vijaypisal49. blogspot. com

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

माळीन गाव दुर्घटना झाली त्यावेळी लिहलेले

माझा लेख आपल्या सर्वांसाठी!
विजयकाका पिसाळ!

आपल्या महाराष्ट्राला संकटे काही नवीन नाहीत!
माळीन गाव असो कि सावित्री नदीवरील दुर्घटना असो,कोठ्यावधी रुपये खर्चून वाहुन गेलेला गोदावरी पार्क असो
अशा घटना आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात राहतो हळहळ व्यक्त  करतो सरकार कोणतही   असो त्यावर टीकात्मक  बोलत राहतो!
पण संबंधीत विभागाला  चुकीच्या गोष्टी लक्षात आणून देत नाही!
नदी नाले यातील अतिक्रमणे रोखत नाही
वृक्ष तोड थांबवत नाही
पोखरले जाणारे डोंगर आणि नदी पात्रातील बेसुमार वाळूतस्करी रोखत नाही
अनियंत्रित प्लॅस्टिकचा वापर थांबवत नाही!
अशा असंख्य गोष्टी आपल्या पासुन सुरु होतात आणि आपल्या हातून काहीही न करता नेहेमीच आपण सरकारी यंत्रणा आणि सरकारला दोष देत असतो!
पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण गंभीर झालो निसर्गाचे नुकसान टाळले तर सगळ्या समाजातील लोकांनी दक्षता घेतली तर कदाचित संकटे येणार नाहीत किंवा संकटांचा मुकाबला तरी व्यवस्थित  करता येईल पण संपुर्ण समाज आज निद्रिस्त झालेला पाहतो आपण!
राजकीय आखाडा आसला कि हजारो लोकांना वेळ असतो पण समाजासाठी काही ठोस कार्यक्रम आखायचा असेल तेंव्हा सगळेच नॉट रिचेबल असतात
नेत्याचे वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमात डी जे च्या तालावर नाचण्यासाठी एकत्रित येणारी तरुणाई सामाजिक कामा बाबतीत एकत्रित यायला हवी!पण हे घडत नाही!
विघातक कामा ऐवजी विधायक कामासाठी सर्वांनीच देशवासी म्हणुन राजकारण जात पात पक्ष विरहीत काम करायला शिकले पाहिजे!
आपले आदर्श हे आमटे  कुटुंब,राणी व विजय बंग,नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे सिंधूताई सपकाळ हे असले पाहिजेत
पैशासाठी काम करणारे नेते अभिनेते व खेळाडू हे आदर्श असावेत का?
जे समाजासाठी तळमळीने काम करतात आणि कायम लोकांचा विचार करतात किंवा आपल्या कमाईतून काही हीस्सा सामाजिक कामासाठी वापरतात त्यांना आदर्श मानायला हरकत नसावी
अपवादात्मक परस्थितीत नेत्यांच्या कलाकारांच्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्यसभेची किंवा विधान परिषदेची खासदारकी आमदारकी द्यायला हवी पण ९०च्या दशकापासून राजकीय पुनर्रवसन किंवा काही ठराविक लोकांना खूष करण्यासाठी किंवा उपद्रवमुल्य कमी करण्यासाठी वरिष्ठ सभागृत सदस्य पाठवले जातात याला कोणताही पक्ष अपवाद राहीलेला नाही!
आता सगळ्यांनी जागृत होण्याची गरज आहे
आज आपल्या पासुन हाकेच्या अंतरावर असणारी संकटे उद्या कदाचित आपल्या गावावर आणि घरापर्यंत  येऊ शकतात!
समाजासाठी देशासाठी वेळ देणारी संस्कारक्षम युवक मंडळी पुढे यायला हवीत
वैयक्तीक हेवेदावे आणि भेदभाव समाजासाठी  आणि देशासाठी घातक आहेत
येणार्या संकटापासुन सावध रहायला शिकले पाहिजे
तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगले देवु!
विजयकाका पिसाळ नातेपुते