vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २२ मे, २०१९

ईव्हीएम वरून चालू असलेला गोंधळ याला जबाबदार कोण? संशय दुर करायचे काम निवडणूक आयोगाने व न्यायालयाने करायला नको का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*निवडणूक पारदर्शक होण्यासाठी . . . .*
*जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होण्यासाठी . . .*
*संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी आता उपाययोजना करायची वेळ आली आहे . . .*

*ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर मारलेली चिफ असते व तिचा डाटा चेंज करता येऊ शकतो कारण ते सॉफ्टवेअर असते हा विरोधकांचा दावा खरा किंवा खोटा याला फारसे महत्व नाही पण, किंचित सुद्धा संशय नको  म्हणून त्याला   पर्याय दिलाच पाहिजे व  निवडणूक पारदर्शक झालीच पाहिजे !
 ही केवळ  विरोधकांची मागणी म्हणून नव्हे तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, निवडणूक आयोगाने व न्यायालयाने विरोधक म्हणतात म्हणून नव्हे तर जनतेच्या मनातील संभ्रम दुर व्हावा म्हणून लोकांच्या मतांचा विचार केलाच पाहिजे !
त्यासाठी आधुनिक मतदान यंत्राच्या साह्यानेच बटन दाबून  मतदान घ्यावे , बटन ज्या चिन्हा समोरील दाबले ते चिन्ह प्रिंट होऊन  ते प्रिंटिंग ज्या मतदाराने मतदान केले त्याला दिसावे व मगच ते संबधित पेटीत पडावे आता ज्या प्रमाणे व्हीव्हीपॅट करते तसेच!  ( त्यातून व्हीव्ही पॅट सारखी चिठ्ठी ज्याला मतदान केले आहे ति बाहेर पडावी व थोडी जाड आणि मोठी असावी)
व अश्या स्लिप किंवा चिठ्ठ्या या एटीएम मशिन सारखे मशिन विकसित करून मोजल्या जाव्यात त्यामुळे मोजायची कटकट मिटेल व त्या चिठ्ठ्या कितीही वेळा मोजता येतील  व निकालही वेळेवर लागतील  व त्या कितीही वेळा मोजता येण्याचे कारण शंकेला वाव नको .   जोपर्यंत सर्व वाद मिटत नाहीत तोपर्यंत त्या चिठ्ठ्या सुरक्षित जपून ठेवाव्यात!
 म्हणजेच  त्या चिठ्ठ्या सुद्धा पैसे मोजणारे मशिन सारखे,  व्हीव्ही पॅट चे कौंटींग करणारे मशिन विकसित करून करावे . .
म्हणजे मशिन हॅक झाली ही बोंब कोणीही ठोकायला नको किंवा हा आरोप सातत्याने व्हायला नको  ! व हा गोंधळ कायमचा मिटायला हवा . . .   . .
विजय पिसाळ नातेपुते