vijaypisal49. blogspot. com

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

समान वाटा

प्रत्येकाचा वाटा प्रत्येकास समान  मिळालाच पाहिजे . . .
विजय पिसाळ नातेपुते . .

समजा माझ्याकडे पन्नास देशी गाईचा तबेला किंवा गोठा आहे असे समजू . . .
मला जर प्रत्येक गाईची  काळजी घ्यावी असे वाटत असेल, प्रत्येकीस समान अन्नपाणी , समान चारा , समान खुराक द्यायचा झाला तर मि प्रत्येक गाईला व्यवस्थित सेप्रेट सेप्रेट  बांधून समान  सर्व अन्नपाणी देईल, ज्यामुळे प्रत्येक गाईची  तब्येत तर चांगली होईल च मात्र ति दुध सुद्धा भरपुर देईल आणि अन्नधान्याची नासाडी सुद्धा करणार नाही . . .

हेच जर मि केवळ त्या गायीवर  दया दाखवण्यासाठी , त्यांना बांधल्यामुळे अन्याय होईल म्हणून मि जर एका मोकळ्या जागेत चारा टाकला . . .
तर काय होईल. .? 
त्यातील धष्टपुष्ठ व मोठ्या गाई या प्रथम चार्याच्या ढिगावर जातील तिथे यथेच्छ  भरपुर चारा खातील पण या दरम्यान कमजोर गाईंना त्या चार्याजवळ येवू सुद्धा  देणार नाहीत. ..स्वतः खावून वरून त्यांना मारतील हे आपण पाहतोच नेहमी व स्वतःचे  पोट भरल्यानंतर तो चारा पायाने तुडवतील. . त्यावरच नाचून घान सुद्धा  करतील. . .
परिणामी चारा खराब होईल. . . व वाया सुद्धा जाईल. . .
लक्षात येतय का ?

 आणि कुपोषित व कमजोर गाई अजून कमजोर होतील त्यांना यांचा उष्टा चारा सुद्धा मिळणार नाही . . परिणामी त्या दुध देणार नाहीत किंवा हळूहळू  मृत पावतील आणि कळपात ठराविक सशक्त गाईच भरपुर खावून जगतील पण
मालकाला तर सर्व गाईचे संगोपन करून व्यवसाय चांगला करायचा असतो . . प्रगती करायची असते म्हणून. .
कोणत्याही गाईला उपाशी ठेवायचे नसते . . .
कारण त्याचे प्रेम सर्वच गाईवर सारखे असते . .
मग आपण तर माणसे आहोत. . . माणसे . .
कमजोर असो कि सशक्त प्रत्येकास समान पाहिजे वाटायला . . .
कमजोरला जास्त वाटून सशक्त उपाशी नको आणि सशक्तला मोकळे सोडून माजू द्यायला नको . .
यामुळेच
मला असे वाटते आपल्या देशातील
प्रत्येकास किमान चांगले जगण्यासाठी
ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे . . .
सर्वच जातींना  लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी , यात  ज्याचा त्याचा वाटा द्यावा आणि
आज जो खूला प्रवर्ग आहे तोच नष्ट करावा
म्हणजे कुणाचाही वाटा कुणी चोरणार नाही व
कमजोर वर्गात बलदंड वर्गाची घुसखोरी बंद होईल
लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा वाटला की आपोआपच जो तो स्वतःच्या हिस्साचं नीट खाईल व नासधूस करणार नाही . . . देश प्रगती करेल. .
रोज बंद, संप टाळेबंदी , आंदोलने होणार नाहीत. .
प्रत्येक वर्गाला समान संधी मिळेल. . .
त्यातही प्रत्येक जातीतील, वर्गातील गरीबांनाच प्राधान्य क्रमाने  तो  वाटा मिळाला पाहिजे . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

समान वाटा