vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण









नातेपुते येथे शिवजयंती उत्साहात साजरी . 

नातेपुते येथे शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून खर्या अर्थाने शिवरायांना विशिष्ट एका जाती पुरते मर्यादित ठेवण्याला विरोधक करणारी व शिवविचार सर्वांच्याच मनात रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न  करणारी म्हणून नातेपुते पंचकृषीत नावलौकिक असणारी  म्हणजेच,  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते* यांच्या वतीने मंगळवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी खास  निवृत्त लष्करी अधिकारी मेजर श्री हनुमंत माने,मेजर  श्री दाजी जानकर, मेजर सुरेश पांढरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले ! 
यातुन लष्करी सेवेत असताना  सर्व देशवासियांचे,  सिमेवर संरक्षण करणार्‍या जवानांना निवृत्ती नंतरही समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळावी या उदात्त हेतुने माजी सैनिकांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने शिवरायांचे  पुतळ्यांचे  पुजन करण्यात आले , 
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, आप्पासाहेब  भांड,  पत्रकार सुनिल राऊत, पत्रकार आनंद जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य   श्रीगणेश पागे व  समिर सोरटे ,शिक्षक  श्री संजय ढवळे, व बाबुराव जमाले  तसेच  सामाजिक कार्यकर्ते  एकनाथ ननवरे ,राहुल पदमन,कैलास सोनवणे,   करीम शेख, सुनिल ढोबळे , सागर बिचुकले ,रुपेश इंगोले, राहुल बोत्रे,  विजय डुबल,चंद्रशेखर शेटे, विवेक राऊत, गणेश ठोंबरे , धनंजय राऊत, रवि भंडारे  आदी मान्यवर  उपस्थित होते !
कार्यक्रमाची सांगता झाले  नंतर वेळात वेळ काढुन  माझी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच श्री धैर्यशील देशमुख,प्रा.  उत्तम सांवत यांनीही भेट देऊन प्रतिमा पुजन केले ,  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी !  शिवजयंती सोहळा समितीचे  प्रमुख. . . 
श्री विजय पिसाळ,
श्री संभाजी पवार,
श्री सतिष जाधव,  
अक्षय बावकर, 
ओकांर निकम, 
यांनी विशेष परिश्रम घेतले !


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

नातेपुते नगरीचे कर्तव्यदक्ष सपोनि श्री राजकुमार भुजबळ साहेब.

चालू घडामोडींचे विश्लेषण

नातेपुते नगरीचे कर्तव्य दक्ष सपोनि *मा श्री राजकुमार* यांनी नातेपुते गावचा सपोनि चा कार्यभार सांभाळल्यापासून, विविध गुन्हे उघडकीस आणले , त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर बर्यापैकी वचक बसवला ,बर्याच गुन्ह्याचा छडा तातडीने लावून संबधितांना न्याय मिळवून दिला ,  विशेष म्हणजे गावात होणारे सतत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नातेपुते नगरीतील नागरीकांचे सहकार्याने "गावातील सर्व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी" *सीसीटीव्ही कॅमेरे* बसवून अभिनव असा उपक्रम राबवला आणि त्यातून, मोटारसायकलचे  पेट्रोल चोरी असेल, मोटारसायकलींची  चोरी असेल, रोड रोमियोंचा  शाळा व कॉलेजमधील मुलींना होणारा त्रास असेल  हा बर्याच अंशी कमी झाला आहे .
 एसटी स्टँड व परिसरात होणार्‍या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली, साहेबांनी सीसीटीव्ही बसवल्यामुळे व बरेच  गुन्हे तात्काळ उघडकीस आले आहेत. याच बरोबर भुजबळ साहेब नातेपुते येथे रूजू झाले पासून गावातील शांतता व जातीय सलोखा अबाधित आहे व ति  टिकण्यास खूप मोठी भुमिका साहेबांनी पार पाडली आहे .  
कुणावरही कधीही कसलाही  अन्याय न करता नातेपुते हे पुर्णपणे शांततामय कसे राहिल व किरकोळ वाद कसे मिटतील व सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल हीच भुमिका भुजबळ साहेबांची नेहमी असते. गावातील सर्वांनाच सहकार्याची भुमिका साहेब घेतात, या सर्व गोष्टीमुळे *आदरणीय राजकुमार भुजबळ साहेबांना व नातेपुते पोलिस स्टेशनला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे* 
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या गुणांकन संकल्पनेनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे व पोलिस उपविभागाच्या कार्यालयाचे एकुण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारी २०१९ मध्ये नातेपुते पोलिस ठाणे व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे . 
या विशेष  गौरवा बद्दल  भुजबळ साहेबांचे  मनःपूर्वक  हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा . . . 
विजयकाका  पिसाळ नातेपुते

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

आता फक्त युद्ध करूया !

चालू घडामोडींचे विश्लेषण
संपुर्ण ब्लॉग वाचा व मगच प्रतिक्रिया द्या ! 

प्रत्येकाचे रक्त सळसळतंय,होय!  पाकिस्तानचा बदला घ्यायला हात शीवशीव करतात, मनात रागाचा कडेलोट होतोय, सगळे चॅनलवाले, पत्रकार व संपुर्ण देशप्रेमी हेच सांगत आहेत, 
युद्ध करावं माजलेल्या  पाकिस्तानला धडा शिकवावा , पाकव्याप्त  काश्मीर पासून सुरूवात करावी ते थेट , लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, अशी शहरं , एकामागून एक,  एका दिवसात बेचिराख करावीत, लाखो सैनिक घुसवून एका एका सैनिकाच्या बदल्यात किमान  हजार तरी मारावेत, 
रक्तपात करावा , 
सगळं पाकिस्तान जाळून टाकावं , बेचिराख करावं , नेस्तनाबूत करावं , जगाच्या नकाशावरून त्याचं निशाण  कायमचं मिटवावं ! 
हेच प्रत्येक भारतीयाला वाटतंय! पाकिस्तानचा रागच तितका आलाय,  
 वाटणं सहाजिकच आहे . पण हे करताना , कितीजण सैनिकांबरोबर जायला तयार आहेत, कितीजण कुटूंब घरदार, बायका -मुलं आई वडील सोडून युद्धभुमिवर जायला तयार आहेत, भारतमातेची सेवा करायला व जीवाची बाजी लावून जीवनाची आहुती द्यायला कोण कोण येणार आहे,  कितीजण, आजच्या पेक्षा दुप्पट टॅक्स भरायला तयार आहेत, कितीजण, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांची जबाबदारी घेणार आहेत, कितीजण, त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण, व पत्नीला आधार देणार आहेत! 
कितीजण, त्यांचे अश्रू पुसणार आहेत?  कितीजण आपल्या उत्पन्नातील किमान चवथा हिस्सा शहिदांच्या वारसांना द्यायला तयार आहेत, दहा रूपये  दान करताना ज्यांची फाटते ते नुसते फेसबुक व वॉटसपवर मोकळी अक्कल पाजळतात  , मला माहीत आहे बहुसंख्य भारतीय त्याग करतीलही पण, सगळेच  करतील का ?  याचे उत्तर इतिहासाची पाने चाळताना  पहावे लागेल  !  
पाकिस्तान बेचिराख करताना , तो नुसते शेपूट घालून पळून जाईल का ? 
त्यांचे १० मारताना आपलेही २ ते ३ जण शहीद होतील की नाही ?  याचा तरी कधी विचार केलाय का ? 
युध्दज्वर चढविणे व अंगात संचारणे  सहज शक्य होते पण युद्ध करणे हे विनाशाकडे घेऊन जाते, हे कधीतरी शहीद कुटुंबाचे वारसांना भेटा मग कळते , फुकटचे सल्ले देणारे,  प्रत्यक्षात सगळे नाही पण बरेच भेकड सुद्धा असतात, लेखनीला तरबेज असतात व वेळ आलीच तर  कडी लाऊन आत बसून अक्कल पाजळतात, कारण त्यांच्या घरचा कुणीच सीमेवर लढत नसतो, पाकिस्तानचे  युद्धात  समजा ४०लाख मारले तर किमान आपलेही १० लाख तरी शहीद होतील याचातरी विचार केलाय का ?  पानिपतची तेंव्हा लढाई झाली होती तर कित्येकजण युद्ध कैदी होऊन आजही पाकव्याप्त बलुचिस्तान मध्ये जगताना दिसतात, पहिल्या व दुसर्‍या महा यु़द्धाच्या कथा जरी इतिहासात वाचल्यातरी जगाचा विनाष युद्धामुळे होऊ शकतो, संपुर्ण मानवजात संपुष्टात येवू शकते कारण आता मोठे युद्ध कदाचित अणुबॉम्बचेही होऊ शकते , नालायक पाकिस्तान बरोबर युद्ध करत  असताना , त्यांच्या बाजूने चीन उतरला व आपल्या बाजूनेही , ब्रिटन  , अमेरिका , रशिया , उतरले व आपल्या पक्षाची सरसी होऊ लागली व त्यांनी पराभवाच्या भितीमुळे का होईना प्रथम  अणुबॉम्बचा  हल्ला केला तर व  आपली , दिल्ली , मुंबई, बेंगळुरू , कलकत्ता , अशी शहरं त्यांनी लक्ष केली तर कितीजणांना जीव गमवावा लागेल, किती कुटुंबे बेचिराख होतील हे नुसते मनात विचार करून बघा , किंकाळ्या , आरोळ्या  , विव्हळत पडलीली , जणावरे , माणसे , मुलं बाळं रक्त मासाचे सेडच्या सडे, पडलेली प्रेत तरी उचलायला माणसे राहतील का ? 
कारण आताचे युद्ध मुळात तलवारीचे राहिलेले नाही , टँक बारूद, अणुबॉम्ब व कितीतरी नरसंहारक घातक शस्त्रांचा वापर युद्धात होऊ शकतो , 
जैविक व रासायनिक हल्ले वेगळेच! 
समजा असा विचार करा की,  आपल्याच घरावर बाँब टागला गेला व आपलीच  लहान लहान मुलं , आईवडील व आपण त्याचे शिकार झालो तर काय होईल! हडा मासांच्या चिंध्या चिंंध्या झाल्यातर सोसेल का ? 
 व समजा आपणही अणुबॉम्ब टाकायला सुरूवात केली तर त्याचे जागतिक  काय परिणाम होतील, याचा तरी विचार केलाय का ? 
अणुबॉम्ब मुळे तसेही कुठलेच राष्ट्र दुबळे राहिले नाही . 
हो अतिरेकी संपवायलाच पाहिजेत पण त्यासाठी योग्य मार्ग निवडवा लागेल, मुसद्दी पणाने छुपे लढावे लागेल, हो त्यासाठी आपल्या यंत्रणा बळकट कराव्या लागतील, 
दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे . . .
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र यायची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून शिक्षण दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसताव लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्याच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच   वार्तांकन करता आले नाही पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाणे , बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायला पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. 
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

दहशतवाद संपवणे शक्य आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण



दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे ! 
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र येण्याची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून राष्ट्रीय शिक्षण  दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसता, लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्यांच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच वार्तांकन करता आले  पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाने व बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायलाच पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. काही
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घेण्याची निर्णायक वेळ आली आहे !* 
पुर्ण वाचा व जास्तीत जास्त शेअर करा . . . . 
विजय पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून. . . 
आदरणीय विजयसिंह मोहिते -पाटील तथा दादासाहेब आपणांस नम्र विनंती की , मोठ्या मनाने पवार साहेबांना माढा लोकसभेला उभे राहण्याची ऑफर दिली .(ति त्यांनी तात्काळ नाकारायला हवी होती पण तेही लगेच तयारी दाखवू राहिले ) तुमचे प्रेम साहेबांवर आहे हे आम्हालाही माहिती आहे पण आजवरच्या साहेबांच्या तुमच्या  बाबतीतील  अनुभवाने माझ्या सारखे तुमचे लाखो चाहते , अनुयायी व्यतीत व निराश झाले आहेत. जे काय राष्ट्रवादी पक्षात  चालू आहे त्यामुळे पराकोटीचे दुःख आम्हाला झाले आहे . आदरणीय पवार साहेब पंतप्रधान व्हावेत जसे  तुम्हाला मनोमन  वाटते तसेच सर्वांनाच वाटते , त्यांचे शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील काम सुद्धा चांगलेच आहे या बद्दल दुमत असायचे कारण नाही ,  पण त्यांच्यावर मनापासून आपण प्रेम करून सुद्धा , निष्ठा ठेवून सुद्धा  त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सुद्धा ,  त्यांनी सातत्याने आपल्याला सापत्नतेचीच  वागणूक दिली  ही सल आमच्या मनात लसलसते आहे  एक काळ असा होता की, संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मुख्यमंत्री व साहेबांना पंतप्रधान बघण्यासाठी आतुर झाली होती पण साहेबांना त्यांच्या कर्माने (विश्वासाती स्वभावामुळेच ) पंतप्रधान पद मिळाले नाही व तेंव्हा  काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त येवूनही केवळ तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केले हा इतिहास आहे  .सातत्याने  तुमचा पक्षातील आवाज दाबण्याचे  काम केले गेले ,  महत्वाची खाती काढून तुलनेने दुय्यम खाती दिली गेली  पण तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे तुम्ही  ग्रामविकासा सारख्या दुय्यम खात्यालाही मोठे करायचे काम  केले , ग्रामविकास मंत्री म्हणून जोरदार ठसा उमटवला , तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या निष्ठावंत आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्यांना विविध प्रलोभने  दाखवून  व विविध क्लृप्त्या लढवून तुमच्या पासून दुर करायचे काम केले . २००९ ला पंढरपूर मधून तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला मुद्दामहून तिथून उभे केले व तुमच्या पराभवाची तजवीज केली गेली  आणि परिचारक व तुमच्यात कायमचा दुरावा निर्माण केला , त्या अगोदच तुम्ही त्यांना  मोठ्या मनापासून  २००९ला  माढ्यातून लोकसभेवर निवडून दिले पण तरीही त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही व त्यांच्या ताकदीचा व शब्दाचा मतदार संघातील विकासकामासाठी म्हणावा तसाव उपयोग केला नाही, पाठपुरावा केला नाही  , पंढरपूरच्या पराभवा नंतर तातडीने तुमचे पुनर्वसन करणे अपेक्षित होते , पण त्यासाठी सुद्धा दोन वर्षे ताटकळत ठेवले  व नंतर राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली आणि  परत मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही , तुमच्या पक्षातील विरोधकांना सातत्याने बळ दिले, तरीही  आम्हाला  वाटायचे राजकारणात कमीजास्त चालते आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, रणजितदादांना कुठेतरी सामावून घेतले जाईल पण तसे झाले नाही , साहेबांना  त्यांच्या मुलीची  , पुतण्याची व आता नातुचीच जास्त काळजी आहे पण ते करताना दुसर्‍याचे किती वाटोळे करावे याचेही भान राहिलेले नाही , पक्षीय राजकारणात गट तट हे असतात ते सगळ्यात पक्षात दिसून येतात पण इतर पक्षांचे पक्ष प्रमुख किंवा अध्यक्ष सर्व गटातटांना सामावून घेताना गटबाजी वाढणार नाही याचीही दक्षता घेतात, हे मात्र माजी सनदी अधिकारी व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनाच पुढे करून तुमच्या पायात साप सोडायचे काम करतात,  हो इथे मात्र साहेब किंवा अजितदादा गटबाजीला खतपाणी घालतात जेष्ठ सहकार्याला आव्हान उभे करतात व  सहकार्याचाच  , स्वतःच कसा पराभव होईल हे पाहतात हो हे फक्त राष्ट्रवादीतच होत आहे . त्यामुळे आमच्या सारखे हजारो लाखो कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. 
दादासाहेब आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते तुमच्यावरील अन्यायाने खिन्न झालोय, व्यतीत झालोय, राजकारणात जर आपलाच नेता आपले खच्चीकरण करत असेल तर आपण का या पक्षात रहावे ! हीच वेळ आहे बंड करायची , स्वाभिमानी जनता व लाखो तुमचे चाहते , कार्यकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पहात आहेत, जनतेत फिरताना आम्हाला त्याची प्रचिती येत आहे , हो दादासाहेब आता काहीही होवो पण आर या पार होऊद्या त्यांनी आपल्याला सातत्याने अपशकुन केलाय आपण आता करा ही लोकांची भावना  आहे . हो  हीच वेळ आहे कि आता त्यांनाही आपली किंमत दाखवून देण्याची हीच वेळ आहे बंड करून उठण्याची , दादासाहेब "अभी नही तो, कभी नही " हो आजही वाटते मनोमन वाटतेय साहेब पंतप्रधान व्हावेत. 
पण सुप्रियाताईंनी वडीलांसाठी जरा थांबायला काय हरकत आहे ! त्यागाचा मक्ता फक्त आपणच घेतलाय का ? 
  साहेबांनी शिरूर, मावळ याठिकाणी प्रचंड कामे केली आहेत की, तिथून लढावे येथील ना ते निवडून तिथे तिथून पळ काढून इकडे कशासाठी त्यांचा डोळा ! नातुची काळजी लागलीय का ?  पार्थदादाचे तरी कुठे अजून वय झालेय? 
दादासाहेब तुम्ही आम्हाला सांगताय साहेबांना आपण आमंत्रण दिलंय, निवडून आणायची जबाबदारी आपली आहे , पण दादासाहेब त्यांनी कधी आपल्यासाठी त्याग केलाय का ? त्यांनी कधी आपल्याला बारामतीतून उभे रहायची ऑफर केलीय का ? प्रेम हे निःस्वार्थी व निस्सीम असायला हवे मात्र ते कधीच एकतर्फी असता कामा नये ! 
२००९ च्या आपल्या पंढरपूरातील  पराभवाच्या जखमा आजही आमच्या अंगातून  भळभळून वहात आहेत, साहेब माढ्यातून नक्कीच माघार घेतील मात्र ते जर जनमताचा कौल न जाणता  उभे  राहिलेच  तर मात्र बहुसंख्य कार्यकर्ते तुमचेही ऐकायच्या मनस्थितीत राहणार  नाहीत हे जनतेत फिरताना आम्हाला पदोपदी जाणवते , हा लेख मि माझ्या मनाने नव्हे तर जनतेच्या असणाऱ्या प्रतिक्रिया तुम्हाला कळाव्या म्हणून लिहलाय, जनता म्हणते  पंढरपूरच्या विजयदादांच्या  पराभवाचे उट्टे काढायची संधी आली तर, घेऊ साधून! 
असंख्य कार्यकर्ते संधीच शोधत आहेत व साहेब उभे राहिलेच तर ति त्यांना आपोआपच मिळण्याची शक्यता आहे .
विजय पिसाळ नातेपुते !

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पवार साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे! ही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे ! फक्त माढ्याचा आग्रह कशासाठी करताय तेच कळेना !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय, पवार साहेब लोकसभेवर जाण्यासाठी  अट्टाहास करायला हवाच का ?  
तुम्हाला जरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व बाकीच्या सर्व  सहकार्यांनी माढ्यातून लढायचा आग्रह केला असला तरीदेखील तुम्ही विनम्र नकार द्यायला पाहिजे ! असे जनतेला वाटते , साहेब 
आज प्रत्येक पक्षात व प्रत्येक मतदारसंघात कुरबुरी असतातच, तशा राष्ट्रवादीतही आहेत,  उदयनराजे , धनंजय महाडिक, यांच्याही मतदारसंघात किरकोळ कुरबुरी होत्या व आहेत!  त्या कुरबुरी तुम्ही मिटवताच की , खरेतर तुमच्या शब्दा बाहेर कुणीच नाही ,  उलट तुम्ही वडीलकीच्या नात्याने सर्वांना ठणकावले पाहिजे व सांगितले पाहिजे की , पक्षाचा निर्णय प्रत्येकाने मान्य करावा नाहीतर तुमची गय केली जाणार नाही . जे ग्रामपंचायतीला कधी निवडून आले नाहीत असे लोक  केवळ पैसा आहे म्हणून उमेदवार म्हणून इच्छुक होतात, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करतात. याला खरंच खतपाणी घालायची गरज नाही ! पण खतपाणी घातले जातेय, साहेब तुम्ही कोणत्याही सभागृहात असला तरी संधी असेल तर नक्कीच पंतप्रधान व्हाल त्यासाठी माढ्यात उभेच रहायची गरज नाही . 
साहेब जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे व तुम्हीही जनतेची अविरत सेवा केली आहे त्यामुळे आता मनमोहनसिंग यांचे सारखे राज्यसभेवर राहून मार्गदर्शन करत रहायला पाहिजे असे वाटते ,  आपल्या जुन्या  सहकार्यांना व  पक्षाच्या कामात झोकून देणार्‍यांना संधी द्यायला पाहिजे पण होतय उलटंच? कधीच पक्षाचे काम न केलेले उमेदवारी काय मागतात पेच काय निर्माण होतो ! 
यातून साध्य काय होतंय? जनतेमध्ये  
फक्त पक्षाची नाचक्की होतेय! आज  मिडीयात  संपुर्ण पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत असा प्रचार होतोय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देणे कठीण होत  असताना ,  सामान्य  जनतेला काय वाटेल याचा तरी तुमच्या सारख्या मुरब्बी व्यक्तीमत्वाला कळायला हवे ! 
तुम्ही  विचार करायला हवा . 
लोकात चर्चा होतेय, 
तुम्ही सध्या राज्यसभेवर आहातच, अजितदादा व सुप्रियाताई सुद्धा विधिसभा व लोकसभेवर आहेत आणि रोहितदादा पण सध्या जिप सदस्य आहेत पार्थदादाची पण चर्चा आहे मग राष्ट्रवादी पक्ष केवळ पवार कुटुंबा पुरता मर्यादित आहे का ? की पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. . अशी चर्चा बरी नव्हे ! 
तुम्ही आजवर मोठ्या मान सन्मानाने सर्व निवडनुका जिंकल्या आहेत  पण यावेळची माढा लोकसभेची निवडणूक  तितक्याच फरकाने तुम्ही जिंकाल अशी शक्यता कमी वाटते ,  कारण २००९ व आत्ताची परिस्तिथी खूप  विभिन्न आहे, भाजपाची बांधनी तळागाळात पोहचलीय  व वंचित बहुजन आघाडीमुळे   दलित व मुस्लीम मतांची विभागणी अटळ आहे ,  या तोट्याच्या बाजुंचाही विचार करायला हवा . माळशिरस तालुक्यात  विजयदादा तुमचेच काम करतील हे नक्की आहे.  कारण दादांच्या स्वभावात आतुन एक करायचे  व वरून दुसरे करायचे  असे नसते पण  समजा  जरी विजयसिंह दादांनी तुमचे मनापासून काम केले तरीदेखील जनतेच्या मनात एक सुप्त अन्यायाची भावना तयार होत  आहे, राष्ट्रवादी पक्ष दादांवर अन्याय करतोय, त्यांचे जाणिवपुर्वक खच्चीकरण केले जातेय, त्यांना डावलले जातेय व ही सुप्त भावना  मतपेटीतून व्यक्त झाली तर राष्ट्रवादीचे  मताधिक्य कमालीचे घटू शकते . 
साहेब तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे , अभ्यास दांडगा आहे तुमच्या बुद्धीमत्तेला व स्मरणशक्तीला तोड नाही पण तुम्ही सध्या माढ्यात उभे रहायचा चुकीचा विचार करताय! खरेतर  तुम्ही सहकार्यांना मोठे करा आणि निवडणूक लढवायची असेलच तर  नक्कीच  बारामतीमधुन उभे रहा .पण माढ्यातून नका उभे राहु आपल्याच पक्षातील  काहीजण विजयसिंह दादांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून तुम्हाला आग्रह धरतील पण त्यातील एक दोन सोडले तर जनाधार नसलेले बहुतेक आहेत. त्यांचे ऐकु नका  त्या ऐकु नका ! 
 तुम्ही प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार द्या व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या    किमान १५ खासदारांचे बळ घेऊन दिल्लीत जावा  नक्कीच तुमची मान खूप उंचावली जाईल, जुने जानते सहकारी बरोबर घ्या काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे नवीन रक्तालाही संधी द्या मात्र माढ्यातुन स्वतः विजयदादांनी काहीही म्हटले तरी त्यांनाच तिकिट द्या कानफुक्या लोकांचे जास्त ऐकु नका , 
कोल्हापुर मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनाही डावलल्या नंतर जि सहानुभूती त्यांना मिळाली तशी सहानुभूती विजयदादांना आहे , जरी दादांनी बंडखोरी केली नाही, तुमचेच प्रामाणिक काम केले  तरीदेखील वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटील या नावावर प्रेम करणारा वर्ग दुखावला जाणार व तो भाजपाच्या वळचणीला जाणार मग साध्य काय होणार!  तुमचे मताधिक्य घटले तर काही कानफुके परत म्हणणार की विजयदादांनी तुमचे काम केले नाही , माढा गढ शाबूत राहिला पाहिजे व तुम्हीही देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे म्हणून तुम्ही शक्यतो राज्यसभा हाच पर्याय निवडा किंवा बारामतीमधुन लढा , सुप्रियाताईंना राज्यसभा पर्याय ठेवा मात्र माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील हेच पक्षाला तारक राहतील हे नक्की वाटते !
विजय पिसाळ नातेपुते

माढा मतदारसंघातील जनमताचा घेतलेला कानोसा !


नक्कीच वाचा. . . 
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . . 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . 
सामान्य मतदार म्हणतात. . 
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये , 
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही ! 
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल? 
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले ! 
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही . 
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही , 
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल! 
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात, 
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ? 
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ? 
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी , 
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक, 
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे, 
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे ! 
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा ! 
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका , 
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा ! 
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही ! 
पवार साहेब 
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!


सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न! 
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा ! 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

माढा मतदारसंघातून जाणून घेतलेला लोकांचा कल!

चालू घडामोडींचे विश्लेषण. . . .
नक्कीच वाचा. . .
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते .
सामान्य मतदार म्हणतात. .
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये ,
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही !
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल?
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले !
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही .
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही ,
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल!
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात,
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ?
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ?
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी ,
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक,
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे,
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे !
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा !
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका ,
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा !
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही !
पवार साहेब
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!


सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न!
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा !
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !