चालू घडामोडींचे विश्लेषण
आत्महत्या! आत्महत्या ! ! आत्महत्या ! ! !
दुष्काळ पडला काही पिकले नाही , आत्महत्या !
पुर आला , पिक वाहून गेले , आत्महत्या !
पिकाला बाजारभाव भेटला नाही , आत्माराम!
मुलीचे लग्न जमत नाही , आत्महत्या !
कर्ज झाले , आत्महत्या !
मुलगी पळून गेली , आत्महत्या !
मुलाला नोकरी लागत नाही , आत्महत्या !
घरात भांडण झाले , आत्महत्या !
टेन्शन आले , आत्महत्या !
सावकार व बँका छळवणूक करतात, आत्महत्या !
कोणतीही समस्या निर्माण झाली की आत्महत्या !
आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे ?
मान्य आहे . .
जीवनात संकटे येतात मनस्ताप होतो , सरकार, प्रशासकीय यंत्रणा खूप त्रास देतात, जगणे मुस्किल करतात, छळवणूक होते , पिळवणूक होते , कष्ट करुनही पदरात काहीच पडत नाही , कर्ज वाढते , समाजातील मानसन्मान जातो , अपमान होतो . परिस्थिती वाईट व विपरीत होते . जवळचे सगळे सोडून जातात, समाज दुषणे देतो , वाईट परिस्थितीत मदतीला कुणीही येत नाही .
पण याला उपाय आत्महत्या आहे का ?
आम्ही छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा वारसा सांगतो , खरच आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे , इतका मोठा आदर्श आपल्या समोर असताना आपण जीवनाला कंटाळतो !
शिवरायांना , शंभुराजांना जीवनात हजारो संकटे आलीच ना !
पण ते संकटांना घाबरले का ? त्यांनी संकटांशी सामना केला ना ! संकटांशी दोन हात केले ना ! शेवटपर्यंत ते लढत राहिले ना ! कुणासाठी प्रजेसाठीच ना !
असली भेकड, नेबळट, घाबरट, दळभद्री पुढची प्रजा निघेल असे जर तेंव्हा शिवरायांना वाटले असते तर कदाचित शिवरायांनी सुद्धा स्वराज्याचा संकल्प विचारात घेतला नसता !
लोकांसाठी शिवरायांनी स्वतःचा जीव कित्येक वेळा धोक्यात घातला आणि आम्ही काय आदर्श घेतला !
आपण महापुरुषांकडुन आदर्श न घेता आत्महत्या करतोय किती दुर्दैव आहे
षंढ होऊन आत्महत्या करतांना आमच्या मनात , लहान मुले, बायका पोरं , आई वडील यांचा कोणताही विचार का येत नाही . मोगलांच्या , निजामाचा , आदिलशाहाच्या , कुतुबशहाच्या ,
इंग्रजांच्या विरुद्ध आमचे पुर्वज यासाठीच लढले का ?
लेकांनो प्रसंगी
व्यवस्था उलथून टाका , कुणाचेही पैसे बुडवू नका पण तुमच्याकडे पैसे नसतील व तो भयंकर त्रास देत असेल त्याला प्रसंगी बडवून काढा .
पैसा मिळवण्याचे सरळमार्गी खूप मार्ग आहेत,
वाट्टेल तो कामधंदा करा , शेती कोरडवाहू असेल तर पानटपरी टाका , वडापावची गाडी टाका , पंग्चर दुकान टाका , कोणतेही काम करा , कामाला लाजू नका पण नालायकांनो आत्महत्या करु नका . .
किती दिवस आत्महत्या करणार तुम्ही ? काय आदर्श पुढच्या पिढीला देणार तुम्ही . .
वारेमाप खर्च करणे , सातत्याने एक म्हणजे एकच पिक घेणे सोडून द्या ! पिक बदल करा ,
थोडीफार तरकारी करा , थोडीफार फळझाडे लावा , त्याची हातविक्री करा , त्यातून प्रपंच चालवा . .
लग्न, बारसे , वाढदिवस छोटे व घरगुती करा .
कौटुंबिक कार्यक्रम करतांना उधळपट्टी करु नका बचत करा . व्यसनापासून दुर रहा .
पण आत्महत्या करु नका . .
आत्महत्या हा पर्याय नाही .
कुटूंब रस्तावर येईल असे कृत्य करणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे.
लेखण प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. .
९४२३६१३४४९
९६६५९३६९४९