vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १२ मे, २०२२

आत्महत्या ! आत्महत्या ! ! आत्महत्या ! ! !


चालू घडामोडींचे विश्लेषण


आत्महत्या!  आत्महत्या ! !  आत्महत्या ! ! ! 

दुष्काळ पडला काही पिकले नाही ,  आत्महत्या ! 
पुर आला , पिक वाहून गेले , आत्महत्या ! 
पिकाला बाजारभाव भेटला नाही , आत्माराम! 
मुलीचे लग्न जमत नाही , आत्महत्या ! 
कर्ज झाले , आत्महत्या ! 
मुलगी पळून गेली , आत्महत्या ! 
मुलाला नोकरी लागत नाही , आत्महत्या ! 
घरात भांडण झाले , आत्महत्या ! 
 टेन्शन आले , आत्महत्या ! 
सावकार व बँका छळवणूक करतात, आत्महत्या ! 
कोणतीही समस्या निर्माण झाली की आत्महत्या ! 
आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे ? 
मान्य आहे . . 
जीवनात संकटे येतात  मनस्ताप होतो , सरकार, प्रशासकीय यंत्रणा खूप  त्रास देतात,  जगणे मुस्किल करतात,  छळवणूक होते , पिळवणूक होते ,  कष्ट करुनही पदरात काहीच पडत नाही ,  कर्ज वाढते ,  समाजातील मानसन्मान जातो ,  अपमान होतो .  परिस्थिती वाईट व विपरीत होते .  जवळचे  सगळे सोडून जातात, समाज दुषणे देतो ,  वाईट परिस्थितीत  मदतीला कुणीही येत नाही .  
पण याला उपाय आत्महत्या आहे का ? 
आम्ही  छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा वारसा सांगतो , खरच आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे ,  इतका मोठा आदर्श आपल्या समोर असताना आपण जीवनाला कंटाळतो ! 
 शिवरायांना , शंभुराजांना जीवनात हजारो संकटे आलीच ना !  
 पण ते संकटांना घाबरले का ?  त्यांनी संकटांशी सामना केला ना !   संकटांशी दोन हात केले ना !   शेवटपर्यंत ते लढत राहिले ना !   कुणासाठी प्रजेसाठीच ना ! 
 असली भेकड, नेबळट, घाबरट,   दळभद्री पुढची प्रजा निघेल असे जर तेंव्हा शिवरायांना वाटले असते तर कदाचित शिवरायांनी सुद्धा  स्वराज्याचा संकल्प विचारात घेतला नसता ! 
 लोकांसाठी  शिवरायांनी  स्वतःचा जीव कित्येक वेळा धोक्यात घातला आणि आम्ही  काय आदर्श घेतला ! 
आपण महापुरुषांकडुन आदर्श न  घेता आत्महत्या करतोय किती दुर्दैव आहे 
  षंढ होऊन आत्महत्या करतांना आमच्या मनात , लहान मुले, बायका पोरं , आई वडील यांचा कोणताही विचार का येत नाही . मोगलांच्या , निजामाचा , आदिलशाहाच्या , कुतुबशहाच्या , 
इंग्रजांच्या विरुद्ध आमचे पुर्वज यासाठीच लढले का ? 
लेकांनो प्रसंगी 
व्यवस्था उलथून टाका ,  कुणाचेही पैसे बुडवू नका पण तुमच्याकडे पैसे नसतील व तो भयंकर त्रास देत असेल त्याला  प्रसंगी बडवून काढा . 
पैसा मिळवण्याचे सरळमार्गी खूप मार्ग आहेत, 
वाट्टेल तो कामधंदा करा ,  शेती कोरडवाहू असेल तर  पानटपरी टाका , वडापावची गाडी टाका , पंग्चर दुकान टाका , कोणतेही काम करा , कामाला लाजू नका पण  नालायकांनो आत्महत्या करु नका . . 
किती दिवस आत्महत्या करणार तुम्ही ?  काय आदर्श पुढच्या पिढीला देणार तुम्ही . . 
वारेमाप खर्च करणे , सातत्याने  एक म्हणजे एकच पिक घेणे सोडून द्या !  पिक बदल करा , 
थोडीफार तरकारी करा ,  थोडीफार फळझाडे लावा , त्याची  हातविक्री करा , त्यातून प्रपंच चालवा . . 
लग्न, बारसे , वाढदिवस  छोटे व घरगुती करा . 
कौटुंबिक कार्यक्रम करतांना उधळपट्टी करु नका बचत करा .  व्यसनापासून दुर रहा .  
पण आत्महत्या करु नका . . 
आत्महत्या हा पर्याय नाही . 
कुटूंब रस्तावर येईल असे कृत्य करणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे.
लेखण प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९
९६६५९३६९४९