vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ११ मे, २०१९

स्वभाव.

चालू घडामोडींचे विश्लेषण


स्वभाव. . . . . . प्रकरण १. . . . .
©®विजय पिसाळ नातेपुते . . . . .
मनुष्य हा प्राणी जगातील एकमेव प्राणी असा असावा की , त्याच्या बाबतीत सतत म्हटले जाते "जगात प्रत्येक आजारावर औषध आहे,  पण स्वभावला औषध नाही "  आणि जवळ जवळ हे सत्य आहे,  असे वाटते .
समाजातील विविध  वयोगटांतील लोकांचे निरीक्षक केले तर पटकन लक्षात येते , लहाण व्यक्तींचा स्वभाव, मध्यम वयाच्या व्यक्तींचा स्वभाव, प्रौढ व्यक्तींचा स्वभाव आणि वयोवृद्धांचे स्वभाव यात जमिन अस्मानाचा फरक दिसून येतो व त्यामध्ये खूप  बदल सुद्धा जाणवतात  किंवा वेगवेगळ्या गाटातील स्वभाव वेगवेगळे असतात. तसेच  वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसेच  विविध जाती धर्मातील परंपरा किंवा त्यामध्ये होणारे संस्कार यामुळे सुद्धा जाती धर्मानुसारही स्वभावात फरक पडतो . प्रत्येक धर्मात सुद्धा  विविध पंतामध्ये लोकांचे विभाजन झालेले पहायला मिळते व त्यातही लोकांच्या स्वभावात  परत बदल झालेले  दिसून येतात. जेंव्हा शहरी भागातील लोकांचे स्वभाव  वेगळेच असतात राहणीमान व  त्यानुसार त्यांचे स्वभाव बदलते दिसून येतात,  ग्रामीण भागातील लोकांचे स्वभाव वेगळेच असतात,  आदिवासी  असो की  झोपडपट्ट्या  असोत,  सुशिक्षित की ,  कमी शिक्षित किंवा अडाणी असोत, अशा वेगवेगळ्या  लोकांमध्ये  फिरत  असताना ,  तुम्हाला विभिन्न स्वभावाचे लोक पहायला मिळतात. . . पाटील, देशमुख ते देशस्थ कोकणस्था पर्यंत, आगरी कोळी ते दलित वस्त्या पर्यंत, सोन्याचांदीचा व्यवसायिक ते रस्त्यावर बुट पॉलिश करणारा पर्यंत, किरणा दुकानदार ते फळविक्रेता ,,शेतकरी ते शेतमजूर आणि क्लास वन ऑफिसर ते शिपाई कामगार इथपर्यंत  वेगवेगळ्या स्वभावाची माणसे तुम्हाला पदोपदी दिसून येत असतात. . .
मग हे स्वभाव कसे विभिन्न असतात, त्यात बदल कसे होतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की , कोणत्याही व्यक्तीमध्ये  आयुष्याच्या सुरवातीला त्याला  जे वातावरण मिळते , ज्या  समाजात व ज्या परिसरात  त्याची  वाढ होते व जो धर्म  जन्मताच त्याला मिळतो व  ज्यात त्याची जडणघडण होते ,  राहण्याची जागा व घरातील आर्थिक व समाजिक स्तर यावरून सुद्धा माणवी स्वभावात आमुलाग्र बदल झालेले दिसून येतात. . .
स्वभावातील बदल आणि संस्कार हे मनावर बिंबणार्या विविध घटनावर अवलंबून असतात. . . .
उदा . . .
लहाणपणा पासून जर एखाद्या घरातील लोक चोरी करून जगत असतील तर आपोआपच त्या घरातील मुलांवर चोरीचेच संस्कार होतात व अशा मुलांचे बाबतीत असे आढळून येते कि, या मुलांचा  देखील चोरी करण्याचा स्वभाव बनत असतो. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीचा हा कल्चर म्हणजे संस्कृतीवर अवलंबून असतो . एखाद्या घरातील लोक जर आपली उपजीविका शिकार करून करत असतील तर सहाजिकच त्या कुटूंबातील लहाणांचे स्वभाव हे काहीप्रमाणात हिंसक असल्याचे दिसून येते . स्वभावाचा आणि आहाराचा सुद्धा काही अंशी संबध येतो , शांत व संयमी लोकांचा आहार बहुतांशी सात्विक असल्याचे दिसून येते . उदाहरण द्यायचे झाले तर कोणाताही शाकाहारी प्राणी हा हिंस्र असत नाही त्यावर सहजासहजी ताबा मिळवता येतो , मग त्यात हत्ती , घोडे, उंट, गाय, बैल, शेळ्या , मेंढ्या , हरीण, ससे अशा विविध प्राण्यांचा समावेश यात होतो व अशाच प्राण्यांचा वापर मानव सुद्धा करत आला आहे .
*स्वभाव ही गोष्ट कदापि बदलणारी असत नाही*
वर्षानुवर्ष जे लोक गुलामगिरीत जगत असतात ते त्या लोकांवरच धुर्त लोक अापला अंमल प्रस्थापित करत असतात मग गुलामगिरी पत्करणारे संख्येने कितीही जास्त असले तरीदेखील हे होत राहतेच.
कारण इतिहास हेच सांगतो की गुलामगिरीत ज्यांचा जन्म होतो तो गुलामगिरीच पत्करतो कारण गुणसूत्रा नुसार त्याचा स्वभाव गुलामगिरीस अनुकूल असा असतो .
प्रकरण(१) एक समाप्त. . . .
क्रमशः . . . .

शनिवार, ४ मे, २०१९

मित्रांनो आयुष्य आनंदी जगुया !

लेख पुर्णपणे वाचा नक्कीच उर्जा येईल. . .
























चालू घडामोडींचे विश्लेषण

🌺🍁🌸🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🌺
गुंतागुंत माझ्या मनाची
©®विजय पिसाळ
*या सुंदर आयुष्यात मि, दुःखी नाही व  कुणावर नाराज पण  नाही.*
*कारण आपल्या  आयुष्यात जे जे घडते ते आपल्या हातात  काहीच नसते व पुढे काय घडणार हे पण आपल्या ध्यानीमनी नसते, सगळा खेळ सृष्टीचा , विधात्याचा* माझ्या आयुष्यात
*कित्येक संकटे आली व त्यातून सातत्याने मार्ग निघाला , २००७ पासून जवळपास २०१८ पर्यंत तब्बल ११ वर्ष संघर्ष केला  कित्येक कठोर  अघात सोसले यात वडीलांचे अकाली जाणे असेल, नंतर आईचे अजारपण, नंतर माझे मनक्याचे काहीकाळासाठीचे पण महाभयंकर  आजारपण ज्यात प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेले होते ,  जवळपास  जे सर्व डॉक्टरांना माझे बरे होणे व पहिल्या सारखे तंदुरुस्त होणे  अशक्य वाटत होते. पण हे कठीण आजारपण मि माझ्या  इच्छा शक्तीच्या बळावर पळवून लावले यासाठी मि प्रचंड चालणे , पोहणे व नियमित  व्यायाम  आणि अवघड  किल्ले चढाई यातून माझे ठणठणीत  पुर्णपणे बरे होणे  शक्य झाले , मि बरा होतोय तोपर्यंतच यात भरीस भर म्हणून   वादळात जवळपास केळीची ७ एकर बाग भुईसपाट होऊन  २० ते २२ लाखांचे नुकसान झाले  व या सर्वांवर कढी म्हणजे पत्नीचे  अजारपण व उपचारांचा प्रचंड खर्च तरीदेखील मि  कधीच डगमगलो नाही की, खचलो नाही सर्वांवर यशस्वी मात करत आयुष्याला जिंकायचा प्रयत्न केला व यशस्वी झालो . परमेश्वराची कृपा समजा किंवा नशीब म्हणा किंवा कष्टाचे फळ समजा पण  नोहेंबर २०१८ पासून सर्व संकटे संपली व परत आनंदी पर्व सुरू झाले, मुलीला  १० ला ९१%मार्क, लहान मुलगा व मुलगी सुद्धा  खूप हुशार  आहेत सोबतीला मनापासून साथ देणारी  पत्नी सदैव पाठीशी आहेच  ,  आईचे, मोठे बंधू व , बहिणींचींचे आशीर्वाद पाठिशी सदैव असतात  !   मग   ,  अजून काय लागते आयुष्यात,  हा प्रवास घरातील  सर्वांच्याच  पाठबळावर व मित्र  , सोबती,  हितचिंतक   यांनी दिलेल्या  मानसिक  ताकदीीवर  व वेळोवेळी एकमेकांच्या साथीमुळे व  आधारावर पुर्ण केला*
*हे सर्व काही घडत असताना*
  *वेदना कितीही झाल्या तरी खचलो नाही , आयुष्यभर जीवलग   मित्र खूप  मिळाले , त्यातील  काहीजण अडचणीत   दूर सुद्धा  गेले  थोडीशी मनाची  घालमेल  झाली मात्र  कधीच कुणावर  राग व्यक्त केला  नाही.* जीवनात
*मनातील भावना व्यक्त करताना कदाचित कुणी दुःखावतं तर कुणी सुखावतं हा नियमच सृष्टीचाच  मात्र मि कधीच कुणाशीही संवादाचे मार्ग बंद करत नाही* विसंवादला थारा नाही .
*मला सगळ्यांनाच समजून घेण्याची तशी सवय आहे व शक्यतो मि फारसा कुठे व्यक्त होत नाही पण जे आपुलकीने बोलतात आपले वाटतात, त्यांना मनापासून सर्व सांगतो कारण बोलून मन हालकं होतं हा विचार असतो*
*कित्येकवेळा माझ्याकडून चुकाही होतात, त्या जवळच्या मित्रांजवळ  कबूल सुद्धा करतो  व त्यावर मनन चिंतन करायची तयारी सातत्याने  ठेवतो , आणि कुणी समजून घेतले तर माझे मन  सुखावते , नाही समजून घेतले तरीदेखील मि  सोडत नाही माझ्यातला   शांतपणा  मात्र समोरच्या वैक्तीच्या डोक्यातील आपल्या बद्दलचा राग व गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत बैचेन मात्र होत  असतो मी*
*सर्व नात्यावर प्रेम करायची आवड असल्याने व ति नाती कधीच  तुटू नयेत असेच वाटते व तेच  माझे मन मला सांगते व त्यासाठी मि शक्य होईल तेवढी माघार घेणे पसंत करतो*
*समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलून हालकं वाटतं असेल तरीही बोलतो किंवा एखाद्याला आपल्याशी  बोलायचे नसेल आपल्याला टाळायचे असेल  तरीदेखील माझी बिलकुल हरकत नसते कारण कुणालाच आपल्यामुळे ठेच लागू नये हेच वाटते* या आयुष्यात फक्त
*जिंकायचं आहे आपुलकी व प्रेमाने !  सर्वांनाच आपलेसे करायचे   आणि घट्ट करायचे आहेत मैत्रीचे बंध म्हणून कधीच कुणाबरोबर कधी किरकोळ दुरावलो तरी , स्वतःच पुढाकार घेऊन गैरसमज  दुर कसे  होतील हाच प्रयत्न असतो माझा  , व कुणीही असो मि  कधीच माझ्याकडून संवाद बंद करत नाही   ,  का ते  माहीत नाही पण माझा स्वभावच  तसाच आहे.*
*जगू वाटत स्वतःसाठी ,पण इतरांशीवाय कधीच करमत पण नाही आणि  जीव तुटतो खूप .*
*आयुष्य खुप सोपं आहे , गरजा मर्यादित आहेत , पण जगता येत नाही  एकटं एकटं हाच  मुळ स्वभाव आहे .*
*त्यामुळे आयुष्यात कित्येक मित्र मैत्रिणी जोडता आले, यादी खूप मोठी तयार झाली जेवढा जमेल तेवढा वेळ पण दिला सर्वांसाठी त्यातून बहुतेकांनी मनापासून प्रेम दिले,  हीच  कमाईच समजतो मी*
*लहान व्हायचं स्वप्न आता पुर्ण होणार नाही , मित्राांना मि सदैव म्हणतो  ,शाळा , कॉलेजचे दिवस परत नाहीत  , कधीतरी एकत्र येवूया   व आयुष्यातील काही आपुलकीचे मित्रांना  भेटूया ,  काहींना नसतो वेळ  पैसा पैसा करतात  पण त्याबद्दलही  माझी  तक्रार  नाही , माहिती आहे गेलेली वेळ परत येत नाही म्हणून क्षणात सर्व दुःख विसरुन छानपैकी जगावे वाटते मला.*
*माझी  सुखाची व्याख्या व परिभाषा सर्वांना समजून घेणे व सर्वांसाठी जगणे हीच आहे म्हणून  वाटते आयुष्यात जोडलेली प्रत्येक व्यक्ती सदैव माझी मित्र म्हणून रहावी व मैत्रीचे प्रेम जपणारी असावी , यात मला सुख आहे , मला कधीच माझ्यामुळे कुणाची नाती तुटावीत, कुणाला त्रास व्हावा असे चुकीचे  वाटतही नाही म्हणून मि सदैव सर्वांसाठी माघार घेतो व मैत्री  जपण्याचा प्रयत्न करत राहतो*व हे जीवन जगताना कुणाचेही मन दुःखी होईल, कुणाच्याही  स्वाभिमानाला ठेच  लागेल ही बिलकुल भावना नसते माझी , जगायचे ते साधेसरळ,  हीच माझ्या मनाची भावना असते व त्यातच सुख मानतो मि.*  मग तो मित्र असो , कि मैत्रिणी असोत की , नातेवाईक असतोत,
माझ्या आठवणी

*विजय पिसाळ  नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
                                                                            *😴🙏🏻तुमचा दिवस आनंदी जावो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना   🙏🏻😴


बुधवार, १ मे, २०१९

दुष्काळाची दाहकता . . . व पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम!

चालू घडामोडींचे विश्लेषण


विविध ठिकाणी पाणी फौंडेशनची व विविध स्वयंसेवी संस्थांची  कामे चालू आहेत. . . . पाणी आडवले गेले  पाहिजे पाणी जमिनीत  जीरले पाहिजे . . . 
पण जमिनीची धूप न होता हे झाले पाहिजे . . . 
बर्याच ठिकाणी चर खोदकाम केले जाते व मातीचा भराव टाकला जातो ,  पण याची भिती अशी  आहे की . . .  मोठा पाऊस झाला की , खळखळ पाण्यामुळे सगळी माती पाण्या बरोबर वाहत जाते ,  जमीन खचते व अपेक्षित पाणी सुद्धा साठत नाही , माती समुद्राला जावून मिळते , कृत्रिम जलसाठे निर्माण केलेले आहेत त्यातही प्रचंड प्रमाणात गाळ साठतो ,  पर्यायाने  मनुष्यबळ, श्रम व पैसा पाण्यात वहात जातोय. . . मुळातच  हे 
आपण  निसर्गावर अतिक्रमण करतोय असे  माझे ठाम व पुर्णपणे विचार करून व्यक्त  केलेले मत आहे . . . 
पाणी साठवण्याची ही शाश्वत पद्धत नाहीच! 
पाणी जमिनीत मुरण्यासाठी . . . . 
झाडे लावणे झाडांना समांतर चर खोदून व झाडांच्या मुळामार्फत जि जमिनीला रंध्र (भेगा)पडतात त्यातून पाणी  मुरवणे हाच पर्याय असतो . . 
आणी ज्या ज्या ठिकाणी भरपूर झाडे असतात त्या ठिकाणी दुष्काळाची तिव्रता बिलकुल जाणवत नाही . . 
मुळात प्रचंड वृक्षाची कत्तल सुरू असल्याने पाऊस कमी झालाय, त्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही , यामुळे  तापमान वाढलेले आहे व त्यामुळे जमीनी धुप सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे , धुळीचे लोट वाळवंटातील वादळासारखे उडत आहेत,  शासनाने व लोकांनी मनापासून  झाडे जगवली पाहिजेत  व नैसर्गिक ओढे नाले यावर छोटे छोटे बंधारे बांधले पाहिजेत व दुसरी गोष्ट जुन्या काळी ज्या प्रमाणे  मोठ्या प्रमाणात कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधले , लघु प्रकल्प उभारले गेले , छोटी छोटी तळी निर्माण केली गेली व त्यातून जलसाठे निर्माण केले गेले तोच पॅटर्न महत्वाचा आहे . व तोच राबवला जात नाही . 
आज विविध ठिकाणी  स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे , मात्र पुर्णपणे जलतज्ज्ञांची मदत न घेतल्याने बहुतांश कामे अशास्त्रीय पद्धतीची चालु आहेत. . . 
सर्रासपणे ओढे उपसून वाळूची वाट लावली जात आहे वाळू व माती बाहेर काढल्याने त्यात पाणीच मुरत नाही . ..फक्त फोटो काढायला पावसाळ्यात दिसते व बाष्पीभवन होऊन पाणी संपुण जाते ,  शासनाचा पैसा मात्र पुरेपूर  मुरतोय. . 
म्हणून करोडोंचा खर्च होऊनही पाणी काही साठत नाही व दुष्काळही हाटत नाही . . 
हे असेच चालू राहिले तर जमिनीचा -हास ही गंभीर समस्या निर्माण होणार हेही तितकेच खरे आहे . . . 
विजय पिसाळ नातेपुते

मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

चाळीशीच्या नंतरचे आयुष्य!


चालू घडामोडींचे विश्लेषण



चाळीशीच्या उंबरठ्यावरील  जीवनप्रवास  होत आला . . . . . . . ..पण अजूनही स्वतःसाठी जगायचेच राहून गेले की काय?  असे बहुतेकांना  मनातून वाटत तर नाही ना ? 
या साठी हा लेखन प्रपंच. . . . . . 
विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९

पुरुष असो की महिला असो . . . . आयुष्यातील एकदा का चाळीशीचा टप्पा जवळ आला किंवा चाळीशीत आला की , जवळपास तो पुरूष किंवा ति महिला पुर्णपणे प्रगल्भ होते अशी आपल्या समाजात रुढ मान्यता आहे. चाळीशीत पोहचलेल्या किंवा चाळीशी पार केलेल्या पुरूष व महिलांचा  तारुण्यातील सुखद व धकाधकीचा प्रवास आता   एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपलेला असतो . 
मुलांचं शिक्षण चालू झालेले व बर्यापैकी खर्च वाढलेले असतानाच स्थिरस्थावर  होऊन  कुठेतरी  राहण्यासाठी आवश्यक असलेलं स्वतःचं टुमदार   घर, एखाद्या छोटीसी का होईना , चारचाकी गाडीचे   स्वप्न. .  ही नवीन संसारातील गरज निर्माण झालेली असते , भरपूर  आव्हाने तर  असतातच पण त्यातही  व्यवसाय किंवा नोकरी यात तो बर्यापैकी सेटल असेल तर काही अडचण असायची शक्यता असत नाही !  मात्र काहीजणांना विशेषतः प्रायव्हेट सेक्टर मधे कमी पगार असेल तर व व्यवसाय बेताचा चालत असेल तर  आर्थिक आघाडीवर तर झुंजावे लागतेच मात्र प्रपंचाचा डोलारा सांभाळताना खूप ओढाताण सुद्धा होत असते .  बहुतेकांना कॉम्प्युटर चे व बैठे काम असतेच, त्यामुळे डोळ्यांना त्रास निर्माण होतो,  मग चेष्मा ,  शुगर बीपी , कंबरदुखी , असे छोटेमोठे आजार डोके वर काढायला सुरूवात झालेली असते . जो चाळीसी मध्ये सुद्धा या कोणत्याही समस्यांचा सामना करत नाही तो खरोखर तंदुरुस्त असतो . त्याला भाग्यवान म्हटले पाहिजे !  
आज मि चाळीशीच्या उंबरठ्यावरील लेख लिहण्याचे प्रायोजन काय हा माझ्या बहुतेक   वाचकांना प्रश्न पडला असेल. .? 
मित्रांनो . . . आयुष्यातील प्रत्येक वळणावर मनुष्य वेगवेगळी स्वप्न पहातो . . शालेय जीवनात खूप अभ्यास करावा, नाव कमवावे , चांगली नोकरी किंवा योग्य व्यवसाय करून स्थिरस्थावर  व्हावे व सुयोग्य जोडीदार मिळावा  ही स्वप्न बहुतांश मुला मुलींची असतात. ..व आईवडील सुद्धा तसेच संस्कार करत असतात,  यात गैर काहीच नसते . . बहुतेकजणांची मेहनतीने ही स्वप्न पुर्ण होतात सुद्धा . . . गोजिरवाण्या घरात एकदोन मुलं आई वडील बायको असा सुखाचा संसार  चालू असतो . . . जणू जग जिंकल्याच्या थाटात वावरू लागतो मनुष्य प्राणी . . . 
पण खरी आयुष्याची गंमत किंवा  मजा तिस वय संपून हळूहळू जसा तो पुढे सरकू लागतो . . . तेंव्हा  चालू होते !    . . आईवडील व्यवसाय किंवा नोकरीतून रिटायर्ड होत असतात. त्यांचा दवाखाना चालू होतो. पण मुला मुलींना कामामुळे आईवडील यांच्याकडे लक्ष देताना धावपळ होत असते विशेषतः दवाखान्यात तासंतास वेटिंग मुळे ! 
 मुलंही  मोठी होतात, त्यांचे शिक्षण, आजारपण व इतर खर्च वाढतच  असतात, त्यातच घरासाठी , गाडीसाठी , बहुतेकजण लोन काढून स्वप्न पुर्ण करायचा प्रयत्न करतात  . मग घराचा ईएमआय (हाप्ता) गाडीचा इएमआय, दैनंदिन  घर खर्च यातून मिळणारा पगार किंवा व्यवसायातील इन्कम अपुरा वाटायला लागतो . . कितीही जास्त पगार असो पण पुरतच नाही . . . . 
नोकरीवाला तर वाढत्या खर्चाची चिंता असल्याने  सुट्टी घेत नाही , उलट ओव्हर टाईम करून जास्तीची कमाई होईल का यासाठी प्रयत्न करतो !  व्यवसायिक सुद्धा  जास्तीत जास्त नफा यासाठी रात्रंदिवस पळत असतो . . . हे सर्व  करताना तो कधीच स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही . हळूहळू वय वाढत जाते . . त्यातून आईवडील वयस्कर होऊन आजारी तरी पडतात किंवा जगाचा निरोप तरी घेतात. . . 
आयुष्याची ओढाताण मात्र  सुरूच  असते . . .!  नुसते धावणे आणि धावणे . . . 
यात तो मनुष्य मग स्त्री असो कि पुरूष स्वतःसाठी जगायचे विसरूनच  जातात. . . 
अगदी , ओझे वाहणारे गाढव, घाण्याच्या बैल हे तरी बरे त्यापेक्षा वाईट अवस्था केवळ मोठेपणासाठी करून घेतलेली असते . . . 
इतरांचे पाहून कधीकधी मुलांना भरमसाट फि असणार्‍या शाळेत घालण्यासाठी ओढाताण करून घेणे, शासकीय किंवा नजिकच्या  दवाखान्यात चांगले उपचार मिळत असताना सुद्धा लक्झरी सेवा देणाऱ्या दवाखान्यात उपचार करून घेणे , घरातील सामान खरेदी करताना ब्रँडच्या नावाखाली पैशाची वारेमाप उधळपट्टी करणे ,  महागडे कपडे, महागडे फर्निचर, यातून मोठेपणा मिरवणे . . 
बँकांच्या फसव्या जाहिरातीला भुलून क्रेडिट कार्डचा गर्वाने वापर करून समस्या गंभीर करने , 
गरज  नसतानाही क्लब जॉईन करने . . . ओघानेच हे सर्व करताना कधीच स्वतःकडे मात्र लक्ष न देणे अशा चुका करत असतो बहुतेकजण  आपण. . . 
या जीवनप्रवासातील किती वेळ स्वतःसाठी देतो आपण, कितीवेळा मित्र मैत्रिणी यांना भेटतो आपण. . . गरजा वाढवतोच  व त्या पुर्ण करण्यासाठी परत डाँकी वर्क करत राहतो  यापलीकडे बहुतेकजण जगतच नाहीत. . . आपण! 
पैसा जरूर कमवा,  खूप मोठे व्हा, स्वप्न सुद्धा मोठी असूद्या , पण हे करताना आपले जगणे मात्र दुःखी निरस्त  करू नका . . . 
आणि तुमच्या जीवणाचे मुल्यमापण करण्याची हीच चाळीशीतील योग्य वेळ ओळखायला शिका ! . . . 
जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे व वर्षा दोन वर्षातून  घरातील सर्वजण किंवा मित्र मैत्रिणी , यांच्या सोबतीने छोट्या मोठ्या सहलीला गेले पाहिजे . . . 
चाळीमध्ये येऊन तुम्ही  जगलाच  नाही पुढे तुम्ही मनसोक्त काय जगणार? स्वतःचे जीवन नुसते असेच कष्टात घालवून काय मिळवणार?  
चाळीशी पर्यंत  मजबूत असणारे शरीर हळुहळू कमजोर होत जाणार, हळूहळू जबाबदाऱ्या वाढणार, परत मुलींच्या लग्नाचे व मुलांच्या सेटलमेंटचे दडपण मनावर येणार व यातूनच विविध आजारांचा नव्याने जन्म होणार. . 
हे सर्व टाळायचे असेल तर केवळ आणि केवळ सर्व करत असताना स्वतःसाठी वेळ द्या , मित्र मैत्रिणी यात मिसळा , एकमेकांना फोन करा , थोडंतरी म्यॅच्यअर्डपणा कृतीतून दिसूद्या ,  जीवनाचा आनंद घ्या , बिनधास्त  मनसोक्त जगायचा प्रयत्न करा . . गरजा कमी करून बचतीचे मार्गच तुमचे भविष्य सुरक्षित करतात हे जरी खरे असले तरीदेखील स्वतःचा जीव कधीच मारू नका . . . प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा मनमोकळा , मनमुराद  प्रयत्न करा . . 
जेंव्हा तुम्ही चाळीशी ओलांडून पन्नासीकडे जाल तेंव्हा जगायचे राहूनच  गेले असे व्हायला नको. तरूपणी तुम्ही कमावते असता तेंव्हा तुम्हाला परिवारात मानसन्मान असतो तेंव्हाच जीवनाचा आनंद लुटा . . सुना बाळा आल्यावर जगण्याची परिभाषाच बदलते हे जेष्ठांच्या तोंडून ऐकू येतेच ना ?  म्हणून वयाचा महत्वाचा टप्पा हा चाळीशीनंतरचा सुरक्षित करा व जीवनाचा प्रवास मानव म्हणून करा . . . 
लेखक. . . 
विजय पिसाळ नातेपुते 
एम ए राज्यशास्त्र. . . .

सोमवार, १ एप्रिल, २०१९

संयमाने कोणत्याही गोष्टीवर मात करता येते! तोच यशाचा प्रभावी मार्ग असतो !

चालू घडामोडींचे विश्लेषण

*राजकारणातील रोज घडणार्‍या किरकोळ -,  क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नये* फक्त प्रामाणिक काम करत रहावे . .
विजयकाका पिसाळ. . . नातेपुते . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
मनापासून सर्वजण हा छोटासा लेख पुर्णपणे  वाचाल ही अपेक्षा !

*राजकारणात काल काय झाले याला बिलकुल महत्व नसते , त्यातून फक्त बोध जरूर  घ्यावा व भविष्यात  सावध पावले टाकावीत. .*
*आपल्या नेत्यावर निष्ठा व प्रेम असावेच यात कुणाचेही दुमत असायचे कारण नाही . .*
*राजकारण म्हटलं की , विरोध हा  होणार, टीका टिप्पणी होणार, आरोप -प्रत्यारोप होणार. .*
नेत्यांची फोडाफोडी. . कार्यकर्त्यांची पळवापळवी होत राहणार. .
*काहीजणांना  आपल्या नेतृत्वावर विश्वास व प्रेम असते . . तर काही जणांचा जीव छोट्या मोठ्या  पदात गुंतलेला असतो. .*

*काहीजण क्षणिक फायदा किंवा स्वार्थ पहात असतात तर काहीजण हे दीर्घकालीन फायद्याचा व स्वतःच्या राजकीय भवितव्याचा आणि आपल्या पाठिशी असणार्‍या जनतेच्या पाठींब्याचाही विचार करत असतात. .*
*लोकशाहीत आजच्या घडीला विविध प्रलोभने , राजकीय दबाव, जनतेचा रेटा व आपल्याला असलेले भविष्य याचा विचार करून जो तो व्यक्ती आपला नेता व पक्ष निवडत असतो . . .*
*कधीकधी तर मानवी मनाची द्विधा मनस्थिती होत असते . .काय निर्णय करावा हेच बर्याच लोकांना समजत नाही . .*
*काहीजणांच्या बाबतीत तर नातीगोती , पै-पाहुणे , व घरगुती संबध हे सर्व पाहून  राजकारणातील गॉड फादरची निवड करायची असते !*
*कदाचित आपलाच एखादा  निष्ठावंत कार्यकर्ता,  दबावतंत्रामुळे, मजबूरीमुळे , किंवा विविध कारणांनी इतर गटात किंवा इतर पक्षात  गेला तरीदेखील त्याचे खरे कारण शोधायचा प्रयत्न जरूर केला गेला पाहिजे .*
*असे मला वाटते . .त्याला लगेच टार्गेट करून, त्याच्यावर  टीका टिप्पणी करून  परेशान करून ,,हुज्जत घालून  भविष्यातील  आपला कट्टर विरोधक करू नका *
*जरा संयम बाळगावा,  सामंजस्य ठेवा , त्याची समजूत घाला , गोड बोलत रहा कदाचित परत तो आपले काम करू शकतो . .*
मात्र त्याला सतत डिवचत राहून कायमचा विरोधक करू नये!
माणसे जास्त जोडण्या बरोबर ति टिकवणे व त्यांना हाताळणे !
 हेच राजकीय यशाचे गमक असते . .
या बाबतीत. .
*आदरणीय आपले नेते मा श्री विजयसिंहदादांचा आदर्श आपण घेतला पाहिजे!*
दादांनी आजवर कुणालाही कधीच दुःखावले नाही म्हणून
दादासाहेबांना , सर्व पक्षात, सर्व जाती धर्मातील लोकांत, व जनतेमध्ये प्रेम मिळते व दादासाहेबांच्या समोर विरोधक सुद्धा नतमस्तक होतात. .
म्हणूनच आदरणीय दादासाहेब मोदी लाट असतानाही २०१४ ला भरघोस मतांनी विजयी झाले व संपुर्ण देशात दादासाहेबांचे नाव गाजले . .
त्यामुळे कुणालाही काहीही बोलू नका. . लगेच रिअॅक्ट होवू नका . .
जास्त प्रती उत्तर देत बसू नका . . .
दादासाहेबांची व रणजितसिंहदादांची कामे सांगून सर्वांनाच घायाळ करा नक्कीच यश आपले आहे . . . विकासाचे मुद्दे मांडून तोंडे बंद करा . .
यश आपलेच आहे . . ?
असे माझे वैयक्तिक मत आहे . .
श्री विजयकाका पिसाळ नातेपुते . . .

शनिवार, ३० मार्च, २०१९

माढ्यात, श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कडवे आव्हान!

चालू घडामोडींचे विश्लेषण
माढा लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य  वजनदार  नेत्यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे ,भाजपा उमेदवार 
मा. श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे,  श्री संजय शिंदे यांना  कडवे आव्हान! 
वाचा श्री. विजयकाका पिसाळ यांचे लेखणीतून. . 
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
माढा लोकसभेच्या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपून दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले . . 
दोन्ही उमेदवार हे सतत पक्ष बदलणारे व कधी भाजपा कधी सेना कधी राष्ट्रवादी, तर कधी  काँग्रेस  तर कधी शेतकरी संघटना
 यात कमीजास्त काम केलेले आहेत, तसेच ते जुने मित्र सुद्धा आहेत,  दोघांकडेही साखर कारखाने व दुध संघ आहेत, त्यामुळे सहाजिकच आपआपल्या भागात त्यांनी लोकांना रोजगार दिला आहे व काही प्रमाणात दोघांकडेही बर्यापैकी लोकसंग्रह आहे  असे असले तरीदेखील रणजितसिंह नाईक निंबाळकर  हे ज्या पक्षात काम करतात त्या ठिकाणी ते प्रामाणिक पणे  पक्षासाठी झोकून देतात, त्याचप्रमाणे ते जो काही निर्णय असेल तो उघडपणे घेताना दिसतात. 
या उलट संजय शिंदे यांनी मात्र राजकीय पदे मिळवण्याठी  विविध राजकीय  पक्षात  प्रवेश केलेला आपणांस दिसून येतो . त्यांनी   विधिसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला व राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल यांना अडचणीत आणले , विधानसभेची निवडणूक होताच काही महिन्यांतच लगेच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषद अपक्ष लढवली व  भाजपातील नेत्यांचा गोड गोड बोलून विश्वास संपादन केला आणि  राष्ट्रवादीतील आपले बंधू बबनराव शिंदे यांच्या पाठिंब्याने व पवार साहेबांशी आतुन साधलेल्या संधानामुळे जिपचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले ..पवार साहेबांनी सुद्धा बबनराव शिंदे यांनी भावासाठी पक्ष विरोधी काम करून सुद्धा बबनराव शिंदे यांना पाठिशी घातलेले दिसून येते , संजय शिंदे यांनी  वेळोवेळी भाजपा नेत्यांना गोड बोलून  निधी मिळवला मात्र भाजपाच्या नेत्यांना  शेवटपर्यंत झुलवत ठेवून परत एकदा राष्ट्रवादीची झुल पांघरली . . व भाजपासी  दगाबाजी केली ,  भाजपाने वेळोवेळी विचारणा करून सुद्धा मि  लोकसभा लढणार नाही,  मला विधिसभा लढायची आहे. असे सांगुन ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली . 
यामुळेच भाजपातील त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना तोंडघशी पडावे लागले!  यामुळे कमालीचे नाराज झालेले मुख्यमंत्री  व पालमंत्री यांनी तातडीने पावले उचलत त्यांना जिपच्या राजकारणात साथ देणारे , राजाभाऊ राऊत, प्रशांत परिचारक, विजयराज डोंगरे ,,यांना तर त्यांचे पासून बरोबर बाजूला केलेच मात्र त्यांचे कट्टर विरोधक श्री विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपात आणून यशस्वी चाल खेळली आजच्या घडीला त्यांच्याकडे त्यांचे बंधू बबनराव शिंदे हे सोडले तर मनापासून काम करणारा कोणताही नेता उरलेला दिसत नाही . . रश्मी बागल विधानसभेत झालेला पराभव सहजासहजी विसरतील असे वाटत नाही . करमाळ्यातून लिड द्यावे तर पुढे विधानसभला परत शिंदे कुटूंबातील कुणीतरी उभे राहण्याची भीती सतावत असणार?  दीपकआबा साळुंखे यांचा विधान परिषदेत झालेला पराभवाचे मेन सुत्रधार कोण होते व पराभव  कुणामुळे झाला हे त्यांनाही चांगले ठाऊक अाहे. त्यामुळे ते मनापासून काम करतील असे नाही (मुळात त्यांना किती जनाधार हा ही संशोधनाचा विषय)
या  तुलनेने कमी वयात व स्वकर्तृत्वाने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे  उदयाला आलेले आहेत. . वडिल जरी काही काळ शिवसेनेचे खासदार होते तरीदेखील त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने व धडाडीमुळे  स्वराज्य उद्योगसमूहाची स्थापना करून आपल्या कामाची सुरूवात केलेली दिसून येते . . .
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण, माण खटाव व कोरेगाव भागातील जनसंपर्क व कामामुळे जास्तीचे लिड मिळण्याची शक्यता जास्त आहे व त्याच प्रमाणे त्यांचे भाजपा सेनेतील जुने सहकारी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे . . 
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माण खटाव भागातून जास्तीचे सहकार्य मिळू शकते कारण पवार साहेबांनी देशमुख साहेबांना राजकारणात आणून गोरे बंधू यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेही दुखावले गेले आहेत, त्याचप्रमाणे अनिल देसाई व दिलीप येळगावकर यांचीही रसत नाईक निंबाळकर यांना मिळण्याची शक्यता आहे . 
माळशिरसचा गेल्या १० वर्षातील इतिहास जगजाहीर आहे , वेळोवेळी मोहिते पाटील यांना डावलने त्रास देणे, मोहिते पाटलांचे विरोधात सातत्याने पक्षातूनच काही मंडळींना ताकद देऊन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणे मोहिते पाटलांच्या विरोधात निवडणूक जाहीर होण्याला अवधी असताना प्रभाकर देशमुख व दिपक साळुंखे यांना आघाडी उघडायला लावून, विरोध करायला लावून सातत्याने त्रास देण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केले आहे , मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत असूनही मोहिते पाटील यांचे तालुक्यातील विरोधक यांनाही बळ देण्याचे रसद पुरवण्याचे काम पक्ष नेतृत्वाने केले त्यामुळे नाईलाजाने मोहिते पाटील कुटुंबाने होणार्‍या कुचंबणेला कंटाळून पक्ष सोडला . . 
त्यामुळे गेली दहा वर्ष शांत असणारा मोहिते पाटील यांचा गट कमालीचा चवताळला असून जिल्ह्यातील आपआपसातील सर्व मतभेद विसरून विजयसिंह दादांनी व रणजितसिंह दादांनी सर्वांची मोट बांधण्याचे काम केले आहे . मोहिते पाटील यांचेवरील अन्यामुळे राष्ट्रवादी विरोधात  मोठ्याप्रमाणात सहानुभूतीची लाट माळशिरस तालुक्यात व परिसरात निर्माण झाली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातुनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल या सर्व गोष्टींना , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेही पुर्णपणे पाठबळ आहे . . 
मोहिते पाटील यांच्या मुळे राष्ट्रवादीसाठी सेफ असणारा मतदारसंघ जवळ जवळ राष्ट्रवादीच्या हातातून निसटला आहे असेच दिसते . . 
आज भाजपाला विविध तालुक्यात वजनदार असणारे नेते जावून मिळत आहेत. यात जगताप गट, सविताराजे भोसले गट, नारायण पाटील गट, कल्याण काळे गट, राजू बापु पाटील गट, परिचारक गट, शहाजीबापू , श्रीकांत देशमुख, गोरे बंधू या सर्वांची ताकद व मोहिते पाटलांची प्रत्येक तालुक्यातील शक्ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठिशी एकत्रितपणे उभी रहाताना दिसत आहे . . त्यामुळे आजच्या घडीला या दोन तुल्यबळ उमेदवारातील लढतीचे पारडे निंबाळकर यांच्याकडे झुकल्या सारखे वाटते.  निवडणूकीचा आजच्या घडीला घेतलेला लेखाजोखा ! 
लेखक. . . विजयकाका पिसाळ नातेपुते

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

मा.श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मुळे भाजपात चैतन्याचे वातावरण व पक्षाच्या ताकदीतही लक्षणीय वाढ.

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय. . .  रणजितसिंहदादामुळे भाजपाचे बळ वाढले . . . 
वाचा . . . श्री विजयकाका पिसाळ यांचे लेखणीतून. . .
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने युवक नेते व  तरूणांचे आदर्श मा.श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि खर्या अर्थाने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाची अभूतपूर्व ताकद वाढायला मदत  झाली , रणजितसिंहदादांच्या प्रवेशामुळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विजयराज डोंगरे, कल्याणराव काळे , अशी दिग्गज मंडळी भाजपाकडे आकर्षित झालेली दिसून येते , करमाळा , माढा, सांगोला , माण, फलटण, पंढरपूर या भागातील सर्व भाजपाचे जुने कार्यकर्ते  सुद्धा जोमाने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळते,सर्व  परीचारक कुटूंब, नारायण पाटील, सविताराजे भोसले ,   राजाभाऊ राऊत, साठे कुटूंब,सांवत बंधू, शहाजी पाटील, अतुल खूपसे, श्रीकांत देशमुख, गणेश चिवटे  , एकदिलाने काम करताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे माण मधील, गोरे बंधूंची साथ मिळताना दिसत आहे . माळशिरस तालुका तर जवळपास संपुर्ण एक झाल्याचे चित्र असून सर्वजण एकत्रितपणे या निवडणुकीत काम करण्याची शक्यता बळावली आहे. . 
भाजपाच्या नेतृत्वाला रणजितसिंहदादांच्या नेतृत्वाची पारख झाल्यामुळे माढा मतदारसंघात तर भाजपाची ताकद वाढलीच आहे ..पण  त्याचबरोबर मोहिते पाटील यांना मानणारा  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील वर्ग सुद्धा आज भाजपाचा पाठिराखा झाल्याचे दिसून येते , रणजितसिंह दादांनी वैयक्तिक कोणताही स्वार्थ न ठेवता , लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी व पाण्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न व मतदारसंघातील पासपोर्ट कार्यालये व विविध प्रश्न  मार्गी लागण्यासाठी भाजपला साथ दिली असल्याने व विनाअट भाजपात प्रवेश केल्यामुळे रणजितसिंहदादांची जनमानसातील असणारी चांगली प्रतिमा अजून कित्येक पटीने उजाळली आहे,  यातच मोहिते पाटील यांचा विजय आहे . 
माढा लोकसभा मतदारसंघात सगळे गटतट विसरून, भाजपा सेना व मित्र पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र नक्कीच भाजपाच्या व सेनेच्या  वरिष्ठांना सुखावणारे राहिल यात तिळमात्र शंका नाही . 
यापुढच्या काळात भाजपाने रणजितसिंहदादांचे संघटन कौशल्य व नेतृत्व गुण ओळखून मोठी जबाबदारी दिली तर पक्षासाठी रणजितसिंहदादा हे दिर्घकालीन व फायदेशीर नेतृत्व करू शकतात. 
आजवर रणजितसिंहदादांनी निस्वार्थी राजकारण व समाजकारण केल्यामुळे हजारो , लाखो तरूण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात व जोडले गेले आहेत,  मात्र राष्ट्रवादीतील काही अपप्रवृत्तीमुळे रणजितसिंहदादांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी   पक्षाने योग्य उपयोग करून घेतला नाही ..पण  भाजपाने  रणजितसिंहदादांच्या रुपाने खर्या अर्थाने हिर्याची पारख केली आहे . . 
रणजितसिंहदादा सर्वांना बरोबर घेऊन सामुहिक ताकद लावून  माढा लोकसभेला तर भाजपाचा उमेदवार निवडून आणतीलच मात्र त्याच बरोबर संपुर्ण महाराष्ट्रात किमान पक्षासाठी १० ते १२ आमदार सुद्धा वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतील हे मात्र नक्की आहे . . .  सोलापुर जिल्हयातील  अकलूजच्या खाणीतील हिर्याची पारख भाजपाने केली आहेच. . . फक्त त्याला ताकद मिळाली पाहिजे . . . 
लेखन. . विजयकाका पिसाळ नातेपुते . . .

रविवार, २४ मार्च, २०१९

कृष्णा भीमा स्थिरीकरण काळाची गरज! कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला विरोध का ? नक्कीच संपुर्ण लेख वाचा ! डोक्यात प्रकाश नक्कीच पडेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना खरचं अशक्य आहे का*? 
श्री विजयकाका पिसाळ नातेपुते (९४२३६१३४४९/९६६५९३६९४९) यांचे लेखणीतून. . . . . 
*केवळ आणि केवळ पाण्यासाठी टोहो फोडणार्या जनतेला विचारा पाणी म्हणजे काय असते ?*
 *दुष्काळी अवर्षण प्रवण भागातुन पिढ्यान पिढ्या शहराकडे  स्थलांतर करणार्‍या लोकांना हक्काच्या  घोटभर पाण्यासाठी झगडावे लागते हेच मुळात दुर्दैवी नाही का ?* *मुळात रोजगार निर्मिती साठी , शेतीला व पिण्यासाठी  पाणी मिळू नये याच्या इतके वाईट  ते काय असू शकते*
नेत्यांनो एकवेळ  तुम्ही राजकारणात एकमेकांची कितीही जिरवा जिरवी करा पण लाखो लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर राजकारण कराल, कल्याणकारी योजनांना विरोध कराल तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही . 
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची चेष्टा करणार्‍यांनो तिला विरोध करणाऱ्यांनो,  येणार्‍या काळात जनताच काय पण परमेश्वर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही . . . 
आज पैशाची कारणे देऊन या योजनेची खिल्ली उडवली जाते पण या योजनेमुळे लाखो लोकांची तहान भागली जाईल, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, लाखो लोकांना रोजगार मिळेल, दुष्काळी पट्ट्यातून शहराकडे जाणारे बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे थांबतील!  हे मात्र जाणीवपुर्वक विरोध करणाऱ्या लोकांकडून  सांगितले जात नाही . 
केवळ एका विजयसिंह  मोहिते पाटलांना या योजनेचे श्रेय मिळेल म्हणून लाखो लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? 
 *राजकारणापलिकडे *कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्व*. . . .

*राजकीय इच्छाशक्ती होती म्हणून*
*निर्मदेचं पाणी कच्छ ला शेकडो किलोमीटरचा कॅनॉल करून  हजारो कोटी खर्च करून जाऊ शकले,  वाळवंटाचे सुद्धा नंदनवन होऊ शकले* तर  कृष्णा भीमा स्थिरीकरण  योजना का होऊ शकत नाही , तिला  विरोध का ? 
*केवळ इच्छाशक्ती व तळमळ  म्हणून विजयसिंह   मोहिते पाटील तथा दादासाहेब राजकीय करिअर पणाला लावून या योजनेसाठी गेली १० वर्ष  लढत आहेत ते जनतेसाठीच ना !* बांधवांनो. . . . .  
*११० मिटर उंचीचे दोन टप्पे ४ मिटर (१३. १२फुट) व्यासाच्या महाकाय ३ पाईप मधुन,  ५०० अश्वशक्तीच्या १६ पंपाच्या साह्याने, २५ ते ३० किलोमीटर लांबीच्या  पाईपलाईन मधून ताकारी योजना साकार झाली आहे! (एकदा जाऊन बघा)   . . . . . . . . . . . . तर कृष्णा भीमा स्थिरीकरण का होऊ शकत  नाही ?*
केवळ मोहिते पाटलांना  विरोध म्हणूनच ना? . . . या योजनेला विरोध करणाऱ्या  पुढार्यांच्या नादी लागून आपल्या पुढच्या पिढ्या बरबाद करायच्या का ? 
*कृष्णा नदीच्या पात्रातून  पाणी उपसा करणार्‍या  ज्या टेंभू आणि म्हैसाळ योजनेमुळे हजारो हेक्टर आटपाडी व सांगोला तसेच  तासगावचा आणि  खानापूरचा काही  भाग ओलिताखाली आला , ज्या योजनेला तत्कालीन राजकीय  इच्छाशक्ती अभावी साकार व्हायला ३० वर्ष लागली पण शेवटी टेंभू व म्हैसाळ योजना साकार झालीच ना ?  एकेकाळी  या योजना पण कदापि शक्य होणार नाहीत,  तेवढा पैसा नाही , गणित जुळत नाही  अशी आवई उठवली जात होती! टोकाचा विरोध होत  होता, आहो  त्याच योजनेने लाखो लोकांचे कल्याण केले ति योजना झालीच ना !* आणि दुष्काळी पट्ट्यात डाळिंब बागा फुलल्या माळरान फुलले  व शेतकरी सुखावला ना ? 
फक्त त्या योजनेचा रेटा मोठा होता व त्याचे  महत्व जनतेला कळले होते, म्हणूनच  जनरेट्यापुढे सरकार झुकले ना! 
राजकारणाच्या नशेत डोलणार्या व काहीही करून सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना व 
आपल्याला कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्व कळेल का ?
*७० किमी लांब ३८ किमी रुंद  महाकाय कोयना धरन होऊ शकते*
*महाकाय उजनी धरण होऊ शकते*
*महाकाय मेट्रो , मोनोरेल होऊ शकतात*
*केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांची इच्छाशक्ती व वाजपेयींची मदत करण्याची भावना होती म्हणून* *अशक्यप्राय वाटणारा ,कित्येक लांबीचे डोंगर व बोगदे खोदून काढलेला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग होऊ शकतो*
तर कृष्णा भीमा स्थिरीकरणाला विरोध का ? 
*प्राध्यापक मधू दंडवते यांनी ३० वर्ष संघर्ष करुन जनआंदोलने करून कोकण रेल्वे साकारली , त्यासाठी ५०० किलोमीटरच्या आसपास डोंगर फोडावा  लागला, शेकडो पुल बांधावे लागले कित्येक अपघात झाले, झाडांच्या कत्तली कराव्या लागल्या ,  मोठा संघर्ष झाला पण लढाऊ जनतेने ही चळवळ हातात घेतली आणि कोकण रेल्वे साकारली,  केवळ कोकण रेल्वेला वेळीच हाती घेतले नाही म्हणून तिथली काँग्रेस संपली*

*कोकण रेल्वे होते मग कृष्णा भीमा स्थिरीकरण का होऊ शकत नाही!*

*इतकच  काय तर काहींच्या  स्वतःच्या इच्छेखातर लवासा होऊ शकते*
*मुंबई ते नागपुरला जोडणारा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील हातात सत्ता असल्यामुळेच ४५ हजार करोड पेक्षाही जास्त खर्च असणारा समृद्धी महामार्ग मार्गी लागलाच ना?*
हे मोठ मोठे प्रकल्प साकारतानाही विरोध झालाच मोठ्या प्रमाणावर  खर्च आला पण राजकीय पुर्णपणे सत्ता असली की त्या भागातील नेत्यांना ते करणे शक्य झाले . 
*आहो कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना झाली तर*
 लाखो लोकांची  पाण्याची तहान भागली जाईल, समुद्राला वाहून जाणारे पाणी आडवले जाईल, ग्रामीण भागातील  खेडी समृद्ध होतील, तरूणांच्या हाताला काम मिळेल,  मजूरांची रोजगारासाठी भटकंती थांबेल, सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल, नवनवीन साखर कारखाने उभे राहतील,  असणारे कारखाने बंद पडणार नाहीत , सातत्याने पडणार्या दुष्काळामुळे  कत्तलखान्यात जाणारे पशूधन वाचेल, फळबागा होतील, दुध धंदा बरकतीला येईल, हाताला काम नसल्याने तरूणांचे विवाह होत नाहीत ते होतील,  त्यांना मुली मिळत नाहीत, लग्न ठरत नाहीत ते सुद्धा सर्व व्यवस्थित होईल याचातरी विचार विरोध करणाऱ्या पुढार्यांनी करायला हवा . . वैयक्तिक श्रेय चुलीत घाला . . . 
पण दर ३ ते ४ वर्षांनी पाण्या अभावी व दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळेच  आजवर असंख्य शेतकर्यांनी आत्महत्या केल्या , कित्येक तरूणी देखील विधवा झाल्या , काबाडकष्ट करणारी माणसे केवळ पाण्याअभावी हतबल झाली , कुणी गळफास घेतले कुणी, विषारी औषध प्राशन केले तरीदेखील आमचे राजकीय पुढारी केवळ राजकारणात व्यस्त असे का रे ? कपाळकरंटे तुम्ही ! आज दुष्काळी पट्ट्यात फिरा चिमणीला प्यायला पाणी नाही , झाडे सारी वाळू लागली बसायला सावली नाही . . 
कशी जगत असतील तिथली माणसे . ..चार्या अभावी  खपाटीला पोट गेलेली जनावरे , हंडाभर 
पाण्यासाठी वणवण हिंडणारी बायकामाणसे, लहान लहान मुले व आटलेल्या विहिरी बघितल्यावर मन हेलावते ह्रदय पिळवटून जाते , दुःख होते. म्हणून कृष्णा भिमा स्थिरीकरण झाली पाहिजे . . 
मोहिते पाटलांना तुम्ही राजकीय विरोध करा सत्ता प्राप्तिसाठी शतप्रतिशत राजकारण करा पण जनतेच्या जीवावर मात्र उठू नका ..आमच्या पुढील पिढ्यांच्या अन्नात माती कालवू नका !  
कुणाचीतरी तळी उचलण्याच्या नादात, कुणालातरी खूश  करण्याच्या नादात आपल्या भागाचे वाळवंट करू नका . 
या अगोदरच, फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूरच्या हक्काचे पाणी बारामतीला  पळवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळेच ते पाणी पळवू शकले नाहीत. . हा इतिहास आहे 
तरीदेखील पुर्वी निरा उजवा कॅनॉल ६५%व निरा डावा कॅनॉलचे  ३५%पाण्याचे वाटप होते ते त्यांनी सत्तेच्या जोरावर  ६०/४० केलेच हा फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूर तालुक्यावर  अन्याय नाही का ? म्हणूनच आपला हक्काचा न  डगमगणारा नेता पाहिजे . . दुसर्‍याच्या दावणीला बांधलेली स्वाभिमान शुन्य  बुजगावणी काय कामाची ? सोलापूर, सातार्याचे निर्णय इथून झाले पाहिजेत, त्यासाठी बारामतीच्या पायावर डोके कशाला ,  बारामतीतून होणारा हस्तक्षेप थांबायचा असेल तर  त्यासाठी आपल्या भागातील नेत्यांना पाठबळ द्या , लाचारी नको असेल तर लढाई लढा ! 
फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूर 
या तालुक्यातील दुष्काळ कायमचा  हाटला पाहिजे या साठी धोम बलकवडी, व निरा देवधर कॅनॉलची कामे तातडीने होणे आवश्यक होते त्यालाही पुरेसा निधी त्यांनी दिला नाही . . 
म्हणून बारामतीकरांना दुष्काळी भागातील जनता जाब विचारते . .
राजकारणात सत्तेचा ताम्रपट कुणीही जन्मताच घेऊन आलेला नसतो, सत्ता येते जाते पण तिचा वापर जनतेसाठी झाला पाहिजे . . व राजकीय आकस आणि सुडाचे राजकारण करणारे जास्त काळ टिकत नाहीत. 
एखादी योजना जरी खर्चिक असली तरीदेखील ति जनसामान्य लोकांच्या जीवनात क्रांती करणारी असेल तर, लोकांना न्याय देणारी असेल तर,  त्या योजनेला राजकारण विरहित पाठिंबा मिळालाच पाहिजे !
म्हणून हा लेखन प्रपंच. . . लेखक. . विजयकाका  पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
टीप. . 
बरेच जण नाव खोडून लेख, स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवतात. . ..तसे न करता आहे असा लेख शेअर करा !

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

माजी उपमुख्यमंत्री , आदरणीय खासदार मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांच्या कार्याची ओळख, १

चालू घडामोडींचे विश्लेषण

सोलापुर जिल्ह्यातील स्वाभिमानी जागृत व
प्रिय  बांधवांनो आणि  भगिनींनो मि,
 श्री. विजय(काका)पिसाळ नातेपुते तुम्हाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व आदरणीय  माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती सविस्तरपणे देणार आहे  ..आपणाला माहितच आहे की दादासाहेबांनी,  सार्वजनिक व राजकीय जीवनात विविध पदावर काम करत असताना त्या त्या पदांना न्याय देण्याचा मनापासून तळमळीने  प्रयत्न केला आहे . . .
२०१४ ला दादासाहेब नुकतेच  खासदार म्हणून निवडून गेले होते व त्यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून श्री शशीकांतजी शिंदे साहेब काम पहात होते . . जून महिना होता व  सोलापुरात पाण्याची भीषण टंचाई होती ,
सोलापूर जिल्ह्यातील
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व सोलापूर शहर या ठिकाणच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी एखरूख उपसासिंचन व देगांव जोड कालवा , हिप्परगा एखरूख तलावाची उंची वाढवणे व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४६ गावांपैकी १४ गावांना एखरूख हिप्परगा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणे बाबत संबधित गावांचे नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आदरणीय दादासाहेबांनी
बुधवार दिनांक २५/६/२०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता तत्कालीन जलसंपदा मंत्री शशीकांतजी शिंदे साहेब यांच्या कडे  बैठक  लावली व आणि मंत्रमहोदय यांच्याशी  सविस्तरपणे चर्चा करून नागरीकांच्या अडीअडचणी समजून सांगितल्या . . . .
आदरणीय दादासाहेब हे तेंव्हा खासदार म्हणून नुकतेच निवडून आले होते , त्यातही तो परिसर त्यांच्या मतदारसंघा बाहेरील होता . .
पण त्या भागातील   लोकांनी समस्या मांडताच आदरणीय दादासाहेब संबधित खात्याच्या मंत्रिमहोदयांना तात्काळ अवगत केले व तसे पत्र देऊन  तातडीने मिटींग साठी वेळ घेऊन पुढील कार्यवाहीच्या सुचना केल्या व तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. हे केवळ मनापासून तळमळ असल्यामुळेच,
आदरणीय दादासाहेबांनी ,,आमदार,  मंत्री ते उपमुख्यमंत्री व  खासदार असताना कधीही केवळ स्वतःच्या मतसंघाचा व फक्त  स्वतःच्या कार्यकर्त्यांचाच विचार न करता काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे . . .
म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात त्यांना विकासरत्न संबोधले जाते.
त्यांचे काम हीच त्यांची ओळख असून, त्यातूनच जनता त्यांचेवर प्रेम करते .
सत्ता आली तरी उत्मात केला नाही !
सत्ता नसली तरी कधीच जनतेशी असलेली  नाळ तोडली नाही . .
म्हणून मोहिते पाटील हे विकासाचे  ब्रँड होते व यापुढेही  राहतील हे नक्की . . ..म्हणून

#जागृत करूया  स्वाभिमान_
रणजितपर्व_ म्हणजे_ आपला _ अभिमान!
 #परंपरा नेतृत्वाची_सुरूवात_ रणजितपर्वाची !
लेखन -श्री  विजय(काका)पिसाळ नातेपुते ९६६५९३६९४९

बुधवार, २० मार्च, २०१९

मोहिते -पाटील कुटुंबावर जनता जीवापाड प्रेम का करते ? मोहिते- पाटलांचे समाजकारण, राजकारण कसे आहे ! टीकाकार सुद्धा , अपप्रचार करणारे सुद्धा हा ब्लॉग वाचल्यावर समर्थक होतील तर वाचा संपुर्ण ब्लॉग नक्कीच सर्वांनाच अभिमान वाटेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

आम्ही मोहिते पाटील समर्थक. . . . . 
वाचा श्री  विजय (काका) पिसाळ यांचे खास  लेखणीतून. . . होय आम्ही मोहिते पाटील समर्थकच का ? 
होय प्रत्येक जिल्हात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा  ठसा उमटवणारा नेता असतो अशा नेत्यामुळे त्या भागाचा व परिसराचा कायापालट होत असतो , त्यांच्या कामामुळेच त्याभागाला ओळख प्राप्त होत असते . .
तशीच ओळख सोलापूर जिल्हाला लाभली ति मोहिते पाटील परिवार व त्यांच्या कामामुळे , त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे . त्यांनी केलेल्या समाजिक व  राजकीय आणि सांस्कृतिक  कामामुळे ! 
 राजकारण असो,  समाजकारण असो, शिक्षण असो की सहकार असो, शेतीचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असो या प्रत्येक क्षेत्रात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे सोलापूर जिल्हा व आसपासच्या भागासाठी मोलाचे व फार मोठे  योगदान राहिलेले आहे, प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे , तरूण सक्षम झाला पाहिजे , दलित, मुस्लीम वंचित यांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच भूमिका घेऊन आजवर मोहिते पाटील यांनी राजकारण समाजकारण केले आहे व त्यातून त्यांचे नेतृत्व फुलत गेलेले दिसून येते , संपूर्ण  मोहिते पाटील कुटूंबाला फार मोठा राजकीय वारसा लाभला आहे कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे बंधू यांची वाटचाल राहिली आहे किंबहुना ति त्यांनी जोपासली आहे. *जीवात जीवमान असे  पर्यंत जनतेची सेवा करू* हे सहकार महर्षींचे ब्रीद वाक्य! 
 आज सहकार महर्षींची तिसरी पिढी राजकारण व समाजकारणात काम  करत असताना तंतोतंत पाळत आहे.  
हीच तरूण  पिढी  राजकारणात व समाजकारणात  सक्रीय झाली असून या घराण्याची राजकीय व सामाजिक नेतृत्वाची धुरा आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर आलेली आपल्याला बघायला मिळते , रणजितसिंह मोहिते पाटील यांना  मोलाची साथ लाभते आहे ति आदरणीय, धैर्यशीलभैय्या, अर्जूनदादा, शिवबाबा,किर्तीदादा व राणूदीदी आणि  त्यांच्या नव्या पिढीतील संपुर्ण कुटूंबातील महिलांची ! 
सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे  . 
आदरणीय रणजितसिंहदादा 
 हे अभ्यासू , सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषीत  व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून पुढे येत आहेत. 
खर्या अर्थाने महाराष्ट्राला अशा सुसंस्कृत व निर्मळ मनाच्या  नेत्याची गरज नव्या राजकारणाला व महाराष्ट्राला  आहे . कारण हा महाराष्ट्र संस्कारी नेतृत्वाचा आहे, 
रणजितसिंहदादा हे पोटात एक, ओठात एक व कृतीत भलतेच  असे नेते नाहीत, तर त्यांचे वागणे बोलणे व चालणे हे प्रामाणिक, सचोटीचे व स्पष्ट पणाचे राहिलेले आहे. 
राजकारण करत असताना समोरच्याला प्रेम देणे त्याला जवळ करणे हा त्यांचा गुण सर्वसामान्य जनतेला मनापासून  भावतो . . 
असंख्य नेते  राजकारण करत असताना आपली पोळी भाजण्यासाठी विविध डावपेच रचत असतात,  कटकारस्थान करत असतात,  कपटी राजकारण करत  असतात, एकमेकांना संपवू पहात असतात,कार्यकर्त्याला मोठे होऊ देत नाहीत, खच्चीकरण करत असतात  मात्र या राजकारणातील प्रवृत्ती पासून रणजितसिंह हे पुर्णपणे अलिप्त आहेत. एखाद्याला जवळ घेऊन त्याला बेसावध करून वार करणारी प्रवृत्ती राजकारणात फोफावत असतानाच रणजितसिंह हे याला अपवाद आहेत. कार्यकर्ताला  जपून प्रेम देणे, त्याला ताकद देणे, त्यावर विश्वास ठेवणे  हे शिकायला मिळते ते केवळ रणजितसिंहदादा कडून त्यांच्या  जवळ गेल्यावरच. ..आजवर 
 मोहिते पाटील 
 घराण्याची वाटचाल व राजकारण महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे . पक्ष कोणताही असो , पक्षाची सामाजिक व वैचारिक जडणघडण कशीही असो मोहिते पाटील यांच्या लेखी फक्त विकासाला महत्व आहे . पक्षाचा व सत्तेचा वापर केवळ आणि केवळ जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे हीच सहकार महर्षींची शिकवण पाळण्याचे काम अविरतपणे या कुटुंबाकडून चालू आहे . 
मोहिते पाटील  कुटुंबाची वाटचाल फक्त लोकांची कामे करणे व लोकांच्या कामासाठी वाट्टेल तो त्याग करणे हीच राहिलेली दिसून येते , त्यामुळेच  मोहिते पाटलांचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान वाटतो ! 
 सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मोहिते पाटील कुटुंबात घरातील सदस्या प्रमाणे वागणूक मिळते त्यामुळेच त्यांच्याकडे असंख्य  लोक आकर्षित होतात व  त्यांच्यावर प्रभावीत होतात. 
खरेतर मि तसा पुर्णपणे पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता! आपला धर्म जपत असताना, आपल्या धर्माची , संस्कृतीची,  परंपरेची , जोपासना करत असतानाच  इतर जाती  धर्मातील  लोकांचा आदर केला पाहिजे या मतांचा मि पाईक! 
 मानवी जीवन हे जात,  धर्म, पंत, भाषा,  याही पलिकडे सर्वसमावेशक असले पाहिजे ही आमची विचारधारा राहिलेली आहे . 
आम्हाला  टोकाची  धर्मांधता कदापि मान्य नाही . 
धर्मांधता 
 या  विचारांच्या विरूद्ध असणारी माझी  वैयक्तिक मते व माझ्या  जीवनावर छत्रपती शिवराय, फुले , शाहु , आंबेडकर आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा  असणारा प्रभाव व   संस्कार  मनावर खोल रूजला आहे . एक सामान्य युवक म्हणून काम करत असताना मोहिते पाटील परिवार सुद्धा कोणत्याही पक्षात काम केले तरीदेखील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची भूमिका कधीच बदलणार नाहीत हाच विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांनी कोणताही पक्ष निवडला तरी मोहिते पाटील कुटूंबावरील प्रेम कदापि कमी करणार नाही . सहाजिकच  आज मोहिते पाटील परिवाराने भाजपा मध्ये प्रवेश केला आणि असंख्य लोकांचे मेसेज आले , फोन आले कित्येकांनी सोशल मिडीयात आमच्या बद्दल मतेही मांडली टीका टिप्पणी केली  पण या सर्वांना मि एकच उत्तर दिले व देऊ इच्छितो की,  मोहिते पाटील परिवार हा विकासाचा कणा आहे व सोलापूर जिल्हाचा ब्रॅण्ड आहे आणि महाराष्ट्रातील मोजक्‍या विकासाचा वारसा पुढे चालवणार्या  परिवारा पैकी एक  आहे,  याच दृष्टीकोनातून 
  आम्ही त्या कुटूंबाकडे पाहतो . त्यामुळेच संपुर्ण जिल्ह्याला या कुटूंबाचा अभिमान वाटतो व त्यामुळेच  मोहिते पाटील परिवारावर प्रेम करत असताना माझे सर्व जातीधर्मातील सहकारी व मावळे या परिवारा बरोबर  शेवटच्या श्वासापर्यंत  नक्कीच राहतील यात तिळमात्र शंका नाही . . 
१९९९ साली खूप मोठ्या विश्वासाने  आदरणीय विजयसिंह दादांनी आपल्या असंख्य सहकार्यांना सोबत घेऊन पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता . पक्ष वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता . . 
आणि त्यामुळेच काही पदे त्यांच्याकडे चालून आली होती उपकार म्हणून नव्हे , पण तरीही पक्षातील काहींना मोहिते पाटीलांचे वर्चस्व सहन झाले नाही म्हणून सतत डावपेच आखून खच्चीकरण चालू केले व 
आज मोहिते पाटील परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमधील घुसमटीला ,जाचाला ,  अन्यायाला  कंटाळून भाजपात प्रवेश करायचा निर्णय केला ! 
 आम्हाला विश्वास आहे की, मोहिते पाटील यांचे राजकारण व समाजकारण कोणत्याही पक्षातून चालू राहिले  तरीदेखील संपुर्ण मोहिते पाटील परिवार कालही , आजही व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालू राहील, व यापुढेही  सर्वांनाच  बरोबर ठेवेल, व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोक सोबत राहतील यात तिळमात्र शंका असायचे कारण  नाही , सहकार महर्षी हे  शेकाप मध्ये होते व नंतर    काँग्रेस मध्ये असतानाही  मोहिते पाटील परिवाराने ,  ब्राह्मण असो दलित, मुस्लीम मराठा , धनगर,साळी , माळी , कोळी , आदीवासी भटके ,  अशा सर्व आठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेतलेले आहे. कोणताही  कधीच भेदभाव केला नाही.  त्यामुळे यापुढेही तेच काम हा परिवार करत राहिल हे नक्की . . . 
म्हणून आपण सर्वांनीच आजवर जे प्रेम मोहिते पाटील कुटुंबावर केले आहे तेच यापुढेही करायचे आहे . अगदी आपली संस्कृती व विचारधारा जपून. . 
प्रत्येक जिल्हयात स्वतःच्या नेतृत्वाला मोठे केले जाते जपले जाते  कारण  नेता मोठा  झाला तरच त्या त्या भागाचा विकास होतो !  राज्य व केंद्रीय पातळीवरील भरपूर निधी आणता येतो , आपल्या नेत्याला पाठबळ दिले तरच  नेत्याची मान ताट होते राजकीय दरबारात वजन वाढते व नेत्याच्या शब्दाला किंमत प्राप्त होते . 
आजवर जनतेने कै सहकार महर्षी व आदरणीय दादासाहेबांना जे प्रेम दिले पाठिंबा दिला व त्याच लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर आदरणीय दादासाहेबांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात वजन प्राप्त झाले म्हणून या भागात असंख्य योजना आल्या ,  व अगणित  विकासकामे सत्ता असो किंवा नसो होत गेली . 
म्हणून यापुढेही आपल्या नेत्याची ताकद वाढवण्यासाठी नव्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी रणजितसिंहदादांच्या  व त्यांच्या बंधूंच्या पाठिशी ठाम उभे रहाण्याची गरज आहे . 
परकीयांची चाकरी ज्या  प्रमाणे छत्रपती शिवरायांनी केली नाही सुरूवातीला छोटे का असेना पण स्वकियांचे,  रयतेचे राज्य निर्माण केले  त्या प्रमाणेच कुणाचीही चाकरी न करता पश्चिम महाराष्ट्राचा व विशेषतः सोलापूर आणि माढा मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी , शाश्वत  विकासासाठी आदरणीय  रणजितसिंहदादांच्या  पाठिमागे ठाम उभे राहण्याची भूमिका आपण घेऊया . . त्यातच आपले हीत आहे . तसे बघितले तर 
मोहिते पाटलांच्या गढीवर एकेकाळी पाणी भरणाऱ्या व मोहिते पाटलांच्या जीवावर मोठे झालेल्या आणि इथेच परत  गद्दारी करून  व सध्या फितूर झालेल्या फुटीरांचे मनसुबे उधळून लावूया हीच मला सर्वांनाच कळकळीची विनंती करायची आहे . 
श्री विजय (काका) पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

सोमवार, १८ मार्च, २०१९

मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, जनता तुमच्या निर्णयाची वाट पहात आहे, मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणार्‍या जनतेला या राजकारणाचा व कट कारस्थानांचा विट आलाय, आता निर्णय घ्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
दादासाहेब शांत बसू नका . . . 
जनता आता तुमच्या निर्णयाची वाट पहाते आहे . . . 
विजय (काका) पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून! 
बांधवांनो पुर्ण  वाचा व  जागे व्हा ! 
२०१४ साली मोदी लाट असताना भल्या भल्यांची जीरली कित्येक मजबूत गड व बुरूज ढासळले  असंख्य मातब्बरांचा  पालापाचोळा होऊन ते हारले,  राजकारणातून संपले !  काहींनी तर चक्क रणांगणातून  लढाईतून पळ काढला . . .  पण त्याही  वादळात लाट परतवून लावली ति फक्त आणि फक्त मा श्री  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी . समोरचा गडी होता भावनेला हात घालणारा ,   रान पेटवणारा,  भाषणबाजीत पटाईत असणारा, हा  गडी सुद्धा चारीमुंड्या चित केला . . . 
 होय सदाभाऊला अस्मान दाखवले  आणि विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब असंख्य  घरभेदी असतानाही विक्रमी मतांनी निवडून आले. कदाचित पक्षांतर्गत विरोधकांना  याचे खूप वाईट वाटले असणार? 
 . . . 
दादासाहेब जिंकले कारण दादासाहेबांना लाभलेले जनसामान्य  जनता जनार्दनाचं  प्रेम ..
दादासाहेब जरी पट्टीचे व फर्डे वक्ते नसले तरीही  मोजके व कामाचे बोलतात ,बोलण्यात तळमळ असते व स्वच्छ आणि प्रामाणिक भावना असते ! 
 कदाचित  भाषणात थोडेफार कमी असले तरीही  कामाच्या जोरावर त्यांनी जनमानसात  आपले आपुलकीचे   स्थान निर्माण केले आहे.. भाषणबाजी करत बसण्यापेक्षा कामं करत रहाणं हा दादासाहेबांचा स्थाईभाव आहे..
गेल्या पाच वर्षात संसदेत 
महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मध्ये दादासाहेबांचे काम असताना सुद्धा . . . पवार साहेबांवर निष्ठा व निवडून येण्याची क्षमता असतानाही,  तसेच  विद्यमान खासदार असतानाही 
 पवार साहेबांनी विनाकारण 
प्रभाकर देशमुख यांना कामाला लावले तसेच,  दीपक साळुंखे  , बबन शिंदे, रश्मी बागल यांचे चुकीचे ऐकुन म्हणा किंवा गैरसमज होऊन म्हणा दादासाहेबांना पराकोटीचा त्रास दिला . . . 
 प्रभाकर देशमुखांना मतदारसंघात फिरायला सांगून संभ्रम निर्माण केला ,,वातावरण गढूळ केले,  राष्ट्रवादी साठी सेफ व अनुकूल असणारा मतदारसंघ हातानेच  प्रतिकूल करून ठेवला . . प्रभाकर देशमुख किंवा इतर कोण चालत नाही असे दिसताच स्वतःच्या उमेदवारीचे  घोडे दामटले, जनमताचा अंदाज न घेता , विजयदादांनीच मला उभे राहण्याचा अग्रह केल्याचा बनाव निर्माण केला , तरीदेखील निष्ठावंत दादासाहेबांनी साहेबांच्या विरूद्ध एक शब्द काढला नाही, 
 मात्र इथला स्वाभिमानी मतदार पेटून उठला , उठाव करू लागला दादासाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस साहेबांच्या कुटील डावामुळे हैराण झाला , जनमत विरोधात गेल्याची  जाणीव झाली व मग साहेबांनी  माघार घेतली . . यात मोहिते पाटलांचा काय दोष! 
हे रामायण घडत असताना  पुलाखालून बरेच पाणी वाहिले . . . 
पुलाखालून पाणी वाहिल्या नंतर परत दादासाहेबांनाच उभे रहाण्याचा आग्रह केला  गेला . ..पण मनातुन दुःखावलेले दादासाहेब लढायच्या मुडमध्ये नव्हतेच. . . 
पण तरीही दादासाहेबांनी झाले गेले विसरुन नम्रता व साहेबांचा  मान राखून रणजितदादांसाठी तिकिट द्या अशी मागणी केली पण परत तिच -ती तकलादू कारणे पुढे करून निर्णय प्रलंबित ठेवला गेला . . . 
निर्णय प्रलंबित का ठेवला  
 तर  पक्षांतर्गत कुरघोडी ... जे निष्ठावंत नाहीत त्यांचे ऐकणे ,  यामुळेच  वातावरण गढूळ होऊन  गेलं.. ज्या  विजयदादांनी पक्षासाठी व साहेबांसाठी त्यागाची सदैव भूमिका घेतली,  साहेबांचा  प्रत्येक शब्द प्रणाम मानला तिथेच वारंवार  अशा पद्धतीने अवहेलना केली गेली . .  गेली अनेक  वर्ष  सरपंच, जि. प अध्यक्ष,  मंत्रीपदावर, आमदार,ते उपमुख्यमंत्री ,  खासदार,  असल्यापासून जी  कामे केली , जनतेशी नाळ जोडली,  लोकांमध्ये प्रेम मिळवले  व पक्षासाठी कास्था  खालल्या त्याचाही पक्षाने विचार करू नये या पेक्षा आश्चर्य ते काय असू शकते . . 
दादासाहेबांनी उभ्या आयुष्यात सत्ता  कधीच  भोगली नाही तर  सत्तेचा  वापर जनतेसाठी तन मन धनाने केला व  पक्षासाठीही खूप काम केले , 
खरेतर  त्यामुळेच  त्यांचा  मतदारसंघावर प्रथम हक्क होता व आहे . आणि राहिल. . . 
कामाच्या जोरावरच मतदारसंघावर  मजबूत पकड सुद्धा ठेवली  आहे . 
असे असताना नवीन पिढी राजकारणात सक्रिय होत असताना व नव्या पिढीला संधी देण्याची भूमिका असताना , रणजितदादांसाठी तिकीट मागितले तर काय चुकले , रणजितसिंहदादा हे  दादासाहेबांचे नुसते सुपुत्रच नव्हे तर एक उमेदे नेतृत्व म्हणून तरी संधी मिळाली पाहिजे ही लोकभावना आहे.  रणजितसिंहदादांना एक हुशार संघटक म्हणून आणि तरुण रक्ताला म्हणून तरी वाव द्यायला हवा होता . . . 
नवखे पार्थदादा केवळ घरातील म्हणून चालतात? 
पण रणजितसिंहदादा नकोत? 
 पक्षाशी एकनिष्ठ नसणार्या व कानफुकण्यात हातखंडा असणार्‍या लोकांचे ऐकून साहेबांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीचा  निर्णय घेतला नाही . . याचेच लोकांना  खूप वाईट वाटले . . 
ज्या रणजितसिंहांनी पक्षाच्या बांधनीसाठी जीवाचे रान केले , पक्ष चांद्या पासून बांद्या पर्यंत वाढवला  त्यांनाच अशी वागणूक असेल तर पक्षासाठी कोण काम करेल?  सामान्य कार्यकर्ता कसा जोडला जाईल. . . आज माढ्यातील  जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे . . भयंकर चिड आहे . . 
काही पत्रकार व मिडीयाला हाताशी धरून मोहिते पाटील कुटूंबाची जी  बदनामी करण्याचा कुटील डाव खेळला जातोय  त्याचा तर विट आलाय पण या मतदारसंघातील जनता हे कुटील कारस्थान व  डाव निश्चितपणे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही . . 
मोहिते पाटील घराणे हे ब्रँड असून ब्रँड संपत नसतो व तो संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही त्याची झळ निश्चितपणे लागल्या  शिवाय राहणार  नाही . .  
 असल्या खेळ्यामुळे  जनतेमध्ये व  मतदारांमध्ये खूप मोठा रोष राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या विरोधात निर्माण होत आहे. 
  इथल्याच  काही फितूर लोकांमुळे सोलापुर जिल्ह्याचे  गेल्या दहा वर्षांत  खूप मोठं नुकसान झालं  आहे व याची जाणीव संपुर्ण सोलापुरच्या जनतेला झाली आहे , 
त्या गद्दारांना जनताच धडा शिकवेल, 
आमच्या लोकप्रिय नेतृत्वाची अवहेलना व होत असलेली  मुस्कटदाबी इथली जनता कदापि सहन करणार नाही , त्याची   सव्याज परतफेड  करेल हे मात्र निश्चित आहे . . जनमानसात तिव्र प्रतिक्रिया आहेत  सामान्य लोक म्हणतात. . आजवर 
जीतकी  मुस्कट दाबी झाली आहे , जीतका त्रास झाला आहे ! 

 आता  बसं झाले , अती झाले , पुरे झाले  ! 
मोहिते पाटील हे नामांकित घराणे सोलापूर जिल्ह्याची शान व अभिमान आहे . 
 त्यांना दिला जाणारा त्रास जनता उघड्या डोळ्यांनी पहाते आहे. . काही इथले बेईमान मोहिते पाटीलांनी मोठे केलेले कोल्हे आज साहेबांचे कान भरतात व साहेब त्यांना जास्त सिरियस  घेतात हेच विशेष आहे , पण त्यामुळे पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे त्याचं काय? यांना
पक्ष वाढवायचा का संपवायचा ! हेच कळत नाही . . 
राजकारणात एखादं नामांकित घराणे  संपवण्याचा  कुटील डाव आखला जातो  त्यावेळी मात्र स्थानिक जनता त्या घराण्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी रहाते . . हा इतिहास आहे , विलासराव देशमुख, अनंतराव थोपटे , पृथ्वीराज चव्हाण,  सदाशिव मंडलिक, व अशी  असंख्य घराणी संपवण्याचा अयशस्वी प्रयोग केला गेला पण ठरावीक  काळानंतर ही घराणी परत जोमानं उभी राहिली कारण तिथल्या जनतेला परकं कोण आपलं कोण यातील फरक लवकर कळतोच!   इथल्याही जनतेला नक्कीच कळेल. . . महाराष्ट्रातील 
 स्थानिक जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी  राहीलीच ..
मोहिते पाटील कुटूंबातील कोणीही  कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांचा विजय हा निश्चित होईल कारण इथली जनता स्वाभिमान जपल्या शिवाय राहणार नाही . . 
 माढा मतदारसंघातील जनता दादासाहेबांना व रणजितसिंहदादांना विनंती करतेय की ,,राष्ट्रवादीने तिकीट दिले तर ठिकच पण विनाकारण तिकीट नाकारले तर मात्र कोणत्याही पक्षातून उभे रहा कारण आमचा आता मोहिते पाटील हाच पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला निवडून यायला काहीच अडचण येणार नाही . . अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनता पेटून उठेल व 
प्रचंड मतांनी मोहिते पाटील घरातील कुणीही असले तरी निवडून येईल  हे निश्चित आहे . 
विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब  यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व मोहिते पाटील परीवारावर निष्ठा ठेवणारा एक कार्यकर्ता . . . . म्हणून हा 
लेखन. . . प्रपंच! 
श्री विजय(काका )पिसाळ नातेपुते ९६६५९३६९४९

शनिवार, १६ मार्च, २०१९

पवार साहेबांना खुले विनंती पत्र! वेळेत रणजितसिंहांच्या उमेदवारीचा निर्णय घेऊन, तातडीने सर्वांनाच कामाला लागायचे आदेश द्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
साहेबांना खुले पत्र. . . . 

आदरणीय साहेब होय. . . 
आदरणीय. . . 
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब. . . . 
सप्रेम नमस्कार. . . साहेब 
खरेतर तुमचे आचार विचार व अफाट काम करण्याची शक्ती तुम्हाला  जनतेच्या प्रश्नांची असणारी जाणीव, काळानुसार अचूक व योग्य निर्णय घेण्याची तुमची  क्षमता ! 
 राजकीय क्षेत्रात बहुतांश  नेत्यांकडे सभ्यता नसते मात्र तुमच्याकडे राजकारणात असूनही  राजकारणातील पराकोटीची  सभ्यता आणि माणसे जोडण्याची तुमची अफलातून कला या व अजून असंख्य गुणांमुळे तुम्हाला जनतेत   , जानते राजे, चाणक्य, तेल लावलेले पैलवान अशा नानाविध विशेषणांनी तुमचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. . 
देशातील जी मोजकी सर्वमान्य व सर्व पक्षातील लोकांशी स्नेह जपणारी माणसे आहेत, यातही तुमचे स्थान सर्वोच्च असेच आहे . ..शेती , सहकार, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक  अशा विविध क्षेत्रात तुमचे काम अतिउच्च व तेजोमय असे आहे . या तुमच्यातील असंख्य गुणांमुळे आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्यामुळेच अगदी लहानपणापासून तुमचे चहाते झालो,  कार्यकर्ते झालो , तुमच्या विचारांनी प्रभावीत झालो . . तुम्ही पंतप्रधान व्हावे हे आम्हाला  मनोमन वाटू लागले व ते आमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला हीच योग्य  वेळ आली आहे . . . 
त्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक एक जागा महत्वाची आहे हे तर सर्वजण आपण जाणतो . . . 
तरीही आपल्या पक्षात विविध ठिकाणी गटबाजी उफाळून येते ति गटबाजी एका क्षणात संपवायची तुमची क्षमता आहे व तुमच्या शब्दाबाहेर पक्षात कुणी असायचे कारण नाही . . . 
अशाच माढा लोकसभा  मतदारसंघात असलेल्या किरकोळ गटबाजी बद्दल तुम्हाला हे कळकळीचे पत्र लिहावे असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. . . 
आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक घर असून, 
 घराचे कुटूंब प्रमुख तुम्ही आहात सहाजिकच घरातील किरकोळ कुरबुरी , एखाद्या दुसर्‍या सदस्यांची शुल्लक भांडणे व तक्रारी तुमच्याकडेच येणार हेही खरे आहे  , काही सदस्य दुसर्‍या सदस्या बद्दल तक्रारींचे सुर आवळणार व त्या तक्रारींचे निराकरण सुद्धा तुम्हालाच करावे लागणार. . 
जवळपास, कोल्हापुर, सातारा , शिरूर, बीड, मावळ,अशा बहुतांश  मतदारसंघातील तक्रारींचे निराकरण तुम्ही लिलया  केले व सर्वांनाच निवडणूक  कामाला लावले . . 
महाडीक असतील,  उदयनराजे असतील यांना तर त्या ठिकाणी टोकाचा विरोध असतानाही तो विरोध मोडून काढून तिथला तिढा  तुम्ही सोडवला . . . 
माढ्यात मात्र तुमचे असे कोण आहे की ते ऐकत नाहीत. . 
पक्षाच्या विरूद्ध लढून सुद्धा संजय शिंदे   आमदार बबनदादा  यांच्या इच्छेनुसार  जि प अध्यक्ष झाले , पक्षाच्या  अधिकृत सदस्यांनी संजयमाला मदत केली . . 
त्याहीपुढे जाऊन संजय शिंदे व परिचारक, जानकर, यांनी दीपकआबाचा  विधानपरिषदेत पराभव केला . . तरीदेखील तुम्ही त्यांना दापले नाही . . तरीदेखील आम्हाला वाटायचे साहेब योग्यवेळी काहीतरी निर्णय घेतील व गटबाजी संपून जाईल, व परत एकदा पक्ष सोलापूर जिल्ह्यात पुर्वी सारखा एकसंघ होईल  . . . 
पण गटबाजी थांबली नाही . . 
तुम्ही ज्यांना भरभरून दिले तेच पक्षांपुढे आव्हान उभे करू लागले . . 
या परिस्थितीत जनतेत जनाधार असलेले , जनतेत खरे  प्रेम असणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा आदरणीय दादासाहेब तुमच्याशी व पक्षाशी निष्ठा ठेवून राहिलेले एकमेव नेते आहेत. 
आज दादासाहेब असो की तुम्ही असो , 
दोघांनाही वाटतेच ना आपली पुढची पिढी आता संसदीय राजकारणात यावीत. . 
नव्यानेच पक्षात सक्रिय झालेले पार्थदादा असोत की रोहितदादा असोत हे उमेदवारी करत असताना व तरूणांना वाव द्यायची तुमची भूमिका असताना या वेळेस रणजितसिंहांना तुम्ही उमेदवारी दिली तर काय हरकत आहे . . 
आज बबनदादांना आमदार होण्यासाठी  माढा विधासभा आहे , रश्मींना करमाळा आहे पण माळशिरस राखीव असल्यामुळे रणजितसिंहांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना लोकप्रतिनीधी म्हणून कुठून तरी वाव मिळायला हवा  म्हणून सगळे लोक व तरूणवर्ग त्यांची उमेदवारी मागत आहेत. . 
आजवर रणजितसिंहांनीही पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे . . झोकून देऊन काम केले आहे . .  याचाही विचार तुम्ही करायला हवा. . 
निवडून यायची क्षमता या  जर निकषावर उमेदवारी द्यायची असेल तर रणजितसिंह परफेक्ट विजयी उमेदवार होऊ शकतात. . 
कारण मोहिते पाटील परिवाराला मानणारा संपुर्ण चाहता वर्ग आज माढा लोकसभा क्षेत्रात आहे व राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र ताकद लागली की रणजितसिंह हे दोन लाखांवर मतांनी निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही . . 
आणि गटबाजीचे म्हणाल तर तुम्ही सर्वांनाच  एकत्र बसवून तुमच्या खास शैलीत कामाला लागा हा आदेश वडीलकीच्या व कुटूंब प्रमुख म्हणून दिला की माढ्याचा तिढा सुटला म्हणून समजा . . . 
पण या साठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे . 
रश्मी बागल, बबनदादा व दीपकआबा यांना समजावून सांगितले पाहिजे , पक्ष वाचायचा असेल तर गटबाजी थांबवा . . . तरच गटबाजी थांबून सर्वजण कामाला लागतील. . . 
साहेब,  विजयसिंहदादांनी राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून तुम्हाला साथ दिली आहे . . सोलापूरात व पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठिमागे खंबीरपणे  शक्ती उभी केली आहे . . कधीही तुमचा जाहीरपणे किंवा छुपा  विरोध केलेला नाही . 
पक्षाचे काम करत असताना मिळेल ति जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे , 
खरेतर तुमच्यावरील निष्ठा कधीच तुसभरही ढळू दिली नाही . . 
खरेतर विजयसिंहदादांसाठी व रणजितसिंहांसाठी माढा जिंकणे ही गोष्ट अवघड नाही . . 
गेल्या वेळी पेक्षाही यावेळी अनुकूल स्थिती आहे . . 
एकटा माळशिरस विधानसभा क्षेत्रात रणजितसिंहांना ९० हजारापेक्षा जास्त लीड निश्चित मिळेल यात शंका नाही . . 
मात्र काही जणांच्या किरकोळ तक्रारीमुळे रणजितसिंहांची उमेदवारी नाकारली गेली तर या ठिकाणी भावनिक मुद्दा होईल व जनतेत अन्यायाची भावना तयार होऊन पक्षाच्या विरोधात नकारात्मक वातावरण होईल. . पाठिमागे कारण नसताना एकनिष्ठ सदाशिव मंडलिक यांना डावलल्यामुळे हातचा कोल्हापुर गेला होता . . 
तसे व्हायचे नसेल तर गटबाजी पेक्षाही निवडून यायची क्षमता याच बेसवर रणजितसिंहांना उमेदवारी द्या ही विनंती . . 
आणि प्रत्येकाला कामाला लावा तरच सोलापुर जिल्हातील सगळे विधिसभा मतदारसंघ व जिल्हा परिषदेवरील सत्ता परत मिळवता येईल. 
पक्षातील बेकीचा फायदा विरोधकांना होवू नये व हातचा मतदारसंघ जावू नये यासाठीच तरूण अभ्यासू व निष्ठावंत रणजितसिंहांनाच तुम्ही उमेदवारी द्याल हीच अपेक्षा ! 
विजय पिसाळ नातेपुते . 
ता . माळशिरस. .