vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

दुष्काळाचा पंचनामा

पंचनामा . . . दुष्काळाचा आणि शेतकरी समस्यांचा !

जावे दुष्काळाच्या देशात. . . .

आटलेल्या विहिरी फफुट्याने माखलेल्या पायवाटा  ,   पिके नसल्याने भकास उघड्या बोडक्या झालेल्या जमिनी , पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या लहान मुलं मुली , म्हातारी कोतारी माणसे व  बायका . . . चार्या  अभावी  जणावरांची खपाटीला गेलेली पोटं हाताला काम नसल्याने शेतकरी , मजूर यांची कामासाठी शोधाशोध जवळपास ७०% ग्रामीण भागातील हे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे . . कित्येक शेतकर्यांना आपली जणावरे एकतर सोडून द्यावी लागत आहेत किंवा येईल त्या किंमतीला विकावी लागत आहेत, आज, पशुधन वाचवण्यासाठी ना सरकार पुढे येतय ना कोणते लोकप्रतिनीधी पुढे येताना दिसत आहे , मुकी जित्राबं मालकाकडे बघून दिवसभर हंबरडा फोडत आहे पण असाह्य पणे पाहण्याशिवाय मालकही काहीच करू शकत नाही . .  कारण त्याच्या खिशात दमडाही नाही . .
दुष्काळी अनुदान नाही , चारा छावण्या नाहीत, चारा डेपो नाहीत, रोजगारहमीची कामे नाहीत. . .
''नुसता ग्रामीण भाग होरपळतोय''
मायबाप सरकारला कधी पाझर फुटणार देव जाणे . . .
गावच्या गावं ओस पडू लागली आहेत , खेडीच्या खेडी  जणू रंडकी होत चालली आहेत  . . तरूण बायका मुलींनाही
कपाळाला कुंकू लावायची सुद्धा आता लाज वाटू लागली आहे  ! कारण त्यांचा धनी कधी जीव देईल याचा काहीही  भरोसा राहिलेला  नाही . .
सततच्या नापिकीने, दुष्काळाने, गारपिटीने , वादळी वार्याने बळीराजा खचून गेलाय. . त्याच्या हातात काय येतच नाही , दुकानदाराची उधारी  व सावकाराची कर्जे फेडायची कशी ??किराना सामान सुद्धा घ्यायची पत राहिली नाही ! जगायचं कसं  याचीच चिंता त्याला लागून राहिलीय। . .
फसवी कर्जमाफी व फसवा हमीभाव!
 आजही इतक्या भयंकर दुष्काळात भाजीपाला , धान्य, कवडीमोल भावाने जातोय, ऊसाचे बील नाही , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके करपून जाताना बघवत नाही  !
"कुणालाच पाझर फुटेना"
काही जणांनी बँकेचा त्रास नको म्हणून वाट्टेल ते करून जमीन विकून, घाणवट ठेवून,उसने पासने करून,  सावकाराकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज,  ओटीएस मध्ये भरले , त्यामुळे  cbil रेकॉर्ड खराब झाले कित्येक शेतकर्यांचे . . .
त्यामुळे कोणतीही बँक अशा शेतकर्यांना दारात उभी करत नाही . . . अशा विचित्र कात्रीत बळीराजा सापडलाय पण, त्यातून त्याला बाहेर कोण काढणार?
आज राजकारण हे जाती धर्म आणि आरक्षण यापलीकडे जातच नाही . . प्रत्येक पक्ष हा एकमेकांची उणीधुनी काढण्यात मश्गुल आहे ,
जातीय तेढ निर्माण करून मताच्या तुंबड्या भरल्या की राजकीय पक्षांचे भागतेय पण रोज शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या कुणालाही दिसत नाहीत, इतकेच काय परदेशातून बहुमोल परकीय चलन खर्चून
तेल, डाळी , साखर, कांदा वेळोवेळी आयात करून इथल्या शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळले जातेय. .
हजारो हेक्टर जमिनी भूसंपादन करून विकासाच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात कवडीमोल भावाने घालायचा गोरख धंदा खुलेआम चालू आहे . . त्याच जमिनी नंतर करोडो रुपयांना विकल्या जातात. .
 "न्यायासाठी शेकडो धर्मा पाटलांचे " बलिदान जात आहे . . पण
कोण वाचा फोडणार याला ? कोण धावणार मदतीला कोण सोडवणार हे प्रश्न!
कांदा चाळी ,
शेततळी तोकड्या अनुदानामुळे परवडत नाहीत. .

रोजगारा अभावी जगणं मुस्किल झालंय. . . स्थलांतर करावे तर मुक्या जित्राबाचे व घरातील बाया बापड्यांचं आणि म्हातार्या माणसांचं करायचं तरी काय?
म्हणून हा माझ्या सारख्या दुष्काळाची जाणीव असणाऱ्या शेतकर्यांने केलेला हा व्यवस्थेचा  पंचनामा !
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

गटबाजी संपली तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण

गटबाजी मोडून काढून जेष्ठांनाही मानसन्मान दिला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी नक्कीच सत्तापरीवर्तन करेल. . . .

आदरणीय शरद पवार साहेबांनीच लक्ष घालून प्रत्येक मतदारसंघातील गटबाजी संपवली तर राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी घवघवीत यश मिळेल याची आम्हा सामान्य जनतेला व पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींना पुर्णपणे खात्री वाटते  . .
महाराष्ट्रातील शेतकरी , शेतमजूर, सामान्य जनता दलित आदिवासी , कामगार, मुस्लीम या सर्वांनीच  या पाच वर्षांत बरेच भोगले आहे, शेतकर्यांना तर सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी अक्षरशः  वार्यावर सोडले , धनगर, मराठा या समाजाला खोटी अश्वासने दिली, शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, झाले नाही . . जातीय सलोखा यांनी जाणीवपुर्वक बिघडवण्याचे काम केले , भाजपाच्या धनंजय कुलकर्णी कडे शस्त्रांचा साठा सापडूनही लगेच जामीन दिला जातो व इतरांना नक्शलवादी ठरवून खोट्या गुन्ह्यात अडकून तुरूंगात डांबले जाते ,  शेतकरी आत्महत्या करत असताना , यांनी पाकिस्तान मधून साखर व कांदा आयात केला या व अशा असंख्य कारणांनी जनता यांना कंटाळली आहे . म्हणून जनतेला आता  बदल हवा आहे कारण भाजपा सरकारने सर्वच  घटकांना वार्यावर सोडल्यामुळे व शेतमालाच्या किंमती कवडीमोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला  अनकुल वातावरण तयार आहे . . त्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक जागेवर प्रचंड गटबाजी निर्माण झाल्याने अनुकूल वातावरण असतानाही त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत  आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा  पक्षातील गटबाजीमुळेच आजवर घात झाला आहे . .
बारामती , माढा, सातारा , कोल्हापूर, भंडारा गोंदिया हे मतदारसंघ तर राष्ट्रवादी सहज जिंकू शकते फक्त या ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी द्यायला हवी कारण विद्यमान खासदारांचे काम चांगले आहे व त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे . . विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया ताई, उदयन महाराज हे तर पक्षाला सहज विजय मिळवून देवू शकतात,  त्यांना जनतेतूनच जास्त प्रेम  आहे पण पक्षातील विरोधकांना , हे सहन होत नाही , म्हणून ते विरोध करताना दिसत आहेत,  मात्र जनता विद्यमान खासदारांच्या पाठिशी आहे , हे मात्र नक्की . .
वरिल पाच मतदारसंघा बरोबर, राष्ट्रवादीला . . नाशिक,
शिरूर, रायगड, मावळ, नगर, परभणी , रावेर, बीड, जालना, नवी मुंबई,(ठाणे ) उस्मानाबाद, हे मतदारसंघ  सुद्धा अनुकूल आहेत आणि या आकरा  मतदारसंघापैकी किमान राष्ट्रवादी काँग्रेस  सात ते दहा  ठिकाणी सहज जिंकू शकेल अशीच स्थिती आहे , त्यामुळे यावेळी किमान  एकुण बारा  ते पंधरा  जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळतील  , फक्त राष्ट्रवादीने उमेदवार निवडताना जुने जानते व तगडे उमेदवार दिले पाहिजेत तरच यश मिळेल. . .
आणि सगळ्यांत महत्वाचे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून ते जाहीर केले पाहिजेत,  उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचाराला मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. .
राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपआपल्या  विधिसभा मतदारसंघात मजबूत आहेत, स्थानिक राजकारणात,  पंचायत समिती , जिल्हा परिषद, यातही बहुतेक ठिकाणी सत्तेवर आहेत, मात्र लोकसभेला एकमेकांची जिरवा जिरवी करण्याच्या नादात पक्षाच्या उमेदवारा विरूद्ध काम करतात आणि यामुळे पक्षाच्या  उमेदवारांचे पराभव होतात. . .
त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनीच सर्वांना समज देऊन विद्यमान सर्वच  खासदारांना परत  संधी देऊन, संभ्रम संपुष्टात आणायला हवा . . . ग्रामीण भागातील
जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व सत्तापरीवर्तनाची नितांत गरज आहे . . .
कारण भाजपाच्या  काळात. दुध, सोयाबीन, तुर,कापूस  कांदा , ऊस, भाजीपाला , आंबा , डाळिंब उत्पादक शेतकरी भरडला गेला . . .
शेतकर्यांना वार्यावर सोडले गेले . .
सामान्य जनता पवार साहेब सत्तेवर यायची  वाट पाहतेय. . .
फक्त विविध मतदारसंघात जे उमेदवारीवरून घोळ चालू आहेत एकमेकांची जिरवण्याची भाषा चालू आहे ति बंद झाली तर नक्कीच. . . महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होईल. . स्थानिक परिस्तिथी वरिष्ठांना  समजावी ,
पक्षाला व जनतेला चांगले दिवस यावेत यासाठीच हा लेखन प्रपंच. . .
एक कार्यकर्ता . . .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . .

सोलापुर जिल्ह्यात गटबाजीमुळे पोखरत चाललेली राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
तिच खंत व्यक्त केलीय
राष्ट्रवादीचे सामान्य
कार्यकर्ते
श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
 विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
 मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
  प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
 आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते