमान चांगले जगण्यासाठी
    ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे . . .
    सर्वच जातींना  लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी , यात  ज्याचा त्याचा वाटा द्यावा आणि
    आज जो खूला प्रवर्ग आहे तोच नष्ट करावा
    म्हणजे कुणाचाही वाटा कुणी चोरणार नाही व
    कमजोर वर्गात बलदंड वर्गाची घुसखोरी बंद होईल
    लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा वाटला की आपोआपच जो तो स्वतःच्या हिस्साचं नीट खाईल व नासधूस करणार नाही . . . देश प्रगती करेल. .
    रोज बंद, संप टाळेबंदी , आंदोलने होणार नाहीत. .
    प्रत्येक वर्गाला समान संधी मिळेल. . .
    त्यातही प्रत्येक जातीतील, वर्गातील गरीबांनाच प्राधान्य क्रमाने  तो  वाटा मिळाला पाहिजे . .
    विजय पिसाळ नातेपुते
    ९४२३६१३४४९

    समान वाटा


    शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

    नवा पक्षीय विचार

    आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल! इथल्या मातीवर,मातीवर प्रेम करणारी सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून मराठा समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . आपल्यासह सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं आपला पक्ष पाहिजे . . . विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो मराठा हि केवळ एक जात नाही तर तो समूह आहे , हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व मराठाच. . यातील काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या . . पण आजही २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांचा, महाराष्ट्रातील माणसांचा म्हणजे ८०%लोकांचा डिएन ए एकच पहायला मिळेल हे सत्य नाही पचत . . ते जावूद्या इतिहासातील. . गोष्टींची चर्चा अर्थहीन होत चाललीय. . . भविष्यासाठी आता वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही जाती जातीत फरक झाला व उच्चनिचता आली इथेच सत्यानाश झाला . . कुणी पंचकुळी, कुणी ९६ कुळी, कुणी ९२ कुळी, कुणी , कुणबी, कुणी , साळी , माळी, कोळी , अशा विविध जातीने ओळखू लागला याचे कारण काय तर तो वेगवेगळ्या विभागात रहात होता , त्या ठिकाणी थोडाफार रितीरीवाजात फरक होता पण. . . शिवकाळा अगोदर पासून, हे सर्व गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील एक घटक थोडाफार त्याकाळी श्रीमंत होता कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात मराठा समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून प्रतिमोर्चे काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या आरक्षणा विरूद्ध कोर्टात याचिका दाखल करतात. . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून! आजच्या मराठा समूहातील व जे आरक्षणा पासून वंचित राहिले आहेत त्यांनी कित्येक जणांना आजवर साथ दिली . . . पण विसरले ते . . . हाताला काम दिले . . . मोठा भाऊ म्हणून रोजगार दिला . . . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेतले प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . . . हाच तो मराठा होता . . . हाच पाटील देशमुख, हाच कधीकाळचा तुमचा बांधव होता . . याच मराठा वर्गाने सावकार, व्यापारी , या सर्वांनाच संरक्षण तर दिलेच व त्यांच्या कडून कर्ज घेऊन, खरेदी करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा केली . . . . पण आज किती जण मनापासून मराठा बांधवांसोबत आहेत. . . किती जणांना वाटते मराठा बांधवांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे . . . . नोकर्यात संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना मराठा समाजा बद्दल सहानुभूती आहे पण बहुसंख्य लोकांच्या मनात जो पुर्वग्रह आहे तोच जायला तयार नाही , उलट वाढत चाललाय. . . म्हणून आपल्याला न्याय देईल असा . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित उच्चवर्णीय वर्गाला त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्‍या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्‍या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्‍या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्‍या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९