vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

संस्कृती

संस्कृती . . .

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

संस्कृती म्हणजे काय तर साधे आणि सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर, आजच्या आधुनिक जगात बदलत्या वातावरणात आवश्यक थोडेफार बदल स्विकारून  आपल्या चालीरीती अबाधित ठेवून मानवी जीवनातील  उच्च मुल्ल्यांची जपणूक करणे यालाच आपण संस्कृती असे म्हणू शकतो !
या संस्कृतीचा ठेवा हा विविधतेने नटलेला आपल्याला दिसून येतो !  संस्कारातून व
संस्कृती मधून घरात, परिसरात जे घडते तेच आपल्या मनावर बिंबवले जाते , लहानपणापासून, ज्या समाजात आपण वाढतो , ज्या प्रकारे आपल्याला वातावरण मिळत जाते त्याच प्रकारचे संस्कार आपल्या मनावर होत असतात,
धार्मिक गोष्टी असतील, उपासना असेल, किंवा होणारे घरातील छोटे मोठे कार्यक्रम असतील, त्या प्रमाणे आपली जडणघडण होत असते ,
अमुक तमुक  केले तर काहीतरी मिळेल हेही आपल्या मनावर खोल रूजवले जाते , त्याचाही आपल्या आयुष्यावर बराच परिणाम होतो !
आपल्या संस्कृती मध्ये सदैव सत्याचा मार्ग सांगितला जातो, पुण्यकर्म, दानधर्म  करायला शिकवले जाते, सेवा करणे हाच एक पुण्याचा मार्ग आपली संस्कृती सांगत असते , मग ति सेवा देवाची असो की, रंजल्या गांजलेल्यांची असो , त्यातून मनुष्याला परोपकारी करण्याचा मार्ग सांगितला जातो .
भिती साठी का होईना पाप पुण्य सांगून मनुष्याला सत्यमार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केले जाते हीच आपली संस्कृती आहे , (अज्ञानाचा गैरफायदा घेणारे आजकाल सगळीकडे आहेत तो भाग निराळा)
संस्कृती व संस्कार या नाण्याच्या दोन बाजू आहेत,
दोन्ही पैकी एक गोष्ट जरी जीवनात नसेल तर मनुष्य परिपूर्ण बनुच शकत नाही . ज्या परिस्थितीतून, ज्या परिसरातातून, ज्या वातावरणातून आपण येतो त्याच   संस्कृती मधून जन्मताच काही गोष्टी लागू होतात तर संस्कार हे मानवाला परिपूर्ण करतात.
आपल्या संस्कृती मध्ये अहिंसा व सहिष्णुता याला जास्त महत्व आहे व ते करण्यासाठी व तसे संस्कार होण्यासाठी विविध पुजा , उपवास, व अनमोल अशा विविध धर्म ग्रंथांचे वाचन करायचे असते किंवा ते कुणाकडून तरी कानी पडावे लागते !
या सर्व गोष्टी मुळेच आपली संस्कृती टिकून आहे . ज्या ज्या राज्यकर्त्यांना संस्कृती कळली किंवा तसे त्यांच्या मनावर संस्कार झाले ते ते राज्यकर्ते किंवा राजे भारताच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटून गेले , त्यांनाच लोकांनी सदैव प्रेम दिले .
आपल्या संस्कृती मध्ये , शिक्षण, धर्म, राजकारण, शेती अशा विविध विषयांवर मंथन होत आले आहे . सामाजिक जडणघडण व अभिसरण हे त्यातूनच होत असते . .
भारतीय नागरिकांची विविध ठिकाणी , संस्कृती जरी थोड्याफार फरकाने विभिन्न असली तरी , सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना आहे , सहिष्णुता आहे , विविधते मध्ये एकता जपण्याची परंपरा आहे .
विविध चालीरीती , विविध भाषा,विविध पेहराव, प्रदेशानुसार  शारिरीक व कलर मध्ये होणारे बदल हे जरी बाह्य रूपाने वेगवेगळे वाटत असले तरी गाभा मात्र एकच आहे , म्हणून आपल्या देशात विविधतेत एकात्मता दिसून येते .
प्रांतीय वाद, भाषिक वाद, धार्मिक वाद, जातीयवाद, साधन संपत्तीच्या वाटनीतून निर्माण होणारे वाद, या सर्वांचा परिणाम जरी संस्कृतीवर होत असला तरी , ९५%जनता ही कोणत्या तरी देवाची , कोणत्या तरी पंताची उपासक आहेच. व त्यातूनच धार्मिकता येत गेलेली आहे . .
म्हणूनच दक्षिणचा मनुष्य उत्तरेकडील देवांची यात्रा करतो किंवा उत्तरेकडील मनुष्य दक्षिणेतील मोठमोठय़ा मंदिरात जात असतो . .
म्हणून आपण एकसंघ आहोत व एकसंघ असल्यानेच आपली संस्कृती महान आहे . 

विजय पिसाळ नातेपुते .
एम ए राज्यशास्त्र
९४२३६१३४४९

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

आयुष्याचे सार्थक कधी होईल!

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

हिंदू धर्म

हिंदू धर्म. . . .

धर्माला , देवाला नावे ठेवणं तसं फार सोप्पं असतं त्यातल्या त्यात असंख्य लोकांना दुसर्‍याच्या धर्माला जास्त नावे ठेवायला आवडते !
पण धर्म समजून घेणे त्याचे रोजच्या जीवनात आचरण करणे तसे महा कठीण काम!
शिव्या घालायला थोडेच पैसे लागतात!
म्हणून धर्म जाणून घ्या , वाईट प्रवृत्तींकडे लक्ष देवू नका , सर्वच धर्मात वाईट लोक असतात म्हणून धर्माला वाईट म्हणता येत नाही !
आजही ९९% धर्माचे पालन करतात पण, ते स्वतःच्या पातळीवर करतात!
काही मतभेद असतात, मात्र त्याचे रूपांतर मनभेदात होवू नये !
चर्चा करताना धर्मातील अनिष्ट प्रथावर बोलताना कोणी मार्ग सांगितले म्हणून लगेच त्याला धर्मद्रोही म्हणू नये !

हिंदू धर्म आहे की हिंदू संस्कृती आहे की, जीवन जगण्याची कला आहे हे निश्चित पणे मला तरी  सांगता येत नाही ,पण
 माझ्या मते
मनःशांती साठी प्रार्थना करणे  माता पिता व संस्कृती या बद्दल कृतार्थ भाव असणे . .
गुरू बद्दल आदर, पुर्वजा बद्दलचा अभिमान, जेष्ठांचा मानसन्मान, ज्या  चराचरात आपण रहातो खातो, पितो वाढतो , याच्या संवर्धनासाठी,  त्याचे जतन करण्यासाठी,  विविध मार्गाने त्याची उपासना करणे म्हणजे संस्कृती जपणे हीच ति संस्कृती आहे . .
जिथे, सुर्य चंद्र तारे ग्रह यांची उपासना केली जाते !  देव देवतांना मानुन उपासना केली जाते, उपवास केले जातात,
त्यामुळे शरीर व मन शुद्ध होते ! थकवा कमी होतो !
देवाला नमस्कार केल्याने देव प्रसन्न होईल की नाही मात्र देवालयाच्या पायर्या चढताना , फेर्या मारताना निश्चित शरीराला फायदाच होतो . .
देवाच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपल्याच गोडधोड मिळते , नव नवीन पदार्थ खावून आनंददायी जीवन जगता येते !
हीच शिकवण सर्व  धर्मामध्ये असते . . .
कारण  धर्मीक कार्यातून व सर्वच गोष्टीतून,
 प्रत्येकातून मानवाला आवश्यक अशी उर्जा प्राप्त होत असते . . त्यांचे मानवी जीवनात असाधारण महत्व आहे !
या नैसर्गिक गोष्टीतून मानवी जीवन समृद्ध बनत असते . . जसे
निसर्गातील उर्जा असेल तरच अन्न वस्त्र निवारा यांची निर्मिती होते म्हणून आपण निसर्गातील, वेली , पाने , फुले , फळे , याचा जगण्यासाठी उपयोग करत असतो . . तसेच
परमेश्वराच्या नावाने आणलेले फुल देवघरात देवाला वाहिल्यानंतर संपुर्ण घरात सुगंध दरवळू लागतो हाच भाव देव पुजेमागे असावा असे मला तरी वाटते . .
देव आहे की नाही यात न जाता . .
त्याची पुजा अर्चा श्लोक पठण, आरती उच्चारण,  केल्याने मन तर प्रसन्न होतेच पण आपल्या वाणीमध्ये मधुरता येते , पाठांतराची आवड निर्माण होते . .
एक प्रकारे  चांगले वागण्याचे मनावर संस्कार होत असतात!
या साठी सर्व गोष्टी स्वतः करायच्या असतात,असतात,हो  केवळ स्वतःच!
बाहेरील गुरूजी बोलावून पारायण केल्याने , किंवा पुजा घातल्याने स्वतःवर संस्कार ते काय होणार?
कार्यक्रम केल्याने  लोकांना खायला घालून लोकांना सोबत घेतल्याने जरूर मनाला आनंद मिळतो पण तेही करताना आपली आर्थिक परिस्थिती बघून करावे . . .
नुसते पुण्य लाभेल या भ्रमात न राहता . .
असंख्य लोकांना गाव जेवण घालून थोडेच पुण्य लाभते ?
त्यासाठी सत्कर्म करावे लागते . .
रोजच्या जगण्यात सत्यपना लागतो , कुणाचीही फसवणूक आपल्या हातून होता कामा नये !
हाच हिंदू धर्म सांगतो
केवळ एखादा सत्यनारायण घातला तर फक्त. .
गुरूजी येणार त्यांच्या वेळेच्या नुसार थोडेफार मंत्र उच्चारण करणार पण ते आपल्या डोक्यात काय जाणार?
त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास. .
जोपर्यंत एखादी गोष्ट आपण स्वतःहून आवडीने करत नाही , तिची सत्यता पडताळत नाही   तिचा सर्व कसोट्यावर  अभ्यास करत नाही , तोपर्यंत तिचा फायदा किंवा तोटा कधीच आपल्याला समजत नाही . .
हिंदू संस्कृती ही देव, देवळे, पुजा अर्चा , अभिषेक, नारायण नागबळी या पुरती नुसती  मर्यादित नाही तर ति खूप महान व विशाल आहे , तसेही ही  कर्मकांडे करण्याची  गरज नाही ! हिंदू धर्मातील परंपरा थोर आहेत. .
हिंदू  संस्कृती कितीतरी मोठी आहे , या संस्कृतीचा आणि भारतीय जनतेचा तसाही खूप मोठा संबंध आहे .
हिंदू संस्कृती ही कृषी संस्कृती आहे म्हणून हिंदू संस्कृती मध्ये गायीला पवित्र स्थान आहेच  ,,मात्र  प्राण्यासाठी सुद्धा सण उत्सव आहेत,  गाईचे  दुध दुपते व तिच्या पासून मिळणारे पशूधन हे शेतीसाठी आवश्यक आहे!  यातील काही गोष्टी  खूप मनाला भावतात आणि कुठल्याही संस्कृती मधील ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच स्वीकारायच्या असतात. .
वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो
तसेच या हिंदू संस्कृती बाबतीत आहे
यात काही चुकिची कर्मकांडे, चातुरवर्ण व्यवस्था , जातीभेद हे तसेही चुकच आहेत,
कुणाला उच्च कुणाला नीच समजने हेही गैर आहे
मात्र हिंदूच्या  सर्वच धर्मग्रंथामध्ये या वाईट गोष्टींचे कुठेही समर्थन दिसून येत नाही . . .
काही ठिकाणी घुसखोरी झाली असेलही . .
पण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . .
आपली संस्कृती कोणत्याही समुदायाचा द्वेष करायला शिकवत नाही . . . कोणत्याही जातीचा द्वेष करणे हि आपली परंपरा नाही ,
म्हणून आपली असलेली हिंदू संस्कृती अबाधित राहिली पाहिजे !
ति आपली आहे , तिचे महत्व मोठे आहे ति संस्कृती परकीय  लोकांची नाही !
या भुमिवरील पवित्र हिंदू धर्माचे कोण वाटोळ करत  तर नाही ना याचाही विचार करूया !

धर्म हि गोष्ट पवित्र आहे, त्यात शांती असते, त्यात जीवन जगण्याचा मार्ग असतो . .
धर्म हा अभ्यासाचा विषय आहे . .
कुणी राजकीय फायद्यासाठी धर्मचा वापर करू नये, केवळ आणि केवळ राजकारण धर्मात आल्यामुळे धर्मात विविध विचार प्रवाह निर्माण झाले . . राजकारण विरहित धर्म जपला पाहिजे तरच सर्व हिंदू बांधव एकत्र येवून जगाला आदर्श असा हा देश बनवू शकतील!  पण .
राजकीय लोकांमुळे धर्म बदनाम होत आहे ! 

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

देव

देव. . . .

देव समजने . . देवावर भाष्य करणे तसे महा कठीण आहे पण एक विचार मनाला पडलेले प्रश्न देवापुढे मांडावे म्हणून हा लेखन प्रपंच. .

मला माझ्यासाठी काहीही नकोय पण देवाच्या शोधात आहे . मि . .
तसाही मि नास्तिक नाही , परमेश्वरावर माझी नितांत श्रद्धा आहे . मला तर  देवाचा शोध घ्यायचा आहे.  पण माझी तेवढी तपश्चर्या नाही , त्यामुळे मला देव भेटणार नाही पण माझी देवाच्या बाबतीत जी माझी विचारधारा आहे, जी  कल्पना आहे . ति तरी मांडवी म्हणतो . .
मला तसाही कोणत्याही पोतीपुराणाचा ,धर्मग्रंथाचा   बिलकुल अभ्यास नाही,  त्यामुळे मग मला जो आजपर्यंत देव सांगण्यात आला तोच मि खरा माणत आलो . . .
कुणी देवाचे नामस्मरण करायला सांगितले ते मि करायचा प्रयत्न केला , कुणी रात्रंदिवस जप तप करायला सांगितले तेही करण्याचा माझ्या परीने प्रयत्न  केला  ,
कुणी मला देवासाठी प्रार्थना करायला सांगितल्या ते पण झाले , कुणी मला उपवास करायला सांगितले ते पण केले .
कुणी सांगितले देवाला फुले आवडतात तिही वाहिली . .
कुणी सांगितले अभिषेक घाला. . नारळ फोडा . . देवाला भरपुर दक्षिणा ठेवा तेही केले , अन्नदान करा तेही केले ,
गोडधोड नैवेद्य करा ,
एकादशी धरा, चतुर्थी करा, ते पण केले . .
पण मला तरी अजून देव काही कळला नाही . .
मि तरीही देवाची मनोभावे पुजा अर्चा जे जे सांगितले ते ते सर्व केले पण देव अजूनही कळालाच नाही . .
सतत मन विचारात असते ,देव म्हणजे काय?  तो कसा असेल? मालिकेत दाखवलेला की , मंदिरात कोरलेला की, संत महात्मे , महाराज यांनी सांगितलेला . .
पाप म्हणजे काय?
पुण्य म्हणजे काय?
कसं ठरवायचं हे , कुणी कुणी तर कुणाच्या तरी सांगण्यावरून  देवासाठी जागरण करतो  , कुणी गोंधळ घालतो (करतो ).  कुणी
देवाच्या नावाने बोकड, कोंबडा याचा बळी देवून शांतता करायला सांगतो .
अरे वेड लागायची वेळ आली पण देव समजेना . .
कुणी शुभ्र वस्त्र परिधान करतो ओल्या कपड्याने पुजा घालतो व महाराज होतो, कुणी भगवी , कुणी हिरवी कपडे घालून देवाचा कट्टर भक्त असल्याचे, साधू बैरागी असल्याचे भासवतो . कुणी वेगवेगळ्या कथा सांगतो संदर्भ देतो . . भक्त करायला सांगतो !
काहीजण आपल्या बुद्धी चातुर्यातून गोड ओजस्वी , मधाळ वाणीतून आपआपल्या परीने देव सांगत असतो !
खरच कित्येक महाराज, कित्येक, प्रवचनकार, किर्तनकार, सन्यासी यांचे कडून देव ऐकला पण अजून नाही समजला ! प्रत्येकाची मांडणी वेगळी, सांगण्याची कला वेगळी, आणि स्वतःच्या कल्पनेतून  देव सांगण्या पाठीमागचा सुप्त हेतूही वेगळा . .
पुरता गोंधळ निर्माण झाला , काय करावे , हिमालयात जावे कि आश्रमात जावे कि अजून कुठे कुठे शोधावे देवाच्या रुपाला . कोणती पुस्तके वाचावीत प्रत्येकात वेगळेच?
खरचं नारळ फोडून देव पावतो का ?
खरचं देवाला नवस केलेला चालतो का ?
असे हजारो प्रश्न मनात काहूर निर्माण करतात,
जगातील जवळपास ९० %लोक देवाला मानतात, तसा मिही देवाला मानतो .
पण मन मात्र देवाच्या सानिध्यात कधी लागत नाही तर का बरं असे घडते ! मि भाग्यवंत नाही , मि लायक नाही !
देवाच्या नावाने जे चालू आहे तेच देव कसे सहन करतो याच विचारांत मन  गुंतून जाते रे  !
किती बोकडे, किती कोंबडे, कापले  किती तरी पाने फुले , झाडी कापली , तोडली यज्ञ झाले देवाच्या नावाखाली तरीही देव शांत असतो . ..मुक्या प्राण्यांचा छळ करून वेदना देवून दुध काढलेले , देवावर ओतले जाते, दही , तुप, बरेच काही !
परमेश्वर, देव या एकाच गोष्टी मुळे मनात कधी श्रद्धा तर कधी भितीही उत्पन्न होते , देवापासून दुर गेले तर नास्तिक म्हणून संभावना व देव भेटण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देव काही भेटेना ! हे द्वंद्व कधी संपणार?
 प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना,  कल्पना , यातून होणारा गोंधळ हे सर्व   केले तरी देव कधी भेटेल याचाही कुणीही शाश्वत मार्ग  सांगत नाही,  जणू  मार्ग मिळणे कठीण?
काय करावे . . . दुष्काळ पडला ,
पुर आला , भुकंप आला . . नैसर्गिक आपत्ती आली कि काहीजण या भूमिवर पाप जास्त झाल्याचे कारण देतात व अंतिम सांगतात देवाचा प्रकोप झाला . . मन विषण्ण व्हावे असे काही तरी सांगितले जाते . .
देवभूमीत जेंव्हा जेंव्हा प्रकोप होतो तेंव्हा सरसकट पापी पुण्यवंत असा कुठलाही भेदभाव झालेला आजपर्यंत तरी  पहायला मिळाले  नाही ,,पुण्यवंत वाचलेला दिसत नाही कि पापी दुराचारी संपलेला दिसत नाही ,  प्रचंड पुराचे पाणी असो की, अजून भूकंप असो लहान लहान चिमुकली बाळे . . आयुष्यभर कुणालाही कसलाही त्रास न देणारी चांगली माणसे हो जी माणसे रात्रंदिवस जप तप करत होती, पुण्याचा मार्ग सांगत होती तीही  क्षणात अर्तकिंकाळ्या देवून विव्हळत औषध पाण्याविना तडफडत मरत असताना नाही पहावत . . देव कसा असा प्रकोप करेल?
त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा कसा विध्वंस करेल. . कित्येक उपासक साधक हे केदारनाथला वाहून गेले क्षणात सारे संपले . . होय का घडावे हे . . .
मन सुन्न होते मन खिन्न होते ह्रदय पिळवटून जाते . .
मला देव बघायचाय मला देव शोधायचाय. . या साठी काय करावे हेच सुचेना . .
सुसंस्कृत देव भूमीवर  आज बलात्कारी, दहशतवादी , गुंड, पुंड, चिरीमिरी साठीही खून करणारे ,  माजलेले पाहतोय रोज. . पांढर्या पेशात पुढारी असो कि उद्योगपती लुट करतायत, ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत देशाची बिनबोभाट लुट होते , आणि सर्वच पक्षीय ति करत आले आहेत,  याच भूमीवर गरिबांच्या तोंडातून घास काढून, सरकारी बँका ,पतसंस्था ,  साखर कारखाने , मोठ मोठे सरकारी ,  उद्योग  सरकारी तिजोर्या लुटल्या गेल्या,  हजारो कोटी बुडवले गेले , कित्येकांची संपत्ती लाखो कोटींची झाली . .
सत्तेवर जो असेल तो चार पाच वर्षात हजारो कोटींचा मालक होतोय, राजकारणी कुणीही असो ?  काबाडकष्ट कष्ट करणारा मात्र उपाशी राहतोय. .
तरीही पाप पुण्याचा हिशेब लागेना देवा . .
तरीही तुझ्यावरील माझी भक्ती , श्रद्धा तुसभर देखिल कमी होत नाही व होणारही नाही देवा . .
पण मला तुला शोधायचय. .
हो आज मला देव भेटला पाहिजे . .
रस्त्यावर फिरणाऱ्या भिकार्याचे अश्रु पुसण्यासाठी, वेश्या गृहात जबरदस्तीने पळवून नेहून डांबून ठेवून रोज बलात्कार सहन करणार्‍या नाबालिकांना न्याय देण्यासाठी . . घरात घुशी उंदर खेळणार्या झोपडपट्टीतील बांधवांना किमान पाय लांबवुन झोपता यावे यासाठी . .
रोज कर्जापाई कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मला देव भेटला पाहिजे . . कोणताही उपवास करेन मि, कोणताही नवस करेल पण मला देव भेटला पाहिजे . .
बैलापेक्षाही काबाडकष्ट करणार्‍या पाट व पोट खापाटीला गेलेल्या व दोनवेळच्या घासासाठी ८० वय असतानाही धड चालताही येत नाही अशा अवस्थेत  जगण्यासाठी लोकांच्याकडे मोलमजुरी करणार्‍या वृद्ध आजी आजोबांसाठी मला देव शोधायचाय. .
होय मि देवा तुझी आराधना करेल, होय सर्व कर्मधर्म करेल पण तु भेटला पाहिजेस. .
दहा दहा किलोमीटर चिखलातून, झाडीझुडपातून काट्याकुट्यातून शाळेसाठी जेंव्हा मुले मुली जाताना पाहतो ना तेंव्हा इथल्या राजकीय नेत्यांना सुबुद्धी दे हेच मला सांगायचेय तुला . .
गरिबांच्या रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजार बघवत नाही रे ,  घरकुलाच्या बिलासाठी चिरीमिरी खाणारे . . मुलांसाठी आलेला तांदूळ सुद्धा खातात रे देवा . .
मि आवाज नाही उठवू शकत रे,  आवाज उठवणारा या ठिकाणी मारला जातो . .
तुझ्या नावाने जो बाजार मांडलाय तो मला पहावत नाही त्यासाठी तुझीच मदत लागेल मला कारण मला कोण पाठिंबा देणार?  कारण मि असंख्य लोकांच्या जगण्यावर भाष्य करतो म्हणून तुच साथ दे बाबा . .
कदाचित कुणीही मला काम करू देणार नाही .
लगेच गुंड पुंड छळतील रे बाबा म्हणून तु साथ दे . .
माझ्यावर आरोप लावले जातील मला बदनाम केले जाईल पण देवा जे चालू आहे ते तरी कसे पाहू . .
तुझ्या नावाखाली गरिबांच्या अज्ञानाचा , कमी शिक्षणाचा अचूक फायदा घेऊन लुट चालू असते रे देवा . .
देवा जे जास्त शिकलेले आहेत त्यांनाही वेडे केले जाते . त्यासाठीच संमोहण शास्त्र आहेच की , बदलत्या वातावरणामुळे होणारे आजार, घरातील कटकटी , विविध बाह्य घटकांचा होणारा रोजच्या जीवनातील बदल अचूक हेरला जातो, वाढती लोकसंख्या गंभीर समस्या निर्माण करते रे मग त्यातून एकतर तुझ्या नावाखाली किंवा पुर्वजांच्या नावाखाली किंवा वास्तुशास्त्रातील दोष सांगून तथाकथित सुशिक्षित लोकांनाही  वेडे बनवून, घरात मोडतोड करायला सांगून, विविध शांती करायला सांगून मोठा गोरखधंदा राजरोसपणे चालतोय देवा . .
पण जो कोणी धारिष्ट्य दाखवेल तो वैकुंठाला तरी पाठवला जातोय किंवा मॉर्निंग वॉकला जाताना मारला तरी जातोय. ..मारली गेलेली तुच बुद्धी दिलेली लेकरे होती ना ?
तु जशी बुद्धी दिली , तु जशी अज्ञा केली तसेच ति तुझी लेकरे लिहणार ना ?
तुच या जगताचा चालक पालक व तुच त्राता आहेस ना ? मग तुझ्या लेकरांना मारताना तु का पाहतोस तु का तुझ्याच दोन लेकरांत वाद निर्माण होतात, तुझे नियंत्रण कमी झाले की काय? 
हो देवा कसा उलघडा करावा याचा ? तुझ्याच एका लेकरांनी तुझ्याच दुसर्‍या लेकरांचे   कितीही खून केले ? किती खून  पचवले पण
त्यांना का  नाही लागत पाप? का देत नाही शिक्षा ?
देवा जागृत हो तु, तुझी ही पावन व पवित्र भुमी आज रक्त रंजीत होतेय रे ?
मला तु भेटला पाहिजे देवा . .
मन व्याकुळ आहे तुला भेटण्यासाठी . .
तुझ्या नावाने लाखोंचे चढाव होतात. .
लाखोंची वर्गनी गोळा होते . . तिचे काय होते कोण जाणे . . .
करोडोंची उलाढाल चालते पण तुझाच पैसा तुझी मनोभावे पुजा उपासना करणार्‍या , ज्यांनी हा पैसा तुझ्या दानपेटीत टाकला , त्या गोरगरीब कष्टकरी, आत्महत्या करणारे शेतकरी यांच्यासाठी तु वापरायला कधीतरी सांग रे . . त्यांना . . .
तुच निर्माण केलेली काही तुझीच लेकरे तुझ्या नावाखाली खूप मोठी होतात रे , बंगले,  गाड्या , तुप रोटी सर्व मिळते त्यांना व दुसरीकडे तुझीच लेकरे झोपडपट्टीत, स्वतःची जागाही नसते त्यांना वाईट अवस्थेत जगतात उपाशी मरतात. .
कशासाठी त्यांची निर्मिती करतोस रे बाबा ?
तु तर सर्वांची निर्मिती करतो तुच पालनपोषण करणारा , तुच दीनदुबळ्यांचा त्राता  , अरे हेच गरिब तुझ्यावर जास्त निष्ठा ठेवतात, सर्वकाही तुझी भक्ती करतात पण तु त्यांच्याकडे काहीतरी पहात जा ?
अरे तुझ्याच लेकरातून कसाकाय भेदभाव करतोस  रे तु, कुणाला तु उच्च कुळीत!  कुणाला तु एकदम कमी लेखल्या जाणार्‍या जातीत कसे टाकतो ?
तुच  का ही उच्च निचता नष्ट करत नाही . .
कशासाठी हा माणसा माणसात भेदभाव करतोस. .
तुझी पुजा, अभिषेक,  एखाद्या भिकार्याच्या हातून होवू देत की,
व्हीआयपी पास, व्हीआयपी दर्शन रांगा यातही तु गरिब श्रीमंत असा का भेदभाव करतोस. .
कुणाला शे पाचशे दिले की , तुझे डायरेक्ट दर्शन देतात रे करून हे लोक. .
पायी चालणारा ३० दिवस घरदार सोडणारा , ऊन, पाऊस, वारा, याची तमा न बाळगणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी ४८ तास तुझी वाट पहावी लागते रे. मात्र जनतेला रोज फसवणारे, खोटे बोलून जनतेचा पैसा लुटणारे , शाळा कॉलेज महाविद्यालय स्थापन करून हजारो कोटी डोनेशन घेऊन मोठे झालेले तुझ्या जवळ लगेच कसे येतात? तुझ्याच मंदिर समितीचे अध्यक्ष सुद्धा होतात!  दर्शनाला तुलाही पायी चालणार्या भक्तापेक्षा श्रीमंत भक्त जास्त भावतात का ?
पांडूरंगा कधीच वारीत न चालणरा तुझ्या पवित्र मंदिर समितीचा अध्यक्ष होतो . त्याची नियुक्ती करतानाही सरकारला तु सुबुद्धी देत नाही !
असंख्य निःस्पृह असताना श्रीमंतच कसा अध्यक्ष होतो . .
म्हणून मला देवाला भेटायचय. .
मि ऐकांतात असतो तेंव्हा देवा मन व्यथित होते रे . .
एकिकडे भरभरून असताना दुसरीकडे मात्र दोनवेळचे जेवण सुद्धा नसते रे या पवित्र भुमिवर कशासाठी निर्माण करतो गरिबांना ?
ठेवायचे असेल तर सर्वांनाच समान ठेव ना ?
नाहीतर फक्त श्रीमंतांनाच जन्माला घाल की ?
माझी तक्रार नाही ही माझी तुला विनंती आहे . तुझ्या जवळ येण्यासाठी बरेच जण
 रात्रंदिवस नामस्मरण करायचा सल्ला देतात, जप तप करायला सांगतात, मग मला प्रश्न पडतो तुझ्या चरणी जागा मिळावी म्हणून सगळेच नामस्मरण करायला लागले तर शेती कोण पिकवणार  . . तुला लागणारे अभिषेकाच्या  दुधा साठी गायी कोण पाळणार?
मजूरी कोण करणार, कारखाने कसे चालणार. .
सगळे बंद पडल्यावर जनता काय खाणार?
तु कष्ट करणार्‍यांना भेटणार नाही का ?  तुला फक्त नुसता जप करणारेच हवेत कष्ट करून कोट्यवधी लोकांची भुक भागवणारे नकोत? त्यांना तुझ्या ह्रदयात जागा नाही का ?
त्यांना तु कधी प्रसन्न होणार नाही का ?
देवा सांग मार्ग तुझ्या जवळ येण्याचा !
अजून बरेच देवा तुझ्या कडे मागायचेय, तु जशी बुद्धी देशील तसे लिहायचंय, मि हे लिहतोय तेही तु दिलेल्या बुद्धीनुसार, तु दिलेल्या हातांनी राग नको मानु !
मला तुच दिलेली बुद्धी आहे , तुच दिलेले हे शरीर आहे व तुच जे माझ्या बुद्धीला सुचवले तेच लिहतोय!
माझे यात स्वतःचे काहीही नाही !

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

आरक्षण का व कशासाठी ! दिले गेले ?

आरक्षण का द्यावे लागले ?
काही लोक म्हणतात की , सर्वांना समान संधी द्या , आरक्षण बंद करा , आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा . . वगैरे वगैरे बरीच चर्चा चालू असते !
शेवटी ज्याची जशी विचार करण्याची पातळी तशी त्याती प्रतिक्रीया . .
स्वतःच्या डोक्याचा वापर न करता , पुर्व इतिहास न तपासता , कसलाही अभ्यास न करता वाटेल बोलणारे लोक आपण विविध समाजात विशेषतः तथाकथित उच्चवर्णीय लोकात पहात असतो !
भाग पहिला . .
घटनेत आरक्षण का द्यायची वेळ आली . .
भारत हा देश जातीच्या चौकटीत चातुरवर्ण व्यवस्थेत विभागला होता . .
स्वतःला उच्चवर्णीय समजणारा काही वर्ग
दलित आदिवासी व तत्सम मागासलेल्या जातींना हीन वागणूक देत होता , त्यांना रहायला सुद्धा गावकुसाबाहेर जागा दिली जात होती . .
त्यांना सार्वजनिक ठिकाणी कमी लेखले जात होते . .
त्यांना हालकी व कमी दर्जाची कामे दिली जात होती . .
त्यांना अशाप्रकारे वागणूक दिल्याने तो वर्ग पुर्णपणे खचला होता, तो वर्ग सर्व साधनापासून उपेक्षित होता . .
अशा कमजोर वर्गाला कुणीही सरकारी नोकरीत ठेवत नव्हते , कायम दुय्यम स्थान दिले जात होते . .
अशा वर्गावर उच्चवर्णीय लोक अन्याय अत्याचार करत होते , त्यांचे विविध मार्गाने शोषण केले जात होते परिणामी या मागासलेल्या वर्गाला कुठेही प्रतिनिधीत्व मिळत नव्हते त्यामुळे त्यांना कुठेतरी जगता यावे मुख्य प्रवाहात येता यावे या साठीच प्रथमता कोल्हापूर चे  छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे संस्थानात आरक्षण चालू करून न्याय देण्याचा पहिला प्रयत्न चालू केला म्हणून त्यांना सर्वजण आरक्षणाचे जणक म्हणतात. . .
त्या संस्थानातील आरक्षणाचा अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरवातीला फक्त
मागासलेल्या जाती व मागासलेल्या जमातींना म्हणजेच sc व st या वर्गाला घटनेत आरक्षण दिले , नंतरच्या काळात इतर मागासवर्गांसाठी म्हणजेच obc आरक्षणासाठी  विविध आयोग नेमण्यात आले व त्या पैकीच एक आयोग म्हणजे मंडल आयोग किंवा मंडल कमिशन. .
यात या आयोगाने सुरवातीला काही जातींचा समावेश करण्यासाठी एक सुची बनवली . .
व त्या मंडल कमिशनच्या सुचितील लोकांना आरक्षण देण्यासाठीच्या शिफारसी  व्हीपी सिंग यांच्या सरकारने स्विकारल्या व मंडल आयोग स्वीकारला !
परत विविध राज्याच्या सरकारांनी कोणतेही आयोग न नेमता विविध जातींचा हळूहळू समावेश इतर मागासवर्ग जातीत करून केंद्र सरकार कडे सिफारसी केल्या व ते ते वर्ग इतरमागासवर्गात समाविष्ट करण्यात आले त्याला कोणतेही जाचक पॅरामिटर लावले गेले नाहीत. . .
आरक्षण हे लग्नातील पंक्ती सारखे नव्हते जेवढे येतील तेवढ्या सर्वांना जवायला पोटभर वाढावे आणि सर्वांचेच समाधान करावे !
आरक्षण या साठी होते मर्यादित जागामध्ये प्रत्येकास काहीना काही प्रतिनिधीत्व मिळावे . .
पण आज आरक्षणाची चर्चा वेगळ्याच अँगलने काही लोक जाणीवपुर्वक खोडसाळपणे करत असतात. . .
आम्ही ९०%मिळवतो तरीही आम्हाला अॅडमिशन भेटत नाही , आम्हाला नोकरी लागत नाही व ७० %वाल्यांना नोकरी लागते वगैरे वगैरे . .
पण अशी चर्चा करणारे हेही विसरून गेलेले असतात की ,
१०० जागा पैकी आपल्या वाट्याला किती आल्या व त्यांना किती दिल्या !
म्हणजे १००जागापैकी आरक्षित असलेल्या जागा ५२ असतात व त्यामध्ये जवळपास ७५ %लोकसंख्या समाविष्ट असते . . ओपन जागेत कुणालाही अॅप्लिकेशन करता येत असले तरी ओपनमध्ये असलेल्या उच्चवर्णीय लोकांशी स्पर्धा वंचित घटक करत नसल्याने जवळपास ७५%लोकसंख्या असलेला वर्ग ५२ %जागेपुरता मर्यादित जागेवर अॅप्लाय करतोय. . ४८%राहिलेल्या जागेवर २५ वर्ग जागा मिळवतो , खरेतर
हा मागासवर्ग जातीवर अन्याय असतो मात्र
उच्चवर्णीय लोक टक्केवारी पुढे करतात व बघा त्यांना कमी मार्क्स असूनही त्यांना नोकरी भेटते आम्हाला जास्त मार्क्स असूनही नोकरी भेटत नाही . .
मुळात कॅटॅगीरीच्या लोकांची स्पर्धा ओपनच्या बरोबर नसते तर आपल्या आपल्या गटातील लोकांशी असते म्हणून ज्या गटात जास्त स्पर्धा किंवा शिक्षणाचे प्रमाण जास्त,  सोयी सुविधा जास्त त्या ठिकाणी आपोआपच तिव्र स्पर्धा असल्याने मेरीट जास्त राहणार!
वंचित घटकां मध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी , सोयीसुविधा कमी त्यामुळेच मेरीटचे प्रमाण कमी म्हणून तर आरक्षण आले . . .
इथपर्यंत साधक बाधक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की ,
सर्व समाजातील लोकांना शिक्षण व नोकरीत  प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे , कोणताही समाज यापासून वंचित रहाता कामा नये . . .
तसेही आरक्षण हा सर्वांनाच एका प्रवाहात आणायचा तेंव्हाचा  तो एकमेव मार्ग होता , लोकसंख्या मर्यादित होती,
लोकांना शेतीतून बर्यापैकी रोजगार उपलब्ध होता काळ! त्यामुळे आरक्षणाची मागणी होत नव्हती . .
बदलत्या काळाणूसार
काही गोष्टी बदलाव्या लागतील,
मुळ आरक्षण का निर्माण झाले तर
त्याचे कारण जातीव्यवस्था व शोषण या पासी जाते !
जातिव्यवस्था १००%बंद झाली नाही किंवा नजिकच्या काळात  सहजासहजी बंद होईल असे वाटत नाही . .
आज जवळपास सर्व समाजातून आरक्षणाची एकतर मागणी होतेय किंवा आरक्षण बंद करा असेही काही उच्चवर्णीय म्हणत आहेत. .
पण आरक्षण बंद केले तर
आदिवासी , दलित, गोरगरीबांना , शिक्षणात नोकरीत व राजकारणात कोण संधी देईल का ? ति संधी न मिळाल्याने काय होईल व त्यांना मुख्य प्रवाहात  कशी संधी मिळेल हे कुणीही सांगत नाही केवळ थोड्याफार गुणांचा फरक दाखवून आरक्षणाला विरोध केला जातो !
मु़ळात काळ बदलत गेला , लोकसंख्या वाढत गेली , प्रत्येकास काम मिळेना, रोजगार कमी पडू लागला . .
शेती पिकेना, पिकली तर बाजारभाव भेटेना, मोठमोठय़ा कंपन्यात कमी पगारात कामगारांचे शोषण चालू झाले , व शिक्षण अतिशय महाग झाले !
मग आता काय करायचे . .
दलित आदिवासी ओबीसी यांच्या पेक्षाही भयंकर अवस्था कृषक समाजातील लोकांची झाली
व आम्हालाही आरक्षण मिळावे ही मागणी पुढे आली . . .
यात वावगे काही नाही . 
या मागणीची पुर्तता कशी करायची हा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला ,
त्याला एकच मार्ग आहे !

प्रत्येकाचा वाटा प्रत्येकास समान  मिळालाच पाहिजे . . . 
समजा माझ्याकडे पन्नास देशी गाईचा तबेला किंवा गोठा आहे असे समजू . . .
मला जर प्रत्येक गाईची  काळजी घ्यावी असे वाटत असेल, प्रत्येकीस समान अन्नपाणी , समान चारा , समान खुराक द्यायचा झाला तर मि प्रत्येक गाईला व्यवस्थित सेप्रेट सेप्रेट  बांधून समान  सर्व अन्नपाणी देईल, ज्यामुळे प्रत्येक गाईची  तब्येत तर चांगली होईल च मात्र ति दुध सुद्धा भरपुर देईल आणि अन्नधान्याची नासाडी सुद्धा करणार नाही . . .

हेच जर मि केवळ त्या गायीवर  दया दाखवण्यासाठी , त्यांना बांधल्यामुळे अन्याय होईल म्हणून मि जर एका मोकळ्या जागेत चारा टाकला . . .
तर काय होईल. .? 
त्यातील धष्टपुष्ठ व मोठ्या गाई या प्रथम चार्याच्या ढिगावर जातील तिथे यथेच्छ  भरपुर चारा खातील पण या दरम्यान कमजोर गाईंना त्या चार्याजवळ येवू सुद्धा  देणार नाहीत. ..स्वतः खावून वरून त्यांना मारतील हे आपण पाहतोच नेहमी व स्वतःचे  पोट भरल्यानंतर तो चारा पायाने तुडवतील. . त्यावरच नाचून घान सुद्धा  करतील. . .
परिणामी चारा खराब होईल. . . व वाया सुद्धा जाईल. . .
लक्षात येतय का ?

 आणि कुपोषित व कमजोर गाई अजून कमजोर होतील त्यांना यांचा उष्टा चारा सुद्धा मिळणार नाही . . परिणामी त्या दुध देणार नाहीत किंवा हळूहळू  मृत पावतील आणि कळपात ठराविक सशक्त गाईच भरपुर खावून जगतील पण
मालकाला तर सर्व गाईचे संगोपन करून व्यवसाय चांगला करायचा असतो . . प्रगती करायची असते म्हणून. .
कोणत्याही गाईला उपाशी ठेवायचे नसते . . .
कारण त्याचे प्रेम सर्वच गाईवर सारखे असते . .
मग आपण तर माणसे आहोत. . . माणसे . .
कमजोर असो कि सशक्त प्रत्येकास समान पाहिजे वाटायला . . .
कमजोरला जास्त वाटून सशक्त उपाशी नको आणि सशक्तला मोकळे सोडून माजू द्यायला नको . .
यामुळेच
मला असे वाटते आपल्या देशातील
प्रत्येकास किमान चांगले जगण्यासाठी
ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे . . .
सर्वच जातींना  लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी , यात  ज्याचा त्याचा वाटा द्यावा आणि
आज जो खूला प्रवर्ग आहे तोच नष्ट करावा
म्हणजे कुणाचाही वाटा कुणी चोरणार नाही व
कमजोर वर्गात बलदंड वर्गाची घुसखोरी बंद होईल
लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा वाटला की आपोआपच जो तो स्वतःच्या हिस्साचं नीट खाईल व नासधूस करणार नाही . . . देश प्रगती करेल. .
रोज बंद, संप टाळेबंदी , आंदोलने होणार नाहीत. .
प्रत्येक वर्गाला समान संधी मिळेल. . .
त्यातही प्रत्येक जातीतील, वर्गातील गरीबांनाच प्राधान्य क्रमाने  तो  वाटा मिळाला पाहिजे . .


आर्थिक निकषावर आरक्षण ही पुडी सोडणार्यां पासून सावधान. . . आर्थिक निकषावरील आरक्षणाची चर्चा फक्त  एका वर्गाच्या फायद्यासाठी चालू आहे . 

आर्थिक निकषावर आरक्षण हा फालतु प्रचाराचा धंदा  बंद करावा . . . .
आर्थिक निकषावर आरक्षण लागू करायचे म्हटले तर सर्व लाभ उच्च व सवर्ण जातीतील लोकच गरीबी दाखवून गिळंकृत करतील
ओबीसी , दलित,आदिवासी  मराठा , जाट, पटेल, यांना  व तत्सम जातींच्या लोकांना कुणीही नोकरी देणार नाही ,
सगळे सवर्ण जातीतील लोकांचीच भरती केली जाईल!
पारधी , भिल्ल, नंदीवाला, टोकरी , अशा कितीतरी जाती आहेत त्यांना तर कुणीही संधी देणारच नाही . . .
या साठी 
आज संपुर्ण देशातील, आदिवासी , दलित, मराठा , ओबीसी , जाट, रजपूत, पटेल, गुज्जर, किंवा असे बरेच समुदाय आहेत की, त्यांना आजही त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत हिस्सा किंवा प्रतिनिधीत्व मिळालेच नाही . . .
मग ते  शिक्षण असो की,  नोकरी . . .  त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढे प्रतिनिधीत्व मिळालेच नाही . .
त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांनाच समान प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे , मग तो सवर्ण असो की दलित, आदिवासी , किंवा , ओबीसी असो !
वरील समुदायाच्या लोकांनी एकमेकाविरूद्ध भांडणतंटे करण्या ऐवजी ऐकमेकांच्या हातात हात घालून
प्रत्येकास लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे या साठी भांडले पाहिजे . .
ओपन कॅटॅगिरी संपुष्टात आणून लोकसंख्येच्या प्रमाणात संपुर्ण १००%आरक्षण वाटलेच पाहिजे . .
म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय तर मिळेल व कुणाचीही कुणाच्या जागेवर घुसखोरी होणार नाही !
त्यासाठी जातनिहाय ऑनलाइन, आधार व पॅनकार्ड लिंक करून जनगणना होणे गरजेचे आहे . .
याला कोण विरोध करणार नाही . .
आणि कुणी विरोध केला तर तो आपला सर्वांचाच विरोधक समजावा . . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

समान वाटा

प्रत्येकाचा वाटा प्रत्येकास समान  मिळालाच पाहिजे . . .
विजय पिसाळ नातेपुते . .

समजा माझ्याकडे पन्नास देशी गाईचा तबेला किंवा गोठा आहे असे समजू . . .
मला जर प्रत्येक गाईची  काळजी घ्यावी असे वाटत असेल, प्रत्येकीस समान अन्नपाणी , समान चारा , समान खुराक द्यायचा झाला तर मि प्रत्येक गाईला व्यवस्थित सेप्रेट सेप्रेट  बांधून समान  सर्व अन्नपाणी देईल, ज्यामुळे प्रत्येक गाईची  तब्येत तर चांगली होईल च मात्र ति दुध सुद्धा भरपुर देईल आणि अन्नधान्याची नासाडी सुद्धा करणार नाही . . .

हेच जर मि केवळ त्या गायीवर  दया दाखवण्यासाठी , त्यांना बांधल्यामुळे अन्याय होईल म्हणून मि जर एका मोकळ्या जागेत चारा टाकला . . .
तर काय होईल. .? 
त्यातील धष्टपुष्ठ व मोठ्या गाई या प्रथम चार्याच्या ढिगावर जातील तिथे यथेच्छ  भरपुर चारा खातील पण या दरम्यान कमजोर गाईंना त्या चार्याजवळ येवू सुद्धा  देणार नाहीत. ..स्वतः खावून वरून त्यांना मारतील हे आपण पाहतोच नेहमी व स्वतःचे  पोट भरल्यानंतर तो चारा पायाने तुडवतील. . त्यावरच नाचून घान सुद्धा  करतील. . .
परिणामी चारा खराब होईल. . . व वाया सुद्धा जाईल. . .
लक्षात येतय का ?

 आणि कुपोषित व कमजोर गाई अजून कमजोर होतील त्यांना यांचा उष्टा चारा सुद्धा मिळणार नाही . . परिणामी त्या दुध देणार नाहीत किंवा हळूहळू  मृत पावतील आणि कळपात ठराविक सशक्त गाईच भरपुर खावून जगतील पण
मालकाला तर सर्व गाईचे संगोपन करून व्यवसाय चांगला करायचा असतो . . प्रगती करायची असते म्हणून. .
कोणत्याही गाईला उपाशी ठेवायचे नसते . . .
कारण त्याचे प्रेम सर्वच गाईवर सारखे असते . .
मग आपण तर माणसे आहोत. . . माणसे . .
कमजोर असो कि सशक्त प्रत्येकास समान पाहिजे वाटायला . . .
कमजोरला जास्त वाटून सशक्त उपाशी नको आणि सशक्तला मोकळे सोडून माजू द्यायला नको . .
यामुळेच
मला असे वाटते आपल्या देशातील
प्रत्येकास किमान चांगले जगण्यासाठी
ज्याचा त्याचा वाटा मिळालाच पाहिजे . . .
सर्वच जातींना  लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी , यात  ज्याचा त्याचा वाटा द्यावा आणि
आज जो खूला प्रवर्ग आहे तोच नष्ट करावा
म्हणजे कुणाचाही वाटा कुणी चोरणार नाही व
कमजोर वर्गात बलदंड वर्गाची घुसखोरी बंद होईल
लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा वाटला की आपोआपच जो तो स्वतःच्या हिस्साचं नीट खाईल व नासधूस करणार नाही . . . देश प्रगती करेल. .
रोज बंद, संप टाळेबंदी , आंदोलने होणार नाहीत. .
प्रत्येक वर्गाला समान संधी मिळेल. . .
त्यातही प्रत्येक जातीतील, वर्गातील गरीबांनाच प्राधान्य क्रमाने  तो  वाटा मिळाला पाहिजे . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

समान वाटा


शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

नवा पक्षीय विचार

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल! इथल्या मातीवर,मातीवर प्रेम करणारी सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून मराठा समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . आपल्यासह सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं आपला पक्ष पाहिजे . . . विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो मराठा हि केवळ एक जात नाही तर तो समूह आहे , हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व मराठाच. . यातील काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या . . पण आजही २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांचा, महाराष्ट्रातील माणसांचा म्हणजे ८०%लोकांचा डिएन ए एकच पहायला मिळेल हे सत्य नाही पचत . . ते जावूद्या इतिहासातील. . गोष्टींची चर्चा अर्थहीन होत चाललीय. . . भविष्यासाठी आता वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही जाती जातीत फरक झाला व उच्चनिचता आली इथेच सत्यानाश झाला . . कुणी पंचकुळी, कुणी ९६ कुळी, कुणी ९२ कुळी, कुणी , कुणबी, कुणी , साळी , माळी, कोळी , अशा विविध जातीने ओळखू लागला याचे कारण काय तर तो वेगवेगळ्या विभागात रहात होता , त्या ठिकाणी थोडाफार रितीरीवाजात फरक होता पण. . . शिवकाळा अगोदर पासून, हे सर्व गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील एक घटक थोडाफार त्याकाळी श्रीमंत होता कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात मराठा समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून प्रतिमोर्चे काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या आरक्षणा विरूद्ध कोर्टात याचिका दाखल करतात. . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून! आजच्या मराठा समूहातील व जे आरक्षणा पासून वंचित राहिले आहेत त्यांनी कित्येक जणांना आजवर साथ दिली . . . पण विसरले ते . . . हाताला काम दिले . . . मोठा भाऊ म्हणून रोजगार दिला . . . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेतले प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . . . हाच तो मराठा होता . . . हाच पाटील देशमुख, हाच कधीकाळचा तुमचा बांधव होता . . याच मराठा वर्गाने सावकार, व्यापारी , या सर्वांनाच संरक्षण तर दिलेच व त्यांच्या कडून कर्ज घेऊन, खरेदी करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा केली . . . . पण आज किती जण मनापासून मराठा बांधवांसोबत आहेत. . . किती जणांना वाटते मराठा बांधवांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे . . . . नोकर्यात संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना मराठा समाजा बद्दल सहानुभूती आहे पण बहुसंख्य लोकांच्या मनात जो पुर्वग्रह आहे तोच जायला तयार नाही , उलट वाढत चाललाय. . . म्हणून आपल्याला न्याय देईल असा . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित उच्चवर्णीय वर्गाला त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्‍या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्‍या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्‍या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्‍या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

आत्महत्या महापाप

**आत्महत्या नका करू तरूण बांधवांनो वृद्ध माता पित्यांनो, शेतकरी बांधवांनो ! !*
**कळकळीची विनंती*
 *मनापासून आवाहन*
*विजय पिसाळ नातेपुते*
९४२३६१३४४९

तर वाचाच. . .
आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकणे म्हणजे ,
ज्या आई वडीलांनी रात्रंदिवस कष्ट करून वाढवले , अंगाखांद्यावर खेळवले, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन, उपाशी राहुन तुम्हाला खायला घातले , शिक्षण दिले , सर्व लाड पुरवले , तुमच्या जन्मा बरोबर पेढे वाटले, गावातील आयाबायांना  बोलवून नामकरण केले ,
ऐपती प्रमाणे कपडा लत्ता दिला , का ? तर तुम्ही मोठेपणी त्यांना  व्यवस्थित सांभाळून त्यांचे नाव उज्ज्वल कराल या माफक अपेक्षेने , काय चुकले त्यांचे ,  तुम्हाला वाढवताना  किती वेदना सहन केल्या , तुमच्या पायाला काटा टोचला तरीही आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले , तुम्हाला कोणी रागावले नावे ठेवली तरी तुमची बाजू त्याच माता पित्यांनी घेतली !  मात्र तुम्ही कुणाच्या तरी भडकावू भाषणाने प्रभावीत होऊन  कारण नसताना स्वतःच्या जीवा बरोबर संपुर्ण कुटुंबातील लोकांना मनस्ताप व भयंकर वेदना देवून, वार्यावर सोडून आत्महत्या करता , अरे आत्महत्या  करणे हे नुसते पाप नाही तर महापाप आहे .
मुल गेल्यानंतर किती वेदना होतात ते आई वडील होवून अनुभवा !

जमेल ते काम करा , कष्ट करा , पैसा बचत करा , गावात काम नसेल, शेती पिकत नसेल, बाजारभाव भेटत नसेल तर  बांधवांनो  शहरात जाऊन छोटीमोठी नोकरी करा , नाही जमले तर लाज न बाळगता कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा त्यात मर्दपना आहे , स्वाभिमान आहे , मोठेपणा आहे ,
जीवनात गरीबी कधीच रहात नसते , टेंशन  कधीतरी संपते, नैराश्य संपत असते , एका दिवसात कुणी, टाटा, बिर्ला,आंबानी होत नाही , त्यासाठी ट्रगल  , कठोर मेहनत हाच एक  मार्ग आहे गरीबी कधीच कायमस्वरूपी  रहात नसते , फक्त हाताला मिळेल ते काम वेळ न लावता करत रहाने व  लागेल ते काम व कष्ट करणे हाच एकमेव मार्ग असतो ,
**आपल्या रक्तात शिवरायांच्या रक्ताचा अंश आहे**
शिवरायांचे धाडसाची शिकवण आहे !  बांधवांनो
शिवराय असे घाबरले असते , त्यांनी अर्ध्यावर स्वराज्य निर्मितीचे  कार्य सोडले असते , संकटाचा सामना केला नसता तर कदाचित हे स्वराज्य उभेच राहिले नसते !
पण आपण लगेच खचून जातो !
सरकारे चालवणारे सगळे राजकारणी आता संवेदनाहीन होत चालले  आहेत, तुमच्या जीव जाण्यामुळे त्यांना पाझर फुटेल असे ही नाही . . .
म्हणून जरा शिवचरित्र डोळ्यासमोर ठेवा  व
आठवा जरा . . .
शिवरायांनी
नैराश्याने खचून न जाता तहात निम्मे राज्य जावून सुद्धा महाराज डगमगून गेले नाहीत!
पोटच्या लेकराला मोगलांच्या ताब्यात दिले तरी खचले नाहीत!
बांधवांनो
"शीर सलामत, तो पगडी पचास "
अरे जीव असेल तर सर्व काही मिळेल. .
सरकार आज आहे उद्या नाही
ज्यांनी ज्यांनी आपल्याला  फसवले आहे
त्यांना त्यांना धडा शिकवण्यासाठी तुमची समाजाला गरज आहे ,
कोणताही सत्ताधारी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला येत नसतो ,
याच देशातील जनतेने , मोगलशाही, निजामशाही, अदिलशाही, कुतुबशाही, यांच्या राजवटी पाहील्या आणि क्रांती करून नेस्तनाबूत केल्या त्यांची  , क्रुरता पाहिली, इंग्रज, फेंच, पोर्तुगीज, डच हाकलून दिले , तेंव्हा तर या देशात  लोकशाही नव्हती ,
अनियंत्रित सत्ता होत्या  , जुलमी कारभार होते . .
तेंव्हा सुद्धा आपले पुर्वज आत्महत्या करत नव्हते !
अशा महाभंयकर सत्ता या मातीतील शुर वीरांनी उलथवून लावल्या याचा विचार करा . .
जे न्याय हक्क आपल्याला देणार नाहीत त्यांना आपण नक्कीच लोकशाही मार्गाने हाकलून लावू शकतो !
ति ताकद आपल्या लोकशाहीत आहे , जेंव्हा जेंव्हा सत्ताधारी माजले तेंव्हा तेंव्हा इथल्या जनतेने त्यांना घरी बसवले ! आठवा जरा फ्रेंच राज्यक्रांती, आठवा जरा
या देशातील जनतेने इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणी नंतर धडा शिकवला मग हे तर आत्ताचे  राजकारणी  नुसते बोलबच्चन पोपट आहेत, तेवढा दम नाही यांच्यात,
हिटलर, नाझी, मुसोलीनी , यांची साम्राज्य धुळीला मिळाली ! जनता जास्त नाही सहन करत. . .
पण तुम्ही जगले पाहिजे .
या देशाचे कायदे , घटना हे जनतेसाठी आहेत हे बाबासाहेबांनी घटनेत सांगितले आहे , लोकांना न्याय देण्यासाठी त्यात वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मुभा दिलेली आहे पण आताची सरकारे बहिरी , मुकी , व आंधळी झालेली आहेत,
त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही !
काही मंडळी कोर्टाची ढाल करून, काहीना . .  काही अडचणी आणून तुम्हाला जरूर त्रास देत आहेत पण डगमगून जावू नका !
जरा वाट पहा योग्य येतेच, ती वेळ आली की मात्र दनका द्या पण आत्महत्या हा मार्ग नाही . . .
त्यामुळे सबुरीने घ्या , जीव असेल तर वाट्टेल ते करू
पण जीव देवून रणांगण सोडून पळणारे आपण नाही आहोत याचा तरी विचार करा !
आत्महत्या करणे म्हणजे , देशाला,
जातीला व आपल्या इतिहासाला कलंक लावणे होय!
ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाने कित्येकांना पोसले   , कित्येकांचे संरक्षण केले , कित्येकाचे प्राण वाचवले , छातीची ढाल केली, परकीय आक्रमकांचा बंदोबस्त केला,  कित्येकांना आधार दिला ,
हा इतिहास विसरू नका !
आजही गावागावात सर्व जातीपातीची  जनता आपल्या बरोबर असते , एकमेकांच्या ताटात आपण जेवतो, एकमेकांची विचारपूस करतो , घासातील घास खातो  हेही विसरू नका !
प्रत्येक समाजात १ ,  २%नासके असतात ते आपल्यात सुद्धा आहेत म्हणून इतर जाती धर्मातील,  बांधवांना नावे ठेवू नका , खालच्या पातळीवर जावून टीका सुद्धा करू नका , संस्कृती जपा !
आपला संघर्ष हा राजकीय नेते , सत्ताधारी पक्ष  यांचे बरोबर आहे ,
मग सत्तेवर कोणताही पक्ष असो त्या पक्षांकडून न्याय नाही मिळाला तर लढत राहू ! 
आपला संघर्ष हा न्याय हक्कासाठी आहे हे ध्यानात ठेवा !
आपले , ब्राह्मण, दलित,ओबीसी ,  मुस्लिम, आदिवासी हे  शत्रू नाहीत तेही आपले बांधवच  आहेत, कदाचित तुम्हाला हे पटणार नाही पण मराठा व आठरापगड जाती  , बारा बलुतेदार यांचे नाते शिवकाळापासून आहे किंबहुना त्याच्या अगोदर पासून ही असेल म्हणूनच सर्व जाती धर्मातील मावळे शिवरायांचे सैनिक झाले व होते ,  याचाच आपणही एक भाग आहोत,
स्वतःला कुणीही उच्चकुलीन समजू नये व कुणालाही दुय्यम हलके समजू नये !
गावातील, किरकोळ वाद, किरकोळ तंटे गावात सोडवायची परंपरा जपा, एखादा दुसरा नालायक वागला म्हणून इतर  समाजातील सर्वांनाच धडा शिकवायची भाषा बरोबर नाही , तुमच्या वर खराचा कुणी अन्याय केला तर कुणालाही घाबरू नका वाट्टेल ती किंमत मोजून   आक्रमक सुद्धा व्हा मात्र शक्य होईल तिथकी    परिस्थिती संयमाने हाताळली तर  नक्कीच तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही .
काही नालायक राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांनी  राजकारणासाठी दुसऱ्या जाती धर्माची टिंगलटवाळी करणे चालू करून तुमची माती भडकवून स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करणे चालू केले आहे !
मराठा समाजाविषयी , ओबीसी , दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा डाव टाकला आहे तो डाव
सक्सेस होवू देवू नका, तो डाव उधळून लावा  ,
आपल्यातील काहींना फोडून दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो हाणून पाडा !
माझ्या धारधार  लिखाणामुळे मलाही त्रास होतो पण मि कुणाला घाबरत नाही कारण लढणे हाच पिंड आपला आहे,
वाट्टेल त्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवून
लेखनीच्या माध्यमातून सतत प्रबोधन करायचे, सेवा करायची हाच मि विढा उचललेला आहे . .
काहीही केले तरी कुणी  चांगले म्हणते , कुणी वाईट म्हणते पण
आपले काम आपण करत रहायचे , प्रत्येकास
कामाच्या व्यापातून वेळ देता येतो असेही नाही
मात्र,
दिवसभराची कामे संपल्यावर किमान तुमच्या माझ्या भल्यासाठी लिहतो कदाचित माझ्या लेखणीतून काही चुका होत असतील, त्रुटी रहात असतील पण
हा प्रबोधनाचा वसा घेतलेला आहे ,
बांधवांनो काहीही होवूद्या पण आत्महत्या करू नका !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय हिंद जय महाराष्ट्र!

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

आत्महत्या हे महापाप

**आत्महत्या नका करू तरूण बांधवांनो वृद्ध माता पित्यांनो, शेतकरी बांधवांनो ! !*
**कळकळीची विनंती*
 *मनापासून आवाहन*
*विजय पिसाळ नातेपुते*
९४२३६१३४४९

तर वाचाच. . .

आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकणे म्हणजे ,
ज्या आई वडीलांनी रात्रंदिवस कष्ट करून वाढवले , अंगाखांद्यावर खेळवले, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन, उपाशी राहुन तुम्हाला खायला घातले , शिक्षण दिले , सर्व लाड पुरवले , तुमच्या जन्मा बरोबर पेढे वाटले, गावातील आयाबाया बोलवून नामकरण केले ,
ऐपती प्रमाणे कपडा लत्ता दिला , का ? तर तुम्ही मोठेपणी त्यांना  व्यवस्थित सांभाळून त्यांचे नाव उज्ज्वल कराल या माफक अपेक्षेने , काय चुकले त्यांचे  तुम्हाला वाढवताना  किती वेदना सहन केल्या , तुमच्या पायाला काटा टोचला तरीही आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले , तुम्हाला कोणी रागावले नावे ठेवली तरी तुमची बाजू त्याच माता पित्यांनी घेतली !  मात्र तुम्ही कुणाच्या तरी भडकावू भाषणाने प्रभावीत होऊन  कारण नसताना स्वतःच्या जीवा बरोबर संपुर्ण कुटुंबातील लोकांना मनस्ताप व भयंकर वेदना देवून, वार्यावर सोडून आत्महत्या करता , अरे आत्महत्या  करणे हे नुसते पाप नाही तर महापाप आहे .
मुल गेल्यानंतर किती वेदना होतात ते आई वडील होवून अनुभवा !

जमेल ते काम करा , कष्ट करा , पैसा बचत करा , गावात काम नसेल, शेती पिकत नसेल, बाजारभाव भेटत नसेल तर  बांधवांनो  शहरात जाऊन छोटीमोठी नोकरी करा नाही जमले तर लाज न बाळगता कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा त्यात मर्दपना आहे , स्वाभिमान आहे , मोठेपणा आहे ,
जीवनात गरीबी कधीच रहात नसते , टेंशन कधीच, नैराश्य संपत असते , एका दिवसात कुणी, टाटा, बिर्ला,आंबानी होत नाही , त्यासाठी ट्रगल हाच मार्ग आहे गरीबी कधीच कायमस्वरूपीव रहात नसते , फक्त हाताला मिळेल ते काम वेळ न लावता व  लागेल ते काम व कष्ट करणे हाच एकमेव मार्ग असतो ,
**आपल्या रक्तात शिवरायांच्या रक्ताचा अंश आहे**
शिवरायांचे धाडसाची शिकवण आहे , बांधवांनो
शिवराय असे घाबरले असते , त्यांनी अर्ध्यावर कार्य सोडले असते , संकटाचा सामना केला नसता तर कदाचित हे स्वराज्य उभेच राहिले नसते ! पण आपण लगेच खचून जातो !
सरकारे चालवणारे सगळे राजकारणी आता संवेदनाहीन होत आहेत, तुमच्या जीव जाण्यामुळे त्यांना पाजर फुटेल असे ही नाही . . .
आठवा जरा . . .
शिवरायांनी
नैराश्याने खचून न जाता तहात निम्मे राज्य जावून सुद्धा महाराज डगमगून गेले नाहीत!
बांधवांनो
"शीर सलामत, तो पगडी पचास "
अरे जीव असेल तर सर्व काही मिळेल. .
सरकार आज आहे उद्या नाही
ज्यांनी ज्यांनी आपल्याला  फसवले आहे
त्यांना त्यांना धडा शिकवण्यासाठी तुमची समाजाला गरज आहे ,
कोणताही सत्ताधारी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला येत नसतो ,
याच देशातील जनतेने , मोगलशाही, निजामशाही, अदिलशाही, कुतुबशाही, यांच्या राजवटी पाहील्या  , क्रुरता पाहिली, इंग्रज, फेंच, पोर्तुगीज, डच हाकलून दिले , तेंव्हा तर या देशात  लोकशाही नव्हती ,
अनियंत्रित सत्ता होत्या  , जुलमी कारभार होते . .
तेंव्हा सुद्धा आपले पुर्वज आत्महत्या करत नव्हते !
अशा महाभंयकर सत्ता या मातीतील शुर वीरांनी उलथवून लावल्या याचा विचार करा . .
जे न्याय हक्क आपल्याला देणार नाहीत त्यांना आपण नक्कीच लोकशाही मार्गाने हाकलून लावू शकतो !
ति ताकद आपल्या लोकशाहीत आहे , जेंव्हा जेंव्हा सत्ताधारी माजले तेंव्हा तेंव्हा इथल्या जनतेने त्यांना घरी बसवले !
या देशातील जनतेने इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणी नंतर धडा शिकवला मग हे तर आत्ताचे  राजकारणी  नुसते बोलबच्चन पोपट आहेत, तेवढा दम नाही यांच्यात पण तुम्ही जगले पाहिजे .
या देशाचे कायदे , घटना हे जनतेसाठी आहेत हे बाबासाहेबांनी घटनेत सांगितले आहे , लोकांना न्याय देण्यासाठी त्यात वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मुभा दिलेली आहे पण आताची सरकारे बहिरी , मुकी , व आंधळी झालेली आहेत,
त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही !
काही मंडळी कोर्टाची ढाल करून, काहीना काही अडचणी आणून तुम्हाला जरूर त्रास देत आहेत पण डगमगून जावू नका !
जरा वाट पहा योग्य वेळी दनका द्या पण आत्महत्या हा मार्ग नाही . . .
त्यामुळे सबुरीने घ्या , जीव असेल तर वाट्टेल ते करू
पण जीव देवून रणांगण सोडून पळणारे आपण नाही आहोत याचा तरी विचार करा !
आत्महत्या करणे म्हणजे
जातीला व आपल्या इतिहासाला कलंक लावणे होय!
ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाने कित्येकांना पोसले   , कित्येकांचे संरक्षण केले , कित्येकाचे प्राण वाचवले , छातीची ढाल केली, परकीय आक्रमकांचा बंदोबस्त केला,  कित्येकांना आधार दिला ,
हा इतिहास विसरू नका !
आजही गावागावात सर्व जातीपातीची  जनता आपल्या बरोबर असते , एकमेकांच्या ताटात आपण जेवतो, एकमेकांची विचारपूस करतो , घासातील घास खातो  हेही विसरू नका !
प्रत्येक समाजात १ ,  २%नासके असतात ते आपल्यात सुद्धा आहेत म्हणून इतर जाती धर्मातील,  बांधवांना नावे ठेवू नका , खालच्या पातळीवर जावून टीका सुद्धा करू नका ,
आपला संघर्ष हा राजकीय नेते , सत्ताधारी पक्ष  यांचे बरोबर आहे ,
मग सत्तेवर कोणताही पक्ष असो त्या पक्षांकडून न्याय नाही मिळाला तर लढत राहू ! 
आपला संघर्ष हा न्याय हक्कासाठी आहे हे ध्यानात ठेवा !
आपले , ब्राह्मण, दलित,ओबीसी ,  मुस्लिम, आदिवासी हे  शत्रू नाहीत तेही आपले बांधवच  आहेत, कदाचित तुम्हाला हे पटणार नाही पण मराठा व आठरापगड जाती बारा बलुतेदार यांचे नाते शिवकाळापासून आहे किंबहुना त्याचाच आपणही एक भाग आहोत,
स्वतःला कुणीही उच्चकुलीन समजू नये व कुणालाही दुय्यम हलके समजू नये !
गावातील, किरकोळ वाद, किरकोळ तंटे गावात सोडवायची परंपरा जपा, एखादा दुसरा नालायक वागला म्हणून समाजातील सर्वांनाच धडा शिकवायची भाषा बरोबर नाही , तुम्ही कधी आक्रमक तर कधी संयमाने परिस्थिती हाताळली तर  नक्कीच तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही .
काही नालायक राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांनी  राजकारणासाठी दुसऱ्या जाती धर्माची टिंगलटवाळी करणे चालू करून तुमची माती भडकवून स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करणे चालू केले आहे !
मराठा समाजाविषयी , ओबीसी , दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा डाव टाकला आहे तो डाव
सक्सेस होवू देवू नका, तो डाव उधळून लावा  ,
आपल्यातील काहींना फोडून दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो हाणून पाडा !
माझ्या धारधार  लिखाणामुळे मलाही त्रास होतो पण मि कुणाला घाबरत नाही कारण लढणे हाच पिंड आपला आहे,
वाट्टेल त्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवून
लेखनीच्या माध्यमातून काहीतरी प्रबोधन करायचे, सेवा करायची हाच मि विढा उचललेला आहे . .
काहीही केले तरी कुणी  चांगले म्हणते , कुणी वाईट म्हणते पण
आपले काम आपण करत रहायचे , प्रत्येकास
कामाच्या व्यापातून वेळ देता येतो असेही नाही
मात्र,
दिवसभराची कामे संपल्यावर किमान तुमच्या माझ्या भल्यासाठी लिहतो कदाचित माझ्या लेखणीतून काही चुका होत असतील, त्रुटी रहात असतील पण
हा प्रबोधनाचा वसा घेतलेला आहे ,
बांधवांनो काहीही होवूद्या पण आत्महत्या करू नका !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय हिंद जय महाराष्ट्र!

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

मराठा आरक्षण मिळू शकते !

मराठा समाजाला आरक्षण  मिळू शकते ! ! ! !
वाचा . . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
कोर्टाने जरी आरक्षणाला ५०%ची मर्यादा घातली असली तरी बदलत्या परिस्थितीनुसार
पटेल, मराठा , जाट, रजपूत, गुज्जर व तत्सम जातींचा समूह बनवुन व जो समूह सामाजिक व शैक्षणिक मागास दाखवून  सध्याच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता वर उल्लेख केलेल्या जातीचा ओबीसी  2 किंवा ओबीसी ब असा प्रवर्ग तयार केला तर आणि  आत्ताच्या ओबीसींना कसलाही त्रास न होता , हा तिढा सुटू शकतो ,  सोडवला जावू शकतो त्या साठी  केंद्र  सरकारने पुढाकार घेणे व आरक्षणा योग्य ते बील तातडीने  तयार करणे व त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवलीतर बिल आणले तर कोणताही पक्ष किंवा समाज विरोध करणार नाही ,
सहाजिकच हे बील पास करणे शक्य होईल, व जे  पक्ष किंवा संघटना ५० %चा बागूलबुवा उभा करून हे बील पास करणे टाळतील तेही आपोआप उघडे पडतील!
सध्याच्या  आत्ता अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रवर्गात आरक्षण मागणे म्हणजे स्वतःच्या पायावरच दगड मारणे असेच होईल, आत्ताच ७० %लोकसंख्या ५२ आरक्षणात सिमीत आहे व त्यात अजून २० लोकसंख्येची  भर पडली तर ९० % लोकांना ५२ %जागा व १० %लोकांना ४८%जागा यामुळे ना मराठा , पटेल, गुज्जर, जाट यांचा फायदा होणार, ना सध्याच्या ओबीसींना फायदा होणार नुसती खिचडी होईल,
त्या पेक्षा आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त करणे ती ७५ % पर्यंत वाढवणे हाच एकमेव उपाय शिल्लक राहतो ! व  आताच्या ओबीसींचा प्रवर्ग  १ व या जातींचा प्रवर्ग २ किंवा अ, ब करणे आवश्यक आहे , म्हणजे कुणाचीही घुसखोरी कुणाच्या राखीव जागात होणार नाही !
आजच्या  ओबीसी प्रवर्गात असणार्‍या जातींचा विचार केला तर ओबीसी कोट्यात इतकी गर्दी झालीय की तिथे अजून जास्त गर्दी झाली तर गुदमरून सर्वच समूह संपतील अशी परिस्थिती आहे ,

आज ओपन कॅटॅगिरीतीलच काही समाज घटक मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष विरोध करत आहेत तेही ,
दबक्या आवाजात छुप्या पद्धतीने , न्यायपालिका व बगलबच्चे पुढे करून असे एक ते दोन समाज, जे ओपन कॅट्यागिरीतील बहुतेक जागा हडप करतात तेच  विरोध सुद्धा  करतात, तेच कोर्टात जातात, कोर्ट सुद्धा त्यांच्या  विचारसरणीचे असते फक्त घटनेची ढाल पुढे  करतात, पण बाबासाहेबांनी कुठेही असे म्हटले नाही की घटना दुरुस्ती करू नका !
उलट गरजेनुसार योग्य वेळी योग्य भुमिका घेण्याचे संसदेला अधिकार दिलेत,
सरकार, भुमिअधिग्रहन कायदा करते, त्या कायद्यात कुणालाही सहजासहजी कोर्टात जाता येत नाहीत, शेतकर्यांना न्याय मागता येत नाही , जीएटी  आणते , कोर्टाने वारंवार सांगून सुद्धा आधार सक्तीचे करते , लोकपाल नियुक्ती टाळते , मात्र मराठा आरक्षण हा विषय आला की कोर्टाने घालून दिलेली मर्यादा दाखवली जाते असे का ? 
आज आरक्षण काढून टाकावे किंवा ते नकोच असलेल्या वर्गाकडून  आरक्षणाला विरोध आहे !
त्यांना सगळ्या जागा खूल्या पाहिजेत, कारण अजून इतर समाज मुख्य प्रवाहा पासून कोसो दुर आहेत, जे आरक्षण विरोधक आहेत त्यांच्याच  असलेल्या लोकांचाच सरकार वर प्रभाव व रिमोटकंट्रोल आहे . .
 त्यांचाच या सरकारवर कंट्रोल असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओपन कॅट्यागीरीच्या सध्या राहिलेल्या ४८%जागा कमी होवू नये असेच वाटते , म्हणूनच संघ परिवार व त्यांचे हितसंबंध जोपासना करणारेच  जातीय घटक  आरक्षणाला विरोध करतात किंवा वेगळीच पुडी सोडून ओबीसी व मराठा असा वाद निर्माण करतात,
म्हणून यापुढे मराठा समाजाने प्रथम ५०% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही असा जो सुप्रीम कोर्टाने एका खटल्यात निर्णय दिलाय तो संसदेत घटना दुरुस्ती करून ५० % पेक्षा जास्त आरक्षण देण्यासाठी कायदा केला पाहिजे , या साठी इतर जाती समुहांना घेऊन भांडले पाहिजे !
विविध राज्यातील शेती करणार्‍या कृषक जातींचा हा लढा यशस्वी करायचा असेल तर, पेटल, मराठा , जाट, रजपूत, गुज्जर, यांना एकत्र आल्या शिवाय मार्ग नाही !
संसदेत जर या कृषक जातींना आरक्षण मिळण्यासाठी नवीन प्रवर्ग तयार करून तशी घटना दुरुस्ती केली गेली तर आपोआपच आरक्षणाचा हा तिढा सुटेल!
जर सरकार या गोष्टी साठी तयार नसेल तर कोणत्याही छोट्या मोठ्या पक्षाला व लोकप्रतिनीधीला खाजगी विधेयक संसदेत मांडता येते तशी तरतूद आहे !
जो कोणी या विधेयकाला विरोध करेल त्याला संपुर्ण देशापुढे उघडे पाडता येईल व नवी दिशा सुद्धा मिळेल!
व आताचे जे ओबीसी घटक आहेत व या  कृषक जातींचा संघर्ष सुद्धा  होणार नाही ,
सरकार आरक्षणा  बाबतीत  प्रामाणिक असेल तर संसदेत तसा कायदा करेल व विरोधकांची मदत मागेल, व जे विरोधक विरोध करतील त्यांना जनता धडा शिकवेल!
कारण या कृषक जाती पैकी ९५%लोक हे  शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या नक्कीच आज मागास आहेत, कर्जाच्या विळख्यात आहेत, सावकारी व बँकांनी यांचे कंबरडे मोडले आहे ,
हे समाज केवळ शेतीवर अवलंबून राहिल्याने आणि सरकारी
शेतमालाच्या आयात निर्यात धोरणामुळे , शेतमालाला बाजार भाव मिळत  नसल्याने , हा शेतकरी  ,  समाज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे ,
मुलांना चांगले शिक्षण द्यायचे म्हटलं तर महागडा  शैक्षणिक खर्च व प्रचंड वाढलेल्या शाळा कॉलेजच्या फि परवडत नाहीत, कर्ज काढून मुलांना शिक्षण दिले तर नोकरीची हमी नाही ,
धंदा करावा तर मोक्याच्या ठिकाणी जागा नाहीत , पुरेसे भांडवल नाही व धंद्यासाठी आवश्यक स्किल नाही अशा दृष्ट्य चक्रात हा शेतकरी समाज सापडलाय, नोकरी , धंदा नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत,
मुलींच्या लग्नाला पैसा नाही ,
यामुळे मराठा किंवा तत्सम जातींचा समूह करून आरक्षण मिळवण्या शिवाय पर्याय नाही !
हे सरकार आरक्षण   सहजासहजी देणार नाही त्यासाठीच सर्व कृषक जातींची मोट बांधने हेच क्रमप्राप्त आहे !
यापुढेही कोणतेही सरकार आले तरी त्यांना हा प्रश्न सोडवण्याची इच्छा असेल तर सहज हा प्रश्न सुटू शकतो !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

माळीन गाव दुर्घटना झाली त्यावेळी लिहलेले

माझा लेख आपल्या सर्वांसाठी!
विजयकाका पिसाळ!

आपल्या महाराष्ट्राला संकटे काही नवीन नाहीत!
माळीन गाव असो कि सावित्री नदीवरील दुर्घटना असो,कोठ्यावधी रुपये खर्चून वाहुन गेलेला गोदावरी पार्क असो
अशा घटना आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात राहतो हळहळ व्यक्त  करतो सरकार कोणतही   असो त्यावर टीकात्मक  बोलत राहतो!
पण संबंधीत विभागाला  चुकीच्या गोष्टी लक्षात आणून देत नाही!
नदी नाले यातील अतिक्रमणे रोखत नाही
वृक्ष तोड थांबवत नाही
पोखरले जाणारे डोंगर आणि नदी पात्रातील बेसुमार वाळूतस्करी रोखत नाही
अनियंत्रित प्लॅस्टिकचा वापर थांबवत नाही!
अशा असंख्य गोष्टी आपल्या पासुन सुरु होतात आणि आपल्या हातून काहीही न करता नेहेमीच आपण सरकारी यंत्रणा आणि सरकारला दोष देत असतो!
पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण गंभीर झालो निसर्गाचे नुकसान टाळले तर सगळ्या समाजातील लोकांनी दक्षता घेतली तर कदाचित संकटे येणार नाहीत किंवा संकटांचा मुकाबला तरी व्यवस्थित  करता येईल पण संपुर्ण समाज आज निद्रिस्त झालेला पाहतो आपण!
राजकीय आखाडा आसला कि हजारो लोकांना वेळ असतो पण समाजासाठी काही ठोस कार्यक्रम आखायचा असेल तेंव्हा सगळेच नॉट रिचेबल असतात
नेत्याचे वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमात डी जे च्या तालावर नाचण्यासाठी एकत्रित येणारी तरुणाई सामाजिक कामा बाबतीत एकत्रित यायला हवी!पण हे घडत नाही!
विघातक कामा ऐवजी विधायक कामासाठी सर्वांनीच देशवासी म्हणुन राजकारण जात पात पक्ष विरहीत काम करायला शिकले पाहिजे!
आपले आदर्श हे आमटे  कुटुंब,राणी व विजय बंग,नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे सिंधूताई सपकाळ हे असले पाहिजेत
पैशासाठी काम करणारे नेते अभिनेते व खेळाडू हे आदर्श असावेत का?
जे समाजासाठी तळमळीने काम करतात आणि कायम लोकांचा विचार करतात किंवा आपल्या कमाईतून काही हीस्सा सामाजिक कामासाठी वापरतात त्यांना आदर्श मानायला हरकत नसावी
अपवादात्मक परस्थितीत नेत्यांच्या कलाकारांच्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्यसभेची किंवा विधान परिषदेची खासदारकी आमदारकी द्यायला हवी पण ९०च्या दशकापासून राजकीय पुनर्रवसन किंवा काही ठराविक लोकांना खूष करण्यासाठी किंवा उपद्रवमुल्य कमी करण्यासाठी वरिष्ठ सभागृत सदस्य पाठवले जातात याला कोणताही पक्ष अपवाद राहीलेला नाही!
आता सगळ्यांनी जागृत होण्याची गरज आहे
आज आपल्या पासुन हाकेच्या अंतरावर असणारी संकटे उद्या कदाचित आपल्या गावावर आणि घरापर्यंत  येऊ शकतात!
समाजासाठी देशासाठी वेळ देणारी संस्कारक्षम युवक मंडळी पुढे यायला हवीत
वैयक्तीक हेवेदावे आणि भेदभाव समाजासाठी  आणि देशासाठी घातक आहेत
येणार्या संकटापासुन सावध रहायला शिकले पाहिजे
तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगले देवु!
विजयकाका पिसाळ नातेपुते

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

माझी पोस्ट कुणाच्याही विरूद्ध नाही , कुणावर राग नाही फक्त पहावत नाही म्हणून लिहावे लागते !
पटले तर बघा नाहीतर सोडून द्या !
राग आला तर माफ करा पण वाचा . . . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

विविध पक्षांच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचल्यामुळे , आज मराठा सगळीकडे विखुरला गेला आहे .  एकगठ्ठा मतदान होत नसल्याने कोणताही राजकीय पक्ष मराठ्यांना सध्या गांभीर्याने घेत नाही असेच म्हणावे लागते , त्यामुळेच  मराठ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले जात नाहीत, सगळे प्रश्न व समस्या जैसे थे  आहेत , शेती बरीच निसर्गावर, समजा निसर्गाने साथ दिली थोडंफार पिकलंच  तर मुद्दाम बाजाभाव पाडण्याचे सरकारी   षडयंत्र  ,  शिक्षणातील मागालेपण, महागडे शिक्षण घेण्याची संपलेली ऐपत व विविध षडयंत्र रचून मराठा युवकांना कुणी हिंदुत्वाच्या , कुणी बहुजन वादाच्या तर कुणी  राजकारणासाठी विविध व्यसनांच्या नादी लावून माती भडकवून विविध ठिकाणी वापर करून घेत आहेत, हाताला काम नसलेले काही युवक सहाजिकच कोणतीतरी संघडना जॉईन करतो मग, कधी मुस्लिम तर कधी दलित तर कधी ओबीसींना नावे ठेवत बसतो पण ज्यांना आपण नावे ठेवतोय त्यांनी नोकरी , शिक्षण, शेती, उद्योगधंदा यात केलेली प्रगती मात्र पहात नाही ,   सर्वच मोठ्या  राजकीय पक्षांनी मराठा समाजातील प्रस्थापित  नेत्यांना बरोबर काहीतरी पदे  देवून पोटापाण्याची सोय केली आहे व त्या बहुतेक  नेत्यांनी काही मोजकेच कार्यकर्ते सांभाळून आपआपल्या बुरूजांची डागडुजी केली आहे ,
महाराष्ट्रात ३२ ते ३६  %पेक्षा जास्त असलेला समाज प्रमुख चार पक्षांत कमीजास्त ८ ते, ९ टक्केवारीने विभागला आहे ! बाकीच्या शेकडो संघटनांची पताका खांद्यावर आहेच! त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्ष उमेदवारी मराठा समाजाला देतात पण बॉस होऊ देत नाहीत, ताटाखालचे मांजर बनवतात व तेही काहीतरी  पदरात पडते यावर समाधान मानतात!

आता राहिलेला जो इतर समाज ज्या पक्षांच्या   पाठिमागे उभे  राहतात  त्यांचेच उमेदवार विजयी होतात  !
हे गणित सर्वच  पक्षांनी बरोबर ओळखले आहे त्यामुृळे , मराठा समाजाचे मोर्चे प्रचंड मोठे होतात मात्र, मोर्च्याला एकत्र आलेला समाज मतदान करताना मात्र, आपल्या सोयीनुसार व आपल्या नात्यागुत्या नुसार, आपल्या संबंधा नुसार   आपआपल्या नेत्यांना मतदान  करत आसतो,  त्याचा परिणाम असा होतो की, मराठा वोट बँक विखूरली जाते व सहाजिकच अपेक्षीत परिणाम किंवा मराठा समाजाकडून राजकीय पक्षांना धोका पोहचत नाही व काही प्रमाणात जो धोका पोहचतो तो आर्थिक गोष्टींची बेगमी करून भरून काढला जातो , त्यामुळे  मराठा समाजाचे प्रश्न कोणही सोडवू शकत नाही . . हीच वस्तुस्थिती आहे . .
त्यामुळे सत्तेवर कुणीही आले तरी मराठा  समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत,  किमान यापुढे तरी  जो पक्ष ठाम भूमिका घेवून मराठा समाजाची भक्कम बाजू मांडत नाही तोपर्यंत मराठा समाजाने प्रस्थापित पक्षांना जवळ करूच नये  असेच वाटते , जोपर्यंत मराठा समाजाची संघटीत ताकद निवडणुकीत एकसंघ दिसत नाही तोपर्यंत कितीही मोठी आंदोलन झाली तरी सरकार नमणार नाही , मग सरकार कोणतीही असो ! आज छोटेमोठे समाज  संघटीत व ठामपणे एकाच कोणत्यातरी पक्षांना मतदान करतात तेंव्हा त्या पक्षांना त्या घटकांपुढे झुकावेच लागते !
जो पर्यंत मराठा समाज  एकत्रितपणे ठरवून मतदान करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा कोणताही  प्रश्न सुटेल असे वाटत नाही !
आजच्या प्रत्येक पक्षांला वाटतेय की , आपण मराठा समाजाची बाजू  लावून धरली तर कदाचित  आपली इतर वोट बँक नाराज होईल किंवा दुर जाईल!
म्हणून कुणीही छुपी किंवा उघड भुमिका मराठा समाज्या साठी घेत नाही !
आज आपण पाहतो प्रत्येक जातीसाठी ठामपणे भांडणारा त्या त्या जातीत नेता आहे , ओबीसींना चुचकारून मुंडे साहेबांनी माधव समिकरण तयार केले , मुंडे साहेबांनी जाणीवपुर्वक मराठा नेत्यांना टार्गेट केले शरीर जरी मुंडे साहेबांचे होते तरी ब्रेन मात्र नागपूरकरांचा होता !
मराठा समाजात नेते बरेच झाले मात्र बहुसंख्य नेत्यांना , आमदारकी,खासदारकी , फारतर जिल्हापरीषद व  मंत्रीपद, महामंडळ, असे काहीतरी दिले की तो नेता समाज विसरून जातो व समाजाचे प्रश्न तसेच अनुउत्तरीत राहतात!
प्रत्येक समाजाचा हमखास पक्ष आहे पण मराठ्यांना कोणताही एक  पक्ष नाही ! कारण मराठा विविध पक्षात विखूरला गेला ,
राजकीय आर्थिक लाभ  मिळेल तिकडे समाजातील नेते जातात व समाज नेत्यांचे मागे जातो . . . हेच पिढ्यान पिढ्या चालू आहे ,
आज ब्राह्मण समाजाचा विचार केला तर जवळपास ९५%ब्राह्मण समाज संघ परिवार व भाजपासी ठामपणे जोडलेला आहे व जो ५% राहतो तो इतर पक्षांत फक्त लाभार्थी असतो त्याचे मत सुद्धा कमळालाच असते पण यातुन कोणताही मराठा बोध घेत नाही !
मराठाच काय इतर कोणताही समाज एकाच पक्षांच्या मागे ठामपणे उभा रहात नाही !
अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांना शिक्षण, रोजगार, नोकरी  नाही मिळाले तरीही वाली कोणही नाही ,
मराठा शेतकर्यांनी कितीही आत्महत्या केल्या तरी सरकार जागे होणार नाही ,
जातीपुरता विचार करणारा मराठा कधीच नव्हता , नसावे सुद्धा याच मताचा मिही आहे ,
पण मराठा समाजाच्या समस्या जर कुणी गांभीर्याणे कोण सोडवणार नसेल  तर मराठा समाजातील नव तरूणांनी आता विचार करायची वेळ आली आहे !
कुठेतरी ठाम राजकीय भुमिका घेऊन जो आपले प्रश्न सोडवेल त्याला तरी जवळ करावे किंवा आपल्या समाजातील तरूणांनी एकत्र येऊन एखादा पक्ष तरी काढावा !
नसेल तर आंदोलन बंद करून आहे तसेच जगत रहावे !
बांधवांनो इतक्या दिवस मराठा शेतकरी आत्महत्या करत होते आता मराठा तरूण आत्महत्या करत आहेत,
तरीही सध्याचे राजकीय पक्ष जर लक्ष देत नसतील तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
काही चुकले असल्यास माफ करावे !