vijaypisal49. blogspot. com

रविवार, १२ मे, २०१९

झाडे वाचली तरच आपण वाचणार!

चालू घडामोडींचे विश्लेषण





























वृक्ष संवर्धना शिवाय. . . . निसर्गाचा समतोल कठीणच. . . . . 
©® लेखन. .    विजय पिसाळ नातेपुते . . . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

आज जिकडे तिकडे प्रचंड उकाडा , तापमान वाढ आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे  पाऊसमान, यामुळे वारंवार  पडणारा दुष्काळ या दुष्टचक्रात भारत देशातील ७० %भाग आडकला आहे ! 
"डोंगर उजाड झाले , पाऊसमान संपून गेले" 
ही अवस्था आज जवळ जवळ ७० %भारत देशाची झाली आहे . . 
दरवर्षी करोडोंचा खर्च वृक्ष लागवडीसाठी व देशातील विविध भागातील दुष्काळ निवारणासाठी केला जातो . . पण दुष्काळ व तापमानवाढ ही समस्या तशीच राहते आहे . . . देशातील किंवा राज्यातील  सरकार कोणतेही असो सुदैवाने  वृक्ष लागवड  तर केली जाते मात्र  दुर्दैवाने  लावलेले वृक्ष संवर्धन करण्यासाठी ना सरकारला अस्था असते ना सामाजिक स्थरावरील लोक पुढाकार घेतात. . मुळातच देशातील नागरीकांना प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे वाटते ! जनसहभाग नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होत नाही . . 
आज अनैसर्गिक पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने  ओढे नाले साफसफाई केली जातेय तोच गाळ कडेला टाकला जातोय व तोच गाळ परत ओढ्यात येतोय,  जमिनीवर चर खोदून सुपीक जमिनीत पाणी मुरवण्याचा अयशस्वी प्रयोग केला जातोय, मुळात जमिन खोदून माती काढून तिची प्रचंड प्रमाणात धूप केली जातेय व तिच माती ओढे व धरणे यात परत येऊन साचतेय व ओढे आणि धरणे गाळाने भरत आहेत,  मुळात नैसर्गिक ओढे व त्यातील वाळूच जर उपसली गेली तर पाणी जमिनीत मुरणार कसे !  वाळू  उपसून ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले गेल्यावर वाळूच नष्ट होणार व  यात वाळू  नष्ट झाल्यामुळे बंधार्यात फक्त  पावसाळ्या मध्ये  मुबलक दिसते , छानपैकी फोटो काढले जातात पण ते पाणी मात्र टिकत नाही ! त्याचे प्रचंड  बाष्पीभवन होऊन ते पाणी  संपुष्टात येते व परत दुष्काळ मात्र पाचवीला आहेच! 
या साठी निसर्ग नियमानुसार ओढ्यात व नद्यात वाळू आवश्यक आहे व त्याचा उपसा सुद्धा नियंत्रणात गरजेनुसार व्हायला हवा !     मुळात जलतज्ज्ञ , डॉ राजेंद्रसिंह, समाजसेवक  अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी जे पॅटर्न राबले ते खूप महत्वाचे होते व आहेत! त्यात 
चराई बंदी, कु-हाड बंदी करणे व  यातून वृक्ष आणि  जंगलाचे संरक्षण आवश्यक आहे .
पडणारे पाणी झाडामुळे तर जमिनीत मुरतेच पण  साखळी बंधारे ,,नाला बंडीग,  कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व लघू प्रकल्पच  यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब आडवला जाऊन  दुष्काळ हटवता येऊ शकतो  व डोंगराळ भागात याला भरपूर स्कोप आहे पण मुळात, कोणत्यातरी शासकीय अधिकार्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना राबवून दुष्काळ हटवण्याचे प्रयोग केले जात आहेत. . त्याचाच एक नमुना म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने चालू असलेले जलयुक्त शिवार अभियान. . . यात ठेकेदार, ट्रॅक्टर मालक व जेसीबी मालक हे आणि अधिकारी मालामाल झाले पण पाणी पातळी पावसाळा सोडला तर जैसे थे ! 
मुळात जल संवर्धन हे जंगल संवर्धनावर अवलंबून आहे .  जंगल नसेल तर पाऊस पडणार नाही व पाणीच पडले नाही तर वॉटरकप काय? जययुक्त शिवार काय? नुसता उलटा कार्यक्रम होणार हे नक्की ! 
आज कित्येक ठिकाणी झाडाची अनियंत्रित कत्तल चालू आहे . वनसंरक्षक व वनअधिकारी हे समाजातील गाव गुंड व सरपन आणि झाडांची तस्करी करणारे  संबधित लोकामुळे हतबल झालेले आहेत. 
काही ठिकाणी तर वनसंरक्षक व वनअधिकारी यांचे आशीर्वादानेच संरक्षित वनांची कत्तल होत आहे. 
कागदोपत्री वृक्ष लागवडीचे करोडोंचे आकडे दरवर्षी प्रसिद्ध होतात मात्र लावलेली झाडे किती वाचवली जातात हा खरा  मुख्य   संशोधनाचा  विषय आहे . . . 
वाढते शहरीकरण व रस्त्यासाठी , कित्येक डोंगर आणि झाडे भुईसपाट करावी लागत आहेत पण त्याची भरपाई इतर ठिकाणी झाडे लावून व ति  मोठी करून केली जात नाही . . 
डोंगररांगा जर गच्च झाडांनी वेलींनी वेढल्या व डोंगरांना जाणीव पुर्वक आगी लावायचे बंद झाले नाही तर मात्र सर्व कठीण आहे . . 
आज काही नालायक लोक बीडी सिगारेट ओढून पेटती काडी व सिगारेट बीडी रस्त्यावर किंवा डोंगरावर टाकतात व क्षणात ते ठिकाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडते . . . या बिडी व सिगारेटला पायबंद कोण घालणार! 
काही दारूडे जंगलात जाऊन दारू पितात व दारूनंतर तिथेच बीडी सिगारेट व मटणाच्या पार्ट्या करून आग न विझवता तसेच नशेत येतात त्यानेच जंगलांना आगी लागलेल्या दिसून येते ! 
सांगायचा मुद्दा हाच आहे की, 
त्याला पायबंद घातला पाहिजे ! 
यापुढे सरकारने 
 शेतकर्यांना सुद्धा  उपयुक्त  आणि निसर्गासाठी  आंबा , चिक्कू, चिंच, आवळा , कळक(बांबू ) ही बांधावर व कंपल्सरी कायदा करून झाडे लावायला लावली पाहिजेत त्याला काही वर्षे अनुदान दिले पाहिजे . वनजमीनीवर झाडांचे संवर्धन करण्यासाठी , तलाठी , ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, कृषी सहाय्यक  व सामाजिक संस्था आणि होतकरू तरूणांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबवून झाडे लावा व त्याचे संवर्धन करा हा उपक्रम हाती घेतला पाहिजे . . 
नुसती दरवर्षी झाडे लावून व ति जळून जाऊन तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन हे रोखले जाऊ शकत नाही . 
त्यासाठी झाडे मर्यादित लावावीत मात्र ति किमान ८०%जगावीत तरच काहीतरी साध्य होईल! 
संपुर्ण देशात व राज्यात संपुर्ण वनक्षेत्रात कु-हाड बंदीची अंमलबजावणी १००%व्हायला पाहिजे ! 
आज रस्त्याच्या कडेचे लिंब, चिंच, वड, आंबे,  सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या चार्यासाठी तोडले जात आहेत. . 
त्यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही .
म्हणून सरकार आणि समाजातील जागृत घटकांनी पुढे आले पाहिजे . . . 
प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक गावाला झाडे जगवण्याचे टार्गेट दिले पाहिजे व त्यावरूनच त्याला अनुदान सुद्धा निश्चित केले गेले पाहिजे ! 
व त्या झाडांचे अॉडीट केले पाहिजे तरच संपुर्ण भारत व आपले राज्य दुष्काळ मुक्त होईल! 
लेखक. . विजय पिसाळ नातेपुते ©®९४२३६१३४४९/९६६५९३६९६९