vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

मराठा आरक्षणाचा सन २०१३ ते सन २०२० प्रवास!

मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करतंय कोण?  
मराठा आरक्षणा बाबतीत खरेच राजकीय पक्ष गंभीर आहेत का ? 

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फार जुनी होती पण त्याला व्यापक स्वरुप नव्हते दि.  ४ एप्रिल २०१३ रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रथमच विशाल मोर्चा मराठा महासंघाने मुंबईत काढून मराठा आरक्षणाची गरज व त्यातून मराठा समाजाची आतील  दाहकता आणि मागणी खर्या अर्थाने सर्वांसमोर आणली पण तरीदेखील पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस आघाडीचे सरकार फार गंभीर नव्हते , मराठा  समाजाचा आक्रोश त्यांच्या लक्षात आलाच नाही , २०१३ पासून ते  २०१४ साल उजाडे पर्यंत   भाजपाने मोदींचे जोरदार मार्केटींग चालू केले . अण्णा हजारेंचे आंदोलन व निर्भया केसने राष्ट्रवादी व  काँग्रेस पुर्णपणे बॅकफूटवर गेली , जनमत विरोधात जातेय हे लक्षात घेऊन  आणि पुढील संकटाची चाहूल ओळखून पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात समिती गठीत केली , समिती म्हणजे मागासवर्ग आयोग नव्हे , परंतु समितीने , मराठा समाजाचा , सर्वंकष अभ्यास करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही शिफारस केली व खर्या अर्थाने पहिल्यांदाच मराठा समाजाचे बाबतीत एक पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार झाला .  पण ११/फेब्रुवारी  २०१३ राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना होऊन सुद्धा मराठा समाजाचा प्रश्न तत्कालीन सरकारने आयोगाकडे का पाठवला नाही ?  याचेही आश्चर्य वाटते ..व उत्तर पण मिळत नाही .  त्यातही , या अयोगातील डॉ. सर्जेराव निमसे , राजाभाऊ करपे, चंद्रशेखर देशपांडे , भूषण कर्डिले , दत्तात्रय बाळसराफ, सुवर्ण रावळ यांचा कार्यकाल ३०/१२/२०१४ साली संपला . पण यापुर्वी हे काम ते करू शकले असते पण तेंव्हाच्या सरकारने हे काम राणे समितीकडे दिले . राणे समितीने २६/२/२०१४ ला अहवाल सादर केला .  पण लोकसभा निवडणूक लागली त्यामुळे आघाडी सरकारला आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षणाची घोषणा करता आली नाही . मे २०१४ च्या लोकसभा  निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आणि राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते खडबडून जागे झाले आणि त्यांनी राणे समितीच्या शिफारसी स्वीकारुन २५ जुन २०१४ ला मराठा आरक्षणाची घोषणा केली , आणि जुलै २०१४ ला १६% आरक्षणाचा अध्यादेश काढला . पण वेळ निघून गेली होती , केंद्रात १० वर्ष व राज्यात १५ वर्ष सत्तेवर राहून अखेरीस घाईघाईने निर्णय घेतला  आणि  दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका  लागल्या आणि मोदींच्या तयार केलेल्या लोकप्रियतेत व  लाटेत काँग्रेस व राष्ट्रवादीची लोकसभे प्रमाणेच वाताहत झाली आणि भाजपाने स्वबळावर विधानसभेच्या  १२३ जागा जिंकल्या स्वतंत्र लढून सुद्धा १२३ जागा जिंकल्यामुळे भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि पवार साहेबांनी भाजपाला न मागता पाठिंबा जाहीर केला ,  आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी  मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली , सरकारला विधानसभेत स्पष्ट बहुमत नसताना आणि शिवसेना विरोधात बसूनही भाजपाने अवाजी   मताने  बहुमत सिद्ध केले तेंव्हा राष्ट्रवादीने सभागृहातून वॉक आऊट करत अप्रत्यक्ष भाजपाला मदतच केली ,  तेंव्हा जर विरोधात मतदान केले असते तर देवेंद्र सरकार लगेच पडले असते .  शिवसेना तात्पुरती विरोधात बसली खरी पण  शिवसेनेचा विरोध पक्ष फुटीच्या भितीमुळे मावळला आणि  सेना फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाली  आणि दरम्यानच्या काळात माहिती अधिकार कार्यकर्ते व वकिल केतन तिरोडकर हे कोर्टात गेले आणि   आरक्षणाचे व्हायचे तेच झाले  आणि  उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली  कसेबसे हे आरक्षण ५ महिने टिकले .  आरक्षणावरील स्थगिती उठवावी म्हणून  मराठा वकिल श्री विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने  विनोद पाटील यांचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाला या केसचा अभ्यास करून लवकरात लवकर निकाल द्यावा असे आदेश दिले . 
आणि उच्च न्यायालयात आरक्षणाची केस कशी लांबवता येईल हे सुरू झाले ,  फडणवीस सरकारने कोर्टात कधी वकिल देण्यासाठी , तर कधी म्हणणे  (शपथपत्र ) सादर करण्यासाठी सातत्याने तारखा मागून घेतल्या .   हा खटला जाणीवपुर्व कसा लांबला जाईल हे पाहिले गेले . पण १३ जुलै २०१६ साली कोपर्डीत दुर्दैवी घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली ,   मराठा समाज वनव्या सारखा पेटून उठला पण शिवरायांचे विचार व संस्कार मानणारा मराठा समाज असल्यामुळे समाजाने  संपुर्ण महाराष्ट्रात शांततेत ५८ मुक मोर्चे काढले ,  हे मोर्चे ९ ऑगस्ट पर्यंत चालूच होते , लाखोंचा समुदाय रस्त्यावर येऊन सुद्धा कुणालाही त्रास होणार नाही इतकी शिस्त पाळून हे मोर्चे निघाले , दुर्दैवाने या कालावधीत जवळपास ४२ तरूणांनी आपले आरक्षणासाठी बलिदान दिले . शांततेत निघालेल्या मुक मोर्चाची संभावना दैनिक सामनामधून मुका मोर्चा घाणेरड्या व्यंगचित्रातून केली गेली पण नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली .  या मोर्चांचा परिणाम होऊन भाजपाला भिती वाटू लागली आणि  त्यांनी हलचाली सुरु केल्या .  ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने शपथपत्र सादर करायला तब्बल ५ डिसेंबर २०१६ पर्यंतचा , दोन वर्षापेक्षा जास्त  कालावधी  कालावधी घेतला .  आणि तब्बल पाच हजार पानांचे शपथपत्र कोर्टात सादर केले ,   मग शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी कोर्टाने तारीख पे तारीख चालू ठेवले आणि  निर्णय दिला कि राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे प्रकरण सोपवून, राज्यमागासवर्ग आयोगाने कोर्टात अहवाल सादर करावा .  पण मराठा समाजाचा दबाव आणि वातावरण विरोधात जातेय हे पाहून फडणवीस यांनी मराठा समाजाला चुचकारण्यासाठी काही लोकप्रिय निर्णयांची घोषणा केली ,  त्यात, वसतिगृहे , स्कॉलरशिप, सार्थी संस्था  आणि  अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी यांचा समावेश होता . कोर्टाच्या आदेशानुसार व कालमर्यादेच्या अटीमुळे  मराठा आरक्षण हे प्रकरण  ४ मे २०१७ रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवले  गेले पण अयोगाचे अध्यक्ष म्हसे साहेब यांचे निधन झाले .  परत अध्यक्ष व इतर रिक्त  सदस्य  कर्मचारी स्टाफ यांची  नियुक्ती करायला काही वेळ गेला कि लावला ?  आणि राज्य मागासवर्ग आयोगाने १५ नोव्हेंबर २०१९ राज्य सरकार कडे अहवाल सादर केला .  २०१९ च्या  लोकसभा निवडणूकीला सहा ते सात महिने अवकाश असताना म्हणजेच ३० नोव्हेंबर २०१८ साली फडणवीस सरकारने आयोगाच्या शिफारसी स्वीकारून तो कायदा विधिमंडळात मांडून सर्व  पक्षाचे एकमताने १६% आरक्षण एस ई बी सी म्हणून   मंजूर केले  .  त्याही कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले . पण उच्च न्यायालयाने खटल्याचा निकाल लावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासू डे टू डे सुनावणी सुरू केली मार्च मध्ये सुनावणी पुर्ण झाली  व उच्च न्यायालयाने गायकवाड अयोगाच्या शिफारसी ग्राह्य धरुन  २७ जुन २०१९ रोजी   मराठा समाजाला  नोकरीत १३ % व शिक्षणात १२ % असे फोड करून आरक्षण  कायम केले . उच्च न्यायालयाने    १४ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र सरकारने केलेली घटना दुरूस्ती सुद्धा आड येत नाही असे मत नोंदवले , मुळात केंद्र सरकारने १४  ऑगस्टला २०१८  घटना दुरूस्ती करून  राज्य सरकारला आरक्षणाचा कोणताही कायदा विधिमंडळात पारीत करता येणार नाही अशी ति घटना दुरूस्ती होती परंतु फडणवीस सरकारने या मुद्याचा विचार न करता विधिमंडळात मराठा आरक्षण कसे मंजूर केले हे कोणही सांगत नाही .  या घटना दुरूस्तीमुळे केवळ केंद्र सरकारच आरक्षणा संबधित कायदे करू शकते असा त्याचा अर्थ आहे व राज्याने केवळ शिफारस करायची आहे .   केंद्राने दोन्ही सभागृहात कायदा करायचा असतो व तो राष्ट्रपतींनी सही करून कायम करायचा असतो .  पण याकडे  सर्व संघटनांनी सुद्धा  दुर्लक्ष केल्याचे दिसून येते कारण आतल्या गोष्टी समाजापुढे येत नसतात व समाज मात्र  फरफटत जातो !  मराठा आरक्षण    याच मुद्यावर भाजपाने लोकसभा निवडणूकीत प्रचार केला आणि महाराष्ट्रात भरघोस यश मिळवले ! 
वरिल सर्व घटनाक्रम थोडक्यात लिहिला आहे .   यात थोड्याफार त्रुटी राहिल्या आहेत पण यावरून हेच दिसते की मराठा आरक्षण या विषयात कोणताही राजकीय पक्ष मराठा समाजाचे हित पाहणारा नाही .  फक्त वापर करा आणि वेळ मारुन पुढे चला हिच भुमिका सर्व राजकीय पक्षांची आहे .  सर्व राजकीय पक्षांना जर मराठा समाजाला काहीतरी द्यायचे असेल तर सर्वजण एकत्र येत मार्ग का काढत नाहीत. यांना फक्त राजकारण करायचे आहे . हे तरूणांनी लक्षात घ्यावे . . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९४२३६१३४४९

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा आम्हाला मान्य आहे का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा  आम्हाला मान्य आहे का ? 
भारत देश स्वतंत्र झाला आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी आली , बाबासाहेब सारख्या विद्वान व्यक्तीने इथल्या , सामाजिक, भोगोलिक,  सर्व प्रश्नांचा अभ्यास बारकाईने  केला , जगातील विविध घटनांचाही अभ्यास केला आणि विविध जाती धर्म पंत भाषा यांना एका चौकटीत आणून न्याय देण्याचा  प्रयत्न केला ,  कायदे व घटनेतही  काळानुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला , विविध कलमे , विविध विषय घटनेत समाविष्ट करून  सर्वांचाच समावेश घटनेत केला , त्याच प्रमाणे बाबासाहेबांनी , मुळ प्रवाहा पासून कोसो दुर लोकांसाठी प्रवाहात येण्यासाठी , प्रस्थापित लोकांपेक्षा , सामाजिक व आर्थिक  मागास राहिलेल्या लोकांसाठी , शिक्षण, नोकरी व राजकीय जागा यात आरक्षण दिले .  प्रामुख्याने हे आरक्षण एससी व एसटी समुदायातील लोकांसाठी होते , तेंव्हाची त्यांची लोकसंख्या ही ७ % व १३ इतकी होती व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत १००% आरक्षण दिले  पण  त्या मुळ एससी व एसटी मध्येही नंतर असंख्य जातींचा वेळोवेळी समावेश करण्यात आला त्यात राजकीय भाग होता व खरे सुद्धा लोक त्या निकषात बसणारेही होते , त्यामुळे   तो त्यांचा नैसर्गिक अधिकार होता कारण ते मुख्य प्रवाहापासून कोसो दुर होते .  आणि  बाबासाहेबांनी आरक्षणाची वेळोवेळी समिक्षा करण्याचे तेंव्हा घटनेत स्पष्ट केले होते .   तेव्हा इतर मागासवर्ग हा विषय अजेंड्यावर नव्हता , पण  संविधानात सर्व धर्मातील  मागासलेल्या जातींसाठी कलम ३४० मध्ये त्यांचे मागासलेपण दुर करण्यासाठी तरतूद केली होती आणि त्याच आधारे मंडल आयोगाची निर्मिती झाली होती .  मंडल आयोगाची निर्मिती १ जानेवारी १९७९ ला झाली तेंव्हाच्या मोरारजी देसाई सरकारने केली  पण तिच्या अंमलबजावणीला १९९२ साल उजाडले व त्या साठी व्ही पी सिंग यांनी पुढाकार घेतला आणि कांशीराम यांनी आवाज उठवला , खूप मोठी आंदोलने झाली  व व्ही पी सिंग यांना त्याची राजकीय किंमत सुद्धा चुकवावी लागली ,  १९८० सालापर्यंत  जनता पक्ष  व हा एक पक्ष होता व तेंव्हा जनता पक्ष फुटून  जनसंघ तयार झाला , म्हणजेच आत्ताचा भाजपा  ,  नंतर जनता पक्ष असंख्य वेळा फुटला , जनता दलाचे असंख्य पक्ष तयार झाले , तो विषय राजकीय वेगळा पाहता येईल,  पण 
 मंडल आयोगाने देशातील ३७४२ जातींना इतर  मागसवर्गीय ठरवून  त्यांची लोकसंख्या ५२%  तेंव्हाच्या लोकसंख्ये प्रमाणे गृहित धरून २७% आरक्षण दिले गेले व त्याची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली .  नंतरच्या काळात राजकीय सोईनुसार काही समाजांना विविध राज्यातील केवळ राज्य सरकारांनी  केंद्राकडे  शिफारसी  करून ओबीसीत समाविष्ट केले गेले , त्यांचे मागासलेपण ठरवण्यासाठी कोणत्याही आयोगाची शिफारस घेतली  नव्हती .  किंवा आयोगाने मागासलेपण   तपासले नव्हते .  आपल्या देशात 
गंमतीचा भाग असा  आहे की ,  एससी १३% , एसटी  ७% , ओबीसी , ५४ % मुस्लिम ११% ब्राह्मण ३% जैन २%  इतके सांगितले जातात?  हे होतात ९०%  मग मराठा , जाट, गुज्जर, रजपूत,  पटेल, (पाटीदार ) सी के पी , सारस्वत, वैश्य, मारवाडी , खत्री , बनिया ,  हे  सर्व मिळून फक्त १०% आहेत का ?  तर याचे उत्तर कुणाकडेही नाही मुळात  सध्याचे ओपनमधील जाती जवळपास   २० ते २५ % च्या आसपास    असतील.  
पण याचा  खर्या अर्थाने परफेक्ट डाटाच कुणाकडेही  नाही.  त्यामुळे कुणाचा वाटा कोण गिळंकृत करतंय तेच कळत नाही  आणि कुणाला काहीही   मिळतच नाही बरीच भानगड आहे , म्हणून प्रत्येक प्रवर्गात अ ब क ड, ई फ हे लोकसंख्येच्या प्रमाणात फोडून दिले पाहिजे म्हणजे प्रवर्गातील  कोणतीही  एकच जात  त्या त्या प्रवर्गातील संपुर्ण  आरक्षण गिळंकृत करणार नाही  आणि परफेक्ट डेटा नाही आणि  आरक्षणाचे वाद हे सुरू आहेत. मंडल आयोगाने सुद्धा  २० वर्षांनी आरक्षणाची समिक्षा करण्याची शिफारस केली आहे व घटनेतही तशी तरतूद आहे पण कोणतेही सरकार यावर काम करत नाही .  घटनेतील तरतूदीनुसार जर आरक्षणाची समिक्षा झाली  फेर आढावा घेतला  तर निश्चितपणे वादविवाद थांबले असते पण तसे घडत नाही .   घटनाकारांना जे समाज आरक्षणाचा फायदा घेतील त्यांनी मुख्य प्रवाहात यावे व जे मागास राहतील त्यांना ते मिळावे यासाठी तरतूद केली आहे .  पण हल्ली एकदा का  एखादा समाज त्यात समाविष्ट झाला की बाहेर पडायला विरोध होतोय,  व तो प्रवर्ग म्हणजे केवळ आम्हीच हे स्वतःच ठरवले जातेय  ,  कोर्टाने तर ५०% मर्यादा घातलीय मग यातून मार्ग कसा निघणार कि देश असाच घुमसत राहणार? 
खरेतर आरक्षणाचा फेरआढावा घ्यावा आणि  प्रत्येक समाजाला  लोकसंख्येच्या ५०% आरक्षण शिक्षण आणि नोकरीत द्यावे ,   व खूला गट सर्वांसाठीच   ५०% खुला असावा किंवा लोकसंख्येच्या पटीत सर्वांनाच १००% जागा वाटून आरक्षण द्यावे असेच वाटते . केंद्र,  राज्य सरकारला आरक्षणाचे  अधिकार असूच नयेत,  तर त्या साठी घटनेनुसार  स्वतंत्र  केंद्रीय अयोय असावा व त्यात सर्व जाती धर्मातील व सर्व राज्यातील गैर राजकीय  प्रतिनिधींचा समावेश असावा .  व  केवळ विशिष्ट  निकष लावून  प्रत्येकाची दर २० वर्षांनी समिक्षा व्हावी व फेरआढावा घ्यावा !  सर्व समुदायातील लोकांना लोकसंख्येच्या पटीत आणि क्रिमिलेअरची अट लावून आरक्षण लागू करावे .  व त्यातील मेरीटनुसारच जागा भराव्यात  नाहीतर आपला देश यादवीत कमजोर होईल. 
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९



बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

नवा पक्षीय विचार

चालू घडामोडींचे विश्लेषण


नवा पक्षीय विचार

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल! 
इथल्या मातीवर,                            प्रेम  करणार्‍या  सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून सुशिक्षित  समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं तरुण शेतकरी , व्यावसायिक, कामगार यांचा विचार करणारा  पक्ष पाहिजे . . ..
श्री  विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो  हि केवळ एक जात, एक समुह किंवा एक व्यक्ती परिवर्तन करू शकत  नाही .  तर त्या साठी  सर्वांनी  सामुहिक पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे .  हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व याच मातीतले . . यातील  काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या  आणि काही जणांना हाल  आपेष्ठांचे जीने नशीबी आले आणि काहींचे जीवन स्थिरस्थावर झाले   . . पण आजची परिस्थिती भयंकर आहे मोजके १० ते  २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .  प्रस्थापित व्यवस्था व राजकीय पक्ष हे सत्ता व त्यातून पैसा यातच गुंतले असून ठरावीक लोकांचे लांगूलचालन करत आहेत.  ८० ते ९० % जनतेवर नाहक विविध कर लादून लुटत आहेत, त्यांना दाबत आहेत. तात्पुरता  महाराष्ट्रातील माणसांचा  विचार केला तर, नोकरदार सुखी नाही , कामगार, शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसायिक सुद्धा सुखी नाहीत मग हे राज्य व देश कुणासाठी चालवले जाते हा प्रश्न आहे .  लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे पण  हे सत्य नाही पचत . . यावर पर्याय काय का ?  हे फक्त सहन करायचे ?  भविष्यासाठी काय योजना करायची का ठरावीक लोकांची गुलामगिरी स्वीकारून गुलामगिरीत जगायचे !  विचार करण्याची वेळ आली आहे ना ? 
 यासाठी  वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही आपण एकसंघ रहात नाही , कारण आपल्याला दाणे टाकून  जाती जातीत झुंजवले जातेय,    उच्चनिचता मनावर खोल रुजवून आपआपसात दुहिची बीजे पेरण्यात  आली व  इथेच सत्यानाश झाला . . 
 शिवकाळा अगोदर पासून   सर्वजण  गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील सर्व  घटक थोड्याफार  फरकाने  त्याकाळी सुखी  होते  कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात सर्व  समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात तर काहीजण  आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून मोर्चे  व  प्रतिमोर्चे  काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या  विरूद्ध कोर्टात  जावून एकमेकांच्या विरूद्ध लढत असतात  . . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून!  आम्ही फक्त संकुचित विचार करतो .  आजच्या घडीला   कोणत्याही  समूहातील  लोकांना इतरांची भिती का वाटते , तर एकमेकांची मने दुभंगण्याचे काम या ठिकाणी पद्धशीर झाले  . . खरेतर . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून  प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . ..तर  . परत एकदा  समाज मनातील कटूता जाईल व राजकारण वेगळ्या उंचीवर जाईल  . . .  कधीकाळी  गुण्या गोविंदाने नांदलेला समाज एकत्र येईल, कुणी मोठा व कुणी छोटा न राहता  सर्वांचा  बांधव होईल  . .  आणि   व्यापारी , कर्जदार, शेतकरी , व्यावसायिक,  कामगार  या सर्वांनाच संरक्षण मिळेल.  ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ताटातूट थोडेफार काढून  भले  त्यांच्या कडून कर्ज रुपाने  घेऊन, सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्न करता येतील!  
 सामान्य, कष्टकरी यांचे साठी कायदे आहेत त्याचा नीट वापर  करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा करता येईल  . . . . पण आज किती जण मनापासून  नवीन राजकीय विचार यावर बोलतील, प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून नवीन व्यवस्था स्वीकारतील  ?  यावरच सर्व भवितव्य ठरणार आहे .  बांधवांनो श्रींमत  २  ते ५ % लोक सर्वांना पिळत   आहेत. राजकीय पक्षांचे राजकारण त्यांचे साठीच आहे , याला पायबंद घालायची ताकद निर्माण झाली तरच सर्वांना भवितव्य आहे  . . किती जणांना वाटते , सर्वांना समान संधी व समान  सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते सर्वांचेच   प्रश्न सुटले पाहिजेत, सर्वांनाच मोफत  शिक्षण मिळाले पाहिजे . . . . सर्वांनाच  नोकर्यात लोकसंख्येच्या हिशेबाने  संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना हे व्हावे वाटते .  पण बहुसंख्य लोकांच्या मनात पक्षीय गुलामगिरी व नेत्यांची भलावण करून मिळेल तर पदरात पाडून जगायची सवय सहजासहजी बदलणार नाही , त्यासाठी ठाम रहावे लागेल, जो एकमेकां बद्दल   पुर्वग्रह आहे तोच घालवावा लागेल  , सर्वांना  न्याय देईल असा विचार करावा लागेल  . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित  पुढारपण करणार्‍या जातींना  त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्‍या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्‍या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्‍या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्‍या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९