vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

सोशल मिडिया शाप की , वरदान?

चालू घडामोडींचे विश्लेषण


*सोशल मिडिया शाप की वरदान. .* 
काहीजण चोवीस तास सोशल मिडिया वापरतील, मनसोक्त करमणूक करून घेतील,  करमणूक करतील, एकमेकांशी संवाद साधतील,  हजारो , लाखो लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचतील, सोशल मिडीयाचाच  वापर करून सोशल मिडिया किती बेकार आहे हे पण सांगतील असो ! हेही खरे आहे  ,  हातात काम असताना सोशल मिडियाचा अती वापर करणं हे चुकच आहे .  पण सोशल मिडिया हा नुसता टाईमपास आहे का ?  सोशल मिडिया नुसती करमणूक आहे का ? हे जर आपण हो म्हणत असू  तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय!  
याच सोशल मिडियामुळे गावागातील समस्या वरिष्ठा पर्यंत पोहचू लागल्या हे विसरता येईल का ? फेसबुक व व्हॉट्सपच्या व सर्वच सोशल मिडियाच्या  माध्यमातून सर्व प्रकारचा व्यापार होऊ लागला आहे  .  जगातील ज्ञान, विज्ञान, कला , क्रिडा यांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे  .  नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा , वस्तूंचे बाजारभाव हे सुद्धा क्षणात आम्हाला मिळू लागले . रोडवरील  अपघात असो कि  घरातील छानसा कार्यक्रम असो त्याचे व्हीडिओ, अॅडिओ, फोटो लगेच मिळतात, त्यामुळे अपघातात मदत होतेच ना ?  इतरांच्या आनंदात सहभागी होता येतेच ना ?  रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबीरे  यांचे आवाहन हजारो लोकांना करता येते.  विधायक कामासाठी लोकांना आवाहन करता येते , लोकांचा सहभाग वाढवता येतो  हे केवळ सोशल मिडियामुळेच शक्य झाले की नाही .  कोणत्या शहरात, कोणत्या भागात काय समस्या आहेत हे पण समजू लागले .  शाळा , कॉलेज, ट्यूशन, यांच्या डेली अपडेट्स याच प्लॅटफॉर्मवर मिळू लागल्या . वर्ग बंद ठेवले तरीदेखील याच माध्यमातून शिक्षण उपलब्ध होत आहे . स्पर्धा परिक्षांची तयारी , विविध अभ्यासक्रम याच माध्यमातून चालू आहेत.  आपला पाल्य शाळेत येतो का , त्याची तयारी कशी आहे . तो सर्व तासांना असतो का ?  याची माहिती घरबसल्या पालकांना  मिळू लागली आहे  .  जगाच्या कानाकोपर्यातील सर्व माहिती क्षणात प्राप्त होऊ लागली आहे.  परदेशात,  परगावात, शहरात   नोकरी व शिक्षण या निमित्ताने असलेली  मुले, नातवंडे , सुना यांच्याशी घरातील वडिलधारी मंडळी व्हीडिओ कॉलवरून बोलू लागली .  शासकीय आदेश क्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होऊ लागले आहेत  .  किराणा  दुकानदार, भाजीवाले  ,  या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू लागले आहेत  .  शेतकऱ्यांना जागेवरून माल विकता येतोय, त्याची जाहिरात करता येतेय,  विविध वाचणीय पुस्तके घरबसल्या वाचता येऊ लागली आहेत . मनोरंजनाचे साधन जरूर  आहे सोशल मिडिया , पण आपुलकीच्या  संवादाचे माध्यम सुद्धा  आहे सोशल मिडिया , मदतीला धावणारा आहे सोशल मिडिया . गोरगरीबांच्या अडचणींचे निराकरण करण्यास मदत आहे सोशल मिडिया .  धावपळीच्या जीवनात एकमेकांना जोडणारा आहे सोशल मिडिया . शाळा कॉलेज संपल्या नंतर  दुरावलेले मित्र मैत्रिणी  एकत्र करणारा आहे सोशल मिडिया . सर्व वस्तुंच्या किंमती , खरेदी व विक्री करणाऱ्या कंपन्या यांची माहिती मिळण्याचे ठिकाण आहे सोशल मिडिया . उत्पादक ते ग्राहक जोडणारा आहे हाच सोशल मिडिया .  गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आहे सोशल मिडिया . .  किरकोळ तोटे जरी असले तरीदेखील फार महत्वाचा आहे सोशल मिडिया . .  फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच त्याचे फायदे समजतील नाहीतर फक्त  , त्याचाच वापर करून सोशल मिडिया खराब आहे असे म्हणणेही  योग्य नाही .  
मला तर सोशल मिडिया हा मानवाला वरदान आहे असेच वाटते . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९