vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ४ मे, २०१९

मित्रांनो आयुष्य आनंदी जगुया !

लेख पुर्णपणे वाचा नक्कीच उर्जा येईल. . .
























चालू घडामोडींचे विश्लेषण

🌺🍁🌸🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🌺
गुंतागुंत माझ्या मनाची
©®विजय पिसाळ
*या सुंदर आयुष्यात मि, दुःखी नाही व  कुणावर नाराज पण  नाही.*
*कारण आपल्या  आयुष्यात जे जे घडते ते आपल्या हातात  काहीच नसते व पुढे काय घडणार हे पण आपल्या ध्यानीमनी नसते, सगळा खेळ सृष्टीचा , विधात्याचा* माझ्या आयुष्यात
*कित्येक संकटे आली व त्यातून सातत्याने मार्ग निघाला , २००७ पासून जवळपास २०१८ पर्यंत तब्बल ११ वर्ष संघर्ष केला  कित्येक कठोर  अघात सोसले यात वडीलांचे अकाली जाणे असेल, नंतर आईचे अजारपण, नंतर माझे मनक्याचे काहीकाळासाठीचे पण महाभयंकर  आजारपण ज्यात प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेले होते ,  जवळपास  जे सर्व डॉक्टरांना माझे बरे होणे व पहिल्या सारखे तंदुरुस्त होणे  अशक्य वाटत होते. पण हे कठीण आजारपण मि माझ्या  इच्छा शक्तीच्या बळावर पळवून लावले यासाठी मि प्रचंड चालणे , पोहणे व नियमित  व्यायाम  आणि अवघड  किल्ले चढाई यातून माझे ठणठणीत  पुर्णपणे बरे होणे  शक्य झाले , मि बरा होतोय तोपर्यंतच यात भरीस भर म्हणून   वादळात जवळपास केळीची ७ एकर बाग भुईसपाट होऊन  २० ते २२ लाखांचे नुकसान झाले  व या सर्वांवर कढी म्हणजे पत्नीचे  अजारपण व उपचारांचा प्रचंड खर्च तरीदेखील मि  कधीच डगमगलो नाही की, खचलो नाही सर्वांवर यशस्वी मात करत आयुष्याला जिंकायचा प्रयत्न केला व यशस्वी झालो . परमेश्वराची कृपा समजा किंवा नशीब म्हणा किंवा कष्टाचे फळ समजा पण  नोहेंबर २०१८ पासून सर्व संकटे संपली व परत आनंदी पर्व सुरू झाले, मुलीला  १० ला ९१%मार्क, लहान मुलगा व मुलगी सुद्धा  खूप हुशार  आहेत सोबतीला मनापासून साथ देणारी  पत्नी सदैव पाठीशी आहेच  ,  आईचे, मोठे बंधू व , बहिणींचींचे आशीर्वाद पाठिशी सदैव असतात  !   मग   ,  अजून काय लागते आयुष्यात,  हा प्रवास घरातील  सर्वांच्याच  पाठबळावर व मित्र  , सोबती,  हितचिंतक   यांनी दिलेल्या  मानसिक  ताकदीीवर  व वेळोवेळी एकमेकांच्या साथीमुळे व  आधारावर पुर्ण केला*
*हे सर्व काही घडत असताना*
  *वेदना कितीही झाल्या तरी खचलो नाही , आयुष्यभर जीवलग   मित्र खूप  मिळाले , त्यातील  काहीजण अडचणीत   दूर सुद्धा  गेले  थोडीशी मनाची  घालमेल  झाली मात्र  कधीच कुणावर  राग व्यक्त केला  नाही.* जीवनात
*मनातील भावना व्यक्त करताना कदाचित कुणी दुःखावतं तर कुणी सुखावतं हा नियमच सृष्टीचाच  मात्र मि कधीच कुणाशीही संवादाचे मार्ग बंद करत नाही* विसंवादला थारा नाही .
*मला सगळ्यांनाच समजून घेण्याची तशी सवय आहे व शक्यतो मि फारसा कुठे व्यक्त होत नाही पण जे आपुलकीने बोलतात आपले वाटतात, त्यांना मनापासून सर्व सांगतो कारण बोलून मन हालकं होतं हा विचार असतो*
*कित्येकवेळा माझ्याकडून चुकाही होतात, त्या जवळच्या मित्रांजवळ  कबूल सुद्धा करतो  व त्यावर मनन चिंतन करायची तयारी सातत्याने  ठेवतो , आणि कुणी समजून घेतले तर माझे मन  सुखावते , नाही समजून घेतले तरीदेखील मि  सोडत नाही माझ्यातला   शांतपणा  मात्र समोरच्या वैक्तीच्या डोक्यातील आपल्या बद्दलचा राग व गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत बैचेन मात्र होत  असतो मी*
*सर्व नात्यावर प्रेम करायची आवड असल्याने व ति नाती कधीच  तुटू नयेत असेच वाटते व तेच  माझे मन मला सांगते व त्यासाठी मि शक्य होईल तेवढी माघार घेणे पसंत करतो*
*समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलून हालकं वाटतं असेल तरीही बोलतो किंवा एखाद्याला आपल्याशी  बोलायचे नसेल आपल्याला टाळायचे असेल  तरीदेखील माझी बिलकुल हरकत नसते कारण कुणालाच आपल्यामुळे ठेच लागू नये हेच वाटते* या आयुष्यात फक्त
*जिंकायचं आहे आपुलकी व प्रेमाने !  सर्वांनाच आपलेसे करायचे   आणि घट्ट करायचे आहेत मैत्रीचे बंध म्हणून कधीच कुणाबरोबर कधी किरकोळ दुरावलो तरी , स्वतःच पुढाकार घेऊन गैरसमज  दुर कसे  होतील हाच प्रयत्न असतो माझा  , व कुणीही असो मि  कधीच माझ्याकडून संवाद बंद करत नाही   ,  का ते  माहीत नाही पण माझा स्वभावच  तसाच आहे.*
*जगू वाटत स्वतःसाठी ,पण इतरांशीवाय कधीच करमत पण नाही आणि  जीव तुटतो खूप .*
*आयुष्य खुप सोपं आहे , गरजा मर्यादित आहेत , पण जगता येत नाही  एकटं एकटं हाच  मुळ स्वभाव आहे .*
*त्यामुळे आयुष्यात कित्येक मित्र मैत्रिणी जोडता आले, यादी खूप मोठी तयार झाली जेवढा जमेल तेवढा वेळ पण दिला सर्वांसाठी त्यातून बहुतेकांनी मनापासून प्रेम दिले,  हीच  कमाईच समजतो मी*
*लहान व्हायचं स्वप्न आता पुर्ण होणार नाही , मित्राांना मि सदैव म्हणतो  ,शाळा , कॉलेजचे दिवस परत नाहीत  , कधीतरी एकत्र येवूया   व आयुष्यातील काही आपुलकीचे मित्रांना  भेटूया ,  काहींना नसतो वेळ  पैसा पैसा करतात  पण त्याबद्दलही  माझी  तक्रार  नाही , माहिती आहे गेलेली वेळ परत येत नाही म्हणून क्षणात सर्व दुःख विसरुन छानपैकी जगावे वाटते मला.*
*माझी  सुखाची व्याख्या व परिभाषा सर्वांना समजून घेणे व सर्वांसाठी जगणे हीच आहे म्हणून  वाटते आयुष्यात जोडलेली प्रत्येक व्यक्ती सदैव माझी मित्र म्हणून रहावी व मैत्रीचे प्रेम जपणारी असावी , यात मला सुख आहे , मला कधीच माझ्यामुळे कुणाची नाती तुटावीत, कुणाला त्रास व्हावा असे चुकीचे  वाटतही नाही म्हणून मि सदैव सर्वांसाठी माघार घेतो व मैत्री  जपण्याचा प्रयत्न करत राहतो*व हे जीवन जगताना कुणाचेही मन दुःखी होईल, कुणाच्याही  स्वाभिमानाला ठेच  लागेल ही बिलकुल भावना नसते माझी , जगायचे ते साधेसरळ,  हीच माझ्या मनाची भावना असते व त्यातच सुख मानतो मि.*  मग तो मित्र असो , कि मैत्रिणी असोत की , नातेवाईक असतोत,
माझ्या आठवणी

*विजय पिसाळ  नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
                                                                            *😴🙏🏻तुमचा दिवस आनंदी जावो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना   🙏🏻😴