vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

स्वराज्यासाठी लढलेला व मराठी बोलणारा प्रत्येक माणूस मराठा !

चालू घडामोडींचे विश्लेषण




"शिवजयंती सोहळा समिती" नातेपुते,यांचे वतीने नातेपुते नगरित शिवप्रतिमा पूजन व जिल्हा परिषद शाळेतील  लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप आणि प्रा. रवी ठवरे यांचे "शिवचत्रातून काय शिकावे " 
या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
या प्रसंगी बोलतांना प्राध्यापक रवी ठवरे सर म्हणाले की , शिवाजी महाराजानी  स्वराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करुन , जुलमी सत्तेविरुद्ध, अन्याय व अत्याचारा विरुद्ध लढा उभारला , राज्यकारभार करताना जो सामान्य जनतेवर अन्याय करेल त्याला कडक शासन केले, जो स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहिल ,त्याचे हातपाय कलम करण्याचे काम शिवरायांनी केले, दुष्काळात रयतेसाठी धान्याची कोठारे खुली केली , शेतकर्यांना शेतसारा माफ केला ,तसेच शेतकर्यांना मोफत बियाणे उपलब्ध केले , पुढे बोलताना ठवरे सर म्हणाले की , शिवरायांचे राज्य हे मराठ्यांचे राज्य होते   पण मराठा हा शब्द कोणत्या विशिष्ट जातीचे राज्य असा नसून महाराष्ट्रात राहणारा , मराठी बोलणारा व स्वराज्यासाठी लढणारा म्हणजे मराठा हे या ठिकाणी अभिप्रेत आहे म्हणून आपणा सर्वांना मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या पूर्वजांच्या इतिहासाचा सार्थ अभिमान असला पाहिजे. शिवरायांनी हजारो मावळे  सोबतीला घेतले आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले , स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य आणि रयतेचे राज्य म्हणजे आपले राज्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करायचा आहे,  व्यसनापासून , टिव्ही मालिका पासून ,मोबाईल पासून  जो तरुण आज भरकटत चालला आहे , त्याला जर परत एकदा चांगले संस्कार द्यायचे असतील तर शिवचरित्राची पारायणे करणे गरजेचे आहे .
या कार्यक्रम प्रसंगी , इयत्ता चौथीतील बाल वक्ता राजवर्धन चिंचकर यानेही सुंदर असे भाषण करुन सर्वांची मने जिंकली.
सदर कार्यक्रमास..
नातेपुते गावचे माजी सरपंच अमरशील देशमुख, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक प्रविणकुमार बडवे , वरिष्ठ लिपिक आबासाहेब देवकाते , बाबुराव जमाले , प्रा.उत्तम सावंत , संजय उराडे , मंगेश दिक्षीत, एकनाथ ननवरे विकास बडवे, रोहित शेटे ,शक्ती पलंगे , अमर  भिसे अनिल जाधव, सतिश जाधव पत्रकार सुनिल राऊत , आनंदकुमार  लोंढे , संजय पवार, आनंद जाधव ,समिर सोरटे, सुनिल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती सोहळा समिती नातेपुतेचे , विजय पिसाळ , कैलास सोनवणे, संभाजी पवार, राहूल पदमन, जयंत चिंचकर,  अक्षय बावकर ,रोहित इटकर, किशोर ढवळे, सुरज चांगण , रोहित चांगण , महेश बडवे , या सर्वांनी परिश्रम घेतले, 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राहूल पदमन यांनी केले.