vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

पन्नाशीतील स्त्रिया...




आयुष्य जगताना मी मनापासून व्यक्त होतो कारण मला लोकांशी बोलायला ,संवाद करायला खूप आवडतं ,  आसपास जे काही घडतं त्यावर मी लिहित असतो ,व्यक्त होतो , मोजक्या लोकांशी मनमोकळेपणाने बोलतो  , कारण जीवनात आपण बोललोच नाही तर ,तुमचे व्यक्तिमत्व कितीही प्रतिभाशाली असलं तरी ते कुणालाच कळणार नाही,  या क्षणभंगुर आयुष्यात कितीतरी चांगले ,वाईट अनुभव येतात ते अनुभव मी सातत्याने लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न करतो ,
आज थोडा वेगळा विषय घेतला आहे, नक्की मन लावून वाचाल अशी अपेक्षा करतो.
आजचा विषय...
पन्नाशीच्या घरातील नारी शक्ती...
पंचेचाळीस नंतर व पन्नाशीच्या आसपास कित्येक  महिला थोड्या तणावमुक्त व आनंदी  राहतात, सुंदर  फॅशनची कपडे , अलंकार व अगदी छानपैकी मेकअप  करतात, त्यामुळे अजूनच  छान दिसतात,  थोडक्यात जीवनातील सर्वात आनंदी क्षण जगण्याचा प्रयत्न करतात,  काय असेल त्यांच्यात झालेल्या बदलांचे रहस्य?
   या वयात  संसाराला  25 ते 30  वर्षे झालेली असतात. संसार करताना त्या काटकसरी  असतात , सगळे बारकावे त्या शिकलेल्या असतात , नवऱ्याच्या कामाच्या व्यापामुळे त्या संपूर्ण घर सांभाळत असतात  त्यामुळे त्या जणू परिपूर्ण मुरलेल्या, रुळलेल्या असतात. पन्नाशीच्या घरात त्यांची शिकलेली, मोठी झालेली, किंवा कमावतीही असतात. त्यामुळे मुलांची जबाबदारी थोडी का होईना कमी होते. मुलांचा अभ्यास, मुलांचा स्टिफीन यातून काही होईना सुटका होतेच आणि मुलंही अगदीच आईवर फार अवलंबून नसतात.आपली कामं स्वतः करतात. मुलांना खायला देणं, क्लासेसला सोडणं - आणणं असं करावं लागत नाही . मुलंही मोठी झाल्यामुळे  मुलांचं  स्वतःच एक वेगळं  विश्व तयार होत . 
त्यामुळे ते त्यांच्या विश्वात   दंग - गुंग झालेले  असतात. मुलं जॉब , उच्च शिक्षण किंवा व्यवसाय यामुळे बाहेर पडतात व तिला थोडीशी मोकळीक मिळते , हो  ती जर स्वतः जॉब करणारी , नोकरी करणारी असेल, तर ती थोडी जरुर  गुंतलेली असते तिला ऑफिस असेल किंवा तिचा जो काही जॉब असेल तो करावा लागतो तरीही तिचे रुटीन परिपूर्ण असते  . 
जर फक्त ती 
गृहिणी असेल तर या वयात तिला थोडी का होईना  मोकळीक मिळते. विशीच्या घरात लग्न झाल्यापासून ती सतत एकापाठोपाठ एक अश्या जबाबदारऱ्यांमध्ये,  थकून जाते ,  घर सांभाळत ,  मंडई पासून कपड्याच्या स्वच्छते पर्यंत , घरातील नीटनेटकेपणा जपताना ती स्वतःला विसरून गेलेली असते अगदी नात्यांच्या गोतावळ्यात, नवरा - मुलं, सर्वांचे व स्वतःचे  आजारपण, सण - समारंभ, चालिरीती , घरातील परंपरा , आपली संस्कृती यात यात पुर्णपणे  व्यस्त असते.  हळूहळू दिवस सरतात पण तिच्या जबाबदाऱ्या काही केल्या कमी होत नाहीत , उलट वाढत जातात, त्यामुळे लग्नानंतर 25 ते 30 वर्ष  एवढ्या वर्षात तिला डोकं वर काढायला वेळच  मिळत नाही. प्रत्येक सासरी गेलेल्या संसारी महिलांना सगळ्या जबाबदारीतून   जावचं लागतं.  ती जेंव्हा लग्न करुन नवीन घरी येते तेंव्हा तिला सासरच्या स्वयंपाकाच्या पद्धती , अगदी डोक्यावर पदर सांभाळत घरातील सर्वांचा मान राखत ,सर्वांच्या आवडीनिवडी जपत   संसाराची तारेवरची कसरत करत  सासरी स्वतःला विसरून जावं लागतं  , नवरा समजुतदार असेल तरच तिला थोडेफार सुख मिळते पण नवरा जर तापट हट्टी संशयखोर असेल तर मात्र तिला पिंजऱ्यातील पोपटा सारखे बंदिस्त जीवन जगावे लागते असे करता  करता  25 /30  वर्षे सहज निघून जातात.  पण  स्त्री ही सहनशील ,प्रेमळ असते ती कुणावर राग काढत नाही की कुणाबद्दल आकस बाळगत नाही फक्त  तिची एकच माफक अपेक्षा असते तिला सर्वांनी समजून घेतले पाहिजे, तिला जाच हाट करु नये  , असा संसार सांभाळून   तिच्या आयुष्यात कुठेतरी येते थोडी स्थिरता येते ,तिला स्वतःसाठी  मोकळीक मिळते  आणि ति थोडे का होईना स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करते .  लहानपणी आई वडील, चुलते मालते, आजी आजोबा यांचा तिने धाक सहन केलेला असतोच व मोठेपणी नवरा, नंदा,सासु सासरे यांच्या इच्छा आकांशा पुर्ण करण्यात ति समरस झालेली दिसून येते. पण 
आयुष्याच्या  पन्नाशीत मात्र ति कणखर होते , तिला तिच्या अनुभवातून एक बळ प्राप्त झालेले असते व या वळणावर आता एकदम भक्कमपणे पाय रोऊन संसारात उभी असते. सगळ्या आयुष्यात ती तावून ,सुलाखून निघालेली असते अगदी   अनुभवाची तिची  शिदोरी काटोकाट भरलेली असते. तिचा वाढलेला असतो , तिला जगाची ओळख झालेली असते आणि ति प्रगल्भ होऊन   आत्मविश्वासाने वावरत असते  तिच्या चालण्या - बोलण्यात - वागण्यात  एक शिस्तप्रिय पण अतिशय सकारात्मक आत्मविश्वास तयार झालेला असतो. आता ती परिपूर्ण झालेली असते, आयुष्यातील नव्या इनिंग साठी तयार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 
तिच्यात  अवघडलेपणा  ,  कंटाळा बिलकुल दिसत नाही. खरेदी विक्री व्यवसाय , व्यव्हार  अचूक सांभाळते , स्वतःचे  निर्णय झटपट घेऊ शकते  तीच्या वागण्या बोलण्यात एक अनुभव संपन्न व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते.  वागण्या - बोलण्यात  तारतम्य बाळगते ,  हाती घेतलेली कामे व जबाबदारी ति आणि लिलया पेलते , कामाचा प्रचंड  उरक आलेला असतो ,  संसारातील नात्यांचे गमक तिला उलगडलेले असते. पै - पाहुण्यांचं दडपण कुठेतरी शिथिल झालेले असते किंवा प्रत्येकाचे स्वभाव तिला अवगत झालेले असतात, त्यामुळे  तिला दडपण  येत नाही.  ती पन्नाशीच्या घरात आल्यामुळे व नवरोबा कामात व्यस्त असल्यामुळे  घरातील सर्व  अधिकार तिच्याकडेच  आलेले असतात .
 भाजी करण्यापासून ते  खरेदी  करण्यापर्यंत ती निर्णय घेते , तिला बचतीची सवय असतेच ,त्यामुळे ती काटकर करतेच व यामुळेच  सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडत असते  .
संसाराची घडी व्यवस्थित बसलेली असल्यामुळे व स्वतःत नियोजन करत असल्यामुळे  कामे कितीही असली तरी योग्य नियोजनातून ती  कमीजास्त स्वतः वेळ काढतेच  म्हणून पन्नाशीत   तिला थोडी  मोकळीक मिळते. आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करते , थोडं शॉपिंग,  पार्लर , मॅचिंग कपडे सणवार व लग्न समारंभ यात नेलपॉलिश व हातावर मेहंदी काढून  आनंदी राहण्याचा तिचा मुड असतो आणि म्हणून ती  छान राहते. 
मुळात स्त्रीची निर्मिती करताना परमेश्वराने तिला   सुंदर बनवलेले असतेच फक्त तिचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी फार कमी लोकांकडे असते ,  ती मनाने जशी सुंदर असते तशीच ती सुंदर  दिसण्याचाही  प्रयत्न करते.
पन्नाशीच्या उंबरठ्यावर  वयाची झाक थोडीफार का होईना चेहर्‍यावर, केसांवर दिसून यायला लागतेच पण ति हार मानत नाही. तिला ती पन्नाशीत आली असे समजून घेत नाही, ती  यावर घरगुती, पार्लरमध्ये जाऊन उपाययोजना करत असतेच आणि यात गैर काही नाही. तसेतर स्रियांचे वजन हे लग्नानंतर नैसर्गिक वाढतेच पण काही स्त्रिया लग्नानंतर सुद्धा स्वतःला अगदी परफेक्ट ठेवतात, आहार ,व्यायाम , योगासने करतात किंवा काही जमले नाही तर किमान रोज चालतात . जसे वय वाढते तसा 
 वजनाचा काटाही "हळूहळू वाढत जातो" पण त्या त्यामुळे हार मानत नाहीत ,
वजन कमी करण्यासाठी  आटोकाट प्रयत्न करतात , फिरायला जाणे, योगा करने , डायट प्लॅन करने , सूर्यनमस्कार घालणे, दोनदाच जेवणे, सौंदर्य टिकवण्यासाठी व  वजन कमी करण्यासाठीची ऑनलाईन वेबिनार , ऑनलाईन  व्हिडिओ  बघत असतात. 
पण काहीही करून वजन कमी करण्याचा प्रयत्न सोडत नाहीत , तरीही वजन मात्र पाठ सोडत नाही.
खरंतर कितीही प्रयोग केले तरी भारतीय परंपरेत खूप सणवार व उपवास असतात त्यामुळे गोडधोड होते ,तळलेले पदार्थ व वरणभात यामुळेच वजन काही कमी होत नाही..पण 
स्वतःच्या सौंदर्याकडे  त्या  जातीने लक्ष देतात . कपड्यांच्या बाबतीतही  नवनवीन फॅशन , नवनवीन डिझाईन  आणि नवनवीन साड्यांचा त्या छंद जोपासत असतात.  कपड्यातील तोच - तो पणा टाकून ती नवनवीन फॅशनचे कपडे घालून  पन्नाशीत  मिरवतात . 
पन्नाशीच्या अगोदर फक्त पावडर , लिपस्टिक, मेहंदी  व निलपेंट यापुढे जात नाहीत , पन्नाशीत मात्र आता मात्र त्या  छान मेकअप करताना दिसतात  ब्लिच , फेशियल, हेअरकट , कंडिशनर , बरेच प्रॉडक्ट त्या वापरत असतात. जेवढं लक्ष तिने चाळीशीपर्यंत दिलेले नसते तेवढे  लक्ष ती  आता स्वतःकडे देते ,स्वतःची  सगळी हौस  पुर्ण करण्याचा प्रयत्न करते व  याच काळात तिचं मन भूतकाळात फार रमतं. माहेरच्या आठवणी , लहानपणीचे शाळेतील रमणीय दिवस  , कॉलेजच मधील स्वच्छंदी दिवस, कित्येक  मैञिणी आणि   गप्पात त्या हरवून जातात ... मावश्या - मामा, भावंड हे सगळं तिच्या मनात  परत परत आठवायला लागतं ! 
25/30  वर्षात आपल्याभोवतीचं लहान झालेलं वर्तुळ ती विस्तारण्याचा, मोठं करण्याचा प्रयत्न करते. 
           पन्नाशीत  नवीन व जुन्या   मैञिणी  तिला मिळालेल्या असतात. तिच्या मैत्रिणींचे जग तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.  कित्येक मैञिणी तिच्या सुखं - दुःखाच्या त भागीदार असतात. मैञिणी बरोबर   ती दिलखुलास हसते , गप्पांमध्ये रंगते, हॉटेलींग करते, सहलीलाही  जाऊन धमाल करते, छान - छान फोटो , व्हिडिओ  काढून ती शेअर करते, ती रिल्स पण बनवते जणू जगण्याचा ,  आयुष्याचा ती  भरभरून आस्वाद घेते.  सिनेमा असो की नाटक असो ती आता मैञिणींच्या गृप बरोबर करते.. कित्येक जणी  भिशी एकत्र लावतात   दांडिया ,गरबा खेळतात , मनात भक्ती गिते , भावगिते गुणगुणत असतात. काही स्त्रियांना 
 कधी कधी निराशा दाटून येते, एकटेपणा जाणवतो, राग अनावर होतो. अशावेळी त्या फक्त त्या जीवल मैञिणींकडे मन मोकळे करतात व स्वतःला सावरतात.  नाही म्हटलं तरी पन्नाशीत बहुसंख्य महिलांचा  अध्यात्माकडे थोडा कल वाढलेला दिसून येतो . सहाजिकच त्यामुळे त्यांना मनःशांती मिळते व आतंरिक ताकद वाढत जाते , पन्नाशीत  तिच्या आयुष्यात येणाऱ्या मोकळीकीचा  ती अश्या प्रकारे उपयोग करुन घेत. हो पन्नाशीतच त्यांना
भरभरून जगायला मिळते , आनंदी राहता येते . आणि म्हणूनच त्यांचे सौंदर्य  पन्नाशीत खुलून दिसते. 
खरेतर स्त्रियांना समजून घेणं आणि त्यांचेवर लिहणं तसं सोपं काम नाही पण मोडकं तोडकं लिहुन स्त्रिला समजून घेण्याचा मी प्रयत्न केलाय !
तुम्हाला काय वाटतं? अभिप्राय जरुर कळवा..
©®विजय पिसाळ, नातेपुते


शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

मानवी स्वभाव व गुलामगिरी!

चालू घडामोडींचे विश्लेषण



आपल्या आसपास जे घडते ते कशामुळे घडते ?
समाज व्यवस्था कशी तयार होते ?
मानवाच्या जीवनात गुणात्मक , रचनात्मक , फरक नेमका कशामुळे होतो !
एक राज्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतोय !
©®विजय पिसाळ ,नातेपुते.
खरंच मनुष्याचे जीवन शिक्षणामुळे, संस्कारांमुळे , ग्रंथ , महापुरुषांचे ऐतिहासिक दस्ताऐवज, धर्म ग्रंथ, कथा ,कांदबर्या , धार्मिक गोष्टी ,पौराणिक कथा वाचन , अवांतर वाचन ,यामुळे बदलू शकते की ,  
आपण जिथे वाढतो, जिथे आपण आसपास घडतंय ते पाहतो आणि जिथे आपल्यावर काही बिंबवले जाते यामुळे आपण बदलतो , बिघडतो की , आपण घडतो ? नेमका आपल्या जीवनाचा मार्ग कसा ठरत असतो ? आपली ओळख कशी तयार होते, आपण सकारात्मक आणि नकारात्मक विचार कसे करु लागतो ?
मनुष्य स्वभाव अनेक प्रकारचे असतात, खरे बोलणारे,  मितभाषी, तापट, रागीट,  मनमिळाऊ, विश्वासू, नाती जपणारे ,समजूतदार, सर्वांशी आपुलकीने वागणारे , असे अनेक प्रकारचे लोक या जगात असतात, कित्येकांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नाही  , काही  व्यक्ती  मोजकेच पण  अतिशय सोज्वळ बोलतात, सर्वांशी आदरार्थी वागतात , जास्त कधी व्यक्त होत नाहीत , आणि त्यांची छाप सर्वांच्या मनावर   पडते, तसे एखादी व्यक्ती घडते ती  आई वडील किंवा गुरुजींच्या संस्कारामुळे हे जरी काही अंशी  खरे असले तरीही , ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वावर असतो, ज्या सामाजिक परिस्थितीत त्या व्यक्तीच्या बालपणीचा कालावधी जातो , त्याच्यावर , त्याच्या कुटुंबावर  डोळ्यादेखत काही प्रसंग ओढावतात , ताणतणाव येतात ,  , त्याच्या बालवयात घरची आर्थिक परिस्थिती कशी असते यामुळेही सुद्धा एखादी व्यक्तीची  घडण होत  असते. ज्याच्या हाताला परिस्थितीचे चटके सोसावे लागतात तिथे , महात्मे घडतात हे तुम्हाला एखाद्या गरिब कुटुंबातला एखादा मोठ्या पदावर जातो तेंव्हा दिसते पण त्या पाठिमागे तो घडताना , त्याच्या समोर जी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीत तो जे भोगत असतो ते समाजातील कित्येकांना माहित होत नाही पण तो परिस्थितीने घडला हे घडल्यावर समजते ! तर काही वेळा  अन्याय, अत्याचार होतात ,  आणि परिस्थितीने तो वाईट मार्ग पत्करतो आणि समाज नव्या गुंडाना जन्म देत असतो हेही घडते !
 सगळी सुख ज्याच्या लहानपणी मिळतात , त्या मुलांमध्ये जनते बद्दल , समाजातील वेगवेगळ्या घटका बद्दल विशेष प्रेम नसते किंबहुना ते फार कमी असते, सोन्याचा चमचा जन्मता ज्यांना मिळतो त्यातील काही अपवाद सोडले तर बरेचसे जण हे ऐषोआरामात जगणे पसंत करतात किंवा व्यसनांच्या आहारी जातात ,त्यांना आईवडिलांच्या कष्टाची,त्यागाची जाणीव नसते , त्यांचा मित्र परिवार हा बहुतेकवेळा व्यसनी असतो किंवा गुंड प्रवृत्तीचा असतो असे मी अनेक ठिकाणी बघितले आहे. कारण जमिनीवर त्यांना सर्व साधारण गोष्टींचा सामना कधीच करावा लागलेला नसतो , आर्थिक संकट त्यांना माहित नसते , त्यामुळे त्यांना जाणीव हा प्रकार नसतो.
 मुळात समाजात वावरत असताना सगळे प्रकार हे तुम्हाला दिसतातच कारण निसर्गाचा नियमच तसा आहे , एकाच आई वडिलांच्या पोटी सुद्धा दोन चांगली लेकरे जन्माला येण्याची  शक्यता कमी असते, एखादा अतिशय कष्टाळू , दयाळू ,शांत असतो तर दुसरा उर्मट ,डांबरट , तापट , आणि सर्वांना त्रास दायक असतो ,  हे बदल का दिसतात ?
यात संस्कार सारखे जरी असले तरी संगत व जाणीव वेगवेगळी असते आणि म्हणून व्यक्ती परत्वे मनुष्य स्वभाव वेगवेगळे दिसून येतात,
"स्वभावाला औषध नाही" हे उगीच म्हटलं जात नाही.
काही लोकांना मनापासून खरे  वागायची इच्छा असते पण सामाजिक रचना अशा व्यक्तींना टिकू देत नाही, त्याला त्रास देणारे, त्याची फसवणूक करणारे ,त्याला नीट जगू देत नाहीत, आजकाल तर चांगल्या लोकांच्या मार्गात असंख्य काटे पेरलेले दिसून येतात  आणि चांगल्या लोकांच्या तक्रारी कुणी ऐकूनही घेत नाहीत,
गुंड ,भ्रष्टाचारी , यांचा सन्मान जागोजागी होताना  दिसतो व चांगली लोक हतबल होऊन वाईट मार्गाकडे आकर्षीत होताना दिसतात व त्यातूनच गुन्हेगारी व स्पर्धा वाढते , चांगले वागून काही उपयोग नाही ही भावना तयार होते तर अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोकांना समाजात मान सन्मान जास्त मिळतो  
 का  तर ?
"सामाजिक व आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या लोकांना , असे गुंड लोक किरकोळ मदत करतात त्यामुळे गांजलेल्या लोकांना गुंड व मवाली आयकॉन वाटायला लागतात" 
मला नेमकं काय म्हणायचं आहे हे समाजशास्त्र व अर्थशास्त्र समजून घेणारे योग्य प्रकारे समजून घेतील   ? मानवी स्वभाव असे का तयार होतात ते सांगताना , सामाजिक रचना काय आहे यावर ,मानवी स्वभावाची निर्मीती अवलंबून असते असे माझे मत तयार झाले आहे "
साध्या व सरळमार्गी लोकांचे  मन म्हणतं की लोक जसे आपल्याशी वागतात तसेच आपणही वागावे व त्याचेच दुसरे मन  पण, म्हणतं आपण तसे वागलो  तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील?
हि द्विधा मनस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक  घटना व घटक कारणीभूत ठरत असतात.
एखाद्यावर दया दाखवून तुम्ही त्याला मदत केली,समजा ऊसणे पैसे दिले, तो भुकेला आहे म्हणून मोफत जेवण दिले किंवा त्याला काही मदत केली तर त्याची जाणीव तो फार दिवस ठेवतोच असे  नाही अर्थात जाणीव ठेवणार पण असतात फक्त संख्या कमी असते.
 पण जर त्याला कुण्या सावकाराने पैसे दिले तर तो त्या सावकाराचे हजार वेळा पाय धरत असतो , सव्याज पैसे फेडतो व सावकाराच्या धाकात राहतो, पण ज्याने विना मोबदला मदत केली  त्याला तो लक्षात ठेवतोच असे नाही,   फुकट मिळाले तर किंमत ठेवत नाही व कुणी  सावकाराने कितिही  त्याला लुटले तर मात्र तक्रार करत नाही, याच मानवी स्वभावामुळे कित्येकदा लोक गुलामगिरी पत्करतात व स्वाभिमान सोडून वागत असतात. हात पसरण्यात धन्यता मानतात ,म्हणून
 अनेक लोकांना एकाच वेळी गुलाम करण्यासाठी आर्थिक दृष्टीने कमकुवत केले जाते व काही मदत करुन त्याच्यावर उपकारांचे ओझे ठेवून त्यालाच लुटले जाते ,मात्र तरीही तो सावकार,गुंड ,मवाली लोकांच्या लुटीला उपकार समजतो असे मानवी स्वभाव आहेत.
व जोपर्यंत लोकांना सावकाराने आपली लुच केलीय हे समजत नाही तोपर्यत तो सावकार त्याला देव वाटू शकतो पण जेव्हा लुट असाह्य होते तो सावकाराचे देणे फेडू शकत नाही तेंव्हा मात्र तो एकतर पुर्ण खचतो व आत्महत्या करतो किंवा संघर्षाची तयारी करुन सावकारांशी दोन हात करतो, सगळे सावकार अधिकृत नसतातच, ते फक्त गावगुंड पाळून लोकांना छळतात इतकेच,  हा लेख जे लुटले जातात त्यांना समर्पित!
विजय पिसाळ नातेपुते !

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

संवाद मनाशी

चालू घडामोडींचे विश्लेषण

माझे विश्व भावनांचे !
माझे जगने माझ्या मनाचे !
ओझे नाही मला माझ्या कोणत्याच नात्यांचे !
कारण माझे  सुत्र फक्त आनंदी जगण्याचे   !
कधी कधी रमत नाही मन !
एकांतात घालवावे वाटतात काही क्षण !
सतत विचार येतो काय कामाची संपत्ती आणि काय कामाचे धन !
मनाला वाटते फिरावे एकटेच कुठेतरी वनवन !
काही केल्या संसार सुटत नाही पण !
मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कधी असा अनुभव आलाय ?
 एखादा दिवस, त्या  दिवसातली एखादी वेळ विनाकारण अगदीच आपणाला अस्वस्थ करते.
नेमकं काय होतंय  हे कळत नाही ? 
काय हवंय  हे उमजत नाही? स्वतःलाही स्वतःशी बोलता येत नाही , आजवरच्या प्रवासात चुकलं की बरोबर हे सांगता येत नाही , आता पुढे काय हे ठरवता येत नाही ? होतं ना कधी कधी असे , आपल्या जवळ सगळं असतं पैसा असतो , सुंदर कुटुंब असती अवतीभवती छान मित्र, नातेवाईक ,असतात , कोणतंच टेन्शन नसते , अगदी झकास चाललेलं असतं तरीही कशाचा प्रभाव आपल्यावर पडतो हे मात्र सांगता येत नाही.
 काहीच समजून येत नाही. मन रमवण्यासाठी मग आपण कुठेतरी गावात , किंवा एखाद्या आवडीच्या मंदिरात , किंवा निसर्गाच्या सानिध्यात , नाहीतर जीवल मित्रांकडे जातो व काहीच जमलं नाही तर जे आपलं ऐकतात , जे आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात त्यांच्याशी काहीतरी शेअर करतो , बरोबर ना? आणि कुणीच काहीच जेंव्हा सोबतीला नसते तेंव्हा  आवडतं पुस्तक वाचतो ना आपण  , किंवा  जुने फोटो पहतो किंवा जुनी गाणी हेडफोन लाऊन ऐकावी वाटतात ना ? अगदी किशोरकुमार, लतादीदी , रफी , आणि तरीही मन बैचेन असेल तर भक्तिगीते, भावगीते ऐकावी वाटतात ना ?
आवडीचं गाणं रिपीट मोडवर परत परत ऐकावं वाटतं ना?, 
मन मोकळं करताना मी तर जमेल तसे लिहित राहतो , मनातील भावना व्यक्त करतो भले   चार ओळी का असेनात !
तसे तर आई वडील होते तोपर्यंत त्यांचे एक एक शब्द कानी पडायचे व मन तृप्त व्हायचे , मनाला वाटतं जगात सगळे बेभरवशी आहे , आहे जीवन सर्वांशी मनसोक्त बोलत , आनंदी जगावे बरोबर ना?पण तरीही कधी कधी 
   मन अजिबात  कुठेच  रमत नाही..
स्वतःला आपण विसरून जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात  एखाद्या दिवशी,एखाद्या वेळी, आपण असे का अवघडतो कु णास ठाऊक? 
विजय पिसाळ , नातेपुते!

मला भावलेली स्त्री !




चालू घडामोडींचे विश्लेषण

मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........

कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने  जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?

आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
  स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता  सर्वांना  कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच  पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा ,  विचार नाही केला कधी स्वता:चा, 
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा  !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती ,  स्त्री म्हणजे युक्ती ,  तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
 पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर  म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते  रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते का तिला कधी विश्नांती ?कधी थांबते का  ती ? कोणते विश्व असते तीचे  स्वतःचे ? कधी करते का ती काही  तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ! सगळे जीवन तिचे  विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते  परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे!
  कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे ! 
ति  कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार  , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं  खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाहीत  कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकसर करुन कायम चालवते संसार !
 विश्व तिचेही  मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला कधी काही  मिळत नाही!
तिलाही हवं थोडं  स्वातंत्र्य असा कोणी विचार करत नाहीत !
 तिला मिळाले जर  थोडे निर्णयाचे  अधिकार !तर  ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता समुद्रापार!
 म्हणून मुलगी कधीच नसते ती  वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते  आकाशाला घवसणी घालण्याचे ! उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे !
फक्त  तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देणारे 
 , धाडसाने  तिला  पाठबळ .देणारंं !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही ! 
  स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी ,  पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी ,  बहिण म्हणून  देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचाच मिळतो  आधार !
  सगळी नाती निभावताना  ति कधीच कमी पडत नाही , तरीही  तिच्या मनासारखं कधी होत नाही !
 संसारासाठी ती सोडते स्वतःचे हक्काचे   घरदार !
 कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार !
नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार!
कारण तिलाच टिकवायचे  असतात आई वडिलांचे संस्कार !
 बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा  कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही,  दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे!
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!
ती  तापाने  फणफणलेली असते , तिला खोकला आलेला असतो , तिझी  दुखते वेदनेने कंबर पण ती कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा  वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तिचं  भरुन येतं पण ति सगळं मजेत आहे असच सांगते कारण तिझे  कुटुंब हे तिचे विश्व असते व कसा का असेना  पतीलाच ति परमेश्वर मानते !

ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला  गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर  गीत आणि प्रयोग करते नृत्याचे , तेंव्हा दर्शन घडते खरे नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती अगदी मनमोकळी , तिचे वागणे असते आपलेपणाचे , अल्लड होते ,  लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन तिच्यातील  माणुसकीचे !
म्हणून स्त्रियांचा आदर करा ,मान राखा होतील संसार सुखाचे !
आणि मार्ग दिसतील तुम्हाला प्रगतीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949

मला भावलेली स्त्री




चालू घडामोडींचे विश्लेषण

मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........

कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने  जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?

आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
  स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता  सर्वांना  कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच  पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा ,  विचार नाही केला कधी स्वता:चा, 
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा  !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती ,  स्त्री म्हणजे युक्ती ,  तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
 पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर  म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते  रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते कधी विश्नांती , कधी थांबते का  ती , कोणते विश्व असते तीचे  स्वतःचे , कघी करते का ती तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ,  सगळे जीवन तिचे  विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते  परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे ,  कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे ! 

ति  कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार  , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं  खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाही कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकर करुन कायम चालवते संसार !
 विश्व तिचे मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला मिळत नाही स्वातंत्र्य आणि तिचा कधीच सहजासहजी करत नाहीत विचार, पण तिला दिले ना थोडे अधिकार तर  ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता  समुद्रापार , म्हणून मुलगी कधीच नसते वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते  आकाशाला घवसणी घालण्याचे , उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे फक्त  तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देऊन , धाडस करा पाठबळ .देण्याचे !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही , 
  स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी ,   पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी ,  बहिण देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचा आधार !
  सगळी नाती निभावताना  ति कधीच कमी पडत नाही , तरी समाज प्रत्येक गोष्टीत तिलाच धरतो जबाबदार !

 संसारासाठी ती सोडते स्वतःचे घरदार , कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार , नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार, कारण तिलाच टिकवायचे  असतात आई वडिलांचे संस्कार !
 बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा  कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून 
स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही,  दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे, 
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!

तु तापाने  फणफणलेली असतेस , तुला खोकला आलेला असतो , तुझी दुखते वेदनेने कंबर पण तु कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा  वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तुझं भरुन येतं पण तु सगळं मजेत आहे असच सांगते कारण तुझे कुटुंब हे तुझे विश्व असते व पतीला तु परमेश्वर मानतेस !

ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला  गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर  गीत आणि प्रयोग करते नृत्याचे तेंव्हा दर्शन घडते नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती 
अगदी मनमोकळी तिचे वागणे आपलेपणाचे , अल्लड होते ,  लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन माणुसकीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949


मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

बा.ज. दाते प्रशाला, माझी शाळा

चालू घडामोडींचे विश्लेषण


मला आज थोडं लिहायचं आहे परत एकदा तुझ्या आठवणीत रमायचं आहे.
बालपणी लागला तुझा लळा !
तुझ्यामुळेच मी पाहिला पाटी पेन्सिल व फळा !
माझी आवडती तुच एक शाळा !
मित्र मैत्रीणी आणि  सोबती तुझ्यामुळेच झाले गोळा !
सर्व सुखांची एक तु आठवण !
जीवलगांची ह्यदयात साठवण !
खरंच तुझ्यावर कितीही लिहिलं तरी मला शब्द कमी पडतील पण तुझ्या आठवणी संपणार नाही.
होय मी विजय पिसाळ ,नातेपुते !
  एक सामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण विदयार्थी म्हणून तुझ्या कडे आलो आणि तुझ्यामुळेच मी घडलो ! ©®विजय पिसाळ नातेपुते. 9665936949
हो हो मी माझी प्रिय शाळा  डॉ. बा.दाते प्रशाले बद्दल थोड व्यक्त होतोय ! मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय शेवटपर्यंत वाचाल ही अपेक्षा करतो ...
 मी विजय शंकरराव पिसाळ व माझे सगळे मिञ व मैत्रिणी यांनी1987 /1988 या वर्षी दाते प्रशालेत  प्रवेश घेतला आणि  तिच्या अंगणात खेळू लागलो  शिकु लागलो , मस्तपैकी  आनंदाने दिवस घालवत होतो किती मजेचे ते दिवस होते , प्रशालेच्या सहवासात असतांना माझी शाळा या विषयावर  खूपदा मराठीत  मोडकी तोडकी  पत्र लिहिली. निंबध लिहिले  तेंव्हा मराठी विषयात  जेमतेम मार्क मिळायचे म्हटलं तर मी सर्वसाधारण विदयार्थी अगदी कसेबसे पासिंग आणि हस्ताक्षर तर खूपच खराब .. पण, आज आनंदाने माझ्या शाळेविषयी लिहिताना अभिमान वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच कारण, मला व माझ्या मित्र मैत्रीणींना तुझी  येणारी आठवण व आमच्यातील घट्ट मैत्रीचा तुच एक धागा , तुझ्या मुळे आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर ,वकील  शिक्षक ,तर कुणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तर कुणी तुझ्या संस्कारातून तयार झालेली अभ्यासू  मित्र व मैत्रिणी मिळालेत , खरेतर  बारावी  परीक्षेनंतर( 1995 )तुझ्या पासून दूर जात असताना वाटायचं आता मस्तपैकी कॉलेज करुया , मौजमजा करुया , स्वच्छंदी जगुया , आपले विश्व खूप मोठे होईल आणि पंखांना बळ येईल म्हणून बारावी नंतर  काही वेळ आनंदी जीवन जगायला मिळेल  असं वाटायचं , ग्रॅज्युएशन झालं ,पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरीही मी शाळेपासून दुर गेलो याच फार वाईट वाटलं नाही. कारण त्या वयात एकच धारणा होती ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका झाली !...
 आता आकाशात मी स्वच्छंदी  झेप  घेतली ... या कल्पनेत मी रममाण झालो होतो ,मी  वेगळ्याच हवेत होतो असेच थोडक्यात .. जेंव्हा मी कॉलेज व पी जी पुर्ण केलं तेंव्हा मला समजलं नाही आपली तीच ती शाळा होती व त्या शाळेची मजा जगातील कोणत्याही ठिकाणी गेला तरीही येणार नाही.
 आता मात्र मी जेंव्हा केंव्हा शैक्षणिक आयुष्यात डोकावतो ,चर्चा करतो तेंव्हा आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या तथाकथित आयुष्या पेक्षा या उंच  आकाशापेक्षा मला माझ्या दाते प्रशालेचा पिंजरा,  हो  तो पिंजराच किती छान होता ,किती   सुरक्षित होता याची वारंवार  प्रचिती येते .. छडी मिळाली तरी दुःख नाही की , परिक्षा जवळ आली म्हणून कधी टेंशन नाही . खरोखर खूप 
दंगामस्ती करायची, खूप खेळायचं ,एकमेकांचे डबे खायचे , एकमेकांना चिडवायचे हो , खूप खूप बिनधास्त भांडण करायचे पण कधीच खुन्नस नसायची एक दिवसात परत जीवलग मैत्री असायची , मी  मुलांशी काही मुलींशी तेंव्हा खूप भांडलो पण कधी त्यांचे बद्दल राग नसायचा कारण मैत्री म्हटलं की भांडण पाहिजेच , खिजवायला हवंच ,मस्त वाटतं , आजही मी गंमतीने भांडतो , खेचाखेची करतो ,सगळे समजदार असल्यामुळे तात्पुरते चिडले तरीही आपलेपणा जपतात , वैचारिक मतभेदांना मैत्रीत थारा देत नाहीत आणि म्हणून मला माझ्या शाळेतील मित्र मैत्रीणींचाही अभिमान वाटतो , तेंव्हा    एखादी गोळी सुद्धा आनंद द्यायची खरंच ते दिवस आठवले की मन भरून येतं , चिंचा ,बोरं किती मनसोक्त खालली  आम्ही , खरचं सगळे   मित्र मैत्रीणी खूप छान आहेत अगदी  वयाने मोठे आहेत पण आपलेपणा तोच आहे , काहींची परमेश्वरी इच्छेमुळे एक्झिट झालीय पण त्यांच्या आठवणी सुद्धा तशाच सतावत असतात ,  म्हणून  आम्हाला आमच्या शाळेची जाता येता आठवण येते , आमची  शाळा मात्र तशीच जाता येता उभी आहे ...

आजही वाटत दाते प्रशालेच्या  पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बसावं पाठीवर दप्तर घेऊन यावं ..परत तीच  घंटा वाजावी , वाघ मामा , साळवे मामा , अभंगराव मामा,  वसगडेकर मामा  यांनी  वाजवलेल्या घंटेचा  आवाज परत परत कानी यावा  .....
राऊत सरांनी परत एकदा म्हणावं परेड सावधान ! परेड विश्राम !
जोशी मॅडम यांनी सुंदर पटी वाजवत , प्रार्थना व 
 राष्ट्रगीत आणि पसायदान म्हणावे होय  ती  प्रतिज्ञा आणि  रोज वेगळी प्रार्थना म्हणायची इच्छा आहे. एन बी  दिक्षीत सरांचा तबला कानावर पडावा  आणि आम्ही तल्लीन व्हावे ... 
 फळ्यावर भरते सरांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेला  सुविचारही वाचायचा आहे.
 बडवे सर , जमदाडे सर , कुचेकर  सरांचे
विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहावेत ...
गणिताच्या एस पी  दिक्षीत सरांनी परत एकदा लसावी व मसावी व प्रमेय  शिकवावीत  , हो सगळे आलेख काढूनच जायला लागेल पण हरकत नाही , एस पी  दिक्षीत सर म्हणजे विद्यार्थी घडवणारे मनापासून आवडणारे गुरुवर्य आणि आयुष्यभर ज्यांचे उपकार फिटणार नाही असे व्यक्तीमत्व, वाया गेलेला विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिक्षीत सरांचा खूप मोठा वाटा आहे. 
शिंदे सरांच्या इंग्रजी तासाला जर लक्ष दिले असते तर कदाचित वेगळ्या वळणावर असलो असतो, सर खूप जीव तोडून शिकवायचे पण मी कधीच इंग्रजीचे पुस्तक उघडले नाही, शब्द पाठांतर केले नाहीत की मनापासून इंग्रजी शिकली पाहिजे असे तेंव्हा वाटले नाही.
इयत्ता दहावीला ढोपे सर जर इंग्रजीला आले नसते तर कदाचित पहिल्यांदा डबल परिक्षा द्यायला लागली असती , ढोपे सरांनी व्याकरण खूप चांगले करुन घेतले आणि म्हणून माझी गाडी पुढे सरकली ,  जैन सर , कसबे सर, ढवळे मॅडम, बर्वे मॅडम साळवे सर,  असे अनेक शिक्षकांनी शिकवताना कधीच भीती वाटली नाही. राऊत सरांनी खेळाच्या बाबतीत खूप चांगली प्रॅक्टिस घेतली आणि खेळाचा मनसोक्त आनंद घेतला ,
खोचरे सरांनी व एन बी दिक्षीत सरांनीही खेळाच्या तासाला भरपूर खेळ शिकवले ,तसेच खडतरे सरांच्याही तासाला मजा यायची !
बाबर  सरांचा
मंत्रमुग्ध करणारा इतिहास  परत परत  ऐकायचा आहे...इतिहास म्हणजे पाठांतर करायला आवडणारा विषय मनापासून आवडायचा 
आणि हो
इयत्ता पाचवी ,सहावी,सातवी व आठवी ,नववी पर्यंत ढवळे मॅडम यांचा मराठीचा तास हवा पण दहावीसाठी मात्र मला परत एकदा  मराठीचं व्याकरण जोशी मॅडम यांच्या कडून शिकवायचय कारण तेंव्हा फळ्याकडे थोडं कमी लक्ष होतं म्हणून माझं कधी कधी लिहितांना दिर्घ र्हस्व चुकतं !
आणि मला आठवी ते दहावीला एम पी के मॅडम 
 संस्कृतसाठी पाहिजेत ,कारण अनेक सुभाषितं विसरलोय , उजळणी व पाठांतर हवं आहे. ब मधून अ मध्ये जायचंय व खास संस्कृतच्या तासाला बसायचं आहे, मन लावून सुभाषित ऐकायची आहेत  !
मधल्या सुट्टीत घरुन   आणलेला डबा आणि मित्रांचा डबा एकत्र  खायचाय , मनसोक्त कबड्डी, खो-खो , खेळायचं आहे
 आणि स्काऊट गाईडसाठी परत एकदा ,मांडवे , शिंगणापूर व धर्मपुरी बंगला या ठिकाणी ,
तीन तीन  दिवसांची शिबीर पाहिजेत , सोबतीला डी डी के सर, जाधवर सर , कसबे सर , स्वामी सर ,डांगे सर , एन बी दिक्षीत सर असतीलच , 
ग्रंथालयात जास्त गेलोच नाही पण जेवढी  पुस्तकं शशी काकांकडून आणली तेवढी मी मन लावून दारी धरत वाचली  व अजून  वाचावी वाटतात ... एखाद्या ऑफ  तासाला बाकावर कान ठेवून तबला पण वाजवावा वाटतोय किंवा दंगा करत बसावे वाटतंय , मला अजूनही आठवत, एकदा  मैदानावर खेळायला गेलतो  व मुली मात्र वर्गातच होत्या मी  अचानक  वर्गात आलो तर माझे दप्तर गायब झाले , बघतोय तर दप्तर व माझ्या सगळ्या वह्या पुस्तके  पोरींच्या हातात 😃 पटापट दप्तर व वह्या पुस्तके माझ्याकडे आले,मी पण काय बोललो नाही व त्या पण बोलल्या नाहीत, विषय समाप्त नाहीतर परत आम्हालाच मार मिळाला असता राऊत सरांचा !
26 जानेवारी व पंधरा ऑगस्ट  स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायला जावसं वाटतंय  नानासाहेब देशमुख, आर एफ दोशी , चंद्रकांत घुगरदे अशी मोठ्या उंचीची माणसे व शिस्तप्रिय व्ही एस कुलकर्णी सर यांना परत एकदा पहायचं आहे ..होय 
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलेलं बक्षिस स्काऊट गाईडचा गणवेश घालून घ्यायचं आहे. रनिंग व वेट लिप्टिंग मध्ये मिळवलेला पहिला नंबर परत काढायचा आहे. शामची आई परिक्षा द्यायला व जोशी मॅडम यांचेकडून शिकायला आवडेल, स्वामी विवेकानंद यांचा वेश परिधान करुन , स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतील ते भाषण परत एकदा  विजय चित्र मंदिर या ठिकाणी म्हणायचं आहे.
पहिल्यांदाच भरते सरांनी पाठांतर करुन घेतले होते व मेकअप पण केला होता!
"All Americans are my Brother and sister" याने सुरुवात करायची व चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट हवाच , " रघुनाशेठ उराडे, शांतीलाल शेठ गांधी, जंबुकुमार दावडा अशा मोठ्या लोकांसमोर तो कार्यक्रम होता.
वार्षिक स्नेहसंमेलनात , ग्रामपंचायत पटांगणात ,विजय पिसाळ ,बापु रुपनवर ,सुधिर काळे व अजून कोणतरी मिळून एक नाटक केलं होतं तेही परत करायचं आहे.
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात इयत्ता दहावीत असताना स्काऊट गाईडचा संघनायक म्हणून पाहुण्यांना व ध्वजाला सलामी द्यायची आहे फक्त स्वामी सर हवेत सराव घ्यायला ! खाकी हाफ पँट ,अजूनही आठवते , रस्त्यावरुन  मोठ्याने  ....भारत माता...की......जय.....अशी आरोळी ठोकायचीय !
परीक्षेच्या कालावधीत पाठांतर करायचे आहे तेही घरची कामे करत करत , इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र, विज्ञान, गणित, भुमिती ,इंग्रजी खूप खूप छान शिकायचे आहे व  सारा अभ्यास करायचाय... आवडत्या विषयांचे पेपर सोडवताना पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...
    खर सांगू  शाळेत जेवढं शिकवलं तेच डोक्यात बसायचं घरी कामं खूप असायची त्यामुळे होमवर्क कधी पुर्ण होत नव्हता , गणित व इतिहास , विज्ञान व भुगोल मनापासून आवडायचे , व म्हणून मनापासून शाळेत येऊन बसायचे आहे व शाळे   सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत .  खरं मला सायन्सची आवड होती अकरावीत फार समजत नाही मी एच के सरांच्या तासाला थोडा गोंधळ केला व सरांनी माझ्यावर एक तास लेक्चर दिलं ,मला तेंव्हा वाईट वाटलं आणि मी सायन्स सोडून कॉमर्सचा वर्ग निवडा तिथेही अकाउंट, इकॉनॉमिक्स, सेक्रेटरी प्रॅक्टिस , यासाठी पाटील सर , होळ सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं , वाणिज्य अशा विषयांचा अभ्यास केला  , कॉलेज करताना बि कॉम केले तिथेही   स्टँट व मॅथ्स , इकॉनॉमिक्स, अकाउंट ,बँकिंग या विषयांचा अभ्यास करायला मिळाला  , अगदी नंतर  मी माझ्या आवडीच्या कला शाखेतून , इतिहास, पॉलिटिक्स, सायंटिफिक मेथड ,मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलं व पॉलिटिक्स विषय घेऊन एम ए केलं  पण कुठेच दाते प्रशाले सारखा मनापासून आनंद मिळाला नाही .
 मित्रांनो आपण  परत एकदा  आपल्या शाळेत जाऊया  ती आपल्याला  बोलावते आहे , कदाचित फळे बदलले असतील  पण त्याच भिंती ,तेच ग्राऊंड व तिच इमारत पहायची आहे.
होय दाते प्रशाला सांग ना ?  मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?
    १२ वी निरोप समारंभाच्या वेळी तेंव्हा मुख्याध्यापक असलेले  व्ही एस कुलकर्णी सर यांचे भाषण आजही आठवणीत आहे.
“तुम्ही या शाळेत जे शिकलात ते कितीही मोठे झालात तरी विसरू नका , तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुम्हाला या शाळेची आठवण येत राहिल व या शाळेतील आनंदी क्षण  तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
   म्हणून वाटते !
ते  घालवलेले शाळेतील  दिवस  आपल्या जीवनात  परत येणार नाहीत... याची  मला अगदी मनोमन जाणीव आहे...
दाते प्रशालेतीचे या लेखातून ह्यदयापासून आभार मानायचे आहेत . कारण भारत मातेच्या लाखो लेकरांवर हजारो शाळा संस्कार करत असतील पण आपली  शाळा व आपले  गुरुजन हे केवळ शाळा व गुरुजन नव्हते तर ते साक्षात होते एक विद्येचे माहेरघर , विद्येचे मंदीर व त्या मंदिरात मला व माझ्या मित्रांना   ज्ञान देणारे  साक्षात परमेश्वर समान गुरुजन , म्हणून मला लिहिण्याचे वेड लागले व बोलण्याचे धाडस प्राप्त झाले ! प्रत्येकाचा मान कसा राखावा , कुणाचा  आदर करावा हे धडे कुठल्याच पुस्तकात मिळत नाहीत , त्यासाठी हवी दाते प्रशाला !
माझ्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली ती केवळ दाते प्रशालेत  बहुसंख्य शिक्षकांनी शिकवलेल्या एका एका धड्यातून , सांगितलेल्या एका एका गोष्टीतून!
जगण्याचं व लढण्याचं बळ प्राप्त झालं ते तिथेच 
 आज  शेती ,व्यवसाय आणि माझ्या आयुष्यात जे  चांगल घडलं आहे हे दाते प्रशालेतील  सुसंस्कृत ,संस्कारी गुरुजनांचं पाठबळ आहे..
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, जेंव्हा जेंव्हा मी उंच भरारी घेईन तेंव्हा दाते प्रशालेचा विद्यार्थी म्हणून  मी दाते प्रशालेचे  नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...©®
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते…
9665936949
😊

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

मराठा समाजाची दिशा काय असावी


चालू घडामोडींचे विश्लेषण

मी शक्यतो
मराठा बांधवांनो  जातीच्या विषयावर लिहित नाही , बोलत नाही किंवा त्यावर जास्त व्यक्त होण्याइतपत मला ज्ञानही नाही. हो मी तुमचा बांधव श्री विजय पिसाळ नातेपुते. तुमच्याशी आज या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय , माझे तुम्हाला मत पटले तर विचार करा नाही पटले तर सोडून द्या!
तर बांधवांनो मी माझे वैयक्तिक मत तुमच्या समोर या मिडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय ,नंतर सविस्तर पणे माझ्या युट्युब चॅनलवर व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न करेन, खरेतर आपल्या देशात  प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या  जातीचा अभिमान असतो , फक्त कुणी तो जाहीर दाखवतो तर कुणी समाजाच्या कामातून दाखवतो तर कुणी छुपा का होईना जातीचा अभिमान बाळगतो ही मी अनेक ठिकाणी पाहिलंय , अनुभवलंय, व काहींचे अनुभव मला त्यांनी शेअर केलेत , म्हणून तुम्हाला सांगतो आपण समाजासाठी एखादी मागणी करताना , एखादी गोष्ट सरकार दरबारी मांडत असताना इतरांच्याही भावनांना ठेच लागणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे, मला मान्य आहे की मराठा समाजात जितके अती श्रीमंत, श्रीमंत लोक आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने गरीब पण आहेत , आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ठोस मागण्या आपण सरकार दरबारी करायलाच हव्यात , जसे की , गरिब मुलांना शैक्षणिक शुल्क माफी , होस्टेल व मेस मध्ये सवलती,  हुशार मुला मुलींना , स्कॉलरशिप  ,मेडिकल , इंजिनिअरिंग व ज्या ठिकाणी शैक्षणिक फि , खूप जास्त आहे ती फि माफी होण्यासाठी  सरकार दरबारी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
अजून एक अत्यंत महत्त्वाचे , मराठा समाजाला कोणतेही सरकार ओबीसीतू आरक्षण देणार नाही हे अगदी सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. फक्त ओबीसी बांधवांना ज्या शैक्षणिक सवलती व जेवढे शैक्षणिक शुल्क भरावे लागते तेच गरीब मराठा समाजाला भरावे लागले पाहिजे यासाठी सरकारवर  निश्चित दबाव टाकणे योग्य राहिल .
  कितीही आंदोलने झाली तरी मराठा समाजात फुट पाडायचे राजकीय डावपेच हे सर्व राजकीय पक्षांना माहित आहेतच , त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाचा नेता आरक्षण  देणार असे बोलत असेल तर ते तो  खोटं बोलतोय हे ध्यानी घ्या ,  मराठा- दलित, मराठा- ओबीसी, मराठा-मुस्लिम , मराठा -ब्राह्मण असे वाद लावून सगळ्या राजकीय पक्षांनी आपआपली पोळी भाजून घेतली आहे पण मराठ्यांच्या पदरात काही मिळालेले नाही, व मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर अगदी सर्वांनीच केलाय व नेत्यांना त्यातून पाहिजे ते मिळाले आहे पण गोरगरीब मराठ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून मराठा बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे,  जो अभ्यासात हुशार आहे त्यांने मन लावून अभ्यास करावा , व फक्त क्षमता असेल त्यांनीच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करावेत , न्यायपालिका, आयटी क्षेत्र यात विशेष परिश्रम घेऊन संधी प्राप्त कराव्यात तिथे  क्षमता असेल तर तुम्हाला संधी आहेत  पण सरसकट सर्वांनी एकमेकांच्या नादी लागून स्पर्धा परीक्षा देत बसू नये  किंवा सर्वांनीच आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इंजिनिअरिंग करु नये पण स्वतःकडे क्षमता असेल तर निश्चित ते क्षेत्र निवडावे अन्यथा वेळ पैसा खूप जातो आणि मानसिक ताणतणाव येऊन जीवनात नैराश्य येते व   इतर क्षेत्रात करिअर करायच्या संधीपण निघून जातात ,  ज्यांना शेती आहे  पाणी आहे  त्यांनी शेतीत मन लावून अभ्यासपुर्ण शेती करावी , शेतीकडे दुर्लक्ष करु नये , शासनाच्या योजनांचा फायदा जरुर घ्यावा पण त्या योजनांसाठी एखादा प्रोजेक्ट बिलकुल करु नये , केवळ आणि केवळ आपले उदिष्ट हे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो व ज्या पिकांमध्ये रिस्क कमी असते ती पिके घेऊन , त्याकडे पुर्ण लक्ष देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कार्यरत रहावे ,  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा , बाजारभाव जरी हातात नसला तरी एकाच पिका ऐवजी वेगवेगळी पिके घेऊन व ताजे चलन कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे , मजूर टंचाई खूप भासतेय त्यामुळे सर्वच क्षेत्र लागवडीसाठी न वापरता काही क्षेत्राला विश्रांती द्या ,  विषमुक्त , सेंद्रिय शेती हे ऐकायला मस्त वाटते पण करायला थोडे कठिण असते म्हणून सेंद्रिय व विषमुक्त शेती करायचीच असेल तर , अगोदर या शेतीच्या मार्केटचा अभ्यास करावा ,  व शेती करताना  पिकांची फेरपालट करा , जरी सरकारी धोरणे शेतकरी विरोधी असली तरी ,  नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवा आणि ज्या पिकांना सरकार हात लावू शकत नाही अशा पिकांवर लक्ष द्या, सोयाबीन, कापून ,कांदा या पिकांची लागवड थोडी हिशोबात करा व एकरी उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करा , हे झालं शेतीचं , अजून खूप तुमच्याशी शेअर करायला मुद्दे आहेत हळूहळू प्रत्येक मुद्दा मी बोलत राहिल , मित्रांनो  तुम्हाला जिथे कुणाचाही द्वेष ,राग मत्सर शिकवला जात नाही अशा कोणत्याही संघटनेत जायला हरकत नाही पण जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी, धंद्यासाठी द्या,  बहुजनवाद , हिंदुत्व वगैरे गोष्टी फक्त राजकीय आहेत , त्याने तुमच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, तुम्हाला तरीही जावेच वाटले तर नक्की जा पण घरात आपल्या पीठ आहे का  हे पण बघा , आपल्या आई वडिलांना शेतात , धंद्यात मदत करा , नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व कोणतेही काम हलके समजू नका व कोणत्याही व्यवसायाला लाजू नका ,  सकाळी रोज 100 पेंढ्या कोथिंबीर विकून आनंदी व मजेत जगणारे लोक मी पाहतो तुम्ही पण मंडईत जाऊन बघा, फक्त सकाळी दोन तास ,संध्याकाळी दोन तास काम असते,
बांधवांनो  आजचे युग हे खाजगीकरणाचे आहे ,त्यामुळे खाजगी नोकरीत जास्त पगार मिळणार नाहीत किंवा तुम्हाला परमनंट ऑर्डर पण भेटण्याची शक्यता कमीच आहे, म्हणून ज्यांना जमेल त्यांनी न लाजता परिस्थितीनुसार ,  किराणा, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक,  हॉटेल ,मेस ,पान टपरी ,फर्निचर , वेल्डिंग, पंक्चर , गाड्या दुरुस्ती , रिपेअरिंग , शिलाईकाम असे शेकडो धंदे आहेत करण्यासाठी धडपड केली पाहिजे, काही दिवस जम बसायला लागतो, शून्यातून सुरवात करावी लागते ,पण न खचता काम करत राहिले तर धंदा यशस्वी होतो हे 100% सत्य आहे. 
आणि सगळ्यात महत्वाचे मराठा बांधवांनो आपण मोठेपणासाठी नको तिथे वारेमाप खर्च करतो तो टाळायला हवा, साधेपणा व कमी खर्च यातूनच बचत होऊ शकते, मानवी जीवनात रोज संकटे येतात , त्यामुळे थोडी बचत करा , आणि आपण स्वतः व्यसन करु नका , कुणाला व्यसन लावू नका व जर कुणी व्यसनी होत असेल तर त्याला व्यसनापासून दुर करा , व्यसनामुळे कितीतरी बांधवांनी जमिनी विकल्यात, कितीतरी बांधव कर्जबाजारी झालेत व कितीतरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत,  आणि अजून खूप महत्त्वाचे आपल्या घरात एकनिष्ठ रहा , कुटुंब ही संपत्ती आहे , ती टिकवा , एखादा चुकला तर थोडे दुर्लक्ष करा पण नको तिथे हुज्जत घालून वेळ व पैसा बरबाद करु नका, बाई ,बाटली , नाच गाणे यात जो वहात गेला तो बरबाद झाला हे विसरू नका, जमिनी शक्यतो विकू नका आणि तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल , नवीन चांगली गुंतवणूक असेल  तरच काही जमिन विकायची वेळ आली तरच विका पण शक्यतो जमिनी परत मिळणार नाहीत, याचे भान सदैव असुद्या ,आपल्या  समाजात व इतर कोणत्याही समाज बांधवांबरोबर  कोणताही व्यव्हार करताना  फसवणूक करु नका , विश्वासाला तडा जाईल असे वर्तन केले तर थोडाफार फायदा काही काळ होईल  मार्केटमध्ये नाव खराब होऊन कालांतराने त्याचे वाईट व दुरगामी परिणाम होत असतात, आपल्या घरातील सर्वांना  वाचन ,लेखन याची आवड निर्माण झाली पाहिजे , अध्यात्मिक  पुस्तके , कथा काव्य ,कादंबरी, महापुरुषांची चरित्र , धर्मग्रंथ , आणि यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा  ,त्यातून संस्कार होत असतात हे ध्यानी घ्या , आपले सर्व जाती धर्मातील  शेजारी, आपले भावबंध यांच्या सर्व सुख दुःखात सहभागी व्हा , सर्वांना मदतीची भावना ठेवा , आपोआप तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, राजकारणात भाग घेताना आपली योग्यता, स्वतःचे सामाजिक काम , याचाही विचार करा ,केवळ आपल्याच बांधवांना त्रास देण्यासाठी , भावकीची जिरवण्यासाठी  राजकारणात भाग घेऊ नका,  आपल्या समाजातील आपल्या गावातील एखादा जर राजकीय दृष्ट्या सक्षम असेल ,त्यांना किंमत असेल तर पायात पाय घालू नका, तो मराठा असो की कोणत्याही जातीचा असो  नेहमी सपोर्ट करा तरच तुमची कामे होतील  व इतर समाजातील कोणत्याही नेत्याबाबत खालच्या लेवलला जावून टिका करु नका, त्याने तुमचे संस्कार दिसून येतात, 
मराठा समाजाचा कुणीही शत्रू नाही, ब्राह्मण, मुस्लिम, ओबीसी, दलित बांधव हे हजारो वर्षापासून मराठा समाजाचे नैसर्गिक मित्र आहेत , कुणीही आपला विरोधक नाही, कुणीही आपला स्पर्धक नाही व कुणीही आपल्याला त्रास दिलेला नाही , आपले सर्व जाती धर्मातील लोकांशी पिढ्यानपिढ्या  ऋणानुबंध राहिले आहेत, एकमेकांना सर्वांनी मदत केलीय हा इतिहास आहे, काही वाद हे सर्व राजकीय पक्षांनी पेरलेले आहेत व त्यापासून आपण सावध असले पाहिजे.
आपल्या घरी सर्व जाती धर्मातील लोक येतात व त्यांचे आदरपूर्वक स्वागत आपण करतो हे संस्कार आपल्यावर आपल्या पूर्वजांनी केलेत याचा विसर पडू देऊ नका , आपल्या समाजातील काही प्रश्न सोडवण्यासाठी इतरांना टार्गेट करणे हे अत्यंत चुकिचे आहे,
हो मी पण माझे शेतीचे प्रश्न मांडताना सरकार विरुद्ध लिहितो पण व्यक्तीगत द्वेष ,जातीय चेष्मा  म्हणून माझे लिखाण नसते, राजकीय भुमिका वेगळी व सामाजिक काम ते मराठा समाजाचे असो कि ,  बाकीचे सामाजिक काम असो तिथे कोणताही पुर्वग्रह नको की कुणाच्या भावनांना ठेच नको ,
न टिकणारे आरक्षण रद्द करावे व ईडब्ल्यूएसचा लाभ समाजाने घ्यावा हे माझे मत आहे.
आणि सर्वात महत्वाचे सरकार कडे जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रही रहावे , सर्वांची संख्या समजली तर प्रत्येक समाजाला त्याचा फायदा होईल व सरकारला सुद्धा सर्व समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी योजना राबवताना सर्वांना लोकसंख्येच्या पटीत आर्थिक तरतूद करता येईल.
मला खूप बोलायचं आहे लिहायचं आहे पण सर्वांना माझे मत रुचेल असेही नाही.©®
विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

भावनांची गुंतवणूक

चालू घडामोडींचे विश्लेषण

भावनांची गुंतवणूक!
©®विजय पिसाळ, मनाशी संवाद साधताना !

माणसं ही मनापासून एकमेकांना समजून ,सुद्धा समजूतदार वागतातच असे नाही ,   भावनाची कदर हल्ली कुणाला  करावी वाटते असेही दिसत नाही, आज काल माणूसपण हरवत चाललंय , एकांत आणि एकटेपणा यातच प्रत्येक व्यक्ती स्वतःच विश्व म्हणत आहे.  आपलेपणा कुठेतरी हरवत चाललाय , आज विश्वासाला तडे जात आहेत  आणि विचारांची देवाणघेवाण कमी होत आहे. स्वच्छंदी जगण्याची व्याख्या वेगळीच असते. पै पाहुणे , नातीगोती , मित्र , शेजारी पाजारी सगळं जग हे व्यव्हारी झालंय, फायदा नसेल तर बोलतानाही हातचा राखला जातोय , फायदा फक्त आर्थिक असतो असे नाही ,स्वतःची मते इतरांनी स्वीकारली पाहिजेत , तरच ती व्यक्ती योग्य आणि जर वैचारिक विरोधी विचार असेल तर ती व्यक्ती चुकिची आणि म्हणून त्या व्यक्तीचा संबंध सुद्धा नको ही भावना आजकाल वाढीस लागते ,  आणि एखादी व्यक्ती व्यसनी  असेल , खोटी असेल पण ती आपलं ऐकत असेल तर मात्र ती व्यक्ति चांगली असते असा मानवी स्वभाव आजकाल दिसून येतो.
मी जेंव्हा समाजात वावरतो तेंव्हा माणासांचे स्वभाव मला समजून येतात , 
 माणसं माणसांना कमी पण बाजारात खरेदी केलेल्या  वस्तूंना जीवापाड  जपतात.  घर ,गाडी कपाट ,  स्वच्छ करतात , साचलेली घाण, जळमटे साफ करतात. एखादे मशीन बिघडू नये म्हणून  तिचा नियमित वापर करतात , आपली गाडी सुद्धा रोज  फिरवतात, दिवाळी ,दसरा ,पाडवा या दिवशी तीची पुजा करतात , तिचे सर्व्हिसिंग नियमित करतात , तेलपाणी करतात. तिचे लाईफ वाढले पाहिजे ही भावना असते , सगळे लोक भविष्याचा विचार करून काही  वस्तूत म्हणजेच सोने ,चांदी , अशा वस्तूत गुंतवणूक करतात. वस्तू खरेदी केल्या कि त्याचं  सेलिब्रेशन केले जाते , पण आजकाल भावनांची गुंतवणूक होताना दिसत नाही , प्रत्येक गोष्टीत मान अपमानाच्या तराजूत नाती तोलली जातात,  पैसा मिळाला व त्यातून  ,सोने ,चांदी ,जमीन खरेदी केल्या नंतर पेढे वाटले जातात व आनंद साजरा केला जातो पण या  वस्तू  कधी असतील, नसतील किंवा त्याचं मुल्य कमीजास्त होईल याची कल्पना असतानाही त्यावर प्रेम केले जाते पण  आजकाल भावनांची कदर व गुंतवणूक होत नाही एखादी वस्तू  तुटल्यावर , फुटल्यावर किंवा हरवल्यास ,निराश होतात,  अस्वस्थ होतात, काहीही करून अगदी तुटलेली   वस्तू जोडू पाहतात.  पण जिवंत माणसांना माणसे सहजासहजी जोडत नाहीत, अगदी आटलेला झरा प्रवाही होऊ शकतो , समुद्राला भरती ओहोटी येऊ शकते पण माणसं मात्र तुटलेला संवाद जोडत नाहीत , परकीय शत्रू राष्ट्रांचाही संवाद सुरु होतो पण तात्विक कारणांनी ,मतभिन्नता असेल , द्वेष केला जातो ,  तिटकारा करतात व  माणसे संवादच बंद करतात हा मानवी स्वभाव का होत आहे?     मुक  व निर्जीव वस्तुंशी माणसे  संवाद करत असतात .  तिथे मात्र  समजूतदार  होतात. आजकाल तर  निर्जीव वस्तू नसतील तर माणूस  जगण्याची कल्पनादेखील  करू शकत नाही इतकी सवय त्या निर्जीव वस्तुंची होते , माझं पैजण, माझं कानातलं ,माझं घड्याळ, माझा मोबाईल यातच त्यांचं विश्व असतं आणि सजीव नात्यांचा गोडवा नसतो की ,भावनांची कदर नसते . का हरवत चाललाय हा संवाद?
प्रत्येक वस्तू आम्हाला सुंदर हवी , आकर्षक हवी , टापटीप हवी पण  मनातील , राग, मनातील  दुःख अशी  जळमटं साफ करायची कल्पनाच आम्ही करत  नाही , इतरांच्या पराभवात , इतरांच्या वेदनात ,इतरांच्या दुःखात हल्ली कोणच वाटेकरी नसतो , उलट त्याचा आनंद राजरा कसा  करता येईल याचे विचार मंथन केले जाते.
मानवी नाती आटलेल्या प्रवाहासारखी दिसतात , भावनांची तहान भागवताना मात्र दमछाक होते .
 संबंधात    गोडी  असावी      यासाठी नवीन काहीही करत नाहीत, त्यामुळे नाती दुरावतात ,ती  अबोल होतात. 
 तसंही आपण सगळे माझा परिवार, माझा संसार ,  माझं घर, माझी प्रॉपर्टी , माझं हे माझं ते सगळं माझं ,माझं करतो पण ती हस्तांतरित होतं याची कल्पना असूनही  ते मिळवण्यासाठी झटत असतो व शेवटी यातील काय सोबत येते व काय  उपयोगाचे असते  याचा सारासार विचार कधीच केला जात नाही?
 चैनीची वस्तू खरेदी केली तर तीचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी धडपणारी माणसं , माणसांना वापरताना  कशाचीही कदर करत नाहीत, राजकारणात जसे वापरले जाते तसे आज सगळीकडेच वापरले जाते अशी मानवी मनाची भावना रुजत चाललीय , मला माझेच आत्मचिंतन करावे वाटते , मी व्यक्त होतो ,मी लिहितो , कुणी माझे ऐकावे म्हणून नव्हे तर स्वतःच्या  मनाशी तरी संवाद साधुन चिंतनशील रहावे या भावनेतून, 
   का असे होत असेल ?म्हणूनच मला वाटू लागते   निर्जीव वस्तूंना सुद्धा सुंदर लाईफ आहे आणि त्यांना काळजीपूर्वक जपले जाते व त्या टिकतात, मात्र जीवापाड जपलेली नाती व माणसे आजकाल टिकणे कठीण झालंय असं नाही वाटत तुम्हाला?. 
मोबाईल दोन मिनिट सापडला नाही तर जीव कासावीस होतो , शोधा शोध होते पण , ऋणानुबंध जपायला मात्र  जीव तुटत नाही कारण सजीवांशी संवाद हरवलाय व अनोळखी निर्जीव वस्तु बरोबर संवाद मात्र हवाहवासा वाटतोय ? होय ना?
 माणसे दुरावली तरीही कोणी जास्त दुःखी दिसणार नाही पण मार्केट मधून साधी चप्पल आणली व ती तुटली तर मात्र आम्ही दुःखी होणार?  निर्जीव वस्तुंवर आम्ही प्रेम करतो व पण माणसे  तुटण्याचं दुःखही होत नाही.  आजकाल तर  तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या. यालाच समजूतदारपणा  म्हणतात . 
शेवटी  एकाच बाजूने नात्याचा तोल सांभाळणारी व्यक्ती थकते आणि  मनात स्वतःशीच संवाद साधते , चिंतनशील व्यक्ती पुढे पर्याय नसतात कारण त्यांनी भावनांची गुंतवणूक केलेली असते.
  मायाळू माणसं हल्ली शोधावी लागतात ती सापडत नाहीत .  म्हणून मला आसपास दिसते 
निर्जीव होत आहेत व वस्तु मात्र सजीवांशी एकरूप ?
खरं आहे ना ?
©®विजय पिसाळ ,नातेपुते.....

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

शालेय मैत्री ! कारे दुरावा ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



















का रे दुरावा ...
एक छोटासा प्रयत्न जीवलग मित्रांसाठी ... 
श्री . विजय पिसाळ नातेपुते!!!
क्षणभंगुर आयुष्यात कोणते मागणे नाही !
 माझे तुला कोणतेही सांगणे   नाही !
आपुली, आपलेपणा पहिल्या सारखीच  फक्त जप , मैत्री सारखे शुद्ध नाते नाही !
विश्वास होता, विश्वास आहे , मैत्रीत दुरावा योग्य नाही!

मैत्री जपली तर काळजाचा तुकडा वाटते !
आणि 
मैत्री तुटली तर काळीज तुटते !

 संवेदनशील व्यक्ती मैत्री करतात ,मैत्री जपतात व समजूतदार वागतात !
खरेतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना असंख्य मित्र होतात पण !
शालेय मित्रांची गोष्ट काही वेगळीच असते !
एकाच वर्गात शिक्षण घेत असताना खूप भांडायचे ,चेष्टा करायची , कधी कधी तर हाणामारी पण करायची आणि पुढील शिक्षणाच्या निमित्ताने, किंवा वेगवेगळ्या कारणांनी शालेय जीवनातील शैक्षणिक वाटा बदलल्या नंतर ,  दुर गेल्या नंतर , परत कित्येक वर्ष भेटीगाठी नाहीत, कित्येक वर्ष संपर्क नाही, कित्येक वर्ष कोण कुठे याचा ठावठिकाणा नाही फक्त चुकून कुठे कोण भेटले तर तो काय करतो , कुठे असतो , त्याचा फोन वगैरे मिळतोय का ? बघ की , गेट टुगेदर करुयात , मग शोधाशोध सुरु होते,  त्याचे नाव ,तिचे  नाव शोधायचे संपर्क मिळवायचे , लग्नानंतर तिचे नाव वेगळे , मग तिचे  फेसबुक प्रोफाइल कोणत्या नावाने असेल ,ति कुठे असेल असे एक एक करत पत्ते ,फोन नंबर शोधायचे ,  आणि हळूहळू संपर्क होतात , लहानपणीच्या आठवणी, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या दंगा मस्ती यावर मेसेंजर वर बोलणे होते , तु काय करतो ,तुझं काय चाललंय याची चौकशी होते , व्हॉटसअॅप नंबर शेअर केले जातात , व्हॉटसअॅप वर शालेय बाल गोपाळांचे ग्रुप होतात आणि परत एकदा दंगामस्ती , तासंतास चेष्टा मस्करी , गेट टुगेदर, शिक्षकांची चौकशी, कार्यक्रमाचे नियोजन, धमाल मस्ती , 
 परत काही जणांशी ,तात्विक, वैचारिक, राजकीय मतभिन्नता, मग काही जण एक्झिट, तर काहीजण अबोल तर काहीजण वेळेच कारण देत तथास्तु आणि निरव शांतता...
वय वाढल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण नाही का संयम ठेवू शकत ,  कधी कोण चुकला हेच उगाळत बसायचे का ?  ग्रुपमध्ये ग्रुप करुन गैरसमज कमी करण्या ऐवजी वाढवायचे का ? हीच आपली मॅच्युरिटी का ?  कित्येक वर्षांनी जेंव्हा भेटलो ,संपर्क झाला तेंव्हा
मला तुला काहीतरी सांगायचे आहे, तुला वेळ आहे का ? आरे तु कुठे आहेस तुला  वेळ असेल तर भेटायला ये इकडे कधी येतोस का ?  , फक्त येताना तासभर अगोदर फोन कर म्हणजे मी घरी थांबेल , एकमेकांची चौकशी, व्हॉटसअॅप वर न चुकता बोलणे, वेळ असेल तेंव्हा न चुकता खुशाली विचारणे , जोक शेअर करणे , माहितीची देवाण घेवाण करणे , 

मनसोक्त बोलावे , तासंतास बोलत रहावे , मनात काहीच न ठेवता  कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना , पहिल्यांदा सर्व काही त्याच व्यक्तीला सांगावे , कोणताही संकोच मनात न ठेवता मनातील  सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात ,  धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात, कधी वेळ मिळाला तर त्याच व्यक्तीला भेटावे , काही वेळ एकमेकांसोबत घालवावा , चहा ,कॉफी ,नाश्ता याचा आग्रह करत हसतखेळत बोलून सुख दुःख शेअर करावीत , एकमेकांनाचा इतका विश्वास असतो की , कोणतीच गोष्ट एकमेकांनी एकमेकांपासून लपवली जात नाही, 
या नात्यात ,जात धर्म, हुशार , कमी हुशार, गरिब श्रीमंत हा विचार नसतो, कितीही मतमतांतरे झाली तरीही एकमेकांचा आदर करत नाते जपले जाते आणि ते नाते म्हणजे *"मैत्री"*
आणि शुल्लक गोष्टीवरुन किंवा कुणाच्यातरी गैरसमज पसरवण्यावरुन   मित्रांना एकमेकांपासून दुर करण्या पर्यंत स्वतःत बदल करणे हे योग्य आहे का ?
तुम्हाला काय वाटते ?

माझे तुझे काहीच मतभेद नाहीत, तरीही का कोण जाणे तुला आता वेळ नाही?

©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

मानवी स्वभाव

चालू घडामोडींचे विश्लेषण

मानवी स्वभाचा थांगपत्ता लागणे तसे महाकठीणच ! 
तुम्हाला माहित असेलच ,तुम्हाला अनुभव आला असेलच , या जगाची रित काय असते ते ,  आपण या  दुनियेत वावरत असताना जेंव्हा आपण सामान्य असतो तेंव्हा कुणी आपल्या अवतीभवती नसते , मोजके मित्र किंवा मोजकेच नातेवाईक आपल्याशी संबंधित असतात, जेंव्हा आपण चांगले पैसे कमावतो , आपल्याकडे चांगले घर,गाडी ,आणि अजून बरेच काही असते तेंव्हा अजून माणसे आपल्याकडे आकर्षित होतात,  आणि आपण जर काही मंडळांना, सामाजिक काम करणाऱ्या लोकांना मदतीचा हात पुढे केला तर खूप माणसे जवळ येतात,  आपण राजकीय आखाड्यात उतरुन थोडा हात सैल ठेवताच कित्येक अनोळखी सुद्धा मागे फिरतात ,  मग आपण अजून हवेत जातो आणि आपण खर्च करत राहतो पण जेंव्हा आपला हात कमी खर्चिक होतो तेंव्हा बरेच लोक दुर दुर होत जातात आपली आठवण लोकांना व्हायचे कमी होत जाते. हे खरं आहे का?
मित्रांनो अजून एक मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे , ते म्हणजे पैसा,राजकारण व आर्थिक हितसंबंध यामुळे जोडलेले लोक कधी ना कधी दुर जातात पण आपल्यातील असलेल्या कलागुणांवर प्रेम करणारे, आपल्या कामावर प्रेम करणारे वआपल्या चांगुलपणामुळे जीवनात आलेले लोक मात्र कायम सोबत राहतात, त्यांना पैसा श्रीमंती या पेक्षाही व्यक्ती आपली वाटते , आपल्या विचारांना ते मानत असतात . याचा प्रत्येय मला आला ,
माझ्याही जीवनात
 वेगवेगळ्या कारणांनी 
  कित्येक जण माझ्या सोबत  जोडले गेले यात शालेय जीवन, कॉलेज ,व्यावसाय ,सोशल  मिडिया, खेळ यामुळे खूप यादी मोठी होत गेली , कळत नकळत  कित्येकजण अत्यंत विश्वासू बनले,  मला  त्यांचा पुर्ण स्वभाव समजला आहे , ते आपली कदर करतात , आपण सुद्धा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही पाहिजे  असे आपण आपल्या मनाशी ठरवतो   ,मुळातच आपण इतके हळवे आणि भावनिक असतो की , प्रत्येक व्यक्ती ही  मनापासून आपल्याशी आपलेपणाने बोलते  असेच  मनोमन वाटत   वाटते , आणि आपण निगेटिव्ह कधीच विचार करत नसल्यामुळे   कुणाबरोबरच  आपले मत निगेटिव्ह तयार होत नाही.  कुणा बद्दल आपण मनात किंचितही कटूता ठेवत नाही पण कधी कधी आपल्या विषयी , आपल्या राजकीय ,सामाजिक भुमिकेविषयी किंवा आपल्या बद्दल आपल्या परस्पर काही लोकांनी चुकिची मतं मांडली तर अंत्यत विश्वासू व्यक्तीचाही गैरसमज होतो व काही व्यक्ती आपल्या पासून अंतर ठेवू लागतात . तेंव्हा मात्र  काहीच सुचत नाही,  कित्येक लोकांना आपण जीवलग मानतो, पण सगळेच आपल्याला जवळचे मानतील असेही नाही. खरेतर 
मानवी स्वभाव ओळखणे व एखाद्याच्या मनाचा थांगपत्ता लावणे महाकठीणच ,
मित्र,जीवलग मित्र, नातेवाईक, रक्ताची नाती , असे अनेक लोक आपल्या जीवनात जोडले जातात पण खरेच आपण  सर्वांना जोडताना त्यांचे मन कधी जाणू शकतो का ? एखादी व्यक्ती  बोलताना  गोड बोलते , आस्थेवाईकपणे चौकशी करते , आपल्याशी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करते , आपणही आपलेपणाने आडपडदा न ठेवता मनमोकळ्या गप्पा मारतो व त्या व्यक्तीला सहाजिक एक विश्वासू मित्र किंवा आजच्या युगात बेस्ट फ्रेंड म्हणतो पण अशा व्यक्तीने कुणाचेतरी  ऐकून आपल्या बाबतीत गैरसमज करुन घेतला तर , आपल्याला काय वाटू शकते ?
तुमचे अनुभव काय?

तुमचे मत काय?

मित्रांनो मला एकच सांगायचे आहे , एकदा मैत्री केली तर ,ओठात एक पोटात एक असे कधीच करु नका, जे काय असेल ते स्पष्ट वागा,व्यक्त व्हा , बिनधास्त बोला , ज्यांना योग्य वाटेल ते समजून घेतील, ज्यांना योग्य वाटणार नाही ते सोडून जातील .खरं आहे ना?

विजय पिसाळ नातेपुते.

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

समाजरत्न मा.श्री.कै.राजेंद्र (भाऊ) पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते गावच्या राजकीय पटलावरील एक तारा हरपला  !

नातेपुते व पंचक्रोशीत ज्यांचे नाव आदराने घेतले जात होते. ज्यांचा नातेपुते गावात शांतता व सलोखा राहण्यात महत्वाचा सहभाग होता आणि ज्यांना घराण्याचा मोठा वारसा लाभून सुद्धा कोणताही गर्व नव्हता , सर्वांना ते भाऊ म्हणून परिचित होते असे नातेपुते गावचे आदरणीय व्यक्तिमत्व समाजरत्न कै.राजेंद्र (भाऊ) पांढरे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि नातेपुते गावातील गोरगरीबांचा आधार हरपला , कोणताही गोरगरीब दारात गेला आणि त्याला भाऊंनी मोकळ्या हाताने कधी पाठवले असे झाले नाही. गोरगरीबांचे लग्न असो की अजून कोणतीही अडचण असो लोक भाऊंकडे जायचे आणि भाऊ त्यांना वडिलकीच्या नात्याने जवळ करायचे , चार चांगल्या गोष्टी सांगायचे व अडचण दुर करायचे ,भाऊंनी आपला परका असा भेदभाव केला नाही. महादेवाची यात्रा असो की , नातेपुते गावातील कुस्त्यांचा फड असो की , बेंदराचा सण असो भाऊंचा सक्रिय सहभाग असायचा व भाऊंचा शब्द कुणीही मोडत नव्हते .भाऊंनी देशी गोवंशावर निस्सिम प्रेम केले , जातीवंत खिल्लार गाई बैलांचा खूप आपुलकीने सांभाळ केला , लांबून लांबून जातीवंत खिल्लार खोंड आणुन नातेपुते परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी मदत केली. गोपालणातून भाऊंना फारसा आर्थिक लाभ नव्हता किंबहुना तोटाच होता पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात सदैव असायची, नातेपुते विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार भाऊंनी अतिशय काटकसने केला , शेतकऱ्यांना कर्ज देताना कधीच दुजाभाव केला नाही. सोसायटीच्या माध्यमातून  चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरण करताना गोरगरीबांना पुरवठा विभागातून आलेले धान्य पुर्ण वाटप केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले , कधीच कुणाला धान्य संपले आहे असे म्हणून माघारी पाठवले नाही. गावात जर कुठे वादविवाद झाला तंटा झाला तर लोक भाऊंकडे न्याय मागण्यासाठी जात असत  व भाऊ जवळचा परका असा कोणताही विचार न करता न्यायनिवाडा करत असत  , सगळ्या लोकांचे समाधान भाऊ करत असत . भाऊंवर हजारो लोक प्रेम करायचे ते केवळ त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे , त्यांनी समाजकारण व राजकारण करताना अनेकांना संधी दिली  कुरघोडीचे राजकारण केले नाही, दिलेला शब्द कधी मोडला नाही . त्यांनी ज्यांना संधी दिली ती माणसे खूप मोठी झाली  आणि त्या माणसांनीही भाऊंचे नाव वेळोवेळी घेतले, नातेपुते गावचे खेळीमेळीचे राजकारण रहावे म्हणून भाऊंनी जे काम केले ते पुढच्या पिढीसाठी आदर्श असेच आहे.
भाऊ जरी  शरीराने आपल्यात नसतील तरीदेखील त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून या  पुढे सर्वांनी चालवावे आणि नातेपुते गावाला जी भाऊंच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढण्यासाठी सर्वांनी काम करावे हीच आदरणीय भाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे.
पिसाळ (देशमुख ) परिवाराचे , विशेषतः आमच्या  वडिलांचे व पाटील घराण्याचे नाते हे कौटुंबिक होते. 
पिसाळ (देशमुख )परिवार हा पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
विजय पिसाळ नातेपुते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

परमेश्वराचे अस्तित्व !

चालू घडामोडींचे विश्लेषण
परमेश्वराचे अस्तित्व कुणीही नाकारु शकत नाही. आम्ही धार्मिक हिंदू तर  इथल्या मुक्या  प्राण्यामध्ये, अगदी कासव , नाग , गाई ,उंदीर , यातही परमेश्वराला पाहतो , कारण जे मानवासाठी ,सृष्टीसाठी उपयुक्त आहे ते ते आम्ही परमेश्वराचा अंश म्हणून स्वाकरले आहे. प्रत्येक गोष्ट निसर्गाने निर्माण करताना एकमेकांना पुरक निर्माण केली आहे व त्यामुळेच मानव जातीचे अस्तित्व टिकून आहे. प्रत्येक गोष्टीत हिंदू धर्म देवाला पाहतो कारण त्याचा उद्देश त्यांचे संवर्धन करणे हाच आहे. म्हणून  निसर्ग ही सुद्धा  आमची देवता आहे .
इथल्या  नद्यांमध्ये , इथल्या निसर्गामध्ये , इथल्या पानाफुलात , इथल्या संपूर्ण चराचरात परमेश्वराला आम्ही  पाहतो. 
तसेतर  मनशांतीसाठी आम्ही धार्मिक हिंदू  उपासना स्थळांची  म्हणजेच मंदिरांची निर्मिती  करतो. काबाडकष्ट करुन थकल्यानंतर  कुठेतरी मनावरील ताणतणाव दुर व्हायला हवा , कुठेतरी कष्टाचा क्षीण कमी व्हायला हवा ही त्यामागची कल्पना असते मनुष्याने नीट वागावे, बंधुभाव जपावा ,म्हणून असंख्य धर्मग्रंथाची संत सज्जनांनी निर्मिती केली,  त्याचीच पारायने अशा ठिकाणी व्हावीत व चांगले काय ?वाईट काय हे सामान्य बुद्धीच्या लोकांना समजावे ,  असंख्य ऋषीमुनींनी  तपश्चर्या केली ती , कशासाठी होती ?  तर शांत डोक्याने मानवी कल्याणासाठी दिशादर्शक काही  लिहावे म्हणजे मनुष्य प्राण्याचे वर्तन हे सदाचारी राहिल आणि त्याला आपल्या कर्तव्यांची,नात्यांची , व्यव्हारीकतेची जाणीव होईल ,त्यामुळे मनुष्य हा राग ,लोभ ,मत्सर , वासना यापासून दुर राहिल आणि त्याला जीवन जगताना स्वतःची उच्च मुल्य जपता येतील हे  ऋषीमुनींच्या उपासनेचे व तपस्येचे मुख्य कारण असले पाहिजे. रामायण महाभारत , हे ग्रंथ तुम्हाला सदाचारी व दुराचारी, धर्म आणि अधर्म यातील अंतर दाखवतात . एखादे उपासना केंद्र कसे असावे त्याचे एक छानसे उदाहरण आमच्या पासून जवळच श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी पहायला मिळते,तिथे तुम्हाला राहण्याची , ध्यान धारणा करण्याची , दोन वेळ जेवणाची व्यवस्था मोफत केली आहे. कुठेही पैसे मागितले जात नाहीत किंवा पावती फाडावी म्हणून गळ घातली जात नाही .कित्येक भाविक सेवेसाठी रात्रंदिवस झटत असतात. आणि तिथल्या अन्नछत्रामध्ये दोन वेळेला लोक महाप्रसादाचा लाभ घेतात व हे निस्वार्थी काम पाहून शेकडो भाविक , गोंदवलेकर महाराजांचे चरणी नतमस्तक होऊन, कुणी डाळ,कुणी तेल,कुणी तांदूळ, कुणी गुळ ,कुणी भाजीपाला तर कुणी रोख पावती फाडतात पण तिथे त्या ट्रस्ट कडून कधीही काहीही मागितले जात नाही, सगळे स्वेच्छेने दिले जात. या मिळालेल्या दानातून हॉस्पिटल व इतर कित्येक उपक्रम हे सेवाभाव म्हणून राबवले जातात इथे बंधू भाव जपला जातो,  सगळ्या भक्तांना वागणूक समान असते, गोंदवलेकर महाराज यांनी प्रभु श्रीरामाची भक्ती सांगितली होती व भक्ती म्हणजे काय तर रामा सारखे तुमचे वर्तन असावे व तसे वर्तन सतत  घडत रहावे म्हणून रामाचे नामस्मरण करावे हा साधा उपाय  गोंदवलेकर महाराजांनी सांगितला आणि बिघडलेले महाभाग सुद्धा सुधारले .यावरून उपासना केंद्र कशासाठी असावीत व उद्देश काय असावा हे समजून येते. पण ....
हिंदूंची असंख्य उपासना केंद्र आज मुळ उद्देशापासून दुर गेलेली सुद्धा दिसून येतात , इथल्या काही बाजारु  लोकांनी धार्मिकतेला  फाटा दिला आणि भोळ्या भाबड्या हिंदू समाजाला अंधश्रद्धेत गुंतवून त्याचे आर्थिक शोषण तर केलेच पण मानसिक गुलाम सुद्धा केले, आणि मानसिक गुलाम झालेले कितीही उच्चशिक्षित असले तरी , ज्यांची कोणतीही कुवत नाही अशा लोकांच्या चरणी नतमस्तक होतात. मानसिक गुलामगिरी मुळे अमुक पुजेसाठी,तमुक अभिषेकासाठी हजारो रुपये उकळले जातात  , देवाला प्रसन्न करण्यासाठी सोने ,नाणे ,हिरे ,माणिक ,मोती व प्रचंड दान करायला भाग पाडतात , मुळात कोणत्याही देवाला यातील काही लागत नाही.  जो कोणी परमेश्वराची पूजा करेल , तिथे स्वच्छता,साफसफाई करेल त्याला त्याचे पोट चालावे,त्याचा प्रपंच चालावा म्हणून निश्चित चार पैसे मिळाले पाहिजेत, अगदी पगार सुद्धा दिला पाहिजे पण , भोळ्या भाबड्या लोकांना हजारो रुपयांचे दर्शन पास किंवा व्हीआयपी वागणूक देण्यासाठी पैसे घेणे हा धर्म नसून अधर्म आहे.  आणि यामुळेच आज  धार्मिक हिंदू दुखावला जातोय  ! 
आणि दुसरी गोष्ट  राजकीय हिंदूंनी मतांसाठी, सत्तेसाठी व सत्तेतून मिळणाऱ्या मलिद्यासाठी धर्मात राजकारण घुसवले आहे , धर्माला राजकीय रंग दिला आहे. पक्षाचा व स्वतःच्या स्वार्थी विचारांचा प्रचार व प्रसार देवाच्या व धर्माच्या नावाने सुरु आहे  यामुळेच धार्मिक हिंदू व राजकीय हिंदू अशी स्पष्ट रेषा तुम्हाला दिसून येईल ,   धर्मात आपआपसात गैरसमज व   वादविवाद होत आहेत. सत्तेसाठी धर्माचा वापर बंद होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने इथल्या हिंदू धर्माची शिकवण तुमच्या मनात रुजेल इतकेच!
©®विजय पिसाळ नातेपुते.

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

हितगुज स्वतःशी


चालू घडामोडींचे विश्लेषण


हितगुज स्वतःशी 
©®विजय पिसाळ.. नातेपुते.

आज थोडा वेळ मी मला दिला !
घेतली थोडी विश्रांती, समजून घेऊ लागलो स्वतःला !
समाज, कुटुंब, नातेवाईक, प्रपंच  हे तर असतं प्रत्येकाला !
  तु तुझ्यासाठी काही वेळ देतोस का ? थोडे  प्रश्न विचारले मनाला !
 अरे सतत पळतोस ,धावतोस पण   कधी वेळ  असतो तुला स्वतःशी बोलायला ?
अन काही प्रश्नाची उत्तरे लागलो शोधायला !
कष्ट तर करावेच लागते ,पर्याय नसतो जीवनात कुणाला !
रात्रंदिवस कष्ट केले , हे का सांगावे जगाला !
आपली जबाबदारी आपणच निभावतो , आणि आयुष्य लावतो पणाला !
तसेतर  बर्याचदा एकटेच असतो आपण , फक्त आपलीच सावली असते आपल्या सोबतीला !
एक एक पाईप जोडला तर पाईपलाई तयार होते आणि पाणी मिळते शेताला !
तसा प्रत्येक टप्पा सर करत आपण शिकले पाहिजे  आकार द्यायला !
आपले बोलणे आपल्याशीच झाले तर   दुर घालवतो आपण थकव्याला  !
 स्वतःच्या हाताने रोप लावून ते वाढवले ,त्याला  पाणी दिले तर  गोड फळे लागतात त्याला  !
तसे आयुष्याचेही आहे थेंब थेंब घाम गाळून पुढे जावेच लागेल हे सांगितले मनाला  !
कष्ट करताना , प्रपंच चालवताना कित्येक रात्री जागवल्या ,हे मन सांगत होते मला !
पण तुझ्या कष्टाचे अन तुझ्या घामाचे पडले आहे काही कुणाला ?
जसे पाण्याचा थेंब थेंब देऊन जगवतो आपण पिकांना !
तसे एक एक पाऊल टाकत घडवावे लागते स्वतःला!
 तेंव्हाच आकार मिळतो तुमच्या भविष्याला  !
आज मी स्वतःशीच हितगुज केले , माझ्या मनातील  तळमळ ,माझ्या भावना , माझे भवितव्य जाणून घेतले , थोडक्यात आज माझी भेट मी  घेतली , वामनराव पै म्हणायचे ना !
" तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार"  तसा  मीच  माझ्याशी बोलत होतो अगदी मनसोक्त स्वतःशीच  बोलणे झाले..  जगण्यात काही आपण चुकलो असेल, काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याचा थोडा विचार  पण केला  !  
आजवर आपण खूप छान जगलो याचाही आनंद मनात  भरभरून साठवला ,
जरी कष्ट केले तरी मनसोक्त स्वच्छंदी आजवर प्रवास केला हेही सांगितले स्वतःला , माणसे पाहिली , माणसे ओळखली , कमीजास्त चुकलोही पारखण्यात पण  माणसे जोडली व आनंद घेत जगत आलो  .. आणि असेच स्वच्छंदी  जगणे सुरू ठेवणार आहे. स्वतःशी 
हितगुज करताना  जाणवले ,माझी काही कर्तव्य जबाबदाऱ्या आणि  पुढची दिशा यावर पण मी चिंतन केले पाहिजे , वारंवार  स्वतःला शोधले पाहिजे .  मनात विचार आला आपले आरोग्य, आपले शरीर हे चांगले असेल तर सगळे जग तुमच्यावर प्रेम करते !
म्हणुन  काहीही झाले तरी "माझा  मीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ति आहे हेही ध्यानात आले" . 
इतरांचा मानसन्मान , आदर करताना मी  स्वतःचाही   आदर  केला पाहिजे , म्हणजे मी कुठेही कमी नाही , कोणताही न्युनगंड ठेऊन मी जगणार नाही . खूप  दिवसांपासुन इच्छा होती स्वतःसाठी  हितगूज करावे पण  रोजची धावपळ रोजची कामे यामुळे स्वतःशी मी बोलत नव्हतो .  आज वेळ काढला  थोडा निवांत होतो ,थोडा रिलॅक्स होतो   म्हणून  आज कुठे दुपारी वेळ   मिळाला  .  फ्रेश झालो , ज्यांनी जन्म दिला त्यांचे आभार मानले ,ज्यांनी साथ दिली  त्यांच्या बद्दल मनात  कृतज्ञता व्यक्त केली  , ज्या निसर्गामुळे माझे अस्तित्व आहे त्याचेही आभार मानले कारण आपण क्षणभंगुर आहोत , निसर्गातील छोटे प्रवासी आहोत हे मनाला सांगितले , तसेच ज्यांनी ज्यांनी  आपल्यासाठी काही केले त्यांची आठवण काढली व ते सदैव सुखी राहवेत अशी प्रार्थना पण केली   अन   मनापासून  परमेश्वराचेही  आभार मानले , कारण परमेश्वराने माझ्यावर प्रेम करणारी माणसे माझ्या जीवनात पाठवली म्हणून मी आज  आनंदात आहे हे पण मनाला सांगितले .  आज मी सुंदर झाडाच्या गर्द सावलीत स्वतःशी बोलत होतो समजावून  स्वःताला घेत होतो , बालपण, शालेय जीवन, संसार , कुटुंब आणि आजचा मी यावर चिंतन करत होतो .
  अगदी निरव शांतता होती , वार्याची झुळूक व पक्षांचे आवाज सोडले तर 
 आसपास कुणीही नव्हते आणि माझ्या मनाचा शोध मी घेत होतो.
जसे  माझ्या अंतर्मनात मी डोकावले तसे  माझे व्यक्तीमत्व मला  प्रसन्न  दिसले, माझे मन  मला सांगत होते . " तू  जरी कुणाचे फार चांगले करु नाही शकला तरी तू कुणाची फसवणूक केली नाही, कुणाला जाणीवपूर्वक  त्रास दिला नाही म्हणून तुला चिंता करायची गरज नाही" , "प्रत्येक वळणावर तुला यश मिळाले व पुढेही मिळणार आहे "
हे मनाने वारंवार सांगितले ! 
बालपणीच्या आठणीत गेलो तेंव्हा  हास्याची लकेर उमटली..दुसरी व्यक्ती समोर  नसताना चेहऱ्यावर हास्य येणे  कसं शक्य आहे ? 
पण हितगुज स्वतःशी करायचे म्हटलं तर  आठवणी येतात व हसायलाही येते !
हसतमुख मी माझ्यात पाहतो  तेंव्हाच मी प्रसन्न होतो म्हणून स्वतःला ओळखा ,स्वतःशी हितगुज करा ! 
मी माझ्याच विचारात रमून गेलो होतो आणि 
 आजवर काय चुकले काय बरोबर हेही मनातले मनात  व्यक्त  होत होतो ..  तसा  थोडाफार  गोंधळही सुरु होता डोक्यात  आजवर तु खुप धावपळ केली , ओढाताण केली , जमेल तशी मदत केली बहुतेक लोकांवर  विश्वास ठेवला  पण मन म्हटलं भुतकाळ काढून काय फायदा हे कलियुग आहे ? माणसे विसरून जातात , आणि कदाचित तुम्हाला त्रासही देतात  हीच ती रित आहे जगाची   म्हणून   क्षणभर थांबलो आणि परत मनात बोललो !
  हे असेच चालणार   म्हणून पुन्हा एकदा स्वतःला माफ केले.. 
कधी कधी आपण खूप भावनिक असतो , तसेच आपल्या हातून चुकाही होतात , कारण आपण प्रेम करणारी साधीभोळी माणसे असतो तसेही 
.स्वतःला स्वतः च्या  चुका सांगणे कठीण पण आवश्यक आहे असे समजून काय काय चुकले आपले याचेही चिंतन केले.
स्वतःच्या चुका समजून घेणे महत्वाचे आहे.
 स्वतःला छान जगायचे आहे, आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत , तसे जीवन खळळता झरा आहे सुंदर आहे पण तो कधीतरी आटणार आजे जसा झरा सर्वांना खळखळून वाहताना आनंद देतो स्वतःशी गाणी गातो तसे आपण स्वतःशी गायले पाहिजे , अगदी झर्यासारखे वाहिले पाहिजे  , सुखासाठी  हेही केले पाहिजे !
मित्रांनो 
आज मी अगदी आनंदी आहे , कारण मी काहीच गमावले नाही जीवनपटातील   बेरीज व वजाबाकी हे गणित सोडवताना  मी खूप  प्लसमध्ये  आहे . खेळीमेळीच्या वातावरणात मी जगतोय  आणि हवं तसं हवं तेवढं स्वःताला आनंदी ठेवतोय , मी सुखी आहे व  नवीन वर्षात पुन्हा जगण्यास सज्ज झालोय ,  स्वतःला  समजून घेऊन ,मनाशी बोलून जगायचे हेही आज ठरवले आहे , काही वरिष्ठांचे संस्कार , काही  साधू संतांचे मार्गदर्शन व मित्रांचे योग्य सल्ले घेऊन नविन वर्षात  पाऊल ठेवायचे हे  पण हितगूज केलंय मनाशी   .
मला वाटते  प्रत्येकजण अशा कल्पना करतो स्वतःशी बोलतो पण तो लिहित नाही पण प्रत्येकाच्या अंतर्मनात विषय आणि विचार असतात , प्रत्येकाचे भाव विश्व असते कुणी व्यक्त होतो तर कुणी अबोल जगतो पण तो तितकाच उपयुक्त असतो म्हणून स्वतःला समजून घेणेही आवश्यक आहे असे मला वाटते . 
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949