vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

ओळख आदरणीय, माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. खासदार विजयसिंह मोहिते- पाटील तथा दादासाहेबांच्या कार्याची !

ओळख आदरणीय खासदार  विजयसिंह मोहिते पाटील तथा  विजयदादांच्या कार्याची. आदरणीय
दादासाहेबांनी
अकलूज ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला, अकलूजचे सरपंचपदाचा यशस्वी कारभार पाहिल्या नंतर दादासाहेब हे सोलापूर  जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि नेमका  त्यावेळीच  दुष्काळ पडला दादासाहेबांच्या  नेतृत्वाचा  कसोटीचा काळ चालू झाला ,  लोकांच्या  हाताला काम नव्हते , प्यायला पाणी नव्हते, जणावरांना चारा नव्हता अशा परिस्थितीत दादासाहेबांनी  आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर संपुर्ण जिल्हा जिल्हा परिषद मार्फत नाला बंडीग, पाणंद रस्त्यांची कामे , छोटेमोठे तलावातील गाळ काढणे अशी कामे सुरू केली, मजुरांना हाताला काम दिले गोरगरीबांच्या चुली पेटवण्याची व दुष्काळात लोकांना  जगवण्याचे काम दादासाहेबांनी केले , राज्य सरकार मध्ये मोहिते पाटील घराण्याचा दबदबा असल्याने तेंव्हाच्या सरकारने दुष्काळासाठी मुबलक निधी केवळ दादासाहेबांमुळेच  जिल्हा परिषदला उपलब्ध करून दिला, "नव्हे निधी खेचून आणला " गावोगावी वाड्या वस्त्यावर  पिण्याच्या पाण्याचे टँकर, जणावरांना चारा छावण्या उभारून दादासाहेबांनी दुष्काळावर यशस्वी मात केली छोटेमोठे पाझर तलाव, मातीचे बंधारे याचीही मोठ्या प्रमाणात कामे केली . नंतरच्या काळात
आदरणीय दादासाहेब जेंव्हा प्रथमच विधानसभेला उभे राहिले व राज्यात त्यावेळी सर्वाधिक मताधिक्याने शिडी या चिन्हावर निवडून आले, कारण तेंव्हा तांत्रिक अडचणी मुळे दादासाहेबांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही . दादासाहेब विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर दादासाहेबांची ख्याती संपुर्ण देशभरात पसरली गेली , पश्चिम महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी , राजीवजी गांधी आले तेंव्हा तेंव्हा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दादासाहेबांना मानाचे स्थान मिळाले बर्याचदा दादासाहेबांनी व इंदिराजी आणि राजीवजी यांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यामुळे दादासाहेबांच्या शब्दाला दिल्लीत सुद्धा मान होता व आहे  आणि त्याचा फायदा सातत्याने सोलापुर सह पुणे, सातारा , सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी झालेला आहे . दादासाहेबांचा राजकिय आलेख सातत्याने उंच उंच होत गेला विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करताना दादासाहेबांनी निरा देवघर प्रकल्प मार्गी लावला , जिल्ह्यात सहकर्यांच्या माध्यमातून  साखर कारखाने निर्माण केले , विशेषतः बांधकाम खाते सांभाळत असताना संपुर्ण ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले , विविध ठिकाणी पुल बांधले ,  पाटबंधारे मंत्री असताना भाटगर, वीर, व उजनी सह संपुर्ण राज्यातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले एकदा तर निरा खोर्यातील धरणे पन्नास टक्के सुद्धा भरली नसताना विजयदादांच्या अचूक नियोजनातून उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची दोन आवर्तने लोकांना मिळाली व कमांड एरियात  पाणी टंचाई जाणवली नाही , ग्रामविकास मंत्री असताना , सरपंचांचे मानधन वाढवले , अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवले आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ग्रामपंतायती मधील कर्मचार्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला व हजारो कर्मचारी यांना न्याय मिळाला , ग्रामविकास मंत्री असतानाच दादासाहेबांनी , भूमिगत गटार योजनेची ग्रामीण भागात  सुरूवात केली व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते सिमेंटचे करायचा निर्णय केला . राजकीय कारकीर्द चालू असताना दादासाहेबांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्याही संधीचे सोने दादासाहेबांनी केले , सातारा , सांगली , सोलापूर पुणे आणि संपूर्ण मराठवाड्याची तहान भागेल असा कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर केला व संपुर्ण राज्याला पतदर्शी ठरेल असा हा प्रकल्प होता कारण, या प्रकल्पात शेतकर्यांना पाणी तर मिळणार होतेच मात्र त्यासाठी एक इंचही जमीन भूसंपादन करायची गरज नव्हती, कुणीही विस्थापित होणार नव्हते ,  कारण हा संपुर्ण प्रकल्प भूमीगत बोगदा खोदून होणार होता . माळशिरस विधिसभा मतदारसंघ राखीव झाल्याने दादासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातून काही काळ अलिप्त रहावे लागले त्यामुळे काही लोकांनी या प्रकल्पाला खीळ घालण्याचे काम केले कारण हा प्रकल्प झालाच तर त्याचे श्रेय दादासाहेबांना मिळेल हा कोता विचार काहींनी केला.
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात. म्हणून दादासाहेबांना जनतेचे प्रेम लाभते व  मान मिळतो आहे.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य  लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्या सह सोलापूर, पुणे , सातारा , सांगली या ठिकाणची बहुतांश  जनता  दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते,
माळशिरस तालुक्यातील जनतेने तर सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम  केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली, ग्रामीण भागात  शिक्षण उपलब्ध करून दिले ,  रस्ते,  विज, पाणी ,आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले विशेषतः ग्रामीण रूग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रांची गावोगावी निर्मिती दादासाहेबांनी केली . आपुर्या विद्युत प्रवाहाने मोठ्या  प्रमाणावर शेतकर्यांच्या मोटारी जळत होत्या , पुर्ण दाबाने विज पुरवठा होत नव्हता तेंव्हा दादासाहेबांनी खास बाब म्हणून विज उपकेंद्रांची निर्मिती केली .जनतेसाठी  तळमळीने काम करणारा असा नेता कुठेही दिसणार नाही .संत तुकाराम महाराज  व संत ज्ञानेश्वर महाराज  पालखी महामार्ग,महाराष्ट्रात एका जिल्ह्यात स्वतंत्र  विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठ आणण्याचे  कामे केले . उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना सर्वप्रथम दादासाहेबांनीच मांडलेली आपणांस  दिसून येते.  सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव दादासाहेबांच्या मार्गदर्शना खाली झाला , विजदादांनी सोलापूर विमानसेवेसाठी बरेच प्रयत्न केले व काहीकाळ विमानसेवा सुरू देखील केली होती,  असे जिल्ह्यातील असंख्य  प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वेचा प्रश्न सातत्याने लावून धरून तो  रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला,  बंद पडलेल्या  कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉपसाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणण्याचे काम दादासाहेबांनी केले .
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे राष्ट्रीय  सहापदरी व राज्य महामार्गाच्या अंतर्गत येणारे  चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. पालखीतळ, खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी संबधित शेतकर्यांना मिळवून दिल्या. माळशिरस कोर्टासाठी भव्य  इमारत, पंचायत समिती व तहसील कार्यालयाची भव्य इमारत दादासाहेबांमुळेच उभी राहिली .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी दिला, नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी केली ,  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी अशी विविध  कामे मार्गी लावलेली आहेत . माळशिरस येथील लोकांना सोलापूर व पंढरपूर लांब पडत होते म्हणून खास बाब म्हणून जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटीओ ऑफीस माळशिरस तालुक्यात आणले याचाही लाभ माळशिरस सह आसपासच्या तालुक्यातील जनतेला  होताना दिसतोय,
 पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम असेल तेही दादासाहेबांनीच केले आहे ,
 केळी, डाळींब, भाजीपाला व भुसार मार्केट चालू करून शेतकर्यांच्या मालाला स्थानिक ठिकाणीच बाजारपेठ उपलब्ध करून दिली व त्या माध्यमातून हजारो, व्यापारी , मजूर आणि कामगार यांच्या हाताला काम सुद्धा दिलेले आहे .
संपुर्ण महाराष्ट्रातील मोठा घोडेबाजार, शेळी मेंढी व जणावरांचा बाजार सुद्धा याठिकाणी भरतो, अशा बारीकसारीक  विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या आहेत  !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी उपलब्ध करून दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली ,वादळी वार्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून देणे असो ,  जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे दादासाहेबांनी  केली .दलित मुस्लीम यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या व सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुद्धा  उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .अकलूज माळशिरस येथे वेळोवेळी  कृषी प्रदर्शन भरवून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान देण्याचे काम केले .
त्यामुळेच  विजयदादांना माळशिरस तालुक्या सह  सोलापूर सातारा जिल्ह्यातील  जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे , हजारो लाखो कामे अज्ञात आहेत,
माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, माजी आमदार  व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.   आता  जे  गावोगावी सत्कार होत आहेत, अमृत मोहोत्सव साजरा होत आहे ते पाहता दादासाहेबांचे सार्वजनिक जीवन कृतार्थ झाल्याचे दिसून येते .
दादासाहेबांवरील  निस्सीम प्रेमातून सुचलेल्या  चार ओळी लिहण्याचा माझा प्रयत्न तुम्हा सर्वांना  नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा
दादासाहेब व मोहिते पाटील कुटूंबावर प्रेम करणारा एक सामान्य
 कार्यकर्ता म्हणून हा लेखन प्रपंच!
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते.
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
हा लेख दादासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून जास्तीत जास्त शेअर करा .
व आम्हालाही प्रतिक्रिया कळवा ही विनंती

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकायची असेल तर माळशिरस तालुक्यातून मताधिक्य महत्वाचे !

माळशिरस तालुक्याची साथ असल्याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघ  जिंकणे अशक्य. . . ?
माळशिरस तालुका हा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला कालही होता , आजही आहे व भविष्यातही राहिल,  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा एक अपवाद वगळता आजतागायत माळशिरस तालुक्यातील जनतेने कोणतीही  लाट असो किंवा काहीही असो आदरणीय विजयसिंह  मोहिते पाटील यांना मजबूत साथ दिली आहे .
कारण दादासाहेबांकडे सरपंच पदापासून, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्री ते उपमुख्यमंत्री आणि गेली पाच वर्ष खासदार असा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे.
त्यामुळेच त्यांना जनतेची संपुर्ण नस माहिती झाली आहे .
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम इथल्या जनतेने केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ , शिक्षण क्षेत्र,  रस्ते,  विज, पाणी , यासाठी सातत्याने काम केले , संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर  पालखी महामार्ग, सोलापुर विद्यापीठ, कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना , उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना असेल, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव असेल असे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वे मार्ग, कुर्डूवाडी वर्कशॉप यासाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणणे , 
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे सहापदरी व चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी , नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी   केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी असी कामे मार्गी लावलेली आहेत  .जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटी ओ ऑफीस, पासपोर्ट कार्यालय, ग्रामीण रूग्णालये अशा   विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली , जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे केली . .
 सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुखात उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .
त्यामुळे विजयदादांना माळशिरस तालुक्यातील जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे .
चुकीच्यामुळे किंवा काही नेत्यांच्या  खोट्या नाराजीचे भांडवल करत  दादासाहेबांवर जर पक्षाने अन्याय केला ,
 दुय्यम वागणूक दिली , डावलण्याचा प्रयत्न केला तर इथली जनता नाराज होईलच पण पक्षाला मोठ्ठा फटकाही बसेल ,कारण माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवरील अन्यायाने  व्यथित होते व दादासाहेबांच्या पाठिशी ठामपणे उभी राहते . माढा लोकसभा मतदारसंघात सगळ्यांत जास्त मतदान हे माळशिरस तालुक्याचे आहे व या ठिकाणी तर दादासाहेब सदैव ८० ते ९० हजाराचे मताधिक्य घेतात, माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.
गेल्या लोकसभेलाही पक्षातील बर्याच लोकांनी दादासाहेबांना छुपा विरोध केला पण जनता सोबत असल्याने दादासाहेब मोदी लाटेतही निवडून आले .
त्यातही माळशिरस तालुका दादासाहेबांच्या पाठिशी ठाम उभा राहिला .
विजयदादांना व माळशिरस तालुक्याला डावलण्याचा प्रयत्न झालात तर, माढा लोकसभा व माळशिरस, करमाळा , पंढरपूर, माढा विधानसभा विनाकारण अडचणीत येण्याचीही  शक्यता नाकारता येत नाही  .
आदरणीय विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसने मानसन्मान द्यावा , त्यांच्या अनुभवाचा पक्षासाठी उपयोग करावा हीच सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची  व जनतेची भावना दिसून येते . .
मतदारसंघात फिरत असताना , टपरीवर चहा घेताना सुद्धा  गावोगावी विजयदादांच्या नावाची चर्चा होत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इच्छुक बरेच असले तरी काम आणि अनुभव विजयदादा इतका कुणाकडेच नाही हे सत्यही  लपवता येत नाही  ,माढा लोकसभा मतदारसंघात   काहीजण स्वखर्चाने जाहिराती करत अाहेत. नवीन पायंडा पाडत आहेत, लोकामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत तरीदेखील विजयदादा शांतपणे काम करत आहेत.
विजयदादांनी अमृतमोहत्सवी  वाढदिवसाच्या  करमाळा येथील सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना सहज सांगितले की , मला उमेदवारीची चिंता नाही व आजवर मि कधीच पक्षाकडे उमेदवारी मागितली  नाही , यातच दादासाहेबांचा संयम आणि दृढनिश्चय दिसून येतो .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेस येणार्‍या सर्व नेतेमंडळींना सामान्य कार्यकर्ते यांचेकडून एकच अपेक्षा आहे ति म्हणजे पक्षातील गटबाजीला कुणीही खतपाणी न घालता , गटबाजी मोडून काढावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला परत एकदा चांगले दिवस आणावेत.
सामान्य जनता भाजपासेनेच्या सरकारला वैतागली आहे या  सरकारवर नाराज आहे .
फक्त आपला पक्ष एकसंघ निवडणूकीला कोणतीही कुरघोडी न करता सामोरा गेला पाहिजे . .
यश नक्कीच आपले आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज येथील परिवर्तन सभेकडे संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष!



  • राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा उद्या ३० जानेवारीला सोलापुर जिल्ह्यात येणार आहे . सोलापुर जिल्ह्यात पहिली सभा अकलूज येथे होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटीलांचे अकलूज हे होम ग्राऊंड असून उद्या अकलूजची सभा विजय चौकात जंगी होईल हे नक्की .  

    • सभेसाठी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे , अजित पवार हे येणार आहेत. विशेषतः अजितदादा उद्या  काय बोलतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . . . 
    • सभा तर जंगीच होईल पण या सभेत विजयदादांच्या उमेदवारीची घोषणा होईल का ?  हे पाहण्याची उत्सुकता आहे , उमेदवारीच्या घोषणेकडे 
    • विजयदादांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे . . 
    • सभेच्या तयारी साठी अकलूजला राष्ट्रवादीच्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक विजयदादा, धैर्यशील भैय्या , बाबाराजे दादा यांचे प्रमुख उपस्थितीत   घेण्यात आली . . 
    • उद्या तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक प्रचंड संख्येने परिवर्तन सभेसाठी जाणार असल्याचे समजते . माळशिरस सह संपुर्ण माढा लोकसभा  मतदारसंघात विजयदादांनी कामाचा जो   धडाका लावला आहे व विजयदादा कामाच्या बळावर आणि दांडग्या संपर्कावर उमेदवारीचे तेच  प्रबळ दावेदार आहेत तसेच विजयदादांच्या बाबतीत जनतेत प्रचंड  सहानुभूती सुद्धा आहे . . 
    • त्यामुळे बहुसंख्य मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हे  बहुसंख्येने उपस्थित राहतील  . 
    • सभेची तयारी पाहता सभा एकदम मोठी व जंगी होणार असे दिसते . .

    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे , मा श्री अण्णासाहेब डांगे यांचे कडून कौतुक

    सोमवार, २८ जानेवारी, २०१९

    शेतकरी टॅक्स भरतो का ?


    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील

    विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास हे समीकरण गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रातील जनता पाहते आहे . . . . . त्यामुळेच दादासाहेबांची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे व त्यातूनच लाखो कार्यकर्ते दादासाहेबांवर जीवापाड प्रेम करतात. . . . त्यामुळेच दादासाहेबांना "विकासरत्न " ही उपाधी जनतेने बहाल केली . . . लोकशाहीत कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना असंख्य स्पर्धक हे असतातच त्यात गैर काही नाही, काही स्पर्धक नव्याने राजकारणात आलेले असतात व ते सक्रिय असल्याचा अभास करत असतात, पण त्यांच्या कामाचे मुल्यमापण झालेले नसते मात्र कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला जनतेची नस माहित असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील नेतृत्वाची पारख असते , आणि हो ज्या व्यक्तीमत्वाला जनतेत मान असतो व जे व्यक्तिमत्व जनतेसाठी अहोरात्र झटत असते, अशाच व्यक्तीमत्वाचा विचार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करावा लागतो . . . . त्यामुळे दादासाहेबांना , ना उमेदवारी चिंता करायची गरज आहे , ना निवडणूक जिंकायची चिंता आहे , दादासाहेब निवडणूक लढवतील व विक्रमी लाखोंच्या मतांनी जिंकतील हे सुद्धा निश्चित आहे . त्यामुळे येणार्‍या कोणत्याही निवडणूकीत आदरणीय दादासाहेबांची भूमिका निर्णायक तर राहिलच पण राज्याच्या राजकारणावर सुद्धा त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच होतील. . . . लेखन:-विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

    दुष्काळाचा पंचनामा

    पंचनामा . . . दुष्काळाचा आणि शेतकरी समस्यांचा !

    जावे दुष्काळाच्या देशात. . . .

    आटलेल्या विहिरी फफुट्याने माखलेल्या पायवाटा  ,   पिके नसल्याने भकास उघड्या बोडक्या झालेल्या जमिनी , पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या लहान मुलं मुली , म्हातारी कोतारी माणसे व  बायका . . . चार्या  अभावी  जणावरांची खपाटीला गेलेली पोटं हाताला काम नसल्याने शेतकरी , मजूर यांची कामासाठी शोधाशोध जवळपास ७०% ग्रामीण भागातील हे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे . . कित्येक शेतकर्यांना आपली जणावरे एकतर सोडून द्यावी लागत आहेत किंवा येईल त्या किंमतीला विकावी लागत आहेत, आज, पशुधन वाचवण्यासाठी ना सरकार पुढे येतय ना कोणते लोकप्रतिनीधी पुढे येताना दिसत आहे , मुकी जित्राबं मालकाकडे बघून दिवसभर हंबरडा फोडत आहे पण असाह्य पणे पाहण्याशिवाय मालकही काहीच करू शकत नाही . .  कारण त्याच्या खिशात दमडाही नाही . .
    दुष्काळी अनुदान नाही , चारा छावण्या नाहीत, चारा डेपो नाहीत, रोजगारहमीची कामे नाहीत. . .
    ''नुसता ग्रामीण भाग होरपळतोय''
    मायबाप सरकारला कधी पाझर फुटणार देव जाणे . . .
    गावच्या गावं ओस पडू लागली आहेत , खेडीच्या खेडी  जणू रंडकी होत चालली आहेत  . . तरूण बायका मुलींनाही
    कपाळाला कुंकू लावायची सुद्धा आता लाज वाटू लागली आहे  ! कारण त्यांचा धनी कधी जीव देईल याचा काहीही  भरोसा राहिलेला  नाही . .
    सततच्या नापिकीने, दुष्काळाने, गारपिटीने , वादळी वार्याने बळीराजा खचून गेलाय. . त्याच्या हातात काय येतच नाही , दुकानदाराची उधारी  व सावकाराची कर्जे फेडायची कशी ??किराना सामान सुद्धा घ्यायची पत राहिली नाही ! जगायचं कसं  याचीच चिंता त्याला लागून राहिलीय। . .
    फसवी कर्जमाफी व फसवा हमीभाव!
     आजही इतक्या भयंकर दुष्काळात भाजीपाला , धान्य, कवडीमोल भावाने जातोय, ऊसाचे बील नाही , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके करपून जाताना बघवत नाही  !
    "कुणालाच पाझर फुटेना"
    काही जणांनी बँकेचा त्रास नको म्हणून वाट्टेल ते करून जमीन विकून, घाणवट ठेवून,उसने पासने करून,  सावकाराकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज,  ओटीएस मध्ये भरले , त्यामुळे  cbil रेकॉर्ड खराब झाले कित्येक शेतकर्यांचे . . .
    त्यामुळे कोणतीही बँक अशा शेतकर्यांना दारात उभी करत नाही . . . अशा विचित्र कात्रीत बळीराजा सापडलाय पण, त्यातून त्याला बाहेर कोण काढणार?
    आज राजकारण हे जाती धर्म आणि आरक्षण यापलीकडे जातच नाही . . प्रत्येक पक्ष हा एकमेकांची उणीधुनी काढण्यात मश्गुल आहे ,
    जातीय तेढ निर्माण करून मताच्या तुंबड्या भरल्या की राजकीय पक्षांचे भागतेय पण रोज शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या कुणालाही दिसत नाहीत, इतकेच काय परदेशातून बहुमोल परकीय चलन खर्चून
    तेल, डाळी , साखर, कांदा वेळोवेळी आयात करून इथल्या शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळले जातेय. .
    हजारो हेक्टर जमिनी भूसंपादन करून विकासाच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात कवडीमोल भावाने घालायचा गोरख धंदा खुलेआम चालू आहे . . त्याच जमिनी नंतर करोडो रुपयांना विकल्या जातात. .
     "न्यायासाठी शेकडो धर्मा पाटलांचे " बलिदान जात आहे . . पण
    कोण वाचा फोडणार याला ? कोण धावणार मदतीला कोण सोडवणार हे प्रश्न!
    कांदा चाळी ,
    शेततळी तोकड्या अनुदानामुळे परवडत नाहीत. .

    रोजगारा अभावी जगणं मुस्किल झालंय. . . स्थलांतर करावे तर मुक्या जित्राबाचे व घरातील बाया बापड्यांचं आणि म्हातार्या माणसांचं करायचं तरी काय?
    म्हणून हा माझ्या सारख्या दुष्काळाची जाणीव असणाऱ्या शेतकर्यांने केलेला हा व्यवस्थेचा  पंचनामा !
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

    गटबाजी संपली तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण

    गटबाजी मोडून काढून जेष्ठांनाही मानसन्मान दिला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी नक्कीच सत्तापरीवर्तन करेल. . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांनीच लक्ष घालून प्रत्येक मतदारसंघातील गटबाजी संपवली तर राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी घवघवीत यश मिळेल याची आम्हा सामान्य जनतेला व पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींना पुर्णपणे खात्री वाटते  . .
    महाराष्ट्रातील शेतकरी , शेतमजूर, सामान्य जनता दलित आदिवासी , कामगार, मुस्लीम या सर्वांनीच  या पाच वर्षांत बरेच भोगले आहे, शेतकर्यांना तर सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी अक्षरशः  वार्यावर सोडले , धनगर, मराठा या समाजाला खोटी अश्वासने दिली, शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, झाले नाही . . जातीय सलोखा यांनी जाणीवपुर्वक बिघडवण्याचे काम केले , भाजपाच्या धनंजय कुलकर्णी कडे शस्त्रांचा साठा सापडूनही लगेच जामीन दिला जातो व इतरांना नक्शलवादी ठरवून खोट्या गुन्ह्यात अडकून तुरूंगात डांबले जाते ,  शेतकरी आत्महत्या करत असताना , यांनी पाकिस्तान मधून साखर व कांदा आयात केला या व अशा असंख्य कारणांनी जनता यांना कंटाळली आहे . म्हणून जनतेला आता  बदल हवा आहे कारण भाजपा सरकारने सर्वच  घटकांना वार्यावर सोडल्यामुळे व शेतमालाच्या किंमती कवडीमोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला  अनकुल वातावरण तयार आहे . . त्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक जागेवर प्रचंड गटबाजी निर्माण झाल्याने अनुकूल वातावरण असतानाही त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत  आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा  पक्षातील गटबाजीमुळेच आजवर घात झाला आहे . .
    बारामती , माढा, सातारा , कोल्हापूर, भंडारा गोंदिया हे मतदारसंघ तर राष्ट्रवादी सहज जिंकू शकते फक्त या ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी द्यायला हवी कारण विद्यमान खासदारांचे काम चांगले आहे व त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे . . विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया ताई, उदयन महाराज हे तर पक्षाला सहज विजय मिळवून देवू शकतात,  त्यांना जनतेतूनच जास्त प्रेम  आहे पण पक्षातील विरोधकांना , हे सहन होत नाही , म्हणून ते विरोध करताना दिसत आहेत,  मात्र जनता विद्यमान खासदारांच्या पाठिशी आहे , हे मात्र नक्की . .
    वरिल पाच मतदारसंघा बरोबर, राष्ट्रवादीला . . नाशिक,
    शिरूर, रायगड, मावळ, नगर, परभणी , रावेर, बीड, जालना, नवी मुंबई,(ठाणे ) उस्मानाबाद, हे मतदारसंघ  सुद्धा अनुकूल आहेत आणि या आकरा  मतदारसंघापैकी किमान राष्ट्रवादी काँग्रेस  सात ते दहा  ठिकाणी सहज जिंकू शकेल अशीच स्थिती आहे , त्यामुळे यावेळी किमान  एकुण बारा  ते पंधरा  जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळतील  , फक्त राष्ट्रवादीने उमेदवार निवडताना जुने जानते व तगडे उमेदवार दिले पाहिजेत तरच यश मिळेल. . .
    आणि सगळ्यांत महत्वाचे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून ते जाहीर केले पाहिजेत,  उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचाराला मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. .
    राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपआपल्या  विधिसभा मतदारसंघात मजबूत आहेत, स्थानिक राजकारणात,  पंचायत समिती , जिल्हा परिषद, यातही बहुतेक ठिकाणी सत्तेवर आहेत, मात्र लोकसभेला एकमेकांची जिरवा जिरवी करण्याच्या नादात पक्षाच्या उमेदवारा विरूद्ध काम करतात आणि यामुळे पक्षाच्या  उमेदवारांचे पराभव होतात. . .
    त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनीच सर्वांना समज देऊन विद्यमान सर्वच  खासदारांना परत  संधी देऊन, संभ्रम संपुष्टात आणायला हवा . . . ग्रामीण भागातील
    जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व सत्तापरीवर्तनाची नितांत गरज आहे . . .
    कारण भाजपाच्या  काळात. दुध, सोयाबीन, तुर,कापूस  कांदा , ऊस, भाजीपाला , आंबा , डाळिंब उत्पादक शेतकरी भरडला गेला . . .
    शेतकर्यांना वार्यावर सोडले गेले . .
    सामान्य जनता पवार साहेब सत्तेवर यायची  वाट पाहतेय. . .
    फक्त विविध मतदारसंघात जे उमेदवारीवरून घोळ चालू आहेत एकमेकांची जिरवण्याची भाषा चालू आहे ति बंद झाली तर नक्कीच. . . महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होईल. . स्थानिक परिस्तिथी वरिष्ठांना  समजावी ,
    पक्षाला व जनतेला चांगले दिवस यावेत यासाठीच हा लेखन प्रपंच. . .
    एक कार्यकर्ता . . .
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . .

    सोलापुर जिल्ह्यात गटबाजीमुळे पोखरत चाललेली राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
    तिच खंत व्यक्त केलीय
    राष्ट्रवादीचे सामान्य
    कार्यकर्ते
    श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

    पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
    पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
    पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
    एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
    पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
     विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
    आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
    पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
    बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
    पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
     मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
    जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
      प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
     आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
    लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
    आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
    आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शनिवार, १९ जानेवारी, २०१९

    गटबाजीमुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे होणारे नुकसान

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
    तिच खंत व्यक्त केलीय
    राष्ट्रवादीचे सामान्य
    कार्यकर्ते
    श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

    पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
    पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
    पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
    एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
    पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
     विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
    आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
    पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
    बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
    पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
     मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
    जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
      प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
     आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
    लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
    आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
    आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    बुधवार, ९ जानेवारी, २०१९

    आरक्षण

    आरक्षण. . . . . . . . . 

    सध्या देशपातळीवर सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे आरक्षण, आजच्या परिस्तिथीत, सुशिक्षित बेरोजगारांची वाढत जाणारी संख्या आणि गरिब श्रीमंत यातील प्रचंड वाढती  दरी , महागडे व सामान्य, मध्यम वर्गाला सुद्धा न परवडणारे शिक्षण तसेच नोकरीचा अभाव यातून या देशातील बहुसंख्य वर्ग नाराज आहेत. 
    देशातील जवळपास सर्वच राजकीय  पक्ष सत्तेच्या गणिता शिवाय या विषयाकडे  गांभीर्याने पहाला तयार नाहीत, मुळात आरक्षणाची बिजे हि जातियवादामुळेच रोवली गेली हेही वास्तव नाकारता येत नाही , देशातील जवळपास ३५ ते ४० %लोकांना 
    जुन्या काळात जातीच्या आधारावर, हक्क नाकारले गेले, हीन वागणूक दिली गेली , साधन संपत्तितील न्याय वाटा नाकारला गेला , मानव जातीला लाजवतील अशी कामे करायला उच्च वर्गाने भाग पाडले ,  परिणाम एकसंघ समाज भावना न वाढता दरी वाढत गेली व तो मोठा समुदाय मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकला गेला , तो वर्ग  मागास होत गेला , त्याला गावकुसा बाहेर ठेवले गेले व त्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणन्यासाठी काहीतरी हक्काचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या भावनेतून आरक्षणाचा त्यावेळी विचार केला गेला . . . . पण त्या वर्गातील सुद्धा ठरावीक लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतला पण त्यातील सुद्धा गरिब हा गरिब राहिला , जातीय प्रतिनिधीत्व काही टक्के तर मिळाले पण संपुर्ण समाजाचा समतोल विकास व्हायला पाहिजे होता तसा झालाच नाही . नोकरीच्या किंवा राजकीय संधी या खर्या गरिबांना मिळाल्याच नाहीत तर फक्त मागास जातीच्या श्रीमंतांनाच मिळाल्या व मागासलेल्या जातीतील  श्रीमंतांनी त्याच वर्गातील  गरिबांना पुढे करून भरपूर मिळवले  पण वंचित हे वंचित राहिले . 
    तशीच परिस्तिथी सवर्ण किंवा तथाकथित उच्च जातीच्या वर्गामधील  सुद्धा श्रीमंतांनी गरिब सवर्णांची केली , त्यामुळे आज गरिब किंवा मध्यमवर्ग हा आरक्षणाची मागणी करतोय पण यात सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षणाचा लाभ खर्याच गरिबांना मिळणार आहे का ? 
    तर त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे . 
    जोपर्यंत जातीच्या भिंती कमजोर होत नाहीत, तोपर्यंत आरक्षण संपुष्टात येत नाही व भारत देशातील जातीच्या भिंती संपुष्टात येणार नाहीत हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे . . 
    त्यामुळे आरक्षण हे चालूच राहणार व नोकर्या उपलब्ध असो किंवा नसो ! 
    म्हणून या प्रश्नाची मलमपट्टी म्हणून आर्थिक निकषावरील आरक्षण ही पुंगी वाजू लागली़य  , मुळात किरकोळ स्कीम साठी रेशनकार्ड विभक्त करणारे लोक या देशात कमी नाहीत, इतकंच काय तर खोटे घटस्फोट सुद्धा दाखवून शासकीय लाभ पदरात पाडणारे या  देशात आहेत! 
    आर्थिक निकषावर दिलेले आरक्षण हे गरिबांना मिळणारच नाही .
    मग आरक्षणाचा विषय संपणार तरी कसा ? 
     त्यावर उपाय काय? कोणत्याही वर्गातील खर्या वंचित घटकांना न्याय मिळायचा  असेल,  योग्य प्रतिनिधीत्व द्यायचे असेल तर जातीय आरक्षणात सर्वच वर्गांचा समावेश करणे व आरक्षण हे प्रत्येक जातींची जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात वाटून टाकणे व त्यात क्रिमिलेअरच्या जाचक तरतूदी करणे तरच प्रत्येक वर्गातील खर्या  वंचितांना संधी मिळेल! 
    क्रिमीलेअरची मर्यादा ही दुर्दैवाने सातत्याने वाढतेय, इन्कम टॅक्सशी सुसंगत ही मर्यादा पाहिजे होती पण मताच्या राजकारणामुळे ति वाढत जाते आणि परिणामी मागास जातीच्या खर्या वंचितांनाही न्याय मिळत नाही . . . 
    यापुढे जातीय आरक्षण बंद होणारच नाही ,,व एकाच जातीच्या लोकांची दुसर्‍या जातीच्या जागा गिळंकृत करायची पद्धत चालू आहे ति थांबवायची असेल तर लोकसंख्या व क्रिमिलेअर हेच बेस पकडावे लागतील! 
    आज 
    Sc  , St, obc, किंवा ओपन मध्ये भरपुर जाती आहेत पण त्यातही त्या त्या वर्गात ज्या  जाती  पुढारलेल्या  आहेत  तिलाच आरक्षणाचे  जास्तीचे  लाभ मिळतात  व बाकीच्या जाती तशाच उपेक्षित रहातात. 
    म्हणून प्रत्येक गटात सुद्धा , अ ब क ड, असे वर्ग पाडले पाहिजेत  तरच सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळेल असे वाटते ! 
    ओपनमध्ये असलेल्या जाती असो कि मागासलेल्या जाती असो , त्यातील पुढारलेली जात वंचित जातीच्या सर्व सुखसोयी व लाभ गिळंकृत करते ! 
    म्हणून सर्व गटात अबकड करून राखीव जागांचे व शिक्षण व नोकरीतील  प्रमाण टक्केवारीच्या प्रमाणात दिले गेले पाहिजे ! 
    विजय पिसाळ नातेपुते 
    ९४२३६१३४४९