vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २ मे, २०२२

सव्वीस वर्षांनी एकत्र येत मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत








चालू घडामोडींचे विश्लेषण. . . . . 

सव्वीस वर्षांनी  जीवलग मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत. . 

शाळेतील दिवस होते आनंदाचे ! 
जीवन किती सुंदर ते बालपणीचे ! 
हसने ,  बागडणे , मनमुराद नित्याचे ! 
दंगामस्ती ,  कलकलाट  जणू थवे पाखरांचे ! 
 संस्कार  मनावर रुजले , उपकार त्या गुरुजनांचे ! 

सातारा शहरातील नावाजलेली . 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची. 
कन्याशाळा, सातारा . 
 या मुलींच्या शाळेतील 
सन १९९५/९६   इयत्ता १० वी या बॅच मधील  विद्यार्थींनीचा स्नेहमेळावा दिनांक १ मे २०२२ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शाळेची स्थापना सन १९२२ सालची असून या शाळेचे सन २०२१/२०२२ हे शताब्दी वर्ष सुरू आहे . 
या शाळेत शिकलेल्या  असंख्य मुलींनी , सामाजिक, राजकीय, सहकार,  शिक्षण व क्रिडा आणि आपआपल्या  क्षेत्रात   मोठे नाव कमावलेले आहे.  
स्वातंत्र्यपुर्व  काळात स्त्रियांच्या  शिक्षणाला  पुरुष प्रधान मानसिकतेमुळे विरोध होता अशा काळात मुलींनाही शिक्षण  घेता आले पाहिजे हाच विचार मनात ठेवून या शाळेची स्थापना महर्षी कर्वे  यांनी केली व समाजात पुरुषांच्या बरोबरीने मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले .
या संस्थेची स्थापना  महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यातील हिंगणे या गावी केली होती व संस्थेचे नाव सुद्धा हिंगणे शिक्षण संस्था असे होते .
  या संस्थेने विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये काढलेली आहेत. 
हिंगणे संस्थेचे नंतर नामांतर  महर्षी कर्वे असे करण्यात आले .  अशा शिक्षणाचा वारसा लाभलेल्या संस्थेत  १९९५/ ९६  साली इयत्ता १० वी  पुर्ण केलेल्या मुलींचा स्नेहमेळावा संपन्न झाला ,  
दिनांक १ मे रोजी सकाळी  ११ वाजता होणार्‍या स्नेहमेळाव्यासाठी ,  सर्व मैत्रिणी कन्या शाळेत  एकत्र येण्यासाठी आपआपल्या घरून  निघाल्या , कित्येक  मैत्रिणींनी तर खूप लांबचा प्रवास केला आणि या  स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिल्या  .  १ मे हा दिवस  महाराष्ट्र दीन   व कामगार दीन असतो,
 त्याच बरोबर महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळांचा  वार्षिक निकाल व गुणपत्रिका वाटपाचाही कार्यक्रम असतो , हा सुवर्ण योग साधून स्नेहमेळावा  १ मे रोजी घेण्याचे निश्चित केले .  

१ मे असल्यामुळे  वातावरण अगदी प्रसन्न होते.    निकालपत्र घेऊन जाण्यासाठी पालकांची व विद्यार्थीनींची गडबड  सुरू होते ,  बहुसंख्य शिक्षकवर्ग  , विद्यार्थी व पालक हे निकालपत्र घेऊन जाण्यासाठी  उपस्थित होते.  
शाळेतील हे आनंदी वातवावरण कित्येक वर्षांनी पहाण्याचा योग आला  . 
  सर्व मुलींनी  आपआपल्या धावपळीच्या जीवतानील  अमूल्य असा वेळ काढून  १ मे च्या   स्नेहमेळाव्यासाठी जणू आपला दिवस राखून ठेवलाय . . आणि नटून थटून आनंदी वातावरणात  स्नेहमेळाव्यासाठी मैत्रिणी जमू लागल्या आहेत हे दृश्य  खूप छान वाटत होते . . 
एक एक मैत्रिणी जमतील तसे  वातावरण खूपच भाऊक होत होते .  सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर एकत्र  येत असल्यामुळे  सगळ्या मैत्रिणी एकमेकींची गळाभेट घेत होत्या , काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू आपोआपच येत होते .  आपला वर्ग, आपले वर्ग शिक्षक,  आपले विषय शिक्षक,   शाळेत चालणारे उपक्रम, या आठवणी एकमेकींना सांगताना जनू सगळ्या मैत्रिणीं शालेय जीवनातील भूतकाळात  रमून गेल्या .   पाखरांचा थवा झपकन पिकांवर बसावा तो क्षण आपल्या डोळ्यांनी टिपावा  आणि मन प्रसन्न व्हावे तसे वातावरण पहायला मिळाले . . 
तुझ्या डब्यात किती छान भाजी असायची ,  तुझ्या आईच्या हातचा चिवडा किती मस्त लागायचा , तुझ्या डब्यात तर  काय काय असायचे ,  आपण कसे एकमेकींसोबत डबे खायचो,  हे सर किती छान शिकवायचे , त्या मॅडम किती कडक होत्या ,  तिचे बाबा  किती छान होते ,  चित्रकलेच्या तासाला किती मज्जा यायची ,  आपला वर्ग कसा दंगा करायचा मग आपले सर कसे रागवायचे ही चर्चा  एकदम भुतकाळात घेऊन जात होती ,  शाळेची घंटा वाजावी आणि सर वर्गाच्या बाहेर पडावेत आणि जोरदार हास्य फुलावे तसे आज सर्व मुलींना वाटत होते ,  काहीतरी सांगायचे , भरभरून बोलायचे ही धडपड  सुरु होती ,  प्रत्येकीला वाटायचे किती बोलू आणि काय काय सांगू ,  प्रत्येकीने भूतकाळात जावे आणि आपले अनुभव कथन करावे  आणि सर्वांच्या चेहऱ्यावर कधी हास्य, कधी भाष्य तर कधी , तर कधी कुतुहल फुलावे व  मनमुराद दाद हे आपोआपच व्हायचे ! 
तुझ्यात खूप बदल झालाय। तू आहे तशीच आहे ,  तू जरा स्वतःकडे लक्ष दे ही टिपकल चर्चा मस्त वाटायची क्षणभर  काळजीचे , क्षणभर   आपुलकीचे बोलणे मनापासून आवडत होते .   भूतकाळातील आठवणींचे  क्षण जसे जसे आठवतील तसे  प्रत्येकीचे  मन भरुन यायचे . 
ही  गप्पांची मैफल रंगत असतानाच या मुलींसाठी शाळेने खास नाष्ट्याची व्यवस्था केली होती ,  चविष्ट व रुचकर उडीद वडा आणि इडली सांभर  खावून सर्व मैत्रिणी सुखावल्या . .  अगदी तृप्त झाल्या . . 
तोपर्यंत शाळेतील निकालपत्रांचे वाटप होऊन झाले आणि सगळे शिक्षक व शिक्षिका या स्नेहमेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या  . 
ओ सर, ओ मॅड ओळखले का मला !  
 छान संवाद विद्यार्थीनी व शिक्षक शिक्षिका यांचे होत होते .  थोर ति गुरु शिष्य परंपरा अनुभवता आली .
 भेटीगाठी झाल्या , खुशाली विचारपूस झाली ,  शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थीनी या सर्वांनी   महर्षी कर्वेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .  कृतज्ञतेची भावना जणू  मनात दाटून आली . 
शाळेच्या प्राचार्या श्रीमती  जगताप  मॅडम यांनी शाळेच्या प्रगती बद्दल आणि शताब्दी महोत्सवाबद्दल संपुर्ण  माहिती दिली .  
सर्व मुलींनी आपल्या गुरुजनांनसोबत फोटो काढले , उपस्थित सर्व गुरुजनांनी मुलींची आस्थेवाईकपणे चौकशी केली .   
या प्रसंगी . प्राचार्या श्रीमती कविता जगताप मॅडम,उपप्राचार्य श्री.  चंद्रकांत  ढाणे सर, पर्यवेक्षक श्री.  डी. जी.पवार सर,पर्यवेक्षक श्री एकल सर,चित्रकला शिक्षक श्री  पाडळे सर व याच बॅचच्या परंतु सध्या याच शाळेत कार्यरत असलेल्या सौ. ज्योती बगाडे मॅडम व इतर कर्मचारी  उपस्थित होते. 
यानंतर सौ. स्फूर्ती जाधव (पिसाळ ) हिचे मिस्टर श्री  विजय पिसाळ नातेपुते यांनी मुलींना मैत्रीवर  छोटेखानी मार्गदर्शन  केले  , मैत्री  का केली पाहिजे , मैत्रीची व्याख्या काय?  मैत्री मुळे आनंदी कसे राहता येते , मैत्रीत सुख दुःख कशी वाटून घेतली पाहिजेत   हे ही  सांगितले . सर्व मुलींनी या छोटेखानी भाषणाला मनमुराद दाद दिली . 
श्री विजय पिसाळ यांनी समयोचित एक कविता तयार करून मुलींच्या चेहऱ्यावर  आनंद निर्माण केला .  सदर कवितेची  शब्दरचना . . 
किती गोड तुम्ही आणि तुमची कन्या शाळा ! 
एकमेकींना तुम्ही लावता खूप  लळा ! 
विसरता येणार नाही ना ,  वही , पुस्तक आणि फळा ! 
जाग्या झाल्या आठवणी जुन्या  आणि फुलला ना आनंदाचा मळा ! 
तुमच्या चेहऱ्यावर असेच राहूद्या हास्य,  कायम राहू द्या असाच लळा ! 
वरील छोटेखानी भाषणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना 
 सौ. सुनिता शिंदे(शिर्के ) यांनी केली .  
सदर कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलींनी ,  संपूर्ण शाळेतील जुन्या आठवणी जाग्या करत शाळेत फेरफटका मारला ,  नंतर सगळ्या सख्या मैत्रिणींनी  अंगत पंगत गोल  एकत्र बसून,  आम्रखंड, पुरी, पनीर मिक्स  भाजी  ,   भजी  , पापड, मसालेभात, चटणी , अशा सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.   जेवण करत करत खूप हास्यविनोद करत करत छानपैकी एकमेकींना  आग्रहाने जेवण  करायला  लावले . 
जेवणानंतर सर्व मुलींनी  छानपैकी गप्पा मारल्या आणि वर्गमैत्रिण सौ. मंगल झंवर (राठी) हिने बनवलेल्या थंडगार  फ्रूट सॅलेडचाही मनमुराद आस्वाद घेतला . .  
यानंतर  ,  सर्व मैत्रिणींनी  हातावर सुंदर अशी मेहंदी काढली व त्याचे फोटोही  काढले. 
सगळ्या सख्या मैत्रिणींना इतका आनंद झाला होता हे शब्दात सांगणे कठीणच,   सगळ्या मैत्रिणींचा वावर खूप ताणतणाव विरहित होता . त्यांना मनापासून खूप आनंद झाला होता . म्हणून 
 खूप दंगामस्ती चालू होती .  सर्व मैत्रिणींच्या आग्रहाखातर 
 मैत्रीण कु.  शितल लांडगे हिने "मला जावू द्या ना घरी " ही लावणी अतिशय छान  सादर केली .  शितल लांडगे हीचे खूप मोठे कार्यक्रम होतात.   अशा गोड स्नेहमेळाव्याच्या  कार्यक्रात  सगळ्या मैत्रिणी भावूक झाल्या होत्या ,  खूप मैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. 
कार्यक्रम संपला पाहिजे असे कुणालाही वाटत नव्हते पण वेळ आली निरोप घेण्याची , 
 सगळ्यांनी एकमेकींना परत भेटण्याचे ,  सुख दुःखात सहभागी होण्याचे जणूकाही वचन या निमित्ताने दिले .  तसेतर कुणाचेही  पाऊल शाळेतून बाहेर पडत नव्हते  पण सगळ्यांना आपआपल्या घरट्याकडे जावेच लागणारं होते .  जड अंतकरणाने निरोप घ्यायची वेळ येऊच नये असेच प्रत्येकीला वाटत होते . कुणी संसारात तर कुणी आपआपल्या व्यापात 
हरवलेल्या चिमण्या  निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या .  
. कित्येक वर्षांनी भेटल्याचा आनंद होताच, 
आणि परत भेटण्याची ओढही होती ,  जुन्या आठवणी  जागवून   यापुढेही  आनंदी जीवनाचा प्रवास करत करत पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा शब्द देऊन बाय बाय केले  आणि  भावनांचे कंठ दाटले . 
आपोआप  ओलावले नयन, 
किंचित  आश्रूंनी वाट मोकळी केली !
भेटणे व्हावे  निरंतर,  आयुष्य रहावे सुखी  चिरंतन! 
🙏🙏

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  , निर्मला मोहिते , ज्योती बगाडे  यांनी खूप परिश्रम घेतले ,  निर्मला मोहिते हीने सर्वांना एकत्र करण्यासाठी , नंबर व पत्ते शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली . 
या बद्दल सर्व मुलींच्या वतीने  निर्मला  मोहिते हीचा सत्कार श्री.  विजय पिसाळ यांनी केला तर ज्योती बगाडे हीचा सत्कार  , शिल्पा शिंदे , सुनिता शिंदे व सोनाली शिरसाठ यांनी केला . . 
सदर स्नेहमेळाव्याला. 
ज्योती बगाडे ,  मेघा मोहिते ,  निर्मला मोहिते ,  सोनाली शिरसाठ, स्फूर्ती जाधव, सुनिता शिंदे उर्फ  संध्या  शिर्के ,  रिना चव्हान, मनिषा यादव,  जयश्री पाटूकले , योगिता निकम,  स्मिता उंबरदंड, दिपाली अंबेकर,  मेघा घाडगे ,  पुष्पलता भोसले ,  शितल रजपूत,  मंगल झंवर,  शिल्पा निकम, अनिता पाटील,  मोनाली यादव, लता महाजन, विमल बर्गे ,  जबीन शेख,  निलम निंबाळकर,  गीता ढवळे ,  शितल लांडगे . या मैत्रिणी  उपस्थित होत्या .