vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

युक्रेन -रशिया युद्धातून आम्ही काय बोध घेणार?


चालू घडामोडींचे विश्लेषण
. . . . . . . . . . . . . . . . . . . 

रशिया युक्रेन युद्ध ! ! ! 

रशिया युक्रेन युद्धातून आम्ही काय बोध घेणार? 

पुर्व युरोप व रशिया यांना लागून असलेला देश म्हणजे युक्रेन.  बहुसंख्य लोकांचा धर्म ख्रिश्चन आहे.  पुर्वी हा देश सोव्हिएत युनियनचा भाग होता मात्र  नव्वदच्या दशकात  सोव्हिएत युनियनचे पंधरा तुकडे झाले  त्यापैकीच हा एक देश युक्रेन. 
युरोपशी व रशियाशी नजिक  असल्यामुळे इथे इंग्रजी , रशियन भाषा  व संस्कृती दिसून येते .
 इथे गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास नाही म्हटले तरीदेखील चालेल.  
युक्रेन छोटासा पण  अतिशय सुंदर देश आहे . 
 इथे कमी खर्चात  अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळते  म्हणूनच खूप भारतीय इथे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत.
या देशात   मोठ मोठी सुविधा युक्त  विद्यापीठे आहेत. 
सगळीकडे  रस्ते  चकाचक आहेत. सुंदर इमारती आहेत.  सर्व सुखसोयी आहेत. 
 रेल्वे सेवा , विमानसेवा ,  एकदम उच्च दर्जाची आहे . 
 लोकांचे राहणीमान एकदम उच्च दर्जाचे आहे . 
 नैसर्गिक साधनसंपत्ती ,  मुबलक खनिज संपत्ती लाभलेला हा  देश आहे .  आर्थिक सुबत्ता आहे.  सुंदर निसर्ग  लाभलेला आहे. 
  युक्रेनची लोकसंख्या जवळपास  साडेचार कोटींच्या आसपास आहे . 
असे असूनही युक्रेन हा रशियाचा एक दिवस सुद्धा प्रतिकार करु शकला नाही .  
कारण काय असेल ?  
तर तिथल्या लोकांकडे राष्ट्रासाठी  लढण्याची  वृत्ती नाही . युक्रेनकडे  पुरेशी  युद्ध सामुग्री नाही .   विशेषतः आपल्या सारखा त्यांना वारसाही नाही. 
छत्रपती  शिवरायांसारखे लढण्याची प्रेरणा देणारे पुरुष त्या भूमीत जन्माला आले नाहीत. अन्याय अत्याचार या विरुद्ध व  आपल्या भूमीच्या रक्षणासाठी  जीवावर उधार होणारे व परिणामांचा विचार न करता हाती शस्त्र घेणारे  , सुखदेव, राजगुरू , भगतसिंग सारखे स्फूर्तीनायक तिथे  जन्माला आले  नाहीत.  त्यांच्याकडे , मराठा (महाराष्ट्रीयन), जाट, रजपूत, शिख, गुज्जर,   असे जीवावर उदार होऊन लढणारे लोक नाहीत.  राष्ट्रप्रेमाणे प्रेरित होऊन जीवाची बाजी लावणारे वीर तिथे जन्माला आलेच नाहीत.  अन्यायाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक वृत्ती त्यांच्या अंगातच नाही.
म्हणून त्यांना आजच्या परिस्थितीत आपल्या  मुलांबाळांना  घेऊन बंकरमध्ये उपाशी झोपायची वेळ आली आहे .  
पैसा , संपत्ती या गोष्टी त्यांच्यासाठी आजच्या घडीला  जवळपास गौण झाल्या आहेत.  
ते फक्त जगाकडे आम्हाला वाचवा अशी याचना करत आहेत. प्राणाची भीक  मागत आहेत  पण जगातील कोणताही देश त्यांची मदत करायला तयार नाही . 
 म्हणून आज युक्रेनचे अस्तित्व जवळपास -असूनही नसल्या सारखे गलितगात्र  झाले आहे . 
यातून आम्ही काय बोध घेणार आहोत ?  
आम्ही आमच्या  देशात   एकसंघ भावना निर्माण करून  राष्ट्रप्रेम जागृत  करणार आहोत की नाही ? 
पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सारख्या शेजारी  युद्धखोर देशांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत  सैनिकी शिक्षण कंपल्सरी करणार आहोत की नाही ? 
शस्त्रसाठा वाढवून, शस्त्रसज्ज राष्ट्र निर्माण करण्यासाठी पावले टाकणार आहोत की नाही ?  
अंतर्गत जात, धर्म, वर्ग कलह वाढणार नाहीत याची काळजी घेणार आहोत की नाही ?  
की अंतर्गत कलहातच आपली शक्ती वाया घालवणार आहोत?  
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा प्रेरणादाई इतिहास क्रमिक पुस्तकातून  विस्ताराने शिकवणार आहोत की , अजूनही  पोती पुराण सांगत  बसणार आहोत? 
गुप्तचर यंत्रणा ,  आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन भारतात  शस्त्र निर्मितीचे मोठ मोठे  कारखाने प्रचंड वाढवणार आहोत की नाही .  की नुसते  मंदिर मशिद करत बसणार आहोत? 
व्यसनाधीनीतेमुळे तरुण कमजोर होतात, त्यामुळे दारु , शिगारेट, गुटखा , मावा , तंबाखू  यावर कठोर निर्बंध आणले आणणार आहोत की नाही ?  
कुस्ती ,  रनिंग,  थाळीफेक, भालाफेक,  नेमबाजी अशा 
देशी खेळांचे प्रशिक्षण शालेय स्तरावरच देणार आहोत की अजून क्रिकेट, क्रिकेट करत बसणार आहोत? 
  शारीरिक शिक्षण हा विषय  १०० मार्कांचा करणार आहोत की नाही ?  
यापुढे   सदृढ युवकच देशाला वाचवू शकतात.  केवळ मिलिटरी लढेल व आपण वाचू हा भ्रम सर्वांनी डोक्यातुन काढून टाकला पाहिजे .  सैनिकांच्या मदतीला जेंव्हा राष्ट्रातील प्रत्येक माणूस जाईल तेंव्हाच राष्ट्राचा निभाव लागेल. 
थोडक्यात बलिशाली राष्ट्र तेंव्हाच सुरक्षित राहिल जेंव्हा तुमची सैनिकी ताकद जगाला टक्कर देण्याच्या क्षमतेची असेल. 
©® विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९