vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

आर्थिक मंदीचे दुष्परिणाम!

चालू घडामोडींचे विश्लेषण
आर्थिक मंदीचा छोटासा आढावा . . . . !
आर्थिक मंदी . . . ! 
आज संबंध देशातील प्रत्येक उद्योगधंद्यामधून रोज आर्थिक मंदीची  बातमी येत आहे ....मंदीमुळे इतके कामगार काढले , अमुक तमूक उद्योगपतीचे दिवाळे निघाले . . या कंपनीचे शेअर गडगडले , त्या कंपनीला टाळे लागले. 
पण हे घडतय का ? नेमका प्रॉब्लेम काय? 
इतके तज्ज्ञ असताना , भारताची अर्थव्यवस्था मजबूत असताना हे का घडतंय? 
या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा माझा छोटासा  प्रयत्न, उत्पादीत मालाला उठाव नसणे व बाजारपेठेत मागणी घटने म्हणजे मंदीची सुरूवात होणे पण मागणी अचानक घटत नाही . . .  *लोकांची खरेदी  क्षमता हळूहळू  कमी होत जाते  किंवा याचाच दुसरा अर्थ लोकांचे उत्पन्न नैसर्गिक आपत्ती , सरकारी धोरणे , देशातील  परकीय गुंतवणूक काढून घेतली जाणे , लोकांच्या हाताला काम नसने , नवीन रोजगाराची संधी कमी होत जाणे ,  परदेशात आपल्या मालाची निर्यात कमी होणे , जागतिक स्पर्धेत आपला निभाव न लागणे , वाढती लोकसंख्या  , स्पर्धेत टिकू न शकल्याने  लघू व कुटीर  उद्योगधंदे बंद पडणे  व  शेतातील तोट्यामुळे  ग्रामीण भागात पैसा नसणे ,   याचा परिणाम म्हणून,  ऐकून लोकसंख्ये पैकी ८० लोकांचे विविध कारणांनी उत्पन्न व क्रयशक्ती   घटली  की  , लोक (जनता) मार्केट (बाजारपेठत) मध्ये कमीतकमी खर्च करायला सुरूवात करतात, नवीन गाड्या , नवीन कार व लोकांकडून  छोटीमोठी वहाणे खरेदी बंद केली जाते ,  नवीन घर बांधनी, नवीन गुंतवणूक, लोक नवीन खरेदी  हे प्लॅन पुढे ढकलतात, कारण त्यांना भविष्यात  खिशात पैसा येईल कि नाही याची काळजी व चिंता लागून राहिलेली असते , त्यामुळे सहाजिकच   लोकांच्या खिशात भांडवल कमी होत गेले तर त्याचा फटका  व्यापार औद्योगिक क्षेत्र  आणि बांधकाम क्षेत्राला प्रथमता बसत असतो .
बसणारा फटका कधीकधी पतधोरण, जागतिक उत्पन्न व जागतिक डिमांड यावरही अवलंबून असतो . . 
व्यवसायातील मंदी हटायची असेल तर देशातील शेतीसह सर्वच उत्पादीत मालाची निर्यात होणे व रोजगार निर्माण होणेही  तितकेच गरजेचे असते . . 
त्यासाठी सरकारला उचित पावले उचलून  शेती व उद्योगधंदे यांना काही सवलती व अनुदानेही देऊन हातभार लावावा लागतो . . त्यातून संबंधित वर्गाची शक्ति वाढली की रोजगार निर्मिती होते , रोजगार निर्मिती झाली की, लोकांच्या हातात पैसा खेळतो व तोच पैसा परत मार्केटमध्ये उपलब्ध होऊन, उद्योगधंदे व व्यापार पूर्ववत सुरू होतात. . . 
पण त्यासाठी आपली निर्यात वाढून,  आपल्याकडे परकीय गंगाजळी वाढली पाहिजे . . 
मंदी हाटवत असताना थोडीफार महागाई वाढण्याचीही शक्यता असते . . . 
मंदी हटवण्याचा आपल्या देशासाठी तरी  सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत जास्त शेतात गुंतवणूक वाढून,  शेतातून रोजगार निर्माण करणे ,  लघू व कुटीर उद्योगातून युवक व युवतींच्या  हाताला काम देणे व सामान्य लोकांच्या हातात पैसा कसा जाईल याचा विचार करणे होय! 
तरच मंदी हटू शकते 
विजय पिसाळ नातेपुते . .