vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

मराठा समाजाची दिशा काय असावी ?

चालू घडामोडींचे विश्लेषण


सन्माननीय मराठा बंधू भगिनींनो , मी श्री   विजय पिसाळ नातेपुते . . आपणाला मनःपूर्वक नमस्कार. .  
 आपण समाजासाठी रात्रंदिवस काम करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे . आपण  समाजासाठी आजवर केलेले काम व विचारमंथन खूप मोठे आहे . . 
मराठा समाजासाठी काय योजना असाव्यात,   माझ्या मनात काय आहे हे कळावे म्हणून  संपुर्ण मराठा समाजाला उद्देशून हा छोटासा लेख लिहिला आहे . 
आपणा सर्वांचे ध्येय आणि विचार हाच आहे की , आपल्याला मराठ्यांचा विकास करायचा आहे .  स्वाभिमानी मराठा परत एकदा उभा करायचा आहे .  लाचारी आमच्या रक्तात नाही हे जगाला दाखवून द्यायचे आहे . . आम्ही आजवर नेतृत्व केले व इथून पुढेही आम्हीच नेतृत्व करू हे दाखवायचे आहे . . आरक्षण गरजेचे आहेच पण 
आरक्षण या एकाच गोष्टीवर फोकस न करता चौफेर काम वाढवावे लागेल. .  आरक्षणामुळे बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना रोजगार मिळेल  लाखात एकदोन नोकरीला लागतील,  पण बाकीच्या लाखो बेरोजगारांसाठीही  आपल्याला योजना आखाव्या लागतील,  निश्चित दिशा निर्माण करावी लागेल,  दिशाभूल करणारे लोकांपासून सावध रहावे लागेल. .   
मराठा ही केवळ जात नसून मराठा हा देशाचा इतिहास आहे . मराठा हा विचार आहे . म्हणून  आम्ही कधीही कमजोर नव्हतो व नाही . . दाखवून द्यावे लागेल  आम्हाला फक्त भविष्याचा वेध घेऊन काही योजना तयार कराव्या लागतील,  व्यवसाय निवडावे लागतील. . . एकेकाळी 
राज्यकर्ते  कोण असावेत  हे ठरवणारे आम्ही ,  
अन्याया विरुद्ध  लढणारे आम्ही ,  संघर्ष करणारे आम्ही ,  कष्टकरी आम्ही , ताकदवान आम्ही , आमच्या  मनगटाच्या जोरावर पाहिजे ते  मिळवणारे  आम्ही  आज बर्याचदा हतबल आहोत हे चित्र निर्माण केले जात  आहे . 
शुर आम्ही , वीर आम्ही . .  ज्ञानी आम्ही ,  पराक्रमी आम्ही 
हे सर्व आमच्या गाठीशी व  पाठिशी असताना . . . हाच आमचा वास्तव इतिहास असताना 
बर्याच नालायकांनी सिनेमातून आपल्या पाटलांना म्हणजेच मराठ्यांना  बलात्कारी दाखवले , व्यसनी दाखवले , स्त्रिलंपट दाखवले व आपला जगातील आदर्श समाज किती खराब आहे हे दाखवून कमीपणा देण्याचे काम केले गेले . पण हे आमच्या लक्षात आले नाही . 
हे सुधारण्याची  वेळ आली आहे .  म्हणून कोणताही  लघूपट,  फिल्म बनवताना आपला पराक्रम, शौर्य, धाडस  , हे दाखवले पाहिजे जेणेकरून  आमची पुढची पिढी बोध घेईल व संघर्षातून पुढे जाईल  हे माझे मत आहे  . . . 
मराठा कोणत्याही  ठिकाणी मजबूत दाखवला पाहिजे , 
मराठा हतबल  नाही   . . . मराठा  कमजोर  नाही. .  मराठा . . व्यसनी  नाही . . मराठा आत्महत्या  करणारा  नाही  . 
तर मराठा आजही  लाथ मारेल तिथे पाणी काढेल हे मनावर बिंबवले गेले पाहिजे . . .  मराठ्यांच्या पोरांनी संपर्षातून निर्माण केलेले कित्येक उद्योग व व्यवसाय आहेत ते दाखवले पाहिजेत  , मराठ्यांच्या पोरांनी  पाच पाच किलोमीटर पाईपलाईन टाकून  शेती फुलवली आहे हे दाखवले पाहिजे  , डाळिंब, ऊस, केळी ,  यांचे घेतलेले विक्रमी उत्पादन दाखवले  ,  मराठ्यांच्या पोरांनी ,  खेळात  प्राविण्य मिळवले आहे हे दाखवले पाहिजे . कित्येक मराठा हे जबरदस्त काम करणारे , डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, शिक्षक, शास्त्रज्ञ,  संशोधक,  उद्योजक, उद्योगपती ,  शुन्यातून विश्व  निर्माण करणारे आहेत हे दाखवले पाहिजे . 
मराठा संघटीत होऊ शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
मराठा उद्योग होऊ शकतो , मराठा व्यापार करू शकतो . .  मराठा ,   आधुनिक शेती करू शकतो . . मराठा . . मराठा जसे  शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो , तसेच  मराठाच क्रांती करू शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
मराठा  , सर्व प्रश्न सोडवू शकतो , मराठा  आधुनिक शिक्षण घेऊ शकतो,  मराठा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो .  मराठा एकत्र येऊन शाळा काढू शकतो , कॉलेज काढू शकतो , होस्टेल काढू शकतो,  बँका काढू शकतो , पतसंस्था काढू शकतो , मराठा एकत्र येऊन उद्योग धंदे निर्माण करु शकतो , रोजगार निर्माण करायची ताकद आमच्या मनगटात आहे . हे दाखवले पाहिजे  ,    हे सर्व एकसंघ मराठा करू शकतो हे  मनावर ठसवले पाहिजे  . .  
व हेच आपण केले पाहिजे . . 
आरक्षणाची लढाई लढायची आहे पण  त्या सोबत  खूप कामे करावी लागतील व करायची  आहेत. . 

जय जिजाऊ!  जय शिवराय! 

तुमचा . . एक मराठा बांधव. . 
विजय पिसाळ नातेपुते . .
९४२३६१३४४९

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

नातेपुते गावातील चौका चौकात रंगतेय निवडणूकीची चर्चा !

चालू घडामोडींचे विश्लेषण




गेले दोन महिने झाले नातेपुते नगरपंचायत निवडणूक सुरू आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे  प्रभाग, ७ , ८, ९, १० अशा  चार प्रभागांची राहिलेली  निवडणूक  प्रक्रिया सध्या  चालू आहे . प्रभाग १ , २, ३ , ४, ५ , ६ व प्रभाग ११ , १२, १३, १४, १५ , १६, १७ अशा   तेरा प्रभागांची प्रक्रिया  पुर्ण झालेली आहे.  एकंदर  या निवडणुकीत, साम, दाम, दंड भेद याचा सर्सास वापर झालेला दिसून आला .  नवीन प्रभाग रचना आणि राजकीय पार्श्वभुमी नसलेले पण स्वतःची ओळख निर्माण केलेल्या काही  नव्या दमाच्या  तरुणांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली.  पारंपरिक गटतट व युत्या आघाड्या या सातत्याने बनतात, बिघडतात,  प्रत्येक निवडणुकीची समीकरणेही वेगळी असतात.  पण यावेळी मात्र राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या   तरुणांचा उत्साह जबरदस्त पहायला मिळाला .  आम्हाला कधी संधी मिळणार की नाही?  असे  वारंवार ते म्हणत होते.   तेच ते चेहरे , त्याच त्या घरातील उमेदवार, त्याच त्या वाड्या , वस्त्या व वाडे यांच्या भोवती फिरणारे राजकारण यात आम्हाला संधी मिळत नाही  असाही सुर कित्येक उमेदवारांच्या  बोलण्यातून येत होता .   गावातील बहुसंख्य लोकांना काही उमेदवार पसंत नसतात पण केवळ पॅनल प्रमुखांवर प्रेम असते , पॅनल प्रमुखांशी जिव्हाळा असतो , पॅनल प्रमुखांशी नातेसंबंध असतात व आपल्या जवळच्या पॅनल प्रमुखांना  ताकद मिळावी म्हणून काही उमेदवारांना नाईलाजाने लोक मतदान करतात.  हेही या निवडणुकीत दिसून आले .  खाजगीत बोलताना लोक लादलेल्या उमेदवारीमुळेही पॅनल प्रमुखांवर थोडेफार नाराज दिसून आले.  कित्येक वर्ष, काही समाज बांधवांना प्रतिनिधित्व मिळाले नाही , नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग रचनेत,  त्यांना संधी मिळेल ही अपेक्षा होती पण याही वेळी पॅनल प्रमुखांनी काही जागा सेफ करण्यासाठी काही जागांवर  तडजोडी केल्या व कधीही संधी न मिळालेले समाज आजही वंचित राहिले हे एकंदर दिसून येते आहे. 
९०% निकाल अपेक्षित लागतील  मात्र काही वार्डातील निकाल अनअपेक्षित लागण्याची  आशा उमेदवार  बाळगून असल्याचे  दिसून येत आहे . 
एकमात्र नक्की यापुढे  , निवडणूका बिगर पैशाच्या होतील असे वाटत नाही .