vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पवार साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे! ही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे ! फक्त माढ्याचा आग्रह कशासाठी करताय तेच कळेना !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय, पवार साहेब लोकसभेवर जाण्यासाठी  अट्टाहास करायला हवाच का ?  
तुम्हाला जरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व बाकीच्या सर्व  सहकार्यांनी माढ्यातून लढायचा आग्रह केला असला तरीदेखील तुम्ही विनम्र नकार द्यायला पाहिजे ! असे जनतेला वाटते , साहेब 
आज प्रत्येक पक्षात व प्रत्येक मतदारसंघात कुरबुरी असतातच, तशा राष्ट्रवादीतही आहेत,  उदयनराजे , धनंजय महाडिक, यांच्याही मतदारसंघात किरकोळ कुरबुरी होत्या व आहेत!  त्या कुरबुरी तुम्ही मिटवताच की , खरेतर तुमच्या शब्दा बाहेर कुणीच नाही ,  उलट तुम्ही वडीलकीच्या नात्याने सर्वांना ठणकावले पाहिजे व सांगितले पाहिजे की , पक्षाचा निर्णय प्रत्येकाने मान्य करावा नाहीतर तुमची गय केली जाणार नाही . जे ग्रामपंचायतीला कधी निवडून आले नाहीत असे लोक  केवळ पैसा आहे म्हणून उमेदवार म्हणून इच्छुक होतात, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करतात. याला खरंच खतपाणी घालायची गरज नाही ! पण खतपाणी घातले जातेय, साहेब तुम्ही कोणत्याही सभागृहात असला तरी संधी असेल तर नक्कीच पंतप्रधान व्हाल त्यासाठी माढ्यात उभेच रहायची गरज नाही . 
साहेब जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे व तुम्हीही जनतेची अविरत सेवा केली आहे त्यामुळे आता मनमोहनसिंग यांचे सारखे राज्यसभेवर राहून मार्गदर्शन करत रहायला पाहिजे असे वाटते ,  आपल्या जुन्या  सहकार्यांना व  पक्षाच्या कामात झोकून देणार्‍यांना संधी द्यायला पाहिजे पण होतय उलटंच? कधीच पक्षाचे काम न केलेले उमेदवारी काय मागतात पेच काय निर्माण होतो ! 
यातून साध्य काय होतंय? जनतेमध्ये  
फक्त पक्षाची नाचक्की होतेय! आज  मिडीयात  संपुर्ण पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत असा प्रचार होतोय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देणे कठीण होत  असताना ,  सामान्य  जनतेला काय वाटेल याचा तरी तुमच्या सारख्या मुरब्बी व्यक्तीमत्वाला कळायला हवे ! 
तुम्ही  विचार करायला हवा . 
लोकात चर्चा होतेय, 
तुम्ही सध्या राज्यसभेवर आहातच, अजितदादा व सुप्रियाताई सुद्धा विधिसभा व लोकसभेवर आहेत आणि रोहितदादा पण सध्या जिप सदस्य आहेत पार्थदादाची पण चर्चा आहे मग राष्ट्रवादी पक्ष केवळ पवार कुटुंबा पुरता मर्यादित आहे का ? की पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. . अशी चर्चा बरी नव्हे ! 
तुम्ही आजवर मोठ्या मान सन्मानाने सर्व निवडनुका जिंकल्या आहेत  पण यावेळची माढा लोकसभेची निवडणूक  तितक्याच फरकाने तुम्ही जिंकाल अशी शक्यता कमी वाटते ,  कारण २००९ व आत्ताची परिस्तिथी खूप  विभिन्न आहे, भाजपाची बांधनी तळागाळात पोहचलीय  व वंचित बहुजन आघाडीमुळे   दलित व मुस्लीम मतांची विभागणी अटळ आहे ,  या तोट्याच्या बाजुंचाही विचार करायला हवा . माळशिरस तालुक्यात  विजयदादा तुमचेच काम करतील हे नक्की आहे.  कारण दादांच्या स्वभावात आतुन एक करायचे  व वरून दुसरे करायचे  असे नसते पण  समजा  जरी विजयसिंह दादांनी तुमचे मनापासून काम केले तरीदेखील जनतेच्या मनात एक सुप्त अन्यायाची भावना तयार होत  आहे, राष्ट्रवादी पक्ष दादांवर अन्याय करतोय, त्यांचे जाणिवपुर्वक खच्चीकरण केले जातेय, त्यांना डावलले जातेय व ही सुप्त भावना  मतपेटीतून व्यक्त झाली तर राष्ट्रवादीचे  मताधिक्य कमालीचे घटू शकते . 
साहेब तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे , अभ्यास दांडगा आहे तुमच्या बुद्धीमत्तेला व स्मरणशक्तीला तोड नाही पण तुम्ही सध्या माढ्यात उभे रहायचा चुकीचा विचार करताय! खरेतर  तुम्ही सहकार्यांना मोठे करा आणि निवडणूक लढवायची असेलच तर  नक्कीच  बारामतीमधुन उभे रहा .पण माढ्यातून नका उभे राहु आपल्याच पक्षातील  काहीजण विजयसिंह दादांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून तुम्हाला आग्रह धरतील पण त्यातील एक दोन सोडले तर जनाधार नसलेले बहुतेक आहेत. त्यांचे ऐकु नका  त्या ऐकु नका ! 
 तुम्ही प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार द्या व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या    किमान १५ खासदारांचे बळ घेऊन दिल्लीत जावा  नक्कीच तुमची मान खूप उंचावली जाईल, जुने जानते सहकारी बरोबर घ्या काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे नवीन रक्तालाही संधी द्या मात्र माढ्यातुन स्वतः विजयदादांनी काहीही म्हटले तरी त्यांनाच तिकिट द्या कानफुक्या लोकांचे जास्त ऐकु नका , 
कोल्हापुर मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनाही डावलल्या नंतर जि सहानुभूती त्यांना मिळाली तशी सहानुभूती विजयदादांना आहे , जरी दादांनी बंडखोरी केली नाही, तुमचेच प्रामाणिक काम केले  तरीदेखील वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटील या नावावर प्रेम करणारा वर्ग दुखावला जाणार व तो भाजपाच्या वळचणीला जाणार मग साध्य काय होणार!  तुमचे मताधिक्य घटले तर काही कानफुके परत म्हणणार की विजयदादांनी तुमचे काम केले नाही , माढा गढ शाबूत राहिला पाहिजे व तुम्हीही देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे म्हणून तुम्ही शक्यतो राज्यसभा हाच पर्याय निवडा किंवा बारामतीमधुन लढा , सुप्रियाताईंना राज्यसभा पर्याय ठेवा मात्र माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील हेच पक्षाला तारक राहतील हे नक्की वाटते !
विजय पिसाळ नातेपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा