vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ११ मे, २०१८

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

खेड्यातील सुखी समृद्ध भारत, कृषीप्रधान भारत ही देशाची ओळख संपण्याच्या मार्गावर आहे , वाढती लोकसंख्या , लोकसंखेवर आधारीत शहरात वाढणारे लोकसभा व विधानसभांचे मतदारसंघ यामुळे ग्रामीण भागातील कमी होणारे प्रतिनिधीत्व व शहरी लोकांना समोर ठेवून घेतले जाणारे निर्णय यामुळे ग्रामीण शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे, आज ज्यातून शेतकर्यांना हक्काचे चार पैसे मिळत होते, तो दुध धंदा पुर्णपणे तोट्यात आहे, पाण्याची किंमत सुद्धा दुधाला नाही , साखर कडू झाल्याने ऊसाला बाजार नाही, कित्येक साखरकारखाने आजारी आहेत, बंद पडत आहेत, दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत,साधी एफआरफी देवू शकत नाहीत,  तेलबिया , सोयाबीन, मका, कापूस, कांदा , तुर या पिकांच्या बाजारभावाची परिस्थिती तर  भयानक आहे , भाजीपाला , फळभाज्या याला मार्केटमध्ये कवडीमोल किंमत मिळत आहे .
या विदारक परिस्थिती मुळे ग्रामीण अर्थकारण पुर्णपणे कोलमडले आहे,
मुला मुलींची लग्ने रखडली आहेत, मुलांना शिक्षण द्यावे म्हटले तर हातात पैसा नाही ,वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट, हे तर जणूकाही पाचवीलाच पुजलेले आहे , वेळी अवेळी होणारे भारनियमन, सतत बदलणार्या भारनियमनाच्या वेळा काय काय वाढून ठेवले शेतकर्यांच्या नशीबी देव जाणे ,
काहीही कारण नसताना कॅनॉल लगतच्या व नदीकाठच्या शेतकर्यांचा खंडीत केला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुर्णपणे खचला आहे ,हैराण आहे  पाणी चोरणारे मोकाट व सर्वसामान्यांचा वीजपुरवठा खंडीत करणे हे महावितरण व इरिगेशनचे काम मोघलशाहीलाही लाजवेल असे आहे , ऊन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते , विहिरीत पाणी असतांनाही केवळ इरिगेशनचे  अधिकारी व महावितरणचे अधिकारी शेतकर्यांचा छळ करत आहेत, उभी पीके जळताना शेतकर्यांचे ह्रदय सुद्धा जळत आहे . शेतकर्यांनी जगाचे कसे हा प्रश्न आवासून निर्माण झाला आहे ,
बँकेच्या  कर्जाने, व  सावकारी कर्जाने शेतकरी घायाळ झाला आहे . तो पुर्णपणे घायला आलेला असतांना , शेतकर्यांना कोणताही दिलासा मिळत नाही , नुसत्या घोषणांचा पाऊस चालू आहे पण ग्राऊंड लेव्हल वर विकासाचा थेंब सुद्धा पडत नाही ,
शहरात भाजीपाला , फळे, धान्य, दुध,  मांस, अंडी स्वस्त मिळावीत म्हणून विविध मार्गाने निर्यातीत अडथळे आणून, तोच शेतमाल कवडीमोल दराने शहरात कसा जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते आहे!
शेतकर्यांना लागणारे बरेच घटक २८%जीएसटीत आहेत यामुळे आज ग्रामीण भारत मरणासन्न अवस्थेतून जात आहे , "बाप भीक मागू देईना व आई जेवायला घालेना "अशी अवस्था या देशातील शेतकर्याची करून टाकली आहे , यातून मार्ग काढायची भाषा नाही , कोणताही दिलासा नाही , रोज धर्म आणि जातीचे ढोल बडवून समाज दुभंगला जाईल अशा पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातुन शहरात जायचे म्हटले तर शहरी उद्योगपती , कारखानदार हे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवतात ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार कंपनीत मिळालाच तर  ६ महिने झाले की ब्रेक ठरलेलाच असतो !
शासकीय नोकर्या नाहीत, यामुळे प्रचंड वाढलेली बेरोजगारी व त्यातुन निर्माण होणारी गुन्हेगारी व गुन्हेगारीतून वाढणारे खून व बलात्कार आणि जातीय ताणतणाव, या दृष्टचक्रात सापडलेला तरूण कसा बाहेर येणार,
गावात साधे बांधकाम करायला सुद्धा वाळू भेटत नाही , नियतीने कोणता सुड उगवला हे कळायला मार्ग नाही ,
ग्रामीण भागातील कुणालाही शिक्षण परवडत नाही केवळ नैराश्य व चिंतेचे वातावरण आज जवळून पहावे लागतेय!
शिक्षण, नोकरी , व्यवसाय, धंदा या शिवाय तरूण पिढी भरकटलेल्या अवस्थेत जगते आहे . या सर्वांचा परिणाम मुले व्यसनी बनत आहेत, मावा , गुटखा , दारू तंबाखू , मटका याच्या आहारी जात आहेत, या सर्वांचा परिपाक म्हणून तरूण शेतकरी आत्महात्या करत आहेत,
असो हेही वेळ जाईल तरूण परत पेटून उठेल, ग्रामीण भारत नव्याने झेप घेईल, पण एक पिढी बरबाद झाली आहे ति तुम्हाला कधीच माफ करणार नाही !
जय जवान, जय किसान!
भारत माता की, जय!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

गरिबांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे का?

सर्व जातीतील गरीब मुला मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत किंवा माफक फिमध्ये मिळण्याची व्यवस्था व्हावी का ?

आज सर्वच जातीमध्ये गरिबांची संख्या लक्षणीय आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची आस आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घरातील मर्यादित उत्पादनाची साधने , अशिक्षित आईवडील, खेड्यातील जीवनमान, शहरात रहात असेल तर झोपडपट्टीतील राहणीमान, आठराविश्व दारिद्र्य  अशा  परिस्थिती मुळे अभ्यासत येणारे अडथळे या विविध कारणामुळे गरिबांची मुले , प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेर फेकली जात आहेत, त्यामुळे गरिबांचा उच्च शिक्षणातील आलेख फारच कमी आहे . गरिब मुला मुलींचे पालक एकतर रोजंदारीवर कामाला जातात, लोकांच्या घरी मिळेल ती सर्व कामे करतात, किंवा एकदम छोटा मोठा व्यवसाय करतात यात प्रत्येक जातीतील गरिबांचा समावेश होतो, बुद्धी असूनही , पात्रता असूनही , गुणवत्ता असूनही , या मुला मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते ही गोष्ट समानतेच्या तत्वाविरूद्ध असल्यासारखी वाटते ,
तसे पाहिले तर गरिबी ही जात पाहून येत नाही, श्रीमंत आणि गरिबांची सुद्धा भूक अन्न पाण्याशिवाय भागू शकत नाही , आज खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये गरिबांना जवळपास प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. शासकीय शाळा कॉलेज मोडीत काढून खाजगी शिक्षणसंस्थांच्या बाजारात केवळ श्रीमंतांना शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे , गरिबांची मुले खाजगी कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत, चांगल्या नोट्स मिळवू शकत नाहीत त्यामुळेही गरिबांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असते . आज शिक्षणाचा बाजार निर्माण झाला याला आळा बसणे केवळ अशक्य आहे , यापुढच्या काळात फक्त श्रीमंतांचीच मुलेच उच्चशिक्षण घेतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गरिबांच्या मुलांनी, आय आयटी, मेडिकल, किंवा इतर दर्जेदार कोर्सेससाठी प्रवेश मिळवण्याची स्वप्न पाहु नयेत का ?
प्रत्येकजण समानतेची , गुणवत्तेची भाषा बोलतो , परिस्थितीच विपरीत असेल, कोणतीही दर्जेदार साधने उपलब्ध नसतील, अभ्यासाला निकोप वातावरण नसेल तर हुशार असूनही चांगली गुणवत्ता कशी दाखवता येईल, जर आई बाप शिपाई, कारकुन, शेतकरी , मोलमजुरी , घरकाम, करणारे असतील तर पैशाअभावी ते मुलांचे व्यवस्थित संगोपन करू शकत नाहीत तर उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शाळा कॉलेज कसे निवडणार, ट्यूशन कशा लावणार आणि त्याकरिता पैसा कसा उभा करणार,
खरेतर जात पाहून शैक्षणिक फि ठरवण्यापेक्षा गरिबी व श्रीमंती पाहून शैक्षणिक फि ठरवायला पाहिजे शिक्षणाच्या पायाभूत सुविधाच गरिबांच्या मुलांना मिळत नसतील तर ति मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर स्पर्धा कशी करणार? शैक्षणिक साधना अभावी मार्क्स कसे मिळवणार, आज बहुतेक ठिकाणी डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात  , अधिकार्यांची मुले मोठ मोठे क्लास जॉईन करून अधिकारी होतात, केवळ अफाट गुणवत्ता व कुणाच्या तरी वरदहस्तामुळे ५ ते०% गरिबांची मुलेच एम पी एसी व युपीएसीच्या परिक्षांना बसतात व त्यातील काही यशस्वी होतात, बाकीच्यांच्या नशीब एकतर, रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ येते, कुणाला खाजगी नोकरदार व्हावे लागते , किंवा मिलिटरी , पोलिस भरती या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात,
आजच्या परिस्थितीत बहुसंख्य लोकांना शिक्षण परवडत नाही म्हणून ते सोडायची वेळ येते , शासकीय नोकरी नाही, खाजगी नोकरीत कायम होण्याची शक्यता नाही , आणि चांगल्या शिक्षणासाठी पैसा नाही या मुळे गरिब श्रीमंत अशी  प्रचंड तफावत व गरिबांमध्ये  मागासलेपणा निर्माण होत आहे .
याला पर्याय काय नुसते लेख लिहून प्रश्न सुटणार नाहीत तर जनमताचा रेटा लावून खालील उपाय शोधावे लागतील!
गरिबी हा घटक मानून सर्व शासकीय, खाजगी  , अशा शिक्षणसंस्था मध्ये किमान ५० %जागा आरक्षित कराव्या लागतील!
गरिबांच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे लागेल!
शैक्षणिक स्कॉलरशिप गरिबांच्याही मुलांना मिळालीच पाहिजे !
शासनाने उच्च शिक्षणात शाळा कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा रद्द केला पाहिजे !
खाजगी शाळा कॉलेज मध्ये सुद्धा गरिबांना ५० %जागा राखीव पाहिजेत!
अशा पद्धतीने जर उपाय केले नाहीत तर या देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही व त्यामुळे अराजक स्थिती निर्माण होवून श्रीमंतांना सुद्धा सुखाने झोपता येणार नाही !
दरोडे , चोर्या , खून, हे संपत्तीच्या विषम वाटणीतून होतील?
म्हणून गरिब मुख्य प्रवाहात यायचा असेल तर त्याला श्रीमंताच्या मुलांसारखे गुणवत्तापुर्ण व मोफत  शिक्षण मिळायला हवे आणि शिक्षणात यशस्वी झाल्या नंतर पात्रतेप्रमाणे नोकरीच्या व व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

आयुष्याचे सार्थक कधी होईल

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९