vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २८ मे, २०१९

मोदी तरी बहुमत मिळाल्याने ३७० कलम रद्द करतील का ? मोदीजी लोकांनी तुम्हाला दुसर्‍यांदा जबरदस्त बहुमत दिल्यामुळे काश्मीरचा प्रश्न निकाली निघेल का ? काश्मीर पुर्णपणे शांत होऊन तिथल्या लोकांना सुखाची झोप मिळेल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
काश्मीरचे गोड सौंदर्य वाचले पाहिजे व काश्मीर भारताच्या इतर राज्या प्रमाणेच एक राज्य असायला हवे ! म्हणून हा लेख. . . . 


*कलम ३७०*
रद्द करण्यासाठी मोदी सरकार पावले उचलेल का ? 

१९४७ साली ब्रिटिशांनी भारत सोडताना अखंड हिंदुस्थानचे तुकडे तुकडे केले , हिंदुस्थानची फाळणी होऊन तेंव्हा   भारत व  पाकिस्तान असे  मोठे देश निर्माण करतानाच ब्रिटीशांनी , काही ठिकाणी संस्थानिकांनाही स्वतंत्र राज्य व भूभाग दिले व त्यांनी कुठे सामील व्हावे किंवा स्वतंत्र रहावे हा निर्णय त्यांचेवर सोपवला उदा. हैद्राबाद, जम्मू काश्मीर, गोवा वगैरे . . . फाळणीच्या वेळी जम्मू काश्मीरच्या राजाने व संस्थानिकाने स्वतंत्र राहायचा म्हणजे भारत किंवा पाकिस्तान यांच्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, तिथला राजा जरी हिंदू होता तरी बहुसंख्य प्रजा ही मुस्लीम होती . . 
याचाच फायदा घेऊन जम्मू  काश्मीरवर पाकिस्तानने व पिश्तुन टोळ्यांनी  आक्रमण केले (तेंव्हा भारत व जम्मू काश्मीरला जोडणारा महामार्ग अस्तित्वात नव्हता हे बर्याच लोकांना माहिती नाही , नंतर तो नेहरूंनी बनवला !) डोंगरी रस्ते व पाऊलवाटा यानेच त्या खोर्यात खेचरावरून प्रवास करावा लागे . 
तिथला राजा हरिसिंग  पाकिस्तानी बंडखोरांचा व पाकिस्तान बंडखोरांच्या वेशातील  सैन्याचा प्रतिकार करू शकत नव्हता त्यांनी जम्मू काश्मीरवर अक्रमनाचा सपाटा लावला होता   व राजा हरिसिंगाचा जवळजवळ पराभव झालाच असता म्हणून त्याने पाकिस्तानी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताकडे म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याकडे मदत मागितली तेंव्हा जम्मू काश्मीर हा स्वायत्त प्रदेश असल्याने व आपलाही डायरेक्ट अधिकार नसल्याने तिथल्या राजाला आपण डायरेक्ट मदत करू शकत नव्हतो . मात्र नेहरूंनी सरदार पटेल यांचे मार्फत  राजा हरीसिंह यांच्या पुढे भारतात जम्मू काश्मीर सामील करण्याची व त्या बदल्यात पाकिस्तानी आक्रमण परतवून लावण्याची अट ठेवली . . पण शेख अब्दुला व तेथील जनतेने व 
राजा हरिसिंगाने भारतात सामील होण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवल्या . . 
त्यात जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा, संरक्षणाची हमी , स्वतंत्र ध्वज व दुहेरी नागरिकत्व, व काही विशेष मौलिक अधिकार की ज्या अधिकारामुळे इतर राज्यातील  भारतीय नागरिक त्या ठिकाणी जमिन खरेदी करू शकत नाहीत, निवडणूक लढवू शकत नाहीत व राज्यसेवा मध्ये नौकरी करू शकत नाहीत.  त्याठिकाणच्या मुलाशी भारताच्या इतर भागातील मुलीने जरी लग्न केले तरीदेखील डायरेक्ट तिला अधिकार नसतो , जम्मू काश्मीरचा नागरीक संपुर्ण देशात प्रॉपर्टी घेऊ शकतो मात्र तिथल्या मुलींने भारताच्या कोणत्याही भागातील मुलांशी विवाह केला तरीदेखील तिच्या माहेरच्या प्रॉपर्टीत तिचा लग्ना नंतर हक्क राहात नाही  व मुलालाही हक्क मिळत नाही. ( पण २०११ ला कोर्टाने हा निर्णय बदलला आहे ) यांचा समावेश होता . व या सर्व अटी भारतीय राज्यघटना कलम ३७० मध्ये समाविष्ट करूनच त्याने भारतात सामील होण्याचे कबुल केले . . 
त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता ताकद मर्यादित होती , आंतरराष्ट्रीय परिस्तिथी भारताला पाहिजे तेवढी अनुकूल नव्हती , ब्रिटन, फ्रान्स, अमेरीका अशी बलाढ्य राष्ट्र भारताच्या जवळ जवळ विरोधात होती म्हणून कोणत्याही परिस्थितीत जम्मू काश्मीर पाकिस्तानच्या घषात जाऊ नये म्हणून नेहरूंनी राजा हरिसिंग यांच्या अटी मान्य करून सामीलीकरणाच्या करारावर सरदार पटेल यांचे मार्फत  सह्या केल्या आणि ३७० कलम अस्तित्वात आले . . 
राजा आपल्या आश्रयाला येताच भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी आक्रमण परतवून  लावण्यासाठी प्रतिअक्रमण केले व भारत पाकिस्तानचे पहिले युद्ध सुरू झाले . त्यावेळी पाकिस्तानवर आपण विजय जरूर मिळवला , मात्र आपण युनोत गेलो व मध्यस्थिची मागणी केली मात्र  पाकिस्तानने युनोत तेथील जनतेचे सार्वमत घ्यावे व मगच  भारताचा जम्मू काश्मीर वरील हक्क मान्य करावा . आंतरराष्ट्रीय दबावामुळे आपण पाकिस्तानाचा  संपुर्ण पराभव करून सुद्धा ३३% काश्मीरचा भूभाग सोडवून घेता आला नाही . . कारण तेंव्हा युनोत भारताचा मुद्दा कोणीही ऐकून घेऊ शकत नव्हते . . कारण पाकिस्तान तेथील जनतेचे सार्वमत घ्या म्हणत होता व तेथील प्रजा मुस्लीम असल्याने भारताला सार्वमत घेऊन तेथील जनता भारतात सामील होईल याची खात्री नव्हती , म्हणून भारताने राजा हरिसिंग बरोबर झालेला करार समोर करून पाकिस्तानची जनतेच्या सार्वमताची मागणी फेटाळून किंवा सार्वमत घेण्यासाठी तेथील परिस्तिथी अनुकूल नाही असे सांगून सातत्याने टाळाटाळ केली . व ति मागणी सातत्याने फेटाळून  लावली . . पण त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानच्या ताब्यात तो ३३़%भूभाग तसाच राहिला . . आणि त्याचे खापर मात्र विरोधकांनी कायमस्वरुपी नेहरूवर फोडायचे काम केले . . त्या त्या परिस्तिथीत नेहरूंना तेच करण्या शिवाय पर्याय नव्हता . . 
पण १९७१ नंतर हळुहळू  आता भारत मजबूत होत गेलाय परिस्तिथी पालटली आहे  याचा विचार करता . व आपल्याला ३७० रद्द केले तरीदेखील कुणीच काही करू शकत नाही अशी परिस्थिती असल्याने . . . हे शक्य आहे कारण, 
* देश आपला , राज्य    राज्य, सत्ता आपली , तिथे कब्जा  आपला  , मिलिटरी  आपली  , हे सर्व असताना कुणाला घाबरायची गरज नाही व तेंव्हाची आंतरराष्ट्रीय  परिस्तिथी बदलली असल्याने व भाजपाचे केंद्रात  मजबूत बहुमत असलेले सरकार सत्तेवर आल्यामुळे व महत्वाचे म्हणजे भाजपाचा तोच अजेंडा असल्याने  कलम  ३७० रद्द व्हावे व कायमचा हा प्रश्न निकालात निघावा ही जन भावना आहे . . 
अमेरीका जा प्रमाणे त्यांच्या देशाला जे आवश्यक वाटेल त्या प्रमाणे आंतरराष्ट्रीय दबावाला , आंतरराष्ट्रीय, न्यायालयाला भिक न घालता पाहिजे ते कठोर निर्णय घेते तसाच आता  ३७० कलम आपल्या देशाचा आंतर्गत प्रश्न आहे व त्यात कुणाचाही हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही हे जगाला ठणकावून सांगायची वेळ आली आहे व तेवढी नक्कीच ताकद भारताची आहे व त्यासाठी कणखर बहुमत सरकार जवळ आहे . व संसदेतही निर्णायक बहुमत असल्याने हा प्रश्न निकालात निघाला पाहिजे . . . 
काश्मीर ते कन्याकुमारी संपुर्ण देशातील राज्यांना एकच ध्वज, एकच अधिकार, एकच घटना , इतर राज्यात व जम्मू काश्मीर मध्ये सर्व कायदे समसमान व्हायला पाहिजेत! 
म्हणून आता ३७० कलम रद्द झालेच पाहिजे ही देशवासीयांची प्रखर इच्छा आहे . . 
त्यासाठी संपुर्ण देश मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल! 

विजय पिसाळ नातेपुते

शुक्रवार, २४ मे, २०१९

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत का झाली याचा घेतलेला आढावा ! आतातरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आत्मपरिक्षण करेल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  महाराष्ट्रात पराभूत का झाली याची काही कारणे मतदारात जावून शोधली तर पुढील गोष्टी लक्षात येतात. !
केवळ मोदी फॅक्टर मुळे नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या चुका दुरुस्त न केल्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी  लोकसभा २०१९ ला पराभव स्वीकारावा लागला आहे . .
त्याची कारणे . . .
काँग्रेस व राष्ट्रवादीत  नव नेतृत्वाचा अभाव. . .
प्रत्येक पदे ,प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपल्याच घरात ठेवण्याचा केलेला वारंवार प्रयत्न, यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते यांची भावना आपल्याला काँग्रेस व राष्ट्रवादीत    राहून काय भवितव्य म्हणून भाजपा सेनेकडे आकर्षित होताना दिसतात.
प्रचार व प्रसार व जाहिरात   यातील  प्रभावी मुद्यांचा अभाव व  कमजोरी!
आपल्या पेक्षा कोणी वरचढ नको म्हणून   अशोक चव्हाण  व अजितदादा  पवार यांची आपआपल्या पक्षातील नेत्यांनाच संपवण्याची  आखलेली  रणनिती !
पक्ष वाढवण्या ऐवजी एकोपा साधण्या ऐवजी  या लोकांनी आपल्याच पक्षात एकमेकांची जिरवण्यासाठी गटबाजीला दिलेले बळ व ही गटबाजीच त्यांना घातक ठरलेली आज दिसत आहे .
विविध सत्तास्थाने हातात  असतानाही पवार साहेब व सुप्रिया ताई सोडल्या तर बाकीचे पदाधिकारी  , लोकांचे प्रश्न तातडीने न सोडवता , केवळ पदाला चिकटून राहिलेले दिसले! प्रत्येक मतदारसंघात कामा ऐवजी
जात व धर्म बघून उमेदवारी लादने !
पक्षात कसलेही योगदान नसणार्या नवख्या उमेदवारांना केवळ घराणेशाहीच्या माध्यमातून लादने ,
पुण्याची जागा व नगरची जागा सामंजस्य दाखवून  आदलाबदल न करणे  !
केवळ आम्हाला इतक्या सीट हव्यात हा अट्टाहास धरून बसने, औरंगाबाद व पुणे  राष्ट्रवादीला सोडणे अपेक्षित होते .
गेल्या पाच वर्षात नारायण राणे , छत्रपती संभाजी राजे, मोहिते पाटील व विखे पाटील यांचे काँग्रेस व राष्ट्रवादीतूनच   पक्षातूनच खच्चीकरण करणे ,
माढ्यात केवळ मोहिते पाटील यांना त्रास देण्यासाठी म्हणून,
संजय शिंदे व त्यांचे बंधू यांनी पक्ष विरोधी भूमिका घेऊनही त्यांना अभय देणे , ज्या संजय शिंदे व दिपक साळुंखे मुळे पक्षाची वाट लागली त्यांनाच झुकते माप देणे . .
जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांना संपवण्यासाठी पक्षातूनच मोहीम राबवणे !
बर्याच ठिकाणी युती असूनही छुप्या पद्धतीने पाडापाडीचे राजकारण करने ,
पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सारख्यानेही आघाडी धर्म न पाळणे !
मान व खटाव चे आमदार गोरे  व रणजितसिंह निंबाळकर  हे पृथ्वीराज बाबांचे खास जवळचे होते , त्यांनाही भाजपात जावू देणे !
मुंबईत विविध गटातील वादविवाद. . . व
समन्वयाचा अभाव! कित्येक वर्ष
सत्तेवर असताना ओबीसी दुखावतील या अनाठायी भितीमुळे  मराठा समाजासाठी,  आरक्षणासाठी  घटनात्मक आयोगाची निर्मिती न करणे  व आयोगाकडून हातात असतानाही पॉझिटिव्ह अहवाल तयार न करणे ,   दिंडोरी , हिंगोली , बीड, रावेर या ठिकाणी
ऐनवेळी उमेदवार बदलने,
नाशिक मध्ये योग्य उमेदवार न देता ज्यांची भ्रष्टाचारी म्हणून प्रतिमा सगळीकडे झाली  आहे त्यांनाच उमेदवारी देणे व प्रचारासाठी संपुर्ण महाराष्ट्रात फिरवणे,
भंडारा गोंदियातून नाना पटोले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली असती तरी चालले असते पण  तेवढे काँग्रेस व राष्ट्रवादीत सामंजस्य नसने ,
मोठ्या शहरात व गावपातळीवर संघटन कमकुवत असने !
बुथ कमिट्या नसने ,
पारंपारिक, दलित मुस्लीम व काही प्रमाणात मराठा वोट बँकेला  गृहीत धरणे व त्यावर   विसंबून राहणे, नव मतदारावर प्रभाव पाडेल असे नेतृत्व नसणे व ते तयार  होऊ न देणे !
मुस्लीम, माळी , धनगर, वंजारी  ,  दलित यांना सोबत घेण्यात आलेले अपयश,
हक्काचे , दलित, मुस्लीम व धनगर मतदार दुरावणे,
धनगरांना एकाही मतदारसंघात  उमेदवारी न देने,
पक्ष संघटनेत नवीन कार्यकर्ते यावेत यासाठी  व्यापक कार्यक्रम  नसने !
ओबीसी , दलित, यांचा भाजपाने खुबीने राजकारणात वापर केला त्या समाजातून काही चेहरे पुढे करून बरोबर इप्सित साधले !
भाजपा व शिवसेना यांनी जे सोशल इंजिनिअरींग केले ते अघाडीच्या   नेत्यांनी न केल्यामुळे  पराभवाचा सामना करावा लागला . असे मला वाटते . .

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

बुधवार, २२ मे, २०१९

ईव्हीएम वरून चालू असलेला गोंधळ याला जबाबदार कोण? संशय दुर करायचे काम निवडणूक आयोगाने व न्यायालयाने करायला नको का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*निवडणूक पारदर्शक होण्यासाठी . . . .*
*जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होण्यासाठी . . .*
*संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी आता उपाययोजना करायची वेळ आली आहे . . .*

*ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर मारलेली चिफ असते व तिचा डाटा चेंज करता येऊ शकतो कारण ते सॉफ्टवेअर असते हा विरोधकांचा दावा खरा किंवा खोटा याला फारसे महत्व नाही पण, किंचित सुद्धा संशय नको  म्हणून त्याला   पर्याय दिलाच पाहिजे व  निवडणूक पारदर्शक झालीच पाहिजे !
 ही केवळ  विरोधकांची मागणी म्हणून नव्हे तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, निवडणूक आयोगाने व न्यायालयाने विरोधक म्हणतात म्हणून नव्हे तर जनतेच्या मनातील संभ्रम दुर व्हावा म्हणून लोकांच्या मतांचा विचार केलाच पाहिजे !
त्यासाठी आधुनिक मतदान यंत्राच्या साह्यानेच बटन दाबून  मतदान घ्यावे , बटन ज्या चिन्हा समोरील दाबले ते चिन्ह प्रिंट होऊन  ते प्रिंटिंग ज्या मतदाराने मतदान केले त्याला दिसावे व मगच ते संबधित पेटीत पडावे आता ज्या प्रमाणे व्हीव्हीपॅट करते तसेच!  ( त्यातून व्हीव्ही पॅट सारखी चिठ्ठी ज्याला मतदान केले आहे ति बाहेर पडावी व थोडी जाड आणि मोठी असावी)
व अश्या स्लिप किंवा चिठ्ठ्या या एटीएम मशिन सारखे मशिन विकसित करून मोजल्या जाव्यात त्यामुळे मोजायची कटकट मिटेल व त्या चिठ्ठ्या कितीही वेळा मोजता येतील  व निकालही वेळेवर लागतील  व त्या कितीही वेळा मोजता येण्याचे कारण शंकेला वाव नको .   जोपर्यंत सर्व वाद मिटत नाहीत तोपर्यंत त्या चिठ्ठ्या सुरक्षित जपून ठेवाव्यात!
 म्हणजेच  त्या चिठ्ठ्या सुद्धा पैसे मोजणारे मशिन सारखे,  व्हीव्ही पॅट चे कौंटींग करणारे मशिन विकसित करून करावे . .
म्हणजे मशिन हॅक झाली ही बोंब कोणीही ठोकायला नको किंवा हा आरोप सातत्याने व्हायला नको  ! व हा गोंधळ कायमचा मिटायला हवा . . .   . .
विजय पिसाळ नातेपुते

मंगळवार, २१ मे, २०१९

पारदर्शक निवडणूकीसाठी , निवडणूक आयोग व न्यायालयानेही वारंवार होणारी चर्चा थांबण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत! एक सामान्य मतदार व नागरीक यांची अपेक्षा ! पाच वर्षासाठी प्रतिनिधी निवडताना , एक महिना मतदान प्रक्रिया चालत असताना निकालासाठी /मतमोजणीसाठी दोन दिवस गेले तर बिघडले कुठे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी  व राजकीय विश्लेषक म्हणून हे माझे मत आहे . . पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझे हे मत नाही . . .*

*जनतेला स्वतःच्या बहुमोल मताची ताकद जेंव्हा पुर्णपणे कळेल व प्रत्येक भारतीय जनता १००% मतदान करेल व निवडणूका १००%  निःपक्ष पणे  होतील तेंव्हाच लोकशाही खर्या अर्थाने  बळकट होईल!*
*तो पर्यंत या देशात फोडा, झोडा आणि राज्य करा हाच फॉर्म्युला सगळे लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणारे मात्र प्रत्यक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत  घराणेशाही व हुकूमशाही चालवणारे पक्ष चालू ठेवतील हे माझे आजच्या राजकीय परिस्थितीचे स्पष्ट व परखड मत आहे* . 
*मतमोजणीला एक तिथे दोन दिवस लागले तरीदेखील चालतील  पण सिस्टीमवरचा विश्वास वाढला पाहिजे व १००%  सर्वांचाच विश्वास दृढ झाला पाहिजे ! मग ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट १००% मोजले तरी कुणाला काही प्रॉब्लेम असता कामा नये अगदी निवडणूक आयोग व न्यायालय यांना सुद्धा* ! विरोधक म्हणत आहेत म्हणून नव्हे तर सर्वच भारतीयांना विश्वास देण्यासाठी हे आवश्यक आहे . 
*जसे तुम्ही पैसे मोजायला बँकेत मशिन वापरता तसे व्हीव्हीपॅट मोजायला मशिनचा वापर का करू शकत नाहीत. .*

*जर लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट वापरले व त्या पेट्या शिलबंद करून मशिनच्या साह्याने व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठ्या  मोजल्या तर निकाल लवकर लागतील व ज्याला मतदान केले ते आपल्या समोर चिन्ह येईल व वादविवाद बंद होतील*
दुध का दुध पाणी का पाणी . . .*

विजय पिसाळ नातेपुते !

शनिवार, १८ मे, २०१९

नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार मा. श्री शंकर नाना जानकर हे नुकतेच भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले , त्यांच्या यशस्वी कारकीर्दचा घेतलेला हा आढावा .











चालू घडामोडींचे विश्लेषण


नुकतेच नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार *मा श्री शंकर नाना जानकर*  हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ  सैन्यदलातील यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . . .
 त्यांच्या सैन्यदलातील व शालेय जीवनातील खडतर  कारकीर्दीचा आढावा घेतलाय लेखक, कवी, सामाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक आणि  वक्ते  श्री विजयकाका  पिसाळ नातेपुते  यांनी . . . . . . .

नातेपुते गावच्या पश्चिमेस कॅनॉल लगत जानकर वस्ती आहे. या वस्तीवर  नाना मारूती जानकर व त्यांच्या पत्नी हौसाबाई नाना जानकर रहाण्यास होते ते दोघे मिळून  आपला पारंपारिक मेंढपाळाचा (मेंढी पालनचा ) व्यवसाय करत होते. घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची होती . मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने मेंढ्यांना चारा उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्यांना मेंढ्यांना घेऊन चारणी (चारण्या) साठी वेगवेगळ्या भागात जावे लागत असे,  सोबतीला लहान  लहान मुलं एक दोन घोडी, त्यावर जीवनावश्यक सर्व पसारा, वाघरी , घोंगडी ,  लहान लहान कोकरी , करडं , टाकायची व  शेळ्या, मेंढ्या ,  कोंबड्या , सोबतीला घेऊन,  राखण करायला इमानदार दोन ते चार श्वान  बरोबर घेऊन गावोगावी फिरायचे व मुलांचे संगोपन करायचे,  संसाराचा गाडा हाकायचा, शेळ्या व मेंढ्या यांना चारा व पाणी  मिळावे  म्हणून त्यांना भटकंती करावी  लागत असे,  बहुतांश वेळा चार ते पाच महिने नातेपुते गावात व ७ ते ८महिने त्यांना  बाहेरगावीच रहावे लागत असे , प्रामुख्याने ते वाई, सातारा या भागात दिवाळी संपली की,  नातेपुते परिसरातील चारा संपल्या नंतर  उन्हाळ्यात व पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत तिकडेच गावोगावी रहात असत. . .  नाना व हौसाबाई यां दाम्पत्याला ,
 कै दशरथ नाना जानकर
श्री दाजी नाना जानकर
श्री मोहन नाना जानकर
श्री बाळू नाना जानकर
श्री शिवाजी नाना जानकर
श्री शंकर नाना जानकर
श्री सुखदेव नाना जानकर
श्री बापुराव नाना जानकर
ही मुले झाली . . .
या पैकी  श्री दाजी नाना जानकर, श्री शिवाजी नाना जानकर व श्री शंकर नाना जानकर हे तिघेजण भारतीय लष्करात विविध हुद्यावर सेवा करून यशस्वी सेवानिवृत्त झाले . . . . . . . . सहाजिकच या कुटूंबात शिस्तिचे व देशप्रेमाचे वातावरण त्याकाळी  तयार झाले होते व आजही पुढच्या पिढीत आहे,
या अगोदरच लष्करी सेवेतून  दोघे म्हणजे दाजी नाना जानकर व शिवाजी नाना जानकर सेवानिवृत्त झाले असून,   सुभेदार *श्री शंकर नाना जानकर* यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने  सैन्यदलातील दैदिप्यमान कारकीर्दचा या लेखात आढावा घेतला  आहे . . .
 *श्री शंकर नाना जानकर*  यांचा जन्म १ जून १९६९ साली गरीब हिंदू  धनगर कुटूंबातील मेंढपाळाच्या घरी झाला त्यांचे वडील नाना व आई हौसाबाई व जेष्ठ बंधू  यांनी कठीण परिस्थितीत  त्यांचे संगोपन व शिक्षण यासाठी पोत्साहन दिले.  शंकर जानकर यांचे  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण हे दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले . .
घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची व  बेताचीच असल्याने त्यांना सैन्यदलात जाण्या अगोदर विविध ठिकाणी रोजंदारीवर कामाला जावे लागत असे,  कुटूंब मोठे असल्याने केवळ आई वडील व मोठ्या भावांच्या कष्टावर  घर चालणे तसे कठिण होते.  त्यामुळे त्यांना शिक्षणाचा व  वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी शनिवार, रविवार व दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुट्टीत कामाला जाणे व कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता . . . घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व घरातच आई वडीलांकडून देशसेवेचे धडे मिळाल्या मुळे श्री   शंकर नाना जानकर यांनाही सैन्यदला बद्दल विशेष आकर्षण होते व त्यांचे शरीर कष्टाचे आणि चपळ असल्या कारणाने त्यांनीही सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला .
मुळातच घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व संपुर्ण कुटूंबातील लोकांनाही देशाबद्दल विशेष प्रेम असल्याने त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा जो निर्णय घेतला त्याला घरातील सर्वांनीच मनापासून पाठिंबा दिला व साथही दिली . इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण होताच ते  ९/४/१९८९ ला सैन्यदलात भरती झाले . जरी ते इयत्ता १२ वि नंतर भरती झाले तरीदेखील त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले ,  जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर  स्वकर्तृत्वाने ते  एक एक टप्पा पुर्ण  करत पदोन्नती मिळवत गेले  . . .
सन १९८९ला ते  सैनिक म्हणून भरती झाले ,  परंतू अभ्यासू वृत्ती व  कर्तृत्व याच्या बळावर ते
१५/८/१९९७ला लान्स नायक झाले  नंतर
१/४/२०००साली नायक म्हणून त्यांना  बढती मिळाली . त्यांच्या  उत्कृष्ट सेवेमुळे
१७/८/२००५ ला हवालदार म्हणून परत बढती मिळाली .
त्याच प्रमाणे १/३/२०१३ साली नायब सुभेदार या पदावर पोहचले आणि १/३/२०१५ ला मा श्री  शंकर नाना जानकर हे सुभेदार झाले . . . हा त्यांचा लष्करातील प्रवास साधासुधा नव्हता तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना खडतर आव्हानांचा सामना करावा लागला,  या प्रवासात त्यांनी स्वतःचे मनोबल वाढवले आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून  प्रवास केला   . . लष्करातील सेवेच्या काळात त्यांना विविध पदावर काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली  व विविध आव्हानांचा सामना करण्याचे सुद्धा प्रसंग आले . त्यांनी आपल्या सेवेच्या काळात, आसाम (तेजपुर ), उत्तर प्रदेश (इलाहाबाद ), जम्मू काश्मीर (श्रीनगर ), पंजाब (जालंधर ),  महाराष्ट्र (पुणे) , परत जम्मू काश्मीर (कारगिल ), परत महाराष्ट्र मुंबई, परत उत्तर प्रदेश (मेरठ )जम्मू काश्मीर (महू), नागालँड, आंध्र प्रदेश, सिक्कीम, परत पंजाब(भटींडा), परत महाराष्ट्र (पुणे),
इतक्या ठिकाणी काम केले व विविध ठिकाणी प्रवास करावा लागला व लष्करी सेवेचे आव्हानात्मक काम  करावे लागले . जम्मू काश्मीर मध्ये १९९९ ला देशसेवा बजावत असतानाच पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी कारगिल मध्ये घुसखोरी केल्याचे निदर्शनात येताच भारतीय लष्कराने त्यांना पिटाळून लावण्यासाठी , युद्ध सुरू केले यात सहभागी होऊन शेकडो अतिरेकी व पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावण्याची मोलाची  कामगिरी भारतीय सैनिकांनी  केली यात नातेपुते  गावचे सुपुत्र म्हणून सुभेदार शंकर नाना जानकर यांनी मोठे काम केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . ऑफरेशन विजय मध्ये सुद्धा त्यांनी  महत्वपुर्ण भुमिका निभावली . .
लष्करातील सेवा करत असतानाच   वर्षा सिताराम गावडे  एकशीव  यांचे बरोबर दिनांक  २७ /९/१९९२ रोजी त्यांचे  लग्न झाले व आपल्या सुखी संसाराची सुरवात केली वर्षा यांचे बरोबर केली , कु.  वर्षा  गावडे  शंकर नाना जानकर यांचे बरोबर विवाह बंधनात आडकल्या नंतर सासरी नातेपुतेला सौ . वर्षा शंकर जानकर झाल्या व  त्यांनी आपल्या पतीला पुर्णपणे साथ दिली,  घरातील संपुर्ण जबाबदारी  व मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले , आज या सुखी दाम्पत्याची दोन्हीही मुले उच्च शिक्षित असून  कु अंकिता या डॉक्टर झाल्या आहेत  व अमरजित यांनी डी फार्मसी केलेले आहे .
अशा नातेपुते गावच्या सुपुत्राचा सेवा निवृत्ती निमित्ताने यथोचित गौरव होतोय. . . व पुढील आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा . . .
प्रेस नोट. . . . . .
*दिनांक १६/५/२०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता  नातेपुते गावचे सुपुत्र  सुभेदार श्री शंकर नाना जानकर हे तिस वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले . . . .*

*या  निमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ माजी सैनिक संघटना , ग्रामपंचायत नातेपुते व गावातील जानकर कुटूंबावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी विधान परिषदेचे आमदार मा श्री  आर जी रुपनवर यांचे  शुभहस्ते आयोजित केला होता . .*
*सदर कार्यक्रमाला . . .*
*माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते गावचे सरपंच श्री  बी वाय राऊत वकील व युवा नेते दादासाहेब उराडे, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, सामाजिक कार्यकर्ते श्री विजयकाका पिसाळ, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर काळे, प्रतिष्ठीत व्यापारी श्री महेश शेटे, सनीभैय्या देवकाते पाटील,*
 *श्री रणजित सुळ, रणवीर देशमुखआदी मान्यवर उपस्थित होते*.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून व त्यांच्या माता पित्यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली . सुरवातीला विविध ठिकाणी सेवा बजावत असताना जे लष्करातील जवान शहिद झाले आहेत त्यांना सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली . सदर कार्यक्रमाचे  प्रास्तविक माजी सैनिक व अधिकारी  श्री मानाजी जगताप यांनी केले
*या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते*
*श्री विजयकाका पिसाळ, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, विद्यमान सरपंच बी वाय राऊत वकील  व आमदार श्री आर जी रुपनवर यांची समयोचित* व *सुभेदार शंकर नाना जानकर यांच्या लष्करी सेवेतील कामगिरी बद्दल गौरवपूर्ण उल्लेख व अभिनंदन करणारी आणि लष्करी सेवेचा आढावा घेणारी  झाली भाषणे झाली*
या प्रसंगी बोलताना आमदार  आर जी रुपनवर म्हणाले की , शंकर नाना जानकर यांच्या सारखे सुपुत्र या मातीत जन्माला येत आहेत तो पर्यंत आपल्या देशाच्या सिमा सुरक्षित आहेत,  ज्या माता पित्यानी त्यांना घडवले व ज्या धर्मपत्नीने आजवरच्या वाटचालीस साथ दिली यांचेही कौतुक केले पाहिजे अशी भावना आमदार रुपनवर यांनी व्यक्त केली , त्याचप्रमाने आर जी रुपनवर पुढे बोलताना म्हणाले की , जवान सिमेवर लढतात व शेतकरी कष्ट करतात म्हणून आपण सुखाची झोप व आनंदाने दोन घास खाऊ शकतो .
*सुभेदार श्री शंकर नाना जानकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या लष्करी सेवेतील खडतर कामगिरीचा आढावा घेतला . . .*
*नातेपुते गावातील जानकर कुटूंब हे एकमेव असे कुटुंब आहे की एकाच कुटूंबातील सख्खे तिन भाऊ लष्करी सेवेत होते व लष्करी सेवा पुर्ण करून नातेपुते गावात सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. . .*
*या आनंदायी  कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरीक व लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व माता भगिनी उपस्थित होत्या*
*शब्दांकन. . . श्री विजयकाका पिसाळ नातेपुते . . .*

रविवार, १२ मे, २०१९

झाडे वाचली तरच आपण वाचणार!

चालू घडामोडींचे विश्लेषण





























वृक्ष संवर्धना शिवाय. . . . निसर्गाचा समतोल कठीणच. . . . . 
©® लेखन. .    विजय पिसाळ नातेपुते . . . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

आज जिकडे तिकडे प्रचंड उकाडा , तापमान वाढ आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे  पाऊसमान, यामुळे वारंवार  पडणारा दुष्काळ या दुष्टचक्रात भारत देशातील ७० %भाग आडकला आहे ! 
"डोंगर उजाड झाले , पाऊसमान संपून गेले" 
ही अवस्था आज जवळ जवळ ७० %भारत देशाची झाली आहे . . 
दरवर्षी करोडोंचा खर्च वृक्ष लागवडीसाठी व देशातील विविध भागातील दुष्काळ निवारणासाठी केला जातो . . पण दुष्काळ व तापमानवाढ ही समस्या तशीच राहते आहे . . . देशातील किंवा राज्यातील  सरकार कोणतेही असो सुदैवाने  वृक्ष लागवड  तर केली जाते मात्र  दुर्दैवाने  लावलेले वृक्ष संवर्धन करण्यासाठी ना सरकारला अस्था असते ना सामाजिक स्थरावरील लोक पुढाकार घेतात. . मुळातच देशातील नागरीकांना प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे वाटते ! जनसहभाग नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होत नाही . . 
आज अनैसर्गिक पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने  ओढे नाले साफसफाई केली जातेय तोच गाळ कडेला टाकला जातोय व तोच गाळ परत ओढ्यात येतोय,  जमिनीवर चर खोदून सुपीक जमिनीत पाणी मुरवण्याचा अयशस्वी प्रयोग केला जातोय, मुळात जमिन खोदून माती काढून तिची प्रचंड प्रमाणात धूप केली जातेय व तिच माती ओढे व धरणे यात परत येऊन साचतेय व ओढे आणि धरणे गाळाने भरत आहेत,  मुळात नैसर्गिक ओढे व त्यातील वाळूच जर उपसली गेली तर पाणी जमिनीत मुरणार कसे !  वाळू  उपसून ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले गेल्यावर वाळूच नष्ट होणार व  यात वाळू  नष्ट झाल्यामुळे बंधार्यात फक्त  पावसाळ्या मध्ये  मुबलक दिसते , छानपैकी फोटो काढले जातात पण ते पाणी मात्र टिकत नाही ! त्याचे प्रचंड  बाष्पीभवन होऊन ते पाणी  संपुष्टात येते व परत दुष्काळ मात्र पाचवीला आहेच! 
या साठी निसर्ग नियमानुसार ओढ्यात व नद्यात वाळू आवश्यक आहे व त्याचा उपसा सुद्धा नियंत्रणात गरजेनुसार व्हायला हवा !     मुळात जलतज्ज्ञ , डॉ राजेंद्रसिंह, समाजसेवक  अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी जे पॅटर्न राबले ते खूप महत्वाचे होते व आहेत! त्यात 
चराई बंदी, कु-हाड बंदी करणे व  यातून वृक्ष आणि  जंगलाचे संरक्षण आवश्यक आहे .
पडणारे पाणी झाडामुळे तर जमिनीत मुरतेच पण  साखळी बंधारे ,,नाला बंडीग,  कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व लघू प्रकल्पच  यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब आडवला जाऊन  दुष्काळ हटवता येऊ शकतो  व डोंगराळ भागात याला भरपूर स्कोप आहे पण मुळात, कोणत्यातरी शासकीय अधिकार्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना राबवून दुष्काळ हटवण्याचे प्रयोग केले जात आहेत. . त्याचाच एक नमुना म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने चालू असलेले जलयुक्त शिवार अभियान. . . यात ठेकेदार, ट्रॅक्टर मालक व जेसीबी मालक हे आणि अधिकारी मालामाल झाले पण पाणी पातळी पावसाळा सोडला तर जैसे थे ! 
मुळात जल संवर्धन हे जंगल संवर्धनावर अवलंबून आहे .  जंगल नसेल तर पाऊस पडणार नाही व पाणीच पडले नाही तर वॉटरकप काय? जययुक्त शिवार काय? नुसता उलटा कार्यक्रम होणार हे नक्की ! 
आज कित्येक ठिकाणी झाडाची अनियंत्रित कत्तल चालू आहे . वनसंरक्षक व वनअधिकारी हे समाजातील गाव गुंड व सरपन आणि झाडांची तस्करी करणारे  संबधित लोकामुळे हतबल झालेले आहेत. 
काही ठिकाणी तर वनसंरक्षक व वनअधिकारी यांचे आशीर्वादानेच संरक्षित वनांची कत्तल होत आहे. 
कागदोपत्री वृक्ष लागवडीचे करोडोंचे आकडे दरवर्षी प्रसिद्ध होतात मात्र लावलेली झाडे किती वाचवली जातात हा खरा  मुख्य   संशोधनाचा  विषय आहे . . . 
वाढते शहरीकरण व रस्त्यासाठी , कित्येक डोंगर आणि झाडे भुईसपाट करावी लागत आहेत पण त्याची भरपाई इतर ठिकाणी झाडे लावून व ति  मोठी करून केली जात नाही . . 
डोंगररांगा जर गच्च झाडांनी वेलींनी वेढल्या व डोंगरांना जाणीव पुर्वक आगी लावायचे बंद झाले नाही तर मात्र सर्व कठीण आहे . . 
आज काही नालायक लोक बीडी सिगारेट ओढून पेटती काडी व सिगारेट बीडी रस्त्यावर किंवा डोंगरावर टाकतात व क्षणात ते ठिकाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडते . . . या बिडी व सिगारेटला पायबंद कोण घालणार! 
काही दारूडे जंगलात जाऊन दारू पितात व दारूनंतर तिथेच बीडी सिगारेट व मटणाच्या पार्ट्या करून आग न विझवता तसेच नशेत येतात त्यानेच जंगलांना आगी लागलेल्या दिसून येते ! 
सांगायचा मुद्दा हाच आहे की, 
त्याला पायबंद घातला पाहिजे ! 
यापुढे सरकारने 
 शेतकर्यांना सुद्धा  उपयुक्त  आणि निसर्गासाठी  आंबा , चिक्कू, चिंच, आवळा , कळक(बांबू ) ही बांधावर व कंपल्सरी कायदा करून झाडे लावायला लावली पाहिजेत त्याला काही वर्षे अनुदान दिले पाहिजे . वनजमीनीवर झाडांचे संवर्धन करण्यासाठी , तलाठी , ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, कृषी सहाय्यक  व सामाजिक संस्था आणि होतकरू तरूणांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबवून झाडे लावा व त्याचे संवर्धन करा हा उपक्रम हाती घेतला पाहिजे . . 
नुसती दरवर्षी झाडे लावून व ति जळून जाऊन तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन हे रोखले जाऊ शकत नाही . 
त्यासाठी झाडे मर्यादित लावावीत मात्र ति किमान ८०%जगावीत तरच काहीतरी साध्य होईल! 
संपुर्ण देशात व राज्यात संपुर्ण वनक्षेत्रात कु-हाड बंदीची अंमलबजावणी १००%व्हायला पाहिजे ! 
आज रस्त्याच्या कडेचे लिंब, चिंच, वड, आंबे,  सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या चार्यासाठी तोडले जात आहेत. . 
त्यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही .
म्हणून सरकार आणि समाजातील जागृत घटकांनी पुढे आले पाहिजे . . . 
प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक गावाला झाडे जगवण्याचे टार्गेट दिले पाहिजे व त्यावरूनच त्याला अनुदान सुद्धा निश्चित केले गेले पाहिजे ! 
व त्या झाडांचे अॉडीट केले पाहिजे तरच संपुर्ण भारत व आपले राज्य दुष्काळ मुक्त होईल! 
लेखक. . विजय पिसाळ नातेपुते ©®९४२३६१३४४९/९६६५९३६९६९

शनिवार, ११ मे, २०१९

स्वभाव.

चालू घडामोडींचे विश्लेषण


स्वभाव. . . . . . प्रकरण १. . . . .
©®विजय पिसाळ नातेपुते . . . . .
मनुष्य हा प्राणी जगातील एकमेव प्राणी असा असावा की , त्याच्या बाबतीत सतत म्हटले जाते "जगात प्रत्येक आजारावर औषध आहे,  पण स्वभावला औषध नाही "  आणि जवळ जवळ हे सत्य आहे,  असे वाटते .
समाजातील विविध  वयोगटांतील लोकांचे निरीक्षक केले तर पटकन लक्षात येते , लहाण व्यक्तींचा स्वभाव, मध्यम वयाच्या व्यक्तींचा स्वभाव, प्रौढ व्यक्तींचा स्वभाव आणि वयोवृद्धांचे स्वभाव यात जमिन अस्मानाचा फरक दिसून येतो व त्यामध्ये खूप  बदल सुद्धा जाणवतात  किंवा वेगवेगळ्या गाटातील स्वभाव वेगवेगळे असतात. तसेच  वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसेच  विविध जाती धर्मातील परंपरा किंवा त्यामध्ये होणारे संस्कार यामुळे सुद्धा जाती धर्मानुसारही स्वभावात फरक पडतो . प्रत्येक धर्मात सुद्धा  विविध पंतामध्ये लोकांचे विभाजन झालेले पहायला मिळते व त्यातही लोकांच्या स्वभावात  परत बदल झालेले  दिसून येतात. जेंव्हा शहरी भागातील लोकांचे स्वभाव  वेगळेच असतात राहणीमान व  त्यानुसार त्यांचे स्वभाव बदलते दिसून येतात,  ग्रामीण भागातील लोकांचे स्वभाव वेगळेच असतात,  आदिवासी  असो की  झोपडपट्ट्या  असोत,  सुशिक्षित की ,  कमी शिक्षित किंवा अडाणी असोत, अशा वेगवेगळ्या  लोकांमध्ये  फिरत  असताना ,  तुम्हाला विभिन्न स्वभावाचे लोक पहायला मिळतात. . . पाटील, देशमुख ते देशस्थ कोकणस्था पर्यंत, आगरी कोळी ते दलित वस्त्या पर्यंत, सोन्याचांदीचा व्यवसायिक ते रस्त्यावर बुट पॉलिश करणारा पर्यंत, किरणा दुकानदार ते फळविक्रेता ,,शेतकरी ते शेतमजूर आणि क्लास वन ऑफिसर ते शिपाई कामगार इथपर्यंत  वेगवेगळ्या स्वभावाची माणसे तुम्हाला पदोपदी दिसून येत असतात. . .
मग हे स्वभाव कसे विभिन्न असतात, त्यात बदल कसे होतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की , कोणत्याही व्यक्तीमध्ये  आयुष्याच्या सुरवातीला त्याला  जे वातावरण मिळते , ज्या  समाजात व ज्या परिसरात  त्याची  वाढ होते व जो धर्म  जन्मताच त्याला मिळतो व  ज्यात त्याची जडणघडण होते ,  राहण्याची जागा व घरातील आर्थिक व समाजिक स्तर यावरून सुद्धा माणवी स्वभावात आमुलाग्र बदल झालेले दिसून येतात. . .
स्वभावातील बदल आणि संस्कार हे मनावर बिंबणार्या विविध घटनावर अवलंबून असतात. . . .
उदा . . .
लहाणपणा पासून जर एखाद्या घरातील लोक चोरी करून जगत असतील तर आपोआपच त्या घरातील मुलांवर चोरीचेच संस्कार होतात व अशा मुलांचे बाबतीत असे आढळून येते कि, या मुलांचा  देखील चोरी करण्याचा स्वभाव बनत असतो. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीचा हा कल्चर म्हणजे संस्कृतीवर अवलंबून असतो . एखाद्या घरातील लोक जर आपली उपजीविका शिकार करून करत असतील तर सहाजिकच त्या कुटूंबातील लहाणांचे स्वभाव हे काहीप्रमाणात हिंसक असल्याचे दिसून येते . स्वभावाचा आणि आहाराचा सुद्धा काही अंशी संबध येतो , शांत व संयमी लोकांचा आहार बहुतांशी सात्विक असल्याचे दिसून येते . उदाहरण द्यायचे झाले तर कोणाताही शाकाहारी प्राणी हा हिंस्र असत नाही त्यावर सहजासहजी ताबा मिळवता येतो , मग त्यात हत्ती , घोडे, उंट, गाय, बैल, शेळ्या , मेंढ्या , हरीण, ससे अशा विविध प्राण्यांचा समावेश यात होतो व अशाच प्राण्यांचा वापर मानव सुद्धा करत आला आहे .
*स्वभाव ही गोष्ट कदापि बदलणारी असत नाही*
वर्षानुवर्ष जे लोक गुलामगिरीत जगत असतात ते त्या लोकांवरच धुर्त लोक अापला अंमल प्रस्थापित करत असतात मग गुलामगिरी पत्करणारे संख्येने कितीही जास्त असले तरीदेखील हे होत राहतेच.
कारण इतिहास हेच सांगतो की गुलामगिरीत ज्यांचा जन्म होतो तो गुलामगिरीच पत्करतो कारण गुणसूत्रा नुसार त्याचा स्वभाव गुलामगिरीस अनुकूल असा असतो .
प्रकरण(१) एक समाप्त. . . .
क्रमशः . . . .

शनिवार, ४ मे, २०१९

मित्रांनो आयुष्य आनंदी जगुया !

लेख पुर्णपणे वाचा नक्कीच उर्जा येईल. . .
























चालू घडामोडींचे विश्लेषण

🌺🍁🌸🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🌺
गुंतागुंत माझ्या मनाची
©®विजय पिसाळ
*या सुंदर आयुष्यात मि, दुःखी नाही व  कुणावर नाराज पण  नाही.*
*कारण आपल्या  आयुष्यात जे जे घडते ते आपल्या हातात  काहीच नसते व पुढे काय घडणार हे पण आपल्या ध्यानीमनी नसते, सगळा खेळ सृष्टीचा , विधात्याचा* माझ्या आयुष्यात
*कित्येक संकटे आली व त्यातून सातत्याने मार्ग निघाला , २००७ पासून जवळपास २०१८ पर्यंत तब्बल ११ वर्ष संघर्ष केला  कित्येक कठोर  अघात सोसले यात वडीलांचे अकाली जाणे असेल, नंतर आईचे अजारपण, नंतर माझे मनक्याचे काहीकाळासाठीचे पण महाभयंकर  आजारपण ज्यात प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेले होते ,  जवळपास  जे सर्व डॉक्टरांना माझे बरे होणे व पहिल्या सारखे तंदुरुस्त होणे  अशक्य वाटत होते. पण हे कठीण आजारपण मि माझ्या  इच्छा शक्तीच्या बळावर पळवून लावले यासाठी मि प्रचंड चालणे , पोहणे व नियमित  व्यायाम  आणि अवघड  किल्ले चढाई यातून माझे ठणठणीत  पुर्णपणे बरे होणे  शक्य झाले , मि बरा होतोय तोपर्यंतच यात भरीस भर म्हणून   वादळात जवळपास केळीची ७ एकर बाग भुईसपाट होऊन  २० ते २२ लाखांचे नुकसान झाले  व या सर्वांवर कढी म्हणजे पत्नीचे  अजारपण व उपचारांचा प्रचंड खर्च तरीदेखील मि  कधीच डगमगलो नाही की, खचलो नाही सर्वांवर यशस्वी मात करत आयुष्याला जिंकायचा प्रयत्न केला व यशस्वी झालो . परमेश्वराची कृपा समजा किंवा नशीब म्हणा किंवा कष्टाचे फळ समजा पण  नोहेंबर २०१८ पासून सर्व संकटे संपली व परत आनंदी पर्व सुरू झाले, मुलीला  १० ला ९१%मार्क, लहान मुलगा व मुलगी सुद्धा  खूप हुशार  आहेत सोबतीला मनापासून साथ देणारी  पत्नी सदैव पाठीशी आहेच  ,  आईचे, मोठे बंधू व , बहिणींचींचे आशीर्वाद पाठिशी सदैव असतात  !   मग   ,  अजून काय लागते आयुष्यात,  हा प्रवास घरातील  सर्वांच्याच  पाठबळावर व मित्र  , सोबती,  हितचिंतक   यांनी दिलेल्या  मानसिक  ताकदीीवर  व वेळोवेळी एकमेकांच्या साथीमुळे व  आधारावर पुर्ण केला*
*हे सर्व काही घडत असताना*
  *वेदना कितीही झाल्या तरी खचलो नाही , आयुष्यभर जीवलग   मित्र खूप  मिळाले , त्यातील  काहीजण अडचणीत   दूर सुद्धा  गेले  थोडीशी मनाची  घालमेल  झाली मात्र  कधीच कुणावर  राग व्यक्त केला  नाही.* जीवनात
*मनातील भावना व्यक्त करताना कदाचित कुणी दुःखावतं तर कुणी सुखावतं हा नियमच सृष्टीचाच  मात्र मि कधीच कुणाशीही संवादाचे मार्ग बंद करत नाही* विसंवादला थारा नाही .
*मला सगळ्यांनाच समजून घेण्याची तशी सवय आहे व शक्यतो मि फारसा कुठे व्यक्त होत नाही पण जे आपुलकीने बोलतात आपले वाटतात, त्यांना मनापासून सर्व सांगतो कारण बोलून मन हालकं होतं हा विचार असतो*
*कित्येकवेळा माझ्याकडून चुकाही होतात, त्या जवळच्या मित्रांजवळ  कबूल सुद्धा करतो  व त्यावर मनन चिंतन करायची तयारी सातत्याने  ठेवतो , आणि कुणी समजून घेतले तर माझे मन  सुखावते , नाही समजून घेतले तरीदेखील मि  सोडत नाही माझ्यातला   शांतपणा  मात्र समोरच्या वैक्तीच्या डोक्यातील आपल्या बद्दलचा राग व गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत बैचेन मात्र होत  असतो मी*
*सर्व नात्यावर प्रेम करायची आवड असल्याने व ति नाती कधीच  तुटू नयेत असेच वाटते व तेच  माझे मन मला सांगते व त्यासाठी मि शक्य होईल तेवढी माघार घेणे पसंत करतो*
*समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलून हालकं वाटतं असेल तरीही बोलतो किंवा एखाद्याला आपल्याशी  बोलायचे नसेल आपल्याला टाळायचे असेल  तरीदेखील माझी बिलकुल हरकत नसते कारण कुणालाच आपल्यामुळे ठेच लागू नये हेच वाटते* या आयुष्यात फक्त
*जिंकायचं आहे आपुलकी व प्रेमाने !  सर्वांनाच आपलेसे करायचे   आणि घट्ट करायचे आहेत मैत्रीचे बंध म्हणून कधीच कुणाबरोबर कधी किरकोळ दुरावलो तरी , स्वतःच पुढाकार घेऊन गैरसमज  दुर कसे  होतील हाच प्रयत्न असतो माझा  , व कुणीही असो मि  कधीच माझ्याकडून संवाद बंद करत नाही   ,  का ते  माहीत नाही पण माझा स्वभावच  तसाच आहे.*
*जगू वाटत स्वतःसाठी ,पण इतरांशीवाय कधीच करमत पण नाही आणि  जीव तुटतो खूप .*
*आयुष्य खुप सोपं आहे , गरजा मर्यादित आहेत , पण जगता येत नाही  एकटं एकटं हाच  मुळ स्वभाव आहे .*
*त्यामुळे आयुष्यात कित्येक मित्र मैत्रिणी जोडता आले, यादी खूप मोठी तयार झाली जेवढा जमेल तेवढा वेळ पण दिला सर्वांसाठी त्यातून बहुतेकांनी मनापासून प्रेम दिले,  हीच  कमाईच समजतो मी*
*लहान व्हायचं स्वप्न आता पुर्ण होणार नाही , मित्राांना मि सदैव म्हणतो  ,शाळा , कॉलेजचे दिवस परत नाहीत  , कधीतरी एकत्र येवूया   व आयुष्यातील काही आपुलकीचे मित्रांना  भेटूया ,  काहींना नसतो वेळ  पैसा पैसा करतात  पण त्याबद्दलही  माझी  तक्रार  नाही , माहिती आहे गेलेली वेळ परत येत नाही म्हणून क्षणात सर्व दुःख विसरुन छानपैकी जगावे वाटते मला.*
*माझी  सुखाची व्याख्या व परिभाषा सर्वांना समजून घेणे व सर्वांसाठी जगणे हीच आहे म्हणून  वाटते आयुष्यात जोडलेली प्रत्येक व्यक्ती सदैव माझी मित्र म्हणून रहावी व मैत्रीचे प्रेम जपणारी असावी , यात मला सुख आहे , मला कधीच माझ्यामुळे कुणाची नाती तुटावीत, कुणाला त्रास व्हावा असे चुकीचे  वाटतही नाही म्हणून मि सदैव सर्वांसाठी माघार घेतो व मैत्री  जपण्याचा प्रयत्न करत राहतो*व हे जीवन जगताना कुणाचेही मन दुःखी होईल, कुणाच्याही  स्वाभिमानाला ठेच  लागेल ही बिलकुल भावना नसते माझी , जगायचे ते साधेसरळ,  हीच माझ्या मनाची भावना असते व त्यातच सुख मानतो मि.*  मग तो मित्र असो , कि मैत्रिणी असोत की , नातेवाईक असतोत,
माझ्या आठवणी

*विजय पिसाळ  नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
                                                                            *😴🙏🏻तुमचा दिवस आनंदी जावो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना   🙏🏻😴