vijaypisal49. blogspot. com

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

मला भावलेले नेतृत्व, अर्थात मा. श्री . धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण



*मला भावलेले नेतृत्व*
मा . श्री .  धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील तथा आमचे आवडते भैय्यासाहेब. . 
शब्दांकन. . 
श्री . विजय पिसाळ नातेपुते. . 
आमच्या तीन पिढ्या फक्त मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणार्‍या , मोहिते पाटील कुटूंबाशी  एकनिष्ठ असणार्‍या  आहेत,  कित्येकजण मोहिते पाटील कुटूंबाच्या विरोधात गेले व  परत वैयक्तिक स्वार्थासाठी मोहिते पाटील परिवाराच्या   जवळ आले ,  मोहिते पाटील यांच्यामुळे कित्येकजण  करोडपती  झाले नावारूपाला आले , त्यातील कित्येकजण छुप्या पद्धतीने दगाबाजी करतात आणि तेच मांडीला मांडी लावून बसतात. .  पण आम्ही स्पष्ट बोलणारे जरुर असलो तरीदेखील 
 आम्ही कधीही मोहिते पाटील परिवाराची साथ सोडली नाही,  दगाबाजी केली नाही आणि कोणत्याही पदाचीही  अपेक्षाही बाळगली नाही.   कारण मोहिते पाटील परिवाराचा निष्ठावंत सैनिक हेच पद आमच्यासाठी महत्त्वाचे आहे .  कारण  या  परिवारांने एकवेळ एखाद्याचे चांगले करता नाही आले तरी चालेल पण कुणाच्या अन्नात माती कालवायची नाही , कुणाचेही वाटोळे करायचे नाही . . हे  कायम जपले आहे .   अगदी विरोधकांनाही कधी त्रास दिला नाही की विरोधकांची कामे कधी  आडवली नाहीत ,  जात पात धर्म यावरून भेदभाव केला नाही म्हणून  मोहिते पाटील परिवारावर  आम्ही प्रेम करतो .  आमचा पक्ष मोहिते पाटील हाच होता  आहे व राहिल   ते राष्ट्रवादीत असतानाही आम्हाला राष्ट्रवादीशी काहीही घेणेदेणे नव्हते  आणि ते भाजपात आहेत त्याचेही आम्हाला सोयरसुतक नाही . कारण आमचे प्रेम फक्त मोहिते पाटील परिवारावर आहे. त्याच घराण्यातील  अतिशय कार्यकुशल नेतृत्व. म्हणजे  धैर्यशील भैय्या आहेत . काम कोणतेही असो ते तडीस नेण्याची क्षमता  ,  नेतृत्व करण्याची धमक यामुळेच 
 एक झंझावाती नेतृत्व  म्हणून भैय्यासाहेब नावारूपाला आले आहेत. 
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात मी खूप माणसे जवळून पाहिली , कित्येकांशी जवळचे संबंध आले , पण या सर्व माणसांत विशेष भावलेले व्यक्तीमत्व,  आदरयुक्त नेतृत्व  म्हणजे    धैर्यशीलभैय्या  मोहिते पाटील.  
भैय्यासाहेब  हे रसायन खूप वेगळे आहे . अचूक माणसांची पारख करणे ,  माणसे जोडणे , कार्यकर्त्याला ताकद देणे,  कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे व तातडीने कोणत्याही समस्येवर  मार्ग काढणे यामुळे तरुण वर्गात भैय्यांची क्रेझ आहे.  दांडगा जनसंपर्क,  अभ्यास  करुन निर्णय घेण्याची क्षमता यामुळे  भैय्या  प्रत्येक गोष्टीत एकदम काटेकोर आहेत, नियोजनाच्या बाबतीत भैय्यांचा हात कुणीही धरणार नाही ,  माणसे जोडण्याची आवड प्रचंड असलेलं हे व्यक्तीमत्व.  मोहिते पाटील परिवाराचा अभेद्य गड आज जोमाने सांभाळत आहे.  भैय्यांनी ग्रामपंचाय,  पंचायत समिती व जिल्हा परिषद  या ठिकाणी काम करत असताना वेगळीच छाप जनमानसात सोडली आहे.  जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात  विजयदांदांची जागा रणजिदादांनी व बाळदादांची जागा धैर्यशील भैय्यांनी घेतलीय असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही .   समाजकारण व  राजकारण करतांना कष्ट घ्यायची तयारी व अभ्यास या दोन्हीमुळे भैय्या यश खेचून आणतात.  जनतेच्या प्रश्नावर कायम आवाज उठवण्याचे काम भैय्यांनी केले आहे ,  महावितरणने ऐन  अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन  कट करण्याचा धडाका लावला होता ,  सर्वप्रथम  भैय्यांनी  या सुलतानी वसुली विरुद्ध आवाज उठवला आणि अधिकार्यांना वटणीवर आणून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला .   दुष्काळात बंधारे भरुन घेण्यासाठी  लाक्षणिक उपोषण भैय्यांनी  केले .  भैय्यांनी शिवरत्न  शिक्षण संस्था व शिवामृत  दुध संघ या संस्था  अतिशय सचोटीने चालवल्या आहेत,  मुलां मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे  , त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून भैय्यांनी शिवरत्न पॅटर्न राबवला असून  ,  कित्येक विद्यार्थी / विद्यार्थीनींना  पुणे, मुंबई, लातुरच्या तोडीचे शिक्षण अकलूजला उपलब्ध झाले आहे . शिवामृत  दुध संघाने कात टाकली असून सभासद शेतकरी बांधवांना  चांगला दर मिळतो आहे आणि शिवामृत शॉपीच्या माध्यमातून रुचकर पदार्थ ग्राहकांना उपलब्ध होत आहेत व शिवामृत शॉपीच्या  बेरोजगार तरुणांना रोजगाराची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे .  अमॅझॉन सारख्या होम डिलिव्हरी सर्विसच्या माध्यमातून  ,  शिवामृतचे पदार्थ घरपोच मिळत आहेत. 
तालुक्यातील खेडोपाडी भैय्यांचा संपर्क अफलातून आहे . सगळे जयंती समारंभ, लग्न समारंभ,  आणि वैयक्तिक  सुख दुःखात भैय्या जनतेच्या भेटीगाठी घेत असतात, लोकांना धीर देतात.  कोरोनात भैय्यांनी असंख्य लोकांना मदत केली आहे .  त्यामुळे त्यांना बहुसंख्य लोक दयावानही म्हणतात,  लोकांसाठी सदैव उपलब्ध होणे आणि स्वतः लोकांच्या समस्या जाणून घेऊन समस्थ अधिकारी व कर्मचारी यांच्याशी  बोलून समस्या सोडवणे यामुळे गोरगरीबांना भैय्यांचा आधार वाटतो. सहकार महर्षी काकासाहेबांनी माणसे जोडण्याचा वारसा घालून दिला तोच वारसा भैय्यासाहेब समर्थपणे पुढे चालवला  आहे.  खेडोपाडी रस्ते ,  गावांसाठी नवनवीन योजना  कशा राबवता येतील यासाठी भैय्यासाहेब व रणजितदादा कायम संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना भेटून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणता येईल ते पहात असतात.  सगळ्या पक्षातील  सगळ्या नेत्यांचे संबंध मोहिते पाटील परिवारा बरोबर चांगले असल्याने कामे सहजपणे मार्गी लागत आहेत.  राजकारणात खूप लोक  शब्द पाळत नाहीत, खोटे बोलतात पण भैय्यासाहेब दिलेल्या शब्दाला पक्के आहेत. जे काम होणार आहे त्याची तड जागेवर लावण्याचे काम भैय्यासाहेब करत आहेत.
म्हणून भैय्यासाहेबांचे नेतृत्व मला विशेष भावते. . 
आज भैय्यासाहेब यांचा वाढदिवस. .  आमच्या साठी एक उत्साहाचा , आनंदाचा दिवस. . 
भैय्यासाहेब यशवंत व्हा !  किर्तीवंत व्हा  !  दीर्घायुषी व्हा हीच श्री शंभू महादेव व आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ! 
शुभेच्छुक. .  श्री विजय पिसाळ नातेपुते. .