vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १९ मे, २०१८

केवळ लोकशाही साठी !

कर्नाटक सारखा परत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रातही सत्ता परिवर्तनाचा पेचप्रसंग होवू नये या साठी काय करता येईल! ! !

कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाल्यापासून जो गोंधळ चालू होता तो लोकशाहीला मारक होता, भारतीय राजकारणात कित्येक वेळा विविध राज्यातील  विधानसभा , व देशाच्या लोकसभेत सुद्धा त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली पाहिली आहे , पण कर्नाटकात झाले ते लोकशाही मानणार्या माझ्या सारख्या  माणसांना वेदना देणारे होते , निवडणूकीत सर्वच पक्ष प्रचंड साम दाम दंड भेद व पैसा वापरून निवडून येतात, ते  स्वतःच्या ताकदी बरोबर पक्षाच्याही ताकदीवर निवडून येतात, हेही खरे आहे
त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू असतो तरीही कायदा मोडून पक्षांतराचे प्रयत्न,  पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होत  असतात ते खरोखर वाईट असतात, याला जबाबदार केवळ भाजपा आहे असेही नाही जवळपास सर्वच पक्षांनी आजवर सत्तेचा दुरुपयोग केला आहे आमदार खासदारच काय स्थानिक स्वराज्य संस्था , विधान परिषदा , राज्यसभा यातही सदस्य निवडताना जो घोडेबाजार होतो तो भयंकर असतो आणि तोच पायंडा पडू पाहतो आहे , या अगोदरच्या काही  प्रकरणात, माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी चांगला  पायंडा पाडला होता त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित चालू होते पण सत्तेसाठी सर्व काही , हीच भावना प्रत्येक पक्षांचीच झाल्याने या घोडेबाजाराला उत आला आहे  साध्या ग्रामपंचायत निवडणूकीत सुद्धा कित्येक लाख उधळून निवडून येणारे लोक आहेत, मग या निवडणूका तर सत्तेची चावीच हाती देणार्‍या असतात, करोडो अब्जावधीचे निर्णय केवळ एका सहीने होतात त्यामुळे सहाजिकच घोडेबाजार होणार पण आज सुप्रीम कोर्टामुळे काहीप्रमाणात तरी कर्नाटकातील घोडेबाजार थांबला असला आहे  तरीही  भविष्यात विविध राज्यात व केंद्रात  निवडनुका झालेनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे याच्या सुचना किंवा स्पष्ट नियम स्पष्टपणे मानणीय  सुप्रीम कोर्टाने द्याव्येत  किंवा संसदेत कायदा तरी व्हावा हीच जनतेची अपेक्षा आहे ,
सत्ता जनता सदैव कोणत्याही एका पक्षाला देणार नाहीच बदल हे होत राहतील पण बदल सुद्धा लोकशाही मार्गाने व्हावे हेच  अपेक्षित आहे , राजकारणात कुणीही साजूक नाही ,बहुतेक संधी मिळताच  प्रत्येकाला कसेही करून सत्ता हवीच आहे पण सत्ता ही ज्या पक्षाचे तिकीट घेवून निवडून आलाय त्याच पक्षाच्या निर्णयाला अधीन राहून राबवली पाहिजे , किमान कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या निर्णया विरूद्ध लोकप्रतीधीला बहुमतावेळी  जाता येवू नये व कोणतीही पळवाट असू नये तरच लोकशाही वाचू शकते व घोडेबाजार टाळले जावू शकतात, लोकशाहीत, केवळ माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा समोरचा नेता आहे म्हणून मि मदत करेल तर हे चालणार नाही, केवळ पक्षाचा व्हीप चालेल हीच तरतूद हवी  कारण आपले राष्ट्र बळकट करण्यासाठी कोणताही पक्ष नव्हे तर लोकशाही टिकली पाहिजे , पक्ष हे मोठे होतील, सत्तेवर नवे पक्ष येतील पण देश मजबूत झाला पाहिजे , केवळ सत्तेसाठी सर्व सरकारी यंत्रणा , सुरक्षा व्यवस्थावर पडणारा तानतनाव व लोकशाहीचा खून होवू नये ,
प्रत्येक लोकप्रतिनीधीने निवडणूक लढवतानाच पक्षाला बांधिल राहून निवडणूक लढवली पाहिजे ज्यांना संधीसाधू वृत्ती ठेवायची आहे त्यांनी खूशाल अपक्ष निवडून येवून स्वतःचा दम सिद्ध करून कुणालाही पाठींबा द्यावा पण पक्षाचा झेंडा घेऊन निवडून आल्यानंतर मात्र फुटताच येणार नाही व पक्षीय बलाबल असेल  तोच बहुमताचा  आकडा ग्राह्य धरवा ! काहीवेळा विविध कारणामुळे नेताशी किंवा पक्षाशी  मतभेद झाले तर पक्षाचा  राजीनामा देवून खूशाल निवडून यावे पण बहुमत सिद्ध करायच्या अगोदर लगेच पक्षाच्या विरोधात जाता आले नाही पाहिजे ,
व निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला सदनात उपस्थित राहणे कंपल्सरी करावेच  जे सदस्य सदनात बहुमत परिक्षेला गैरहजर राहतील त्यांना किमान १२ वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालावी व आमदारकी , खासदारकीचे सर्व लाभ तात्काळ बंद व्हावेत असा कायदा झाला तरच सत्ता एका पक्षा कडून दुसर्या पक्षाकडे सहज लोकशाही मार्गाने हस्तांतरित होईल, सरकार  स्थिर  चालणे  व लोकहीताची कामे होणे आज काळाची गरज आहे
सत्ता आणि पैशाचा बाजार देशाला रसातळाला घेऊन जाईल, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, गोवा, यात पक्ष कोणते हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर सरकार बनवण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे, आवाजी मतदान, किंवा गुप्त मतदान सदनात न होता सरळसरळ बॅलेट पेपरच्या  साह्यानेच मतदान व्हायलाच हवे आज कर्नाटकात सर्वच पक्षांनी  जनेतेचा कराचा  पैसा भ्रष्टाचार करून कमावला व निवडनुकीत  उधळला गेला आणि जनतेलाच प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे हेच दुर्देवाने म्हणावे लागते  आहे , कोर्ट, वकील, पोलिस यंत्रणा व संपुर्ण भारतातील जनता यांना जो त्रास झाला तो कदाचित सर्व नियम व लोकशाही संकेत पाळले गेले असते तर कदाचित झालाच नसता व  ही वेळ निर्माण झाली नसती ,जशी  आज सत्तेतून पायउतार होण्याची वेळ भाजपावर आली तीच वेळ कदाचित काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षावर येवू शकते, जर व्यवस्थित नियम झाले , कोर्टाने डायरेक्शन दिले   तर मात्र सत्ता परिवर्तन नीट होवू शकते !
व लोकशाही टिकण्यासाठी सत्ता कुणाचीही येवो मात्र जनतेच्या खर्या मतदानातून आली पाहिजे !
कदाचित भविष्यात इव्हीएम बरोबरच बॅलेट पेपर वापरायची वेळ आली तरीदेखील लोकशाहीसाठी ते करावेच लागेल?
आजचा राजीनामा भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा असेल कदाचित हीच वेळ नंतर कोणत्याही पक्षावर येवू शकते !
विजय पिसाळ नातेपुते !
९४२३६१३४४९
केवळ लोकशाहीसाठी !

शुक्रवार, १८ मे, २०१८

काँग्रेस अपयशातून धडा घेईल का ?

राजकारणात सत्ताधारी जेंव्हा जेंव्हा कुणाचेही ऐकत नाही तेंव्हा सक्षम विरोधक असावा लागतो सक्षम विरोधक नसेल तर सत्ताधारी मुजोर बनतो म्हणून काँग्रेस टिकलीच पाहिजे . . .

काँग्रेस अपयशातून धडा घेईल का ?

काँग्रेस अजून कीती काळ संयमाने राजकारण करणार!
आज काँग्रेसला आक्रमक व "इट का जवाब फत्थरसे देंगे "अशा नेतृत्वाची प्रत्येक राज्यात जरूर आहे
काँग्रेसला आक्रमक प्रवक्ते , आक्रमक वक्ते पुढे आणावेच लागतील, आय टी सेल जबरदस्त बनवावाच लागेल, खोटा नाटा प्रचार करणार्‍यांचा तशाच भाषेत समाचार घ्यावा लागेल,
आज काँग्रेसचे विरोधक  उद्योगपती , मिडीया , सर्व शासकीय यंत्रणा , साम दाम दंड भेद वापरून प्रत्येक गड सर करत आहे , आजची काँग्रेस नुसत्या गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विसंबून राहात आहे , हे खेदाची गोष्ट आहे , समोरच्या छावणीत  मोठे मुरब्बी सेनानी आहेत ते बलदंड आहेत, मॅनेजमेंट करण्याबाबत तरबेज आहेत  सर्व गोष्टींत माहिर आहेत, फोडा व राज्य करा ही इंग्रजांची निती हे त्यापेक्षाही खुबीने वापरत आहेत, इलेक्शन कमिशन, न्यायपालिका, पोलिस प्रशासन, व प्रत्येक शासकीय यंत्रणात यांनी माणसे पेरली आहेत,  असे   जबरदस्त  यांच्यासारखे खतरनाक रतिमहारती असतांना इकडे मात्र अजून शिवराय कुणीही होत नाही हे दुर्देवाने म्हणायची वेळ येत आहे,  सगळे जणू आपआपसात भांडत बसून विस्कटलेले आहेत. .
ममता बॅनर्जी , पवार साहेब, जगनमोहन रेड्डी , नारायण राणे यांना काँग्रेसने योग्य सन्मान दिला असता,काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी बेरजेचे राजकारण केले असते तर बरेच काँग्रेस मधील चांगले लोक पक्ष सोडून गेले नसते,  संगमा, तारीक अन्वर यांचा मान राखला असता ,  तर कदाचित  आज चित्र वेगळे असते , आज काँग्रेस कडे, प्रणब मुखर्जी , राजेश पायलट, माधवराव शिंदे अशी दमदार फौज नाही, बरेच मुरब्बी व जेष्ठ नेते योग्यता असूनही अडगळीत टाकले गेले , राज्यसभा , विधान परिषदा यातून नको ते पुढे केले गेले व त्यांनाच मंत्रीपदे व सर्व लाभाची पदे दिली गेली,त्यामुळे जे मास लिडर होते ते तर गेलेच पण   त्यांचेही कार्यकर्तेही पक्ष सोडून गेले ,  त्यामुळे आज  एकटे  राहुल गांधी   नवख्या  सेनापती सारखे  कमी पडतात हेच वास्तव आहे , काँग्रेस प्रत्येक राज्यात अंतर्गत कलह जर मिटवू शकत नसेल तर काय होणार? विरोधकांकडे प्रदेश पातळीवर, आमदार, खासदार, नगरसेवक, या ठिकाणी घराणेशाही आहे पण केंद्रीय नेतृत्व काळानुसार सतत बदलले  जाते व जनमतावर त्याचा अनुकूल परिणाम होतो ! 
पुर्वी काँग्रेसकडे जबरदस्त  लिडरशीप होती कार्यकर्ते व नेते यात ताळमेळ होता ,
राजकीय नेते कार्यकर्ता जपत होते ,राष्ट्रीय भावना होती,  कार्यकर्त्यालाही सत्तेत वाटा होता योग्यतेनुसार काहीतरी मिळत होते ,
आज काँग्रेसमधील नेते कार्यकर्त्याला काहीही देत नाहीत, (विरोधकात तरी सर्व आलबेल आहे असे नाही ),
सर्व सत्तेची पदे व संघटनेतील,  पक्षातील सर्व पदे ,नेते, नेत्यांचे सगेसोयरे ,  बायको, मुलगा ,सुन,  भाऊ, पुतण्या , जावई, मेव्हणा यातच वाटून टाकतात, पक्षाचा निधी सुद्धा कधीच खालीपर्यंत येत नाही , आणि सर्वच जाती धर्मातील,  समाजातील लोकांना  समान धरायच्या ऐवजी मतासाठी प्रत्येक राज्यात विशिष्ट घटकांना अती झुकते माप देते व काही लोकांचे प्रमाणाबाहेर लांगूलचालन करून बहुसंख्य  बाकीच्या लोकांना नाराज करायचा उद्योग केला जातो , आजवर काँग्रेसने खूप चांगल्या योजना राबवल्या पण  त्याची जाहीरात केली नाही,
ज्यांच्या साठी काँग्रेसने भरपूर  योजना राबवल्या  तो वर्ग सुद्धा काँग्रेस पासून दुर गेला , गावागावात विविध तंटे सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बोटचेपी भुमिका काँग्रेस घेत राहिली,
मागच्या काळात मित्र पक्षांची जिरवण्यासाठी मित्र पक्षांवर विविध आरोप करत राहिली,  मित्र पक्ष व त्यांचे नेते याचाही सन्मान केला नाही , पराभवाची कारणे न शोधता ,सतत चुका केल्या , पैसेवाले लोकांना राज्यसभा व विधान परिषद यात झुकते माफ दिले गेले , काँग्रेस सत्तेवर असतांना काही गोष्टींत ठाम राहिली नाही , जाहिरात व मार्केटिंग या गोष्टही केल्या नाहीत याची फळे आज काँग्रेस भोगते आहे , घोटाळे न करता सुद्धा घोटाळेबाज हा शिक्का लावून घेतला , ज्यांनी प्रचंड घोटाळे केले त्यांचेवर जबरदस्त व धड नीट प्रहारही केले नाहीत, हेच काँग्रेसच्या अपयशाचे कारण आहे , केंद्रीय लेवलला इतर पक्ष व्यक्ती पुजा करत नाहीत मात्र काँग्रेस वारंवार व्यक्तीपुजा करते आहे , त्यामुळे सामान्य घरातील लोकांना काँग्रेस मध्ये आपल्याला संधी नाही हीच भावना प्रबळ होताना दिसते आहे ,मनमोहन सिंगा सारखे हुशार गुणी पंतप्रधान जरी काँग्रेसने दिले तरीदेखील मास लिडर असणारे पदापासून दुर ठेवले , त्यामुळेही मासलिडरचा पाठीराखा वर्ग बाजूला गेला,  काँग्रेस निर्णय घेते पण निर्णय झटपट घेत नाही , निर्णय लांबवत बसते व त्यातूनही नाराजी वाढते , आज देशात सक्षम विरोधक पाहिजे त्यासाठी हुशार चाणाक्ष व सर्वांना बरोबर घेवून जाणार्‍या मुरब्बी नेतृत्वाची गरज आहे , आजच्या घडीला काही काळ तरी राहुल गांधींनी बाजूला  होवून दुसर्याला लिडरशिप दिली पाहिजे ,
आज काँग्रेसमध्येही जबरदस्त वक्ते आहेत, जबरदस्त काम करणारे आहेत पण त्यांना संधीच मिळत नाही , जनमताची नस माहिती नसलेले प्रत्येक राज्यात नेते लादले जातात, पृथ्वीराज चव्हाण वैयक्तीक हुशार आहेत, चांगले प्रशासक आहेत मात्र जनतेत त्यांना  फारसी किंमत नाही , त्यामुळे सुद्धा महाराष्ट्र गमवावा लागला, त्यावेळी आक्रमक नारायण राणे मुख्यमंत्री केले गेले असते तर इतकी भयंकर अवस्था झाली नसती, विलासराव देशमुखांचे नंतर संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची बांधणी करणारा नेता दुर्देवाने लाभला नाही ,आज देशाचं नेतृत्व करताना काँग्रेसने स्वतः त्यागाची भुमिका घेवून पवार साहेबांना करायला सांगितले पाहिजे तरच परिवर्तन होईल,
काँग्रेसने , प्रिंट व इलेक्ट्रीक मिडीया व्यवस्थित हाताळला पाहिजे , सोशल मिडियात जी पक्षाची प्रतिमा मलीन केले जातेय ती होवू नये या साठी आयटी सेल स्ट्राँग केला पाहिजे , सिंहाची शिकार करायला नुसती हाकाटी देवून चालणार नाही तर त्याला व्यवस्थित जाळे टाकावे लागेल तरच सिंहाची शिकार होईल,
यांना रोखता येईल!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

शुक्रवार, ११ मे, २०१८

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

खेड्यातील सुखी समृद्ध भारत, कृषीप्रधान भारत ही देशाची ओळख संपण्याच्या मार्गावर आहे , वाढती लोकसंख्या , लोकसंखेवर आधारीत शहरात वाढणारे लोकसभा व विधानसभांचे मतदारसंघ यामुळे ग्रामीण भागातील कमी होणारे प्रतिनिधीत्व व शहरी लोकांना समोर ठेवून घेतले जाणारे निर्णय यामुळे ग्रामीण शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे, आज ज्यातून शेतकर्यांना हक्काचे चार पैसे मिळत होते, तो दुध धंदा पुर्णपणे तोट्यात आहे, पाण्याची किंमत सुद्धा दुधाला नाही , साखर कडू झाल्याने ऊसाला बाजार नाही, कित्येक साखरकारखाने आजारी आहेत, बंद पडत आहेत, दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत,साधी एफआरफी देवू शकत नाहीत,  तेलबिया , सोयाबीन, मका, कापूस, कांदा , तुर या पिकांच्या बाजारभावाची परिस्थिती तर  भयानक आहे , भाजीपाला , फळभाज्या याला मार्केटमध्ये कवडीमोल किंमत मिळत आहे .
या विदारक परिस्थिती मुळे ग्रामीण अर्थकारण पुर्णपणे कोलमडले आहे,
मुला मुलींची लग्ने रखडली आहेत, मुलांना शिक्षण द्यावे म्हटले तर हातात पैसा नाही ,वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट, हे तर जणूकाही पाचवीलाच पुजलेले आहे , वेळी अवेळी होणारे भारनियमन, सतत बदलणार्या भारनियमनाच्या वेळा काय काय वाढून ठेवले शेतकर्यांच्या नशीबी देव जाणे ,
काहीही कारण नसताना कॅनॉल लगतच्या व नदीकाठच्या शेतकर्यांचा खंडीत केला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुर्णपणे खचला आहे ,हैराण आहे  पाणी चोरणारे मोकाट व सर्वसामान्यांचा वीजपुरवठा खंडीत करणे हे महावितरण व इरिगेशनचे काम मोघलशाहीलाही लाजवेल असे आहे , ऊन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते , विहिरीत पाणी असतांनाही केवळ इरिगेशनचे  अधिकारी व महावितरणचे अधिकारी शेतकर्यांचा छळ करत आहेत, उभी पीके जळताना शेतकर्यांचे ह्रदय सुद्धा जळत आहे . शेतकर्यांनी जगाचे कसे हा प्रश्न आवासून निर्माण झाला आहे ,
बँकेच्या  कर्जाने, व  सावकारी कर्जाने शेतकरी घायाळ झाला आहे . तो पुर्णपणे घायला आलेला असतांना , शेतकर्यांना कोणताही दिलासा मिळत नाही , नुसत्या घोषणांचा पाऊस चालू आहे पण ग्राऊंड लेव्हल वर विकासाचा थेंब सुद्धा पडत नाही ,
शहरात भाजीपाला , फळे, धान्य, दुध,  मांस, अंडी स्वस्त मिळावीत म्हणून विविध मार्गाने निर्यातीत अडथळे आणून, तोच शेतमाल कवडीमोल दराने शहरात कसा जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते आहे!
शेतकर्यांना लागणारे बरेच घटक २८%जीएसटीत आहेत यामुळे आज ग्रामीण भारत मरणासन्न अवस्थेतून जात आहे , "बाप भीक मागू देईना व आई जेवायला घालेना "अशी अवस्था या देशातील शेतकर्याची करून टाकली आहे , यातून मार्ग काढायची भाषा नाही , कोणताही दिलासा नाही , रोज धर्म आणि जातीचे ढोल बडवून समाज दुभंगला जाईल अशा पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातुन शहरात जायचे म्हटले तर शहरी उद्योगपती , कारखानदार हे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवतात ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार कंपनीत मिळालाच तर  ६ महिने झाले की ब्रेक ठरलेलाच असतो !
शासकीय नोकर्या नाहीत, यामुळे प्रचंड वाढलेली बेरोजगारी व त्यातुन निर्माण होणारी गुन्हेगारी व गुन्हेगारीतून वाढणारे खून व बलात्कार आणि जातीय ताणतणाव, या दृष्टचक्रात सापडलेला तरूण कसा बाहेर येणार,
गावात साधे बांधकाम करायला सुद्धा वाळू भेटत नाही , नियतीने कोणता सुड उगवला हे कळायला मार्ग नाही ,
ग्रामीण भागातील कुणालाही शिक्षण परवडत नाही केवळ नैराश्य व चिंतेचे वातावरण आज जवळून पहावे लागतेय!
शिक्षण, नोकरी , व्यवसाय, धंदा या शिवाय तरूण पिढी भरकटलेल्या अवस्थेत जगते आहे . या सर्वांचा परिणाम मुले व्यसनी बनत आहेत, मावा , गुटखा , दारू तंबाखू , मटका याच्या आहारी जात आहेत, या सर्वांचा परिपाक म्हणून तरूण शेतकरी आत्महात्या करत आहेत,
असो हेही वेळ जाईल तरूण परत पेटून उठेल, ग्रामीण भारत नव्याने झेप घेईल, पण एक पिढी बरबाद झाली आहे ति तुम्हाला कधीच माफ करणार नाही !
जय जवान, जय किसान!
भारत माता की, जय!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

गरिबांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे का?

सर्व जातीतील गरीब मुला मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत किंवा माफक फिमध्ये मिळण्याची व्यवस्था व्हावी का ?

आज सर्वच जातीमध्ये गरिबांची संख्या लक्षणीय आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची आस आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घरातील मर्यादित उत्पादनाची साधने , अशिक्षित आईवडील, खेड्यातील जीवनमान, शहरात रहात असेल तर झोपडपट्टीतील राहणीमान, आठराविश्व दारिद्र्य  अशा  परिस्थिती मुळे अभ्यासत येणारे अडथळे या विविध कारणामुळे गरिबांची मुले , प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेर फेकली जात आहेत, त्यामुळे गरिबांचा उच्च शिक्षणातील आलेख फारच कमी आहे . गरिब मुला मुलींचे पालक एकतर रोजंदारीवर कामाला जातात, लोकांच्या घरी मिळेल ती सर्व कामे करतात, किंवा एकदम छोटा मोठा व्यवसाय करतात यात प्रत्येक जातीतील गरिबांचा समावेश होतो, बुद्धी असूनही , पात्रता असूनही , गुणवत्ता असूनही , या मुला मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते ही गोष्ट समानतेच्या तत्वाविरूद्ध असल्यासारखी वाटते ,
तसे पाहिले तर गरिबी ही जात पाहून येत नाही, श्रीमंत आणि गरिबांची सुद्धा भूक अन्न पाण्याशिवाय भागू शकत नाही , आज खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये गरिबांना जवळपास प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. शासकीय शाळा कॉलेज मोडीत काढून खाजगी शिक्षणसंस्थांच्या बाजारात केवळ श्रीमंतांना शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे , गरिबांची मुले खाजगी कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत, चांगल्या नोट्स मिळवू शकत नाहीत त्यामुळेही गरिबांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असते . आज शिक्षणाचा बाजार निर्माण झाला याला आळा बसणे केवळ अशक्य आहे , यापुढच्या काळात फक्त श्रीमंतांचीच मुलेच उच्चशिक्षण घेतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गरिबांच्या मुलांनी, आय आयटी, मेडिकल, किंवा इतर दर्जेदार कोर्सेससाठी प्रवेश मिळवण्याची स्वप्न पाहु नयेत का ?
प्रत्येकजण समानतेची , गुणवत्तेची भाषा बोलतो , परिस्थितीच विपरीत असेल, कोणतीही दर्जेदार साधने उपलब्ध नसतील, अभ्यासाला निकोप वातावरण नसेल तर हुशार असूनही चांगली गुणवत्ता कशी दाखवता येईल, जर आई बाप शिपाई, कारकुन, शेतकरी , मोलमजुरी , घरकाम, करणारे असतील तर पैशाअभावी ते मुलांचे व्यवस्थित संगोपन करू शकत नाहीत तर उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शाळा कॉलेज कसे निवडणार, ट्यूशन कशा लावणार आणि त्याकरिता पैसा कसा उभा करणार,
खरेतर जात पाहून शैक्षणिक फि ठरवण्यापेक्षा गरिबी व श्रीमंती पाहून शैक्षणिक फि ठरवायला पाहिजे शिक्षणाच्या पायाभूत सुविधाच गरिबांच्या मुलांना मिळत नसतील तर ति मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर स्पर्धा कशी करणार? शैक्षणिक साधना अभावी मार्क्स कसे मिळवणार, आज बहुतेक ठिकाणी डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात  , अधिकार्यांची मुले मोठ मोठे क्लास जॉईन करून अधिकारी होतात, केवळ अफाट गुणवत्ता व कुणाच्या तरी वरदहस्तामुळे ५ ते०% गरिबांची मुलेच एम पी एसी व युपीएसीच्या परिक्षांना बसतात व त्यातील काही यशस्वी होतात, बाकीच्यांच्या नशीब एकतर, रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ येते, कुणाला खाजगी नोकरदार व्हावे लागते , किंवा मिलिटरी , पोलिस भरती या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात,
आजच्या परिस्थितीत बहुसंख्य लोकांना शिक्षण परवडत नाही म्हणून ते सोडायची वेळ येते , शासकीय नोकरी नाही, खाजगी नोकरीत कायम होण्याची शक्यता नाही , आणि चांगल्या शिक्षणासाठी पैसा नाही या मुळे गरिब श्रीमंत अशी  प्रचंड तफावत व गरिबांमध्ये  मागासलेपणा निर्माण होत आहे .
याला पर्याय काय नुसते लेख लिहून प्रश्न सुटणार नाहीत तर जनमताचा रेटा लावून खालील उपाय शोधावे लागतील!
गरिबी हा घटक मानून सर्व शासकीय, खाजगी  , अशा शिक्षणसंस्था मध्ये किमान ५० %जागा आरक्षित कराव्या लागतील!
गरिबांच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे लागेल!
शैक्षणिक स्कॉलरशिप गरिबांच्याही मुलांना मिळालीच पाहिजे !
शासनाने उच्च शिक्षणात शाळा कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा रद्द केला पाहिजे !
खाजगी शाळा कॉलेज मध्ये सुद्धा गरिबांना ५० %जागा राखीव पाहिजेत!
अशा पद्धतीने जर उपाय केले नाहीत तर या देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही व त्यामुळे अराजक स्थिती निर्माण होवून श्रीमंतांना सुद्धा सुखाने झोपता येणार नाही !
दरोडे , चोर्या , खून, हे संपत्तीच्या विषम वाटणीतून होतील?
म्हणून गरिब मुख्य प्रवाहात यायचा असेल तर त्याला श्रीमंताच्या मुलांसारखे गुणवत्तापुर्ण व मोफत  शिक्षण मिळायला हवे आणि शिक्षणात यशस्वी झाल्या नंतर पात्रतेप्रमाणे नोकरीच्या व व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

आयुष्याचे सार्थक कधी होईल

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९