vijaypisal49. blogspot. com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

गावगाडा कसा चालणार?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कसा चालणार रुतलेला गावगाडा !*
वारंवारची संकटे झेलून झेलून शेतकरी मेटाकुटीला आलाय, कधी बाजारभावाचा प्रश्न, कधी जास्त उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते , कधी वादळी वारे पीक भुईसपाट करतात  , कधी गारपीटीने होत्याचे नव्हते होते , कधी महापूरात सर्वस्व संपून जाते , कधी ओल्या  दुष्काळात पीक सडून जाते , तर कधी कोरड्या  दुष्काळात पीकांची होरपळ होते   तर कधी परदेशातून आयात केलेल्या मालामुळे दर पाडले जातात,  पाडलेले   गेलेले बाजारभाव अशी  नैसर्गिक व सरकार निर्मित  शेतकरी संकटे झेलून झेलून तो थकलाय,   त्याची लुट करून करून सगळे मजेत आहेत, लुट करणारांना , त्याचे शोषण करणारांना ,  त्याला आत्महत्या करायला भाग पाडणारांना कोणीही शाप देत नाही , त्याच्या टाळूवरील लोणी खाणारांना कोणताही देव शिक्षा देत नाही .  त्याची सर्रासपणे लुट केली तरीदेखील आजवर ना कोणत्या सरकारला , ना कोणत्या सावकाराला ना फुकट खाणारांना पाप लागले आहे . त्याला षडयंत्र रचून रचून घायला आणायचे काम करायचे , सगळ्यांना पोसण्यासाठी पिळवणूक करायची . आणि त्याचाच नावाने राजकारण करून मगरीचे आसू ढाळायचे .   आतातर  त्याच्यातील काहींना ६००० हजारांचा नको असलेला उतारा टाकलाय?  जणू भीक टाकावी व त्याने पोट भरावे तसे !  या कोरोनाच्या संकटात तो पुरता संपलाय. .  त्यासाठी राजकारण म्हणून सुद्धा कुणी पुढे आले नाही . 
 पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या , फळबागा , भाजीपाला , शेतात सडून गेला , जागेवर माल पीकून खराब झाला !  कित्येक माझ्या बांधवांना तो  विकताच आला नाही . खूप महत प्रयासाने  विकायची परवानगी भेटली तर वाहतूकीची साधने नाहीत. शेतमालाची ने आण करायला परवानगी , डिझेल टाकायला पास  , 
शेतातील तयार झालेली फळे पिकवण्याची त्याच्याकडे यंत्रणाच नाही ?  आणि तो माल   पिकवला तर माल विकत बसायचे की, शेतात कधी  राबायचे ?  शेती कधी  करायची ?   बाहेर माल विकायला जावे म्हटलं तर शेतातील गुरे , जनावरे बघायची कोणी ?  त्यातूनही सवड काढली तर  बाहेरगावी जाता येत नाही .   व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतात व अशाही संकटात  लोकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विकतात.  नुसती ग्राहक व शेतकर्यांची लुट चालू आहे .  यावर सत्ताधारी व विरोधक मुग गिळून गप्प आहेत .  लाखो रूपये शेतकर्यांनी फळ बागांसाठी,  भाजीपाल्यासाठी घातले . आता त्यातील १० ते २०% तरी वसूल होतील का नाही शंका आहे  ? सरकारी मलपट्टी होईल, मदतीचे आकडे जाहीर होतील पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार घंटा ?  फॉर्म भरणारे , फॉर्म जमा करून घेणारे , याद्या तयार करणारे मात्र मालामाल होणार? 
 मदत मिळेत ति पण ठरावीक लोकांनाच मात्र जाहिरातींची पाने भरभरून छापून येतील हे मात्र नक्की . या महामारीत 
  प्रचंड नुकसानीमुळे   कित्येक शेतकऱ्यांचे  कर्ज थकणार, यात जवळपास ८० % शेतकऱ्यांचे सीबील खराब होणार, त्यामुळे थकीत गेलेल्या शेतकर्यांना  बँका पुढील हंगामात  पतपुरवठा करतील का नाही . ही शंका आहेच  . खाजगी सावकार लुटणार हेही नक्की आहे . सामान्य शेतकऱ्यांनीच नव्हे तर मोठ मोठ्या शेतकऱ्यांनीही  मशागत, मजूर,  खते , बियाणे, डिझेल, पेट्रोल  यासाठी पैसा कसा व कुठून उपलब्ध करायचा हा गंभीर प्रश्न आहे .  शेतकर्यांना  या लॉकडाऊनमध्ये ना पोलिसांनी समजून घेतले , ना महसूल विभागाने समजून घेतले . शेतकऱ्यांचा  किरकोळ माल विकतानाही नाकीनऊ आणले . तेल मिठ सुद्धा बंद पाडले , शेतकरी  लोकांना डिझेल, पेट्रोल यासाठी वनवन करावी लागली , गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना काठीचा प्रसाद खावा लागला . सातत्याने अडवणूक झाली .  त्यामुळे  शेतातील असंख्य कामे पेंडींग राहिली आहेत. मजूरांना शेतात जाताना येताना  भयंकर त्रास सहन करावा लागला , कसा हा तोटा भरून काढायचा  , उपसलेल्या बँका कशा भरायच्या ? 
 पुढच्या काळात   शेती जर पिकली नाही तर हे लोक काय खाणार आहेत कुणास ठावूक. .  प्रशासनाने शिस्त लावायची असते नियम घालून द्यायचे असतात,  पुढाकार घ्यायचा असतो . उपाय योजना करताना गोरगरीबांचे  कमीतकमी नुकसान कसे होईल हे पहायचे असते ?   पण इथे मात्र लोकांना हुसकावून लावणे , मारहाण करणे अपमानास्पद बोलणे सर्रासपणे चालूच होते. किराणा दुकाने बँकात सोशल डिस्टन्सिंगचे किती काटेकोरपणे पालन झाले ?  पण मोटार सायकलवरून फिरून भाजी विकणारांना मात्र हुसकावून लावले गेले , भाजी विकायला चालला तरीदेखील, लायसन्स मागीतले गेले !   ज्या हाताने माणसे पोटभर खातात ते तर शेतातून आलेले असते व त्याच शेतकऱ्यांना   मारहाण केली जाते ?  किती दुर्दैवी आहे .  सगळ्या जगात  जागोजागी मि पोलिस मित्र पाहतोय , प्राणीमित्र, पक्षीमित्र, पाहतोय, पण एकही शेतकरी मित्र पाहिला नाही , जो शेतमाल विकायला मदत करेल!  जो तो फुकट लुटायला , फुकट मिळवायला बसलेला मि पाहिला ! 
 ज्यांना काहीतरी आमचे दुःख समजेल? असे दिसलेच नाहीत! 
या मानवतेच्या ढोंगीपणात  शेतकर्यांच्या व्यथा मांडायला यंत्रणा मुकी झालीय,  शेतकर्यांच्या व्यथा एेकायला यंत्रणा बहिरी झालीय.  शेतकर्यांचा माल फेकून देत असताना सगळी यंत्रणा आंधळी झालीय.   सगळे  ड्रामेबाज कार्यक्रम व त्याचे काय ते कौतुक?   मेडिकल, बँका , किराणा दुकाने या ठिकाणी  किती सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ?  मुळात भाजीपाला फळे जेवढे नियम पाळून विकली तेवढे बाकी काहीच विकले गेले नाही . कितीजण हँडवॉश व सॅनेटा़ईझरचा वापर करतात?  पण शेतमाल विकताना मात्र यांना नियम दिसतात. नियम पाहिजेत पण सर्वांसाठी सारखेच असावेत ना ? 
  बळीराजाच्या मृत्यू नंतर   शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिला नाही . 
येणारा काळ भयंकर असेल हे मात्र नक्की !  
विजय पिसाळ नातेपुते.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

सोशल मिडिया शाप की , वरदान?

चालू घडामोडींचे विश्लेषण


*सोशल मिडिया शाप की वरदान. .* 
काहीजण चोवीस तास सोशल मिडिया वापरतील, मनसोक्त करमणूक करून घेतील,  करमणूक करतील, एकमेकांशी संवाद साधतील,  हजारो , लाखो लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचतील, सोशल मिडीयाचाच  वापर करून सोशल मिडिया किती बेकार आहे हे पण सांगतील असो ! हेही खरे आहे  ,  हातात काम असताना सोशल मिडियाचा अती वापर करणं हे चुकच आहे .  पण सोशल मिडिया हा नुसता टाईमपास आहे का ?  सोशल मिडिया नुसती करमणूक आहे का ? हे जर आपण हो म्हणत असू  तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय!  
याच सोशल मिडियामुळे गावागातील समस्या वरिष्ठा पर्यंत पोहचू लागल्या हे विसरता येईल का ? फेसबुक व व्हॉट्सपच्या व सर्वच सोशल मिडियाच्या  माध्यमातून सर्व प्रकारचा व्यापार होऊ लागला आहे  .  जगातील ज्ञान, विज्ञान, कला , क्रिडा यांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे  .  नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा , वस्तूंचे बाजारभाव हे सुद्धा क्षणात आम्हाला मिळू लागले . रोडवरील  अपघात असो कि  घरातील छानसा कार्यक्रम असो त्याचे व्हीडिओ, अॅडिओ, फोटो लगेच मिळतात, त्यामुळे अपघातात मदत होतेच ना ?  इतरांच्या आनंदात सहभागी होता येतेच ना ?  रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबीरे  यांचे आवाहन हजारो लोकांना करता येते.  विधायक कामासाठी लोकांना आवाहन करता येते , लोकांचा सहभाग वाढवता येतो  हे केवळ सोशल मिडियामुळेच शक्य झाले की नाही .  कोणत्या शहरात, कोणत्या भागात काय समस्या आहेत हे पण समजू लागले .  शाळा , कॉलेज, ट्यूशन, यांच्या डेली अपडेट्स याच प्लॅटफॉर्मवर मिळू लागल्या . वर्ग बंद ठेवले तरीदेखील याच माध्यमातून शिक्षण उपलब्ध होत आहे . स्पर्धा परिक्षांची तयारी , विविध अभ्यासक्रम याच माध्यमातून चालू आहेत.  आपला पाल्य शाळेत येतो का , त्याची तयारी कशी आहे . तो सर्व तासांना असतो का ?  याची माहिती घरबसल्या पालकांना  मिळू लागली आहे  .  जगाच्या कानाकोपर्यातील सर्व माहिती क्षणात प्राप्त होऊ लागली आहे.  परदेशात,  परगावात, शहरात   नोकरी व शिक्षण या निमित्ताने असलेली  मुले, नातवंडे , सुना यांच्याशी घरातील वडिलधारी मंडळी व्हीडिओ कॉलवरून बोलू लागली .  शासकीय आदेश क्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होऊ लागले आहेत  .  किराणा  दुकानदार, भाजीवाले  ,  या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू लागले आहेत  .  शेतकऱ्यांना जागेवरून माल विकता येतोय, त्याची जाहिरात करता येतेय,  विविध वाचणीय पुस्तके घरबसल्या वाचता येऊ लागली आहेत . मनोरंजनाचे साधन जरूर  आहे सोशल मिडिया , पण आपुलकीच्या  संवादाचे माध्यम सुद्धा  आहे सोशल मिडिया , मदतीला धावणारा आहे सोशल मिडिया . गोरगरीबांच्या अडचणींचे निराकरण करण्यास मदत आहे सोशल मिडिया .  धावपळीच्या जीवनात एकमेकांना जोडणारा आहे सोशल मिडिया . शाळा कॉलेज संपल्या नंतर  दुरावलेले मित्र मैत्रिणी  एकत्र करणारा आहे सोशल मिडिया . सर्व वस्तुंच्या किंमती , खरेदी व विक्री करणाऱ्या कंपन्या यांची माहिती मिळण्याचे ठिकाण आहे सोशल मिडिया . उत्पादक ते ग्राहक जोडणारा आहे हाच सोशल मिडिया .  गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आहे सोशल मिडिया . .  किरकोळ तोटे जरी असले तरीदेखील फार महत्वाचा आहे सोशल मिडिया . .  फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच त्याचे फायदे समजतील नाहीतर फक्त  , त्याचाच वापर करून सोशल मिडिया खराब आहे असे म्हणणेही  योग्य नाही .  
मला तर सोशल मिडिया हा मानवाला वरदान आहे असेच वाटते . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

३ मे नंतर सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

3 मे रोजी कदाचित  लॉकडाऊन संपेल, सरकार अर्थव्यवस्था व गोरगरीबांच्या जीवनमरणाचा विचार करून लॉकडाऊन वाढवणार नाही .  पण याचा अर्थ आपल्या देशातून ३ मे पर्यंत संपुर्ण कोरोनाचे उच्चाटन होईल असा बिलकुल नाही .
 ३ मे नंतर सरकारची जबाबदारी कमी व स्वतःची जबाबदारी जास्त वाढणार आहे . लोकांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील, मॉल, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, बस स्थानके , बाजारपेठा , विविध दुकाने  या ठिकाणी लोक प्रचंड संख्येने जातील व येतील. यामुळे कोरोनाची खरी लढाई ३ मे नंतर चालू होणार आहे .  आपल्याकडचे लोक  लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत,  सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत, गुपचूप एकत्र येतात, पार्ट्या करतात,  त्यामुळे ही चैन ब्रेक झाली नाही .  आणि म्हणूनच ३ मे नंतर सुद्धा चैन ब्रेक होणार नाही असेच वाटते . 
  ३ मे नंतर जे जे लोक  स्वतःच स्वतःची काळजी घेतील,  सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक समारंभ, सार्वजनिक रित्या होणारे  धार्मिक कार्यक्रम  व मोठ मोठे होणारे लग्न विधी टाळतील, घरात बाहेरच्या लोकांना कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत  काहीकाळ येऊ देणार नाहीत.  आपल्या वाहनांचाच वापर करतील, भाडोत्री गाड्या सांगणार नाहीत. 
 तेच लोक यातून सहीसलामत राहतील.   खरेतर मोठ मोठ्या शहरातील भाजीपाला व फळे व्यापार हा डायरेक्ट घरोघरी जावून संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांनी करायला पाहिजे .  मोठ्या शहरातील मार्केट कमिट्यात सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा होत आहेत.  त्यापेक्षा व्यापार्यांनी शेतमाल बांधावर खरेदी करावा व घरोघरी जावून तो ग्राहकांना  विकावा तरच यातून आपण वाचू शकतो.  
सरकारने  , शाळा , कॉलेज, परिक्षा , या किमान ऑगस्ट पर्यंत तरी घेण्याचा विचार करू नये .
 शाळेतील मुलं संपुर्ण गावातील किंवा शहरातील वेगवेगळ्या भागातील असतात त्यामुळे धोका वाढू शकतो.  कोरोनाचे संपुर्ण उच्चाटन होईपर्यंत होणारे लग्न समारंभ हे छोटेखानी व घरगुती किंवा रजिस्टर पद्धतीने व्हायला हवेत.  आपल्या देशाची लोकसंख्या आणि सामाजिक सौहार्द यामुळे लग्न समारंभ मोठ मोठे करण्यासाठी संपुर्ण परिसरातील लोकांना निमंत्रित करण्याची प्रथा व परंपरा आहेत पण यापुढे हे कोरोना संपेपर्यंत थांबवावे लागेल  . 
सरकारने परदेशी पर्यटनाला, प्रवासाला  किमान १ वर्ष तरी बंदी ठेवली पाहिजे .  व ज्यांना   केवळ नोकरीसाठी व शिक्षणासाठी  परदेशात  जायचे किंवा यायचे आहे .  त्यांना कंपल्सरी विमानतळावरून थेट १४ दिवस आयसोलेटेड केले पाहिजे .
सध्याची परिस्थिती लगेच सुधारणार नाही त्यामुळे सार्वजनिक प्रवाशी  वाहतूक काही काळ बंद ठेवली तरच संसर्ग थांबवता येईल.  छोटी छोटी वाहने  पुर्णपणे आतून बाहेरून फवारणी करूनच वापरली पाहिजेत.  कोरोनाचे संकट ३ मे नंतर लगेच संपेल व रस्त्यावर येऊन आम्ही दिवाळी करू हा जर विचार करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर होळी जशी गल्लोगल्ली पेटवतात तसे प्रेतांना अग्नि संस्कार करावे लागतील. 
भारतातील शेवटचा कोरोना पेशंट संपेल तेंव्हाच हे संकट संपणार आहे .  त्यामुळे ३ मे नंतर जो काळजी घेईल तोच वाचणार आहे. 
विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

शेतकरी ते थेड ग्राहक विक्रीला परवानगी दिल्या शिवाय पर्याय नाही !

चालू घडामोडींचे विश्लेषण





शेतकरी ते ग्राहक साखळी तयार केल्या शिवाय पर्याय नाही . . 
विजय पिसाळ नातेपुते . . 
कोरोना सारखे साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम वारंवार होत असल्यामुळे प्रशासनाला वारंवार भाजीपाला व फळे मार्केट बंद करावे लागते आहे .  कारण काही ठिकाणी  किरकोळ व्यापारी , ग्राहक, हमाल  नियमांना तिलांजली देतात. त्यामुळे कोरोना सारख्या रोगाचा फैलाव रोखणे कठिण जाते,  यासाठी यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने सहकार्य करून डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही चैन तयार करावी लागणार आहे .  त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या मुलांना छोटी  कुलिंग वाहने व  , शेतावरच फळे पिकवण्यासाठी  रायपनिंग चेंबर या साठी प्रोत्साहन पर अनुदान दिले पाहिजे , तसेच त्यांना बँका मार्फत कमी व्याजदराने किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून, त्याला शासनाने थकहमी दिली पाहिजे  .  फळे व  भाजीपाला हा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शहरातील वेगवेगळ्या भागात घरपोच दिला पाहिजे व तसेच ग्राहक ते शेतकरी साखळी तयार झाली पाहिजे .  संबधित शहरातील मोठ मोठ मोठ्या सोसायट्या व वेगवेगळे ग्राहक यांनी शेतकऱ्यांना जर व्हॉट्सपवरून दैनंदिन लागणार्‍या मालाची ऑर्डर्स दिल्या व तेवढा माल शेतकऱ्यांनी रास्त दराने ग्राहकांना पुरवला तर ग्राहकांना योग्य दराने भाजीपाला व फळे मिळतील व शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळेल व वाहतूक कोंडी  न होता  सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊन  शहरात भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळेल. भाजीपाला वारंवार हाताळल्या मुळे होणारी नासाडी सुद्धा टळेल. .  
यापुढील काळात असे केले तरच कोरोना सारख्या आजारावर मात करता येईल व ग्राहक आणि शेतकरी यांचेही नुकसान टाळता येईल.
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

आर्थिक आणीबाणीच्या दिशेने ?

चालू घडामोडींचे विश्लेषण


नागरीक बांधवांनो . .   देशाचा भार आता आपल्यालाच वाहवा लागेल! 
©® श्री विजय पिसाळ नातेपुते . . . 

मित्रांनो, बांधवांनो कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या कंपन्यांची उत्पादने  बंद आहेत, वाहतूक बंद आहे ,  पेट्रोल  पंप, हायवे , बंद आहेत, रिअल इस्टेट क्षेत्र बंद आहे .  जवळपास देशातील  सर्व कारभार  ठप्प  आहे .  जवळपास देशातील ८० %  व्यवहार  ठप्प आहेत. 
याचाच सरळसरळ अर्थ आपल्या देशाच्या  कर संकलनात पुढील काही महिन्यांत   प्रचंड घट होणार हे ओघाने आले .  त्यामुळे  सरकारने कितीही प्रयत्न केले तरीदेखील बराच कारभार ठप्प होणारच आहे . कारण कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो . सरकारला  पगाराचा खर्च  व आरोग्यासाठीच्या योजनांचा खर्च, दैनंदिन कामकाज व गरजेचे खर्च  भागवणे अतिशय जिकीरीचे होणार आहे .  कोरोणाचे संकट जावून रुटीन लागायला कित्येक महिने लागतील. देशाची चक्र फिरणे इतके सोपे नाही कित्येक दिवसानंतरच कर संकलन हळूहळू पुर्वपदावर येईल.
कंपन्यांचा तोटा वाढत जाणार असून त्यामुळेही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.  
  हजारो लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे सरकारला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंकडे लक्ष द्यावे लागेल.  
यामुळे बाकीच्या योजनांना कात्री लागेल यामुळे जवळपास  सर्वांचीच गैरसोय होईल,  भविष्यात  काही गोष्टींचा नक्कीच  तुटवडा जाणवेल. कारण जवळपास सर्वच वस्तुंच्या  उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे . ठप्प आहे.  भविष्यात अन्नधान्य महागाईचा आलेख सुद्धा वाढणार आहे . अन्नधान्या बरोबरच इतर वस्तु व सेवा सुद्धा महाग होऊ शकतात. 
 कोरोनाच्या फटक्यामुळे  शेतकरीवर्गही  मेटाकुटीला येऊन त्याचेही प्रचंड नुकसान होऊन  क्रयशक्ती घटणार आहे .  सरकारला बाहेरून आरोग्य विषय गोष्टींची साधणे व औषधे हे  जास्तीचे पैसे खर्च करून आवक करावी लागणार आहे . सरकार कोणतेही असले तरीदेखील कर संकलना शिवाय  काही करू शकत नाही . याचाच अर्थ सर्वच देश बांधवांना महागाईची झळ बसणारच आहे . पायाभूत सुविधा , मिळणारी अनुदाने , लोकप्रिय योजना चालवताना सरकारला कसरत करावी लागेल. . प्रसंगी लोकप्रिय योजना गुंडाळाव्या लागतील. यापुर्वीच  पैसा उभा करण्यासाठी सरकारने सार्वजनिक कंपन्यातील आपली भागिदारी विकली आहे .  काही कंपण्यामधील आपली गुंतवणूक काढून घेण्याची घोषणा केली होती . पण उद्योगपती व बँकाच तोट्यात जातील व निर्गुंतवणूक सुद्धा सहजासहजी होईल असे वाटत नाही . 
निर्गुंतवणूकीचा  पुढील टप्पा सुरू होईल.  पण प्रतिसाद मिळेलच असे नाही . 
 सध्याचा कारभार ठप्प झाल्यामुळे सर्वच उद्योगपती व व्यावसायिकांचा तोटा वाढून त्यांना बँकांचे हाप्ते भरणे कठीण होणार आहे .  सहाजिकच बँकांचा एनपीए वाढणार आहे .  त्यामुळे सामान्य जनतेला व लघु उद्योगाला कर्ज मिळणे कठीण होणार आहे . ठेवीवरील व्याज कमी होईल असे दिसते.  शेतीला तातडीने  पतपुरवठा मिळण्याची शक्यता मावळणार  आहे ..मुळात  देशाचा जीडीपी घसरणार  आहे . निर्यात घटून  परकीय चलनसाठा  सुद्धा घटणार  आहे . 
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत घसरू शकतो .  शेअर बाजारात मंदिचा माहोल तयार होऊन शेअर विक्रीचा मारा जास्त होईल असेच दिसते .  त्यामुळे परकीय गुंतवणूक कमी होऊ शकते . .  महामंदीच्या लाटेत आर्थिक आणीबाणी येऊ शकते ?  
त्यामुळे जनतेने सरकारच्या भरोशा पेक्षा स्वतःच रोजगार निर्मितीचे मार्ग शोधले पाहिजेत.  स्वतः बचत केलेला पैसा जपून वापरला पाहिजे . चैनीच्या गोष्टींना बगल दिली पाहिजे . 
नजीकच्या काळात सरकार, चैनीच्या वस्तू , टीव्ही , फ्रिज, दारू , सिनेमा , टिव्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, सोने चांदी , दारू , टोल, रोडटॅक्स, पानमसाला , हिर्याचे दागिने , परदेशी गाड्या यावर अतिरिक्त शुल्क आकारू शकते . 
पायाभूत सुविधांना निधी कमी  पडणार असून नवीन डेव्हलपमेंट थांबणाची शक्यता आहे . महाकाय प्रकल्प रखडले जावू शकतात. . 
गाडी पुर्वपदावर येण्यासाठी कमी माणसांत जास्त काम करून घ्यावे लागेल, सरकारी बाबूंचे लाड थांबवावे लागतील. .  भ्रष्टाचार व दप्तर दिरंगाई याला चाफ लावावा लागेल.  
एकुणच काय तर जनतेला सरकारवर जास्त अवलंबून न राहता .  स्वतःच भारताला बलशाली करण्यासाठी पुढे यावे लागेल तरच देश वाचणार आहे . 
©®विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९

शनिवार, १४ मार्च, २०२०

स्वच्छतेचा आग्रह धरा व स्वच्छता असेल त्याच ठिकाणी संबंध ठेवा . .

चालू घडामोडींचे विश्लेषण

स्वच्छता नसेल तर कोरोनाचा अटकाव करणे शक्य होईल का ? 
विजय पिसाळ नातेपुते . . . 
आपण ज्या हॉटेलमध्ये चहा पितो , ज्या ठिकाणी जेवण करतो , लग्न समारंभात जेवण करतो . . अशा ठिकाणी स्वच्छता पाहिजेच, तिच ति भांडी  परत परत ओली वापरणे   व त्याच त्या  अस्वच्छ  पाण्यात भांडी व चहाचे कप  विसळणे  हे व्हायला नको आहे . . 
हॉटेल मालकांनी , टपरी धारकांनी , कोल्ड्रींकचे गाडे , भेळ सेंटर, वडापावचे गाडे , या सर्वांनी   थोडे जास्त पैसे ग्राहकाकडून  घ्यावेत पण कागदी युज & थ्रोचे  कप व  प्लेट आणि पत्रावळी  वापराव्यात  . . 
जुन्या पत्रावळी किंवा केळीची पाने  व द्रोण वापरावेत. . . वेटरला व आचारी महिला व पुरुषांना  कंपल्सरी साबणाने आंघोळ करायला लावावी . . . त्यांचा  आणि ग्राहकांचा संपर्क येतो . त्यामुळे त्यांनाही बाधा होऊ नये म्हणून हॅन्डग्लोज व मास्क दिले पाहिजेत, रोजचे कपडे स्वच्छ साबणाने धुतलेले पाहिजेत. . 
संसर्ग हा जास्त हॉटेल व लॉज या मार्फत होऊ शकतो . कारण या ठिकाणी ग्राहक बाहेरगावचा व कुठूनही आलेला असतो .  
हॉटेल चालक मालक, मॅनेजर  व कामगार यांनी तर स्वतःची  खूप काळजी घेतली पाहिजे कारण त्यांचे ग्राहक कुठलेही बाहेरगावचे  असतात व टेबलवर जेवण केल्यामुळे , संबंधित भांडी व टेबल दुषित होऊ शकतात. . 
दुसरी गोष्ट. .  
सलुन दुकानात जातानाही ग्राहकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्याच  आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार्‍या दुकानातच गेले पाहिजे . . व ग्राहकांनी शक्यतो घरूनच रुमाल किंवा  नेपकीन घेऊन गेले  पाहिजेत. . 
सलुनचे सर्व साहित्य डेटॉलच्या पाण्यात धुतले पाहिजे . . 
कारण तोच तो नेपकीन वापरल्यामुळे संसर्ग वाढू शकतो कारण रुमाल नेपकीन हे दिवसभर असंख्य ग्राहकांना वापरले जातात. व पुर्णपणे वाळलेले नसतात,   कारागिर बांधवनाही याची बाधा होऊ शकते . . . त्या कारागीर बांधवांनी काटेकोरपणे प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र नेपकीन वापरला पाहिजे . . त्यासाठी  एकदाच जास्त नेपकीन खरेदी करावे , खर्च करावा लागेल पण ग्राहकाचा व स्वतःचाही जीव महत्वाचा आहे .  भलेही नेपकीन  धुवायचे व स्वच्छतेचे  पैसे जास्त घ्या पण स्वतःही सुरक्षित रहा . . 
एस टी महामंडळाने , चालक व  वाहकांना रोज नवीन मास्क दिले पाहिजेत व बसेसचे दैनंदिन निर्जंतूकरण केले पाहिजे . . हीच काळजी रेल्वेतही घेतली पाहिजे . . 
शहरातील जास्त गर्दीच्या शाळा , कॉलेज, मॉल, दुकाने व छोट्या मोठ्या  शाळांनाही विशेष खबरदारीच्या सुचना दिल्या पाहिजेत. . व त्याचे पालन सर्व संबंधिताकडून  झाले पाहिजे . जास्त फैलाव होण्या पेक्षा . . खबरदारी महत्वाची आहे . . 
जागरुक लोकांनी मोठे लग्न समारंभ, घरातील कार्यक्रम हे सध्यातरी मोठे  घेऊ नयेत. लिमिटेड लोकांनाच निमंत्रण द्यावे . .  यात्रा जत्रा भरवणार्या गावांनी  या वर्षी शासनाचे आदेश असो किंवा नसो . .  गावोगावच्या ग्रामपंचायती व पंचमंडळी यांनी ठराव करून  स्थागित कराव्यात. . . 
 व मोठ्या यात्रा यातून संसर्ग जास्त फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही . .
बाहेरगावचा सार्वजनिक व खाजगी  वहानातून प्रवास  फक्त गरजेपुरताच करावा . .  पर्यटनाला जावू नये . . 

विजय पिसाळ नातेपुते . .

मंगळवार, १० मार्च, २०२०

परत भेट होईल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
होय ऐक ना.... ! 

©® विजय पिसाळ नातेपुते . . . . 

नुकतंच दोघांचंही  कॉलेज संपलं होतं टीवायचा पेपर संपल्यावर सर्वांनी  जेवायला जायचा बेत आखला होता हॉटेलमध्ये  , मनाची तर घालमेल चालू होतीच , परत कधीच भेटीगाठी होण्याचीही शक्यता फार नव्हती . .  कारण तेंव्हा संपर्कासाठी मोबाईल नव्हते .  लँडलाईन होते पण घरातील दबावामुळे बिनधास्त बोलणे व कॉलही करणे शक्य नव्हते . . . आम्ही पेपरच्या शेवटच्या दिवशी मस्तपैकी सर्वांनी जेवण केले . आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला . . . सुजयचं (काल्पनिक नावं) फिक्स काहीच नव्हतं आणि तिनं मात्र पुण्याला पुढील शिक्षणासाठी जायचं ठरवलं होतं . . 
दोघांनीही  एकमेकांचा निरोप घेतला आणि सुजय  खोल  भुतकाळात गेला . . .  पहिल्या वर्षी जेंव्हा सुजय  कॉलेजला गेला  तेंव्हा सुजयचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं व सुजयचं  गावही  तसं छोटेसं त्यामुळे सुजयला  इंग्रजी बोलता येत नव्हतं व वर्गातील मुलं मुली मात्र फाडफाड इंग्रजी बोलायची . .  शिक्षकही इंग्रजीत शिकवायचे जणूकाही सुजयच्या  मनाची अवस्था तुरूंगात कोंडलेल्या कैद्यासारखीच व्हायची ! 
सगळे जगच नवीन ना ? 
कुणीच जुने मित्र नाहीत की मैत्रिणी नाहीत कि , जुने शिक्षकही नाहीत. .  सरांनी एखादा प्रश्न विचारला की अडखळत उत्तर द्यायचे पण वर्गात मात्र खसखस पिकायची . . सुजय शांत होता , थोडा हसतमुख पण आपल्या परिस्थितीची जाणीव असलेला ! कॉलेजला  नवीन असल्यामुळे व ग्रामीण भागातून आल्यामुळे त्या भाषा रांगडी होती . . . त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जायच्या . . . 
सुजयच्याही   हळूहळू ओळखी होऊ लागल्या तशी दिव्याचीही ओळख झाली ( काल्पनिक नाव ) दिव्या दिसायला छान, हस्ताक्षर छान, 
श्रीमंत घरातील मुलगी , गाडीवरून मोकळे केस सोडत कॉलेजला   यायची . . महागडे ड्रेस व  मॅचिंग मध्ये असायची  तसेच   बिनधास्त रहायची पण अभ्यासातही जबरदस्त  हुशार , सुजयची  अवस्था पाहून वर्ग हसायचा मात्र दिव्या कधीच हसत नव्हती , समजून घ्यायची एकेदिवशी सुजयला  कॉलेजला यायला उशीर झाला . . सरांनी सुजयची  परिस्थिती व अडचण  समजून न घेता खूप फडाफडा बोलून अपमान केला . . सुजयला  खूप वाईट वाटले . ..पण करणार काय  ? त्या दिवशी   सगळा वर्ग मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर गेला .  मात्र  सुजय एकटाच वर्गात बसून होता  . . सुजय  सर्वांबरोबर आला  नाही म्हणून दिव्याने त्याची मित्रांकडे  चौकशी केली व सुजय का सर्वांबरोबर आला  नाही हे पण खरेतर  ओळखले . . आणि सुजयला  बाहेर कॅन्टीनला   नेहण्यासाठी माघारी वर्गात परत आली  आणि जवळ येऊन  म्हणाली का इतका नाराज आहे रे सुजय !    चल ना आमच्या बरोबर चहाला !  सुजय नको  म्हणत होता , नको - नको करत होता !  सुजयला जणू खूप दुःख झाले होते  पण तिने हट्टाने चहाला त्याला  नेहलेच !  
तोपर्यंत सगळा वर्ग कॅन्टीनला गेला होता . . सुजय व दिव्या  हळूहळू गप्पा मारत चालले होते  . . 
 तिने विचारले का उशिर झाला रे सुजय ! 
सुजय काय सांगणार ?
घरची बिकट परिस्थिती ?  
एक एसटी हुकली तर,  दुसरी एसटी लगेच नसने ? 
शेतातील काबाडकष्ट? 
घरातील कामे ?  जणावरांचा चारा पाणी ?  घरोघरी वाढावे लागणारे दुध ?  की किराणा मंडई ?  शेतातील पिकांना पिकांना पाणी देणे ? 
घरातील  बाकीची  जबाबदारी ?
  नेमकं काय काय सांगायचं ? 
खरंतर कामाच्या ओझ्याखाली त्याचा अभ्यास होत नव्हता , कामामुळे कॉलेजलाही दांड्या पडायच्या , उशीर व्हायचा , बुद्धी असूनदेखील अपमान होतोय याची सल असायची ,  तसा सुजय खेळात, वक्तृत्वात,  कविता करण्यात, हुशार होता . पण या कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे त्याचे गुण थोडेच कुणाला माहिती असणार? 
   घरातील जबाबदारी आणि असणारी कामे यामुळे मात्र हतबल होता ,  सोसण्या शिवाय पर्यायचं नव्हता  . . .  आणि ग्रामीण भागातील मुलांना समजून घेतो तरी कोण?  झगमगत्या दुनियेत ! 
ही सर्व  परिस्थिती सुजयने दिव्याला  सांगितली . . तरीही  सगळी कामे  सांगितली नाहीत पण  यामुळे होणारी ओढाताण व त्याचा होणारा अभ्यासावरील परिणाम हे तो सांगत होता . . . 
 ति ऐकत होती  . . 
मग ति हळूच  म्हणाली हे सर्व  सरांना सांगायचे ना ? 
 पण सुजयला   आपली अजचण सरांना सांगावी असे कधी वाटत नव्हते  . .  त्याला कुणाच्याही सहानुभूतीची व दयेची कधी गरज वाटत नव्हती. ..
तो म्हणायचा करायचा अपमान सहन. .!  पण आपण कमी  नाही स्वतःला समजायचं . . . 
 तिलाही खूप  वाईट वाटले . तिचेही  डोळे पाणावले ,  आणि म्हणाली काळजी नको करू ,  मि तुला नोट्स देत जाईल, तुला काही आडले तर समजून सांगेन,  पण तुझी कामे करत जा आणि अभ्यासही मनापासून कर, काही  अडचण असेल तर नि संकोचपणे  मदतही  मागत जा ? पण यावर त्याने फक्त मान डोलवली . . . 
हळूहळू कॉलेजचे दिवस जातच होते .  
तेंव्हा पासून दिव्या सुजयचा अपमान झाला तर  मनातून  नाराज व्हायची , पण मनातील सल ति कुणाशीच  बोलून शकत नव्हती . . 
दिव्या तिच्या सर्व  नोट्स सुजयला द्यायची , कधीकधी तर झेरॉक्स सुद्धा त्याला द्यायची ,  काही अडले तर समजून सांगायची व वह्या द्यायची . . . जणू बेस्ट फ्रेंडच झाले होते दोघे ! 
 कॉलेमधील, गॅदरींगला , काव्यवाचन स्पर्धेला , एकांकिका स्पर्धेला , वादविवाद स्पर्धेला , छोट्यामोठ्या नाटकांना दोघे एकत्र असाचे ,  विचारांनी व मनानेही दोघे एकत्र आले होते . 
 सुख दुःख वाटून घेताना , जेवणाचा डबाही वाटून खायचे , सुजय सुद्धा हळूहळू कॉलेजच्या विश्वात रमत चालला होता.  रुळला होता  याठिकाणी तो . 
त्याला हळूहळू हे कॉलेज  समजायला लागले होते , तो सगळ्या अॅक्टीवीटीत पुढे असायचा  सहाजिकच  त्याचं कौतुकही होत होतं . दिव्याला टेबलटेनिसची आवड होती व सुजयला क्रिकेटची आवड होती . दोघेही एकमेकांना सपोर्ट करायचे . . जणू दोघांची मैत्री म्हणजे कॉलेजचा एक चर्चेचा विषयच बनली होती . 
फक्त शरीरेच दोन म्हणा की ,  मन मात्र एकच असे दोघांचे नाते तयार झाले होते . एखाद्या वेळी सुजयची टीम हरली  तर तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी यायचे , दिव्याला मेडल नाही मिळाले तर सुजय एकदम खट्टू व्हायचा ! 
का असेल दोघांची ही अवस्था ?
 किती खोलीपर्यंत असेल दोघांची मैत्री ? 
काय असेल सुजयची जादू ?  
काय असेल दिव्याची भावना ? 
 हे जणूकाही न उलगडणारं कोडंच झालं होतं ?  कॉलेज संपलं , आणि शेवटचा पेपर झाला सगळेजण हॉटेलला जेवायला गेले , जेवणाची ऑर्डर सुद्धा सुजयने दिली ,  सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केले , आईस्क्रीम, बडीशेप खावून झाली व  कॅमेर्यांने फोटो काढले . तेंव्हा मोबाईल नव्हते ना !  
 एकमेकांच्या निरोपाची वेळ आली . 
नकळत सुजय व दिव्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण हळूच रुमालाने डोळे पुसत कुणालाही न दाखवता ,  हसत हसत निरोप घेतला ! 
 दिव्या पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती पण सुजयचे पुढील शिक्षणाचे   काहीच फिक्स नव्हते , निरोप घेताना कागदावर पत्ते व लँडलाईन नंबर तर दिले होते पण संपर्काचे मार्ग मात्र खडतर होते . . 
तीन वर्षात मनाने एकत्र आलेले आज विभक्त होणार होते !  जणू धुक्यात वाट हरवावी तसे होणार होते ! 
 कधी भेट होईल याची काहीच खात्री नव्हती . . . जणू सर्वजण पुढे चालले होते आयुष्याच्या पुढील वळणावरील मागील मैत्रीच्या आठवणींना मनात परत परत वेदना. .  जागवण्यासाठीच! 
कधी काळी एकत्र खेळलेली , बागडलेली पाखरं आज नव्या प्रवासाला निघाली होती , उंच स्वप्न  पाहण्याची ,  भरारी घेण्याची आणि जीवणात उंची गाठण्याची खूणगाठ  मनाशी बांधून!  तशी तर,  शरीरं दोन पण जणू  एक श्वास असलेले दिव्या व सुजय  आज वेगवेगळ्या दिशेने आयुष्याच्या  पुढील प्रवासाला चालले होते , आठवणींचा कल्लोळ डोक्यात घेऊन  ? 
कधी काळी एकमेकांशिवाय जगायचा विचारही करवत नव्हता दोघांना ! 
 एकमेकांशिवाय खाण्या पिण्याचाही   विचार त्यांच्या  मनाला शिवतही नव्हता ,  आणि  दुर होण्याचा असा विचार जरी मनात आला   तरीदेखील हे  जग सुद्धा दोघांनाही  नकोस व्हायचं ?  
खरेतर आजपासून एकमेकांशी बोलणंही होणार नाही हा विचार मनाला बेचैन करत होता .  "सागराच्या लाटा शांत व्हाव्यात, " तशी दोघांचीही अवस्था झाली होती .  मनातील वादळं शांत वरूण वाटत होती पण घालमेल मात्र आतल्या आत सुरू होती ! 
 जन्मभर मैत्रीची,  सोबतीची स्वप्न जणू तुटणार असेच वाटत होते त्यांना  .  आजपासून  एकमेकांच्या मैत्रीची   जागा जणू कोणतरी दुसर्‍याच  व्यक्ती घेणार हे मनाला पटत नव्हते . . दोघेतर आपआपल्या घराकडे निघाले होते पण भावणांचा कल्लोळ मनात घेऊन, जर माझ्या मैत्रीची जागा तू  दुसऱ्या व्यक्तीला दिलीस.. तर माझ्या आयुष्याचा  बेरंग होईल! हाच दोघांच्याही मनात विचार येत असावा ? 
 एकमेकांनी या   विरहात कसं मि जगायचं ! 
हे पुढील  आयुष्य कसं काढायचं ! 
 हाच विचार दोघांच्याही मनात घोळत होता ! 
आज  " डोळ्यातील आसवांना , गालावर ओघळतानाही " पाहणारं  जवळ कोणीच नव्हतं ! मन तर  म्हणत होतं हे आयुष्यभर का नसतं कॉलेज? 
दिव्या मनातच  म्हणत होती सुजय का रे मला एकटीला जगायला भाग पाडलंय तू !
 मला पाहिजे ति सजा दे पण माझ्यासाठी तरी तू पुण्याला ये ! , 
मनात म्हणत होती अरे सुजय,  लांडग्यांच्या कळपात नको सोडू तुझ्या लाडक्या  हरिणीला ! 
 बेसावध शिकार करतील रे हे माझी  माणसातील लांडगे   !  
तिच्या मनात विचार घोळत होता . . ति मनाशीच म्हणत होती . 
तुला आठवत का रे माझ्या वाढदिवसाला तु मला दिलेली गुलाबाची नाजूक कळी व  छानसी पेन आजही माझ्या कपाटात जपून ठेवलीय रे ! 
ति नाजूक पांढर्या  मण्यांची माळ ति तर मि एकटीच लपूनछपून घालते रे अधूनमधून ! 
 तिला आठवत होते कॉलेजमध्ये सोबतीला फिरताना तु मला कधीच रागावला नाही ! 
 कधी वाईट भावनेने माझ्याकडे  पाहिले नाही .  स्वप्न पाहताना नेहमी तु जमिनीवर राहिला , तुझ्या मनातील भावना तु कधीच बोलला नाही ?  त्यामुळे नकळत माझ्या ह्रदयात तुझी जागा खूप घट्ट झाली  आणि आज तु सोबत नाही , याची कल्पनाच  मी करू शकत नाही .... माझ्या हातचे डब्यातील पोहे तु आवडीने खाल्ले , भलेही ते चवदार नसतील तरीदेखील कौतुक केले माझे , का इतका गोड वागलास रे माझ्याशी ?  
मि एखाद्या वेळी दुःखी असले की तुला बैचेन व्हायचे  , तुला मि पुर्णपणे ओळखले रे मि  तुझ्यातील प्रेमळ माणसाला मि ह्रदयात स्थान दिले रे ! 
सांग ना सुजय! आपल्या मैत्रीत गरिब श्रीमंती , जातपात, धर्म असा भेदभाव कधीच नव्हता . . होय ना ! 
 तुला मि कित्येकदा सिनेमाला जावू असं मि  म्हटले पण तु विनम्र नकार दिला , किती प्रगल्भ होतास तू . . तुझा जीव नव्हता असे नाही पण जगाच्या नजरा तुला माहित होत्या . . 
 खरंच लाखात एक सुद्धा असा मित्र कुणालाच सापडणार नाही ! 
सुजयच्याही मनातील अवस्था केविलवाणी होती बैचेन होता .  दिव्याने वाढदिवसाला  दिलेली ग्रीटींग, पेन सारं जपून ठेवलं होतं , जणू दिव्याने दिलेल्या भेटवस्तूंची जागा त्याच्या ह्रदयातील वस्तु संग्राहलयातील एका कप्प्यात बंदिस्त केली होती त्याने  .  तो म्हणत होता मनाशी ,  की कित्येक मैत्रिणी येतील जातील पण माझ्या दुःखात हातात हात घेऊन सांत्वन करणारी , कधी पेन विसले तर लगेच देणारी ,  कुठेही गेले तरी बील देऊ न देणारी , पैसा होता म्हणून नव्हे तर जाणीव होती म्हणून आपुलकीने वागणारी ! सतत 
आठवण काढणारी दोन दिवस कॉलेज बुडले तर आपुलकीने चिडणारी . . काळजी  करणारी  , माझ्याशी असलेल्या  मैत्री साठी इतर मित्र  मैत्रिणींचेही टोमणे सहन करणारी !  सुजय मनाशीच बोलत होता  अभ्यासासाठी हट्ट धरणारी , तुझ्यापेक्षा  भारी मैत्रिण असूच शकत नाही . 
खरंतर दोघांनाही माहिती होतं तीन वर्षानंतर आपली भेट होणं कठिण आहे तरीदेखील तु मला जीव लावायची काळजी घ्यायची हे मि कसं विसरू ?  होय ना दिव्या 
 तुला खर तर त्या वेळी त्या माझी जेमतेम परिस्थिती माहिती होती.  माझ्याकडून तुला महागडी गिप्ट मिळणार नाहीत याचीही खात्री होती , वर्गात कॉलेजमध्ये खूप श्रीमंतांची व माझ्यापेक्षाही देखणी मुले होती पण तु माझ्यात फक्त  पाहिला माणूस, माझे पाहिले हळवे मन, माझी पाहिली तु धडपड  आणि माझा पाहिला तु विश्वास!  
तुच दिलेले फुल मि थरथरत्या हातांनी घेतले होते , जणू माझ्या हाताला सुद्धा स्पर्श न होण्याची मि  काळजी घेतली होती , हाच विश्वास तुला भावला हे तुच मला सांगितले . खरेतर फुलाची किंमत छोटी असते पण त्या फुलामुळे तुझ्या चेहर्‍यावर झालेला  आनंद पहिल्यांदा मला कळला  कळला !  
ते  फक्त फुलच  नव्हते तर  माझ्या मैत्रीची , माझ्या भावनेची एक अनमोल भेट होती , जणू  तुझ्यासोबतच्या  मैत्रीची व  पाहिलेल्या स्वप्नांची उंच उंच एक गुंफलेली  गाठ होती .... 
सुजय मनाशीच बोलत होता . . 
तुला आठवतय का ?  पहिल्या भेटीवेळी  आपण कॉलेजच्या हिरवळीवर  दोघेच गप्पा मारत बसलो होतो . . काय बोलावे आणि काय विषय काढावा हे तरी सुचत होते का ?  तु मला माझे बालपण विचारले , माझा भूतकाळ विचारला ! 
एका अनामिकाला जणू तु तुझ्या शब्दातून पाझर फोडलेला . . तेंव्हा 
  गेलेला  तो आपला दोन तासांचा वेळ  खर तर मला आजही आठवतो .  त्याच दिवशी तु मला  पाहिल्यांदा मा़झ्याशी आयुष्यभर  मैत्रीचा  प्रवास करण्याचे वचन घेतले होते आणि आज आपण बरोबर नाहीत याची सल सुजयला सतावत होते . . वचन पाळायला आपण कमी पजलो ही ति भावना होती. . . 
दिव्यापण मनाशी बोलत होती,  आपल्या रुममध्ये डोळे एकटीच पुसत होती , गालावरून ओघळणारे अश्रूत  जणू स्वप्न सारी भिजत होती . . . नव्हे विझत होती ! 
 मनालाच म्हणायची. सुजय  तुझ्या  भेटीची ओढ.....माझ्या मनात कायम राहिल  . 
ती आपली पहिली भेट.... मला सदैव आठवत राहिलं ! 
 पहिल्यांदा नजरेला नजर मि दिली होती पण तु तर तेवढेही धारिष्ट्य दाखवले नव्हते पण तु एक सालस शांत होता म्हणून मी नजरेला नजर तेंव्हा  भिडवली आणि तेंव्हा तुझ्याही  गालावर हळूच हसू उमटलं जणू लाजर्या मुली सारखा तु लाजला हे मि कसं विसरू ... अरे सुजय  माझ्यातर  मनातली धक धक वाढलेलीच  होती तेंव्हा  ... मला  काय बोलावं हे पण सुचत नव्हतं फक्त मि तुला एकटक पहात होते. . जणू निरागस  , मैत्री  मला खूणावत होते . खरेतर तु मुलींशी बोलायला लाजायचा यामुळेच तु मला आवडायचा रे ! 
आठवतंय का तुला ? एकदा कॅन्टीनला कॉफी घेताना किती मजा आली होती ,  कुणालाच काही कळेना.... विषय कळत नव्हता पण हसतमात्र होतो आपण?  बोलायला विषयच नव्हता पण काहीतरी बोलायचे  म्हणून संबंध  नसलेल्या विषयावर बोलत बसलेलो आपण ....सध्या   प्रत्येक गोष्टीची  तुझी आठवण  येते रे तुझी ,  तुझ्या शिवाय  दिवस जाणार नाहीत म्हणून वाईट वाटते रे , एकदा नाही का ?   अचानक रिमझिम  पाऊस सुरू  झाला आणि मि भिजले होते .  पण तु माझ्याकडे वर मान करून न पाहता मला हक्काने घरी जायला सांगितले व मि पण तुझे ऐकले का तर ते आजही मला कळत नाही रे ! 
 मित्रा तुझ्या मैत्रीच्या  स्वप्नात रंगले आहे मि !  भेटशील ना परत ... खरंतर त्या दिवशी मला तुझ्या  सोबत पावसात भिजायच होतं , माझ्या  भिजलेल्या  केसांना तू हाताने हळूवार पणे हात फिरवून बाजूला सारावे वाटत होतं . पण तुला समाजाची रित पुरती माहित होती , तु विचारांने प्रगल्भ होता , तू तसा विचार केलाच नव्हता मैत्री पलीकडे  त्यामुळेच तु मला भावतो रे  ,   तुझं ते माझ्याकडे  पाहणं कधीच वेगळं नव्हतं मात्र  यातच तुझं मोठेपण होतं , तुझ्या  डोळ्यांनी  मला तु भरभरून बघावं हे मला वाटायचं पण तु  कायम  स्वतःला यापासून दुर ठेवलं जणू तुझा आदर्श हा साक्षात सर्व युवकांनी घेतला  पाहिजे .  
 कधीतरी महाबळेश्वर, माथेरान व त्या थंड वातावरणात आपण दोघेच जायचं फिरायचं मि स्वप्न पाहिले होते   तु  व मि  गरमगरम चहा घ्यायता , शॉपिंग करायचं मस्तपैकी ति दोघांनीच जेवण करायचं व दिवसभर फिरून परत यायचं  हे माझं  स्वप्न होतं रे ! 
ते स्वप्नच राहिलं योगच नव्हता  ,  ते स्वप्न जरी साकार झालं नाही तरी तुझं वागणं   जणू आयुष्यात मैत्रीचा आदर्श सांगून गेलंय रे आपलं कॉलेज जीवन  ... 
आजची तरूणाई  किती सुंदर स्वप्न पाहतात, प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि शुल्लक कारणाने लगेच दुरावतात. . पण आपल्यात असं काही झालंच नाही , तु कधी स्वप्न  दाखवलेही नाही  आणि कधी खोटं आश्वासनही दिलं नाही .  इतका कसा तू समंजस होता . . दिव्या आठवलं  तशी हुमसू हुमसून  रडत होती . . 
 मनाला समजवत होती कधीतरी येईल परत माझ्या जीवनात माझा लाडका सुजय, 
फक्त  मित्र म्हणून तरी , तो कधीच मला   विसरून जाणार नाही,  
ना.....मी कधी विसरून जाणार? 
इकडे सुजयही मनाची समजूत घालतोय, स्वप्नात जावून  अजूनही तिथंच थांबून आहे तो ,  जिथं  एकमेकांना  सोडलं... निरोप दिला . 
व्याकूळ होतोय आठवणीनी , मनाशीच म्हणतोय, जावून भेटू या अधूनमधून तिला , जरी कॉलेज माहिती नसले तरी शोधू , जरी पत्ता माहिती नसला तरी हुडकून काढू . . होईल थोडा त्रास पण  नक्की भेटू  , मैत्रीच्या  रस्त्यात जीवनात आलेली व्यक्ती जेंव्हा  दुर जाते तेंव्हा क्षितिज सुद्धा आपल्याला दिसत नाही . जीवनाचा रस्ता  दाखवणारी व्यक्ती जेव्हा दुर जाते ना त्यावेळीच  मैत्रीचा  अर्थ कळतो  , जीवनातील  धक्का देणारा तो एक क्षण  असतो..... 
खरेतर मैत्रीत जीव असतो , जिव्हाळा असतो , आपुलकीचा सागर असतो , समजून घेतले तर आयुष्याचा मार्ग असतो . 
 आपल्याला काहीच अधिकार नसतानाही कुणावर तरी हक्कदेखील असतो जणू तो आपला अधिकार सुद्धा वाटतो . 
 कुणाच्या आयुष्यासोबत न खेळता मैत्रीचा झरा फुलवता येतो , योगायोगाने त्यात प्रेमाच्या धारा बरसल्या तर तो एक योग असतो पण मैत्री हा    खेळ नसतो डाव खेळून खेळल्यागत कधी  मोडायचा नसतो . मैत्रीत भावनांचा मिलाफ असतो. 
म्हणून सुजय आणि दिव्याच्या मैत्रीचा धागा पक्का असतो व या साठीच त्यांचा जीव तुटतो . ..मैत्रीत 
दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवायची असते . दुसर्‍याचे दुःख  आपलेच आहे व ती वेळ  स्वतःवर  आल्यावरच होते. दुःख होते असे नाही तर त्यासाठी संवेदनशील असावे लागते . 
म्हणून दिव्या व सुजय स्वतः एकांतात विरह सहन करतात मात्र  ते सहन करून सुद्धा दुःखाची जाणीव होऊन देत नाहीत ... एकमेकांना 
सुजय व दिव्या भेटतील का ?  
त्यांची मैत्री पुढे जाईल   का ? 
पुढे काय होईल? 
माझ्या वाचकांनी याची उत्तरे शोधावीत माझा यावरील पुढील लेख येईपर्यंत. . . 

काल्पनिक कथा . . . 
©® विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

नातेपुते गावात शिवजयंती उत्साही वातावरणात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण






*सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, सर्वधर्म समभावाचे प्रतिक व दृष्ट  दुर्जनांचे संहारक, प्रजाहितदक्ष राजे, मानवतेचे रक्षक, सर्व जाती धर्माला एकत्र करून  हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे , सर्व जाती धर्मातील नागरिकांचे दैवत,  जाती पातीच्या चौकटी बाहेरील राजे , अन्याय अत्याचार व जुलूमशाही विरुद्ध रणशिंग फुंकनारे*

 श्रीमंत योगी .  श्री श्री श्री 
*छत्रपती शिवराय* यांचे  जयंती  निमित्त  बुधवार  दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी . सकाळी  ९ वाजता .  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते* यांचे वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . 
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन . श्री. नारायणगाव देशमुख, श्री आप्पासाहेब भांड, श्री सुनिल राऊत यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन व शिवरायांचे मुर्तीला गुलाब पुष्पांचा पुष्पहार घालून  करण्यात आले  . 
सदर कार्यक्रमाला 
श्री अमरशिल देशमुख, श्री  धनंजय देशमु़ख, श्री प्रशांत सरुडकर, श्री हेमंत   देशमुख, श्री बाळासाहेब बळवंतराव, श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे ,  श्री संजय ढवळे , श्री संजय उराडे  , श्री किशोर ढवळे , श्री शक्ति पलंगे , श्री सुरज चांगण, श्री रोहित चांगण,  श्री सर्जेराव पाटील, श्री समिर सोरटे , श्री जयंत चिंचकर,  श्री नंदकुमार धालपे, श्री कुलभुषण रोटे ,  श्री सुनिल ढोबळे ,  श्री सुरज पवार, श्री संजय चांगण, श्री अरुण कर्चे , श्री प्रशांत इटकर,  श्री अमरसिंह निकम, गणेश निकम.  आदी मान्यवर व गावातील बहुसंख्य नागरीक  आणि शिवप्रेमी  बोलगोपाळ  उपस्थित होते . 
सदर कार्यक्रम अतिशय  उत्साही वातावरण संपन्न झाला . शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने सर्वांना अल्पउपोहारची सोय करण्यात आली होती . 
या प्रसंगी कैलास सोनवणे यांनी  शिवरायांच्या जयघोषाच्या   घोषणा देऊन वातावरणात उत्साह  निर्माण केला .  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीचे , 
 श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे , श्री  कुलभुषण रोटे , श्री सुरज चांगण  , रोहित चांगण, श्री  आबा जाधव, श्री साधू आवळे , यांनी परिश्रम घेतले .

विशेष म्हणजे सर्व शिवप्रेमी नागरीक हे कोणालाही फोन न करता सुद्धा  व्हॉट्सप व फेसबुकवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित होते .































सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

भारत हा धर्मशाळा नाही . कुणीही बेकायदा या ठिकाणी रहावे आणि देशातील जनतेने निमुटपणे सहन करावे !

चालू घडामोडींचे विश्लेषण





भारतीयांनो जागे होऊया !  हा देश आपल्या  सर्वांसाठी  महत्वाचा आहे . सत्ता कुणाचीही येईल जाईल पण आपल्या सर्व देशवाशियांमधील विश्वास डळमळीत होता कामा नये ! इंग्रजांचे फोडा  व राज्य करा या नितीला बळी पडूनच आपल्या देशाचे तुकडे झाले . देशात एक सुत्रता येण्यासाठी . . स्वतःच्या  धर्माचे आचरण करताना , हा देश कोणत्याही धर्मातील तत्वानुसार किंवा धर्मगुरूंच्या इशार्यावर न चालता घटनेच्या व कायद्याच्या चौकटीनुसार चालला पाहिजे . या देशातील प्रत्येकाचे हक्क अधिकार देतानाच, प्रत्येकाला कर्तव्याची सुद्धा जाणीव असली पाहिजे . जात पात धर्म बाजूला ठेवून सर्व भारतीयांसाठी सर्व कायदे समान असले पाहिजेत. त्याच बरोबर, अल्पसंख्यांक, आदिवासी, सामाजिक व आर्थिक मागास आणि भटक्या जाती जमाती यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, त्यासाठीच त्यांची संपुर्ण माहिती एका छत्राखाली असायला पाहिजे . म्हणूनच
*संपुर्ण भारतीयांची  धर्म, जात,  प्रांत , जिल्हा, तालुका  व गावनिहाय  जनगणना होऊन एक रजिस्टर बनले पाहिजे . .*
विजय पिसाळ नातेपुते .  संपुर्ण लेख वाचा . .
भारत हा विविध भाषा , विविध संस्कृती , विविध चालीरीती , विविध  रुढीपरंपरा विविध जाती , विविध  धर्म  यांनी बनलेला विशाल मोठा देश आहे . या देशावर पुर्वीच्या काळात असंख्य राजे , महाराजे , यांनी राज्य केले , विविध परकीय आक्रमकांनी शेकडोवेळा या देशाची लुट केली , राजेशाही नंतर भारतावर,  सर्वाधिक काळ  राज्य केले ते ब्रिटीशांनी , शेकडो वेळा लुट होऊन, हजारो लढाया,  रणसंग्राम होऊनही या देशाची संस्कृती टिकली  या देशात  ब्रिटीश राजवटीपर्यंत फारशा समस्या नव्हत्या ,  सातत्याने युद्ध व यादवी याने जरी अंतर्गत कलह होता तरीदेखील  हा भूभाग समृद्ध होता , अखंड  भारतात जेंव्हा ब्रिटीशांनी इथल्या सर्व  राजेशाहींचा पराभव करून एकछत्री राज्यकारभार सुरू केला व या देशातील हातमाग, लघुउद्योग,  कुटीर उद्योग, संपुष्टात आणले  आणि या  देशातील सगळ्या संपत्तीची लुट केली , जनतेला गुलाम बनवले ,  अन्याय अत्याचार केले तेंव्हा पासून एकसंघ भारतीयांच्या मनात असुरक्षित वातावरण तयार झाले , जणू भारत देश गुलामगिरीच्या खाईट लोटला गेला .  ब्रिटीशांच्या धोरणाला कंटाळून जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन सरकार विरूद्ध सामूहिकपणे जनक्षोभ तयार होऊ लागला तेंव्हा ब्रिटीशांनी आपल्या कुटील डावपेचांना सुरुवात केली , सुरूवातीला त्यांनी बळाचा वापर करून, तरूणांची धरपकड करणे , १८५७ उठाव मोडून काढणे , असंख्य नेते व तरुणांना तुरुंगात डांबणे हे प्रयोग केले , जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणले पण जनक्षोभ काही केल्या कमी होत नाही हे दिसताच धर्माच्या आधारे  बंगालच्या फाळणीचा घाट घातला व भारतीय समाजात फुटीची बीजे रोवली , बॅरिस्टर  जीना सारख्या कपटी व महत्वकांक्षी मुस्लिम नेत्याला हाताशी धरून अखंड भारताचे तुकडे तुकडे कसे होतील हेच पाहिले . भारतीयांच्या दुर्दैवाने बॅरिस्टर  जीनाने देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे तुकडे केले . . पाकिस्तानची निर्मिती , जम्मू काश्मीरचे सामिलीकरण, व बांग्लादेशची निर्मिती हे विषय वेगवेगळे आहेत त्यावर नक्की कधीतरी लिहीणं होईलच. पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या देशातील वातावरण पुर्णपणे गढूळ करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले ते कायमचेच!!  हिंदूंचे  मुस्लिमांकडे संशयाने पहाणे व मुस्लिमांना असुरक्षित वाटू लागणे यातूनच धार्मिक संघर्ष आणि कट्टरवादाचा उदय झाला व असंख्य तरूण यात भरडले गेले .
हे मात्र नक्की . .  पाकिस्तान जरी मुस्लिम राष्ट्र झाले तरीदेखील भारताने धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारले , आणि भारताचा  प्रगतीचा प्रवास सुरू झाला !  पाकिस्तान व बांग्लादेशच्या निर्मिती नंतर पाकिस्तानी व बांग्लादेशी नेतृत्वाला तिथला राज्य कारभार नीट करता आला नाही व त्या ठिकाणी लोकशाही नीट  रुजली नाही त्यामुळे त्याठिकाणी बर्याचदा लष्कर आणि राजकीय पक्ष यांच्यात विसंवाद होऊन सरकारे बरखास्त केली गेली , लष्करी राजवटी तिथे आल्या !  भारत पाकिस्तान यांचे वय सारखे असूनदेखील व तुलनेने पाकिस्तान समृद्ध असूनदेखील, तिथल्या मूलतत्त्ववाद्यामुळे त्या देशात दहशतवाद रुजला फोफवला  ,,त्यामुळे त्या देशाची प्रगती पुर्णपणे खुंटली , पाकिस्तान आज भिकारी व बकाल झाला  तिच परिस्थिती बांग्लादेशची झाली  त्यामुळे तिथे अनियंत्रित लोकसंख्या वाढत गेली , मूलतत्त्ववाद्यांना इस्लाम कधीच कळला नाही, त्यामुळेच पाकिस्तानमध्ये  दहशतवाद्यांचे तळ निर्माण झाले .  पराकोटीचे दारिद्र्य निर्माण झाले , तरुणांच्या हाताला काम मिळत नाही , अशा परिस्थितीत तितल्या तरूणांना मूलतत्त्ववाद्यांनी जिहादी बनवण्याचा  एककलमी कार्यक्रम  हाती घेतला . पर्यायाने पाकिस्तान तर बकाल झालाच पण बांग्लादेश सुद्धा फार नीट राहिला नाही . सहाजिकच त्याची झळ   पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांच्या  सिमेवरील भारतातील  राज्यांना बसू लागली . शेजारी जर दरिद्री असेल तर चांगल्या लोकांना सुद्धा नीटपणे जगता येत नाही तिच परिस्थिती भारताची झाली .  बांग्लादेश व पाकिस्तानात  लोकांची होणारी  उपासमार व अंतर्गत गढूळ वातावरण यामुळे हाताला काम मिळावे , पोट भरता यावे यासाठी पश्चिम बंगाल, नेपाळ, आसाम, जम्मू काश्मीर या प्रदेशातून आपल्याकडे भयंकर घुसखोरी होत राहिली . तिनही देशातील सीमावर्ती भागातील संस्कृती सारखीच असल्यामुळे व सुरुवातीला आपलीही लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याची झळ आपल्याला जाणवली  नाही पण हे घुसखोरीचे लोण देशाच्या कानाकोपर्या पर्यंत पसरू लागले व इथूनच खर्या अर्थाने चिंता निर्माण होऊ लागली . घुसखोरी बरोबरच आतंकवादी या देशात मुक्त संचार करू लागले आणि या देशातील लोकांचे जगणे खराब केले .
 कायदेशीर मार्गाने व्हिसा व पासपोर्ट काढून रोजगारासाठी कुणी या देशात आला असता तर समजू शकलो असतो . पण या देशातील सीमावर्ती राज्यात यांनी घुसखोरी करून स्थानिकांना हाताशी धरून कागदपत्रे बनवली , ते भारताचे रहिवासी झाले . हळूहळू ते निवडणूका लढवू लागले इतकेच काय तर इथल्या स्थानिक भारतीय नागरिकांवर अन्याय,  अत्याचार सुद्धा  करू लागले . त्यामुळे सर्वप्रथम इंदिरा गांधी यांनी घुसखोरा विरूद्ध कठोर भूमिका घेतली परंतु त्यांची नंतर हत्या झाली . नंतरच्या काळात  दुर्दैवाने राजकारणापाई घुसखोरीचा हा गंभीर मुद्दा कुणालाच गांभीर्याने घ्यावा असे कधी वाटले नाही . या देशात जे १९४७ साली लोक राहिले, या देशाची घटना व कायदे जे पाळतात  त्यांच्या बद्दल कुणाचा आक्षेप किंवा तक्रार असायचे कारण नाही . मग ते धर्माने , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध, पारसी अशा कोणत्याही जाती धर्मातील असोत, त्यांच्या हक्क आणि अधिकारांना कुणालाही धक्का लावता येणार नाही . मात्र कोणत्याही परिस्थितीत १९४७ नंतलर पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करून बेकायदा आले त्यांची बाजू घेण्याचा व त्यांना अधिकार मागण्याचा व त्यांच्या साठी आंदोलने करण्याचा  कुणालाही हक्क  नाही   किंवा १९७१ नंतर जे बांग्लादेश किंवा अन्य देशातून बेकायदा या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्यांचीही बाजू कुणी घेऊ नये दुर्दैवाने घुसखोरीचा मुद्दा बाजूला ,,पडलाय धार्मिक रंग देऊन ध्रुवीकरण केले जातेय व त्याला बळी मात्र सामान्य पडत आहेत   आणि राजकारण मात्र जोरात चालू आहे .
सांगण्याचा मुख्य आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की , यापुढे जर या देशात बाहेरील कुणी बेकायदा घुसखोरीचा प्रयत्न केला किंवा घुसखोरी करून वास्तव्य करू लागला तर त्यांना शोधायची आपल्याकडे कोणतीही यंत्रणा दिसत नाही . Caa व nrc जरी बाजूला ठेवले तरी देशातील प्रत्येक नागरिकांच्या नोंदीचे रजिस्टर हे तयार झालेच पाहिजे . बेकायदा लोक परत घुसले व जर  नोंदणी रजिस्टर  असेल  तर ते लोक  शोधून काढता येतील.
आपल्या देशात, जमीन, रस्ते , दागिने , वस्तू ,  घरे  प्रॉपर्टी , गाड्या , प्राणी , पक्षी , यांची रितसर नोंदणी होते इतकंच काय, मतदार, पदवीधर, विविध संस्था , राजकीय पक्ष, संघटना  यांचीही नोंदणी होते .  मग देशातील नागरीकांची नोंदणी करायला कुणाचा आक्षेप असायचे कारण काय?  हा प्रश्न हिंदु -मुस्लिम या दृष्टिकोनातून बघण्याची व त्यावर राजकारण करण्याची मानसिकताच देशाला रसातळाला घेऊन जाईल. आपल्या देशातील कोणताही नागरीक बाहेर देशात बेकायदा वास्तव्य करू शकत नाही किंवा तसा कुणी प्रयत्न केला तर संबंधित देश घुसखोरावर कठोर कारवाई करतात हे आपण वेळोवेळी पाहिले आहे . मग आपण आपल्या देशात बाहेरील बेकायदा घुसखोर खपवून घे़ण्याची गरज काय?
देशात जर कायदा , सुव्यवस्था  चांगली रहायची असेल तर सर्वांनाच एकमेकांच्या हक्क व अधिकारांची जपणूक करावीच लागेल.
सवलती मिळवताना , सरकारला आपण पाहिजे ति कागदपत्रे देतोच की , साधा पासपोर्ट काढायचा असेल किंवा जातीचा दाखला काढायचा असेल त्यांना सरकारने सांगितलेली कागदपत्रे देणे बंधनकारक असते तिच या ठिकाणी पद्धत राहणार आहे . पण सध्या विनाकारण वाद निर्माण होत आहेत. राजकारण केले जात आहे .
तसेतरी आपल्या देशात राहणार्‍या प्रत्येकाला तुझे मुळ गाव कोणते , तु कोणत्या कारणांनी या गावात रहायला आला आहे . तु या ठिकाणी काय काम करतो आहे . कुणाकडे भाड्याने  राहतो आहे . याची संपुर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे यापुढे बंधनकारक केलेच पाहिजे .  घुसखोरीमुळे गुन्हेगारी वाढतेय, स्थानिकांना रोजगार नाही व बाहेरून ही घुसखोरी . पाणी , रस्ते , वीज, शिक्षण, आरोग्य अशा असंख्य समस्या या देशातील नागरिकांच्या पुढे आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे की  , आपल्या शेजारी जर काही संशयास्पद घडत असेल  , बाहेरची अनोळखी लोक वारंवार एखाद्या ठिकाणी  एकत्र येत असतील. हिंदू विरूद्ध मुस्लिम असे कट रचत असतील तर त्याची खबर देशातील सुजाण नागरिकांनी पोलिसांना दिली पाहिजे . पुलवामा , पठाणकोट, मालेगाव, २६/११  , मुंबईतील साखळी बाँबस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोट  अशा प्रकारची असंख्य उदाहरणे समोर असताना नागरिकांनी गप्प राहता कामा नये . कोणत्याही कायद्याला लोकशाही मार्गाने विरोध जरूर करता येतो ये जरी खरे असले तरीदेखील कायद्याचा आपण अभ्यास न करता विरोध करणे चुकीचे आहे . राजकारणापाई देशातील वातावरण गढूळ करून सामाजिक शांतता भंग करण्याचा कुणालाही हक्क व अधिकार नाही . माझे तर प्रामाणिक मत आहे . पॅन कार्ड  , आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र अशी असंख्य ओळपत्रा ऐवजी , संपूर्ण कुटूंबाची माहिती असणारे , तो कुठेही रहायला गेला तरीदेखील मुळ गावाची व तिथली माहिती असणारे व सध्या राहतो तिथले असे एकत्र माहितीचे एकच ओळखपत्र तयार करून त्याची नोंद रजिस्टरमध्ये केली पाहिजे . त्या रजिस्टरमध्ये , त्याची प्रॉपर्टी व संपुर्ण कुटुंबांची  माहिती असली पाहिजे . खरेतर
देशातील गुन्हेगारी व अनागोंदी याला जबाबदार आपण सर्वजण आहोत.
बाहेरील घुसखोरांना सहानुभूती दाखवण्याची बिलकुल गरज आपल्याला नाही .
 सरकारने बेकायदा देशात वास्तव्य करणार्‍या लोकांना हुडकण्यासाठी गुप्तचर यंत्रणा निर्माण करून, घुसखोरांना शोधून काढले पाहिजे . भारत हा धर्मशाळा नाही व कु़णाचीही जहागीरही नाही . त्यामुळे सरकारने कठोरपणे गुप्तचर यंत्रणा निर्माण करून देशात अशांतता निर्माण करणाऱ्या , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे  आणि बाहेरील घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.  जात धर्मावरून होणारी आंदोलने व हिंसक घटना या बंद झाल्या पाहिजेत मग ते कोणीही असो व  कोणत्याही जाती धर्मातील असो . .
भारतभूमी सर्वांची आहे .
तिचे अखंडत्व राखणे आपले कर्तव्य  आहे . घटनेच्या चौकटीत राहून  सर्वांसाठी समान कायदे , समान संधी व समान  नियम असले पाहिजेत.
विजय पिसाळ नातेपुते .
९४२३६१३४४९

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा "स्नेहमेळावा २९डिसेंबर २०१९ रोजी संपन्न "

चालू घडामोडींचे विश्लेषण












डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या शाळेत सन १९९२/१९९३ या साली  इयत्ता  वी ला   असणार्‍या माजी  विद्यार्थी /विद्यार्थीनींचा  *स्नेहमेळावा*  २६  वर्षानंतर रविवार दिनांक २९/डिसेंबर २०१९ रोजी  मोठ्या उत्साही  वातावरणात संपन्न झाला . 
सन १९९२/१९९३ या वर्षी डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा संपन्न झाला ,  सदर मेळाव्याचे   उद्घाटन  दाते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन बी दीक्षित सर व उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका  यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पुजन  करून करण्यात आले .  सुरवातीला श्री समिर सोरटे यांनी आलेले सर्व  गुरूजन तसेच   त्या काळातील शिक्षकेतर कर्मचारी, माजी  विद्यार्थी आणि  विद्यार्थीनी यांचे स्वागत केले . 
व त्यानंतर इयत्ता तिसरीतील कु. 
स्वेतश्री पिसाळ, कु. वेदिका उराडे, कु. मैथली बडवे कु. रसिका ढवळे व इयत्ता चौथीतील कु. श्रेयशी भांबुरे यांनी शालेय प्रार्थना म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले .  जणू या शाळेतील बाल विद्यार्थीनींनी  त्याकाळातील शाळेत होणार्‍या प्रार्थनेच्या आठवणी जाग्या केल्या . तर  श्री विजय पिसाळ यांनी प्रास्तविक करताना 
प्रास्तविकामध्ये शालेय जीवनात या शाळेत  होणारी मान्यवरांची  व्याख्याने, क्रिडा स्पर्धा , स्काऊट गाईडचे कँप, आर एस पी चे संचलन, शाळेचे बँड पथक,  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, त्याकाळात शाळेत भरणारी विज्ञान प्रदर्शने , वक्तृत्व स्पर्धा , सुंदर  हस्ताक्षर स्पर्धा , चित्रकला स्पर्धा यांचा संपुर्ण आढावा घेतला , त्याचप्रमाणे शाळेतील शिस्त, शिक्षक व विद्यार्थी यांचे असलेले आदरयुक्त नाते आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम याचाही आढावा घेतला , त्याचप्रमाणे गणित, इंग्रजी , मराठी , इतिहास, भुगोल, हिंदी ,  संस्कृत, कार्यानुभव, चित्रकला व क्रिडा  या विषयातील प्रत्येक शिक्षकांची विद्यार्थांना शिकवण्याची  हातोटी  , शिक्षकांची   गुण वैशिष्ट्ये , शिक्षकांचा दरारा व विद्यार्थी यांचेशी असणारे नाते यांचाही उल्लेख करून दिला .  दाते प्रशाला व त्याकाळातील शिक्षक यांच्यामुळे आम्ही कसे घडलो हेही सांगितले . 
सदर स्नेहमेळाव्यास उपस्थितीत शाळेचे माजी मुख्याध्यापक 
मा.  श्री.  वहीकर सर, 
मा. श्री . एस पी दिक्षित सर
मा. श्री . एस. एम. ढोपे सर
मा. श्री. एस. एस शिंदे सर
मा. श्री सी.  डी. जैन सर 
मा. श्री . सुनिल बी.  साळवे सर. 
मा.सौ.एन. एस.मुल्ला (इनामदार ) मॅडम 
मा. श्री. पुरुषोत्तम ए. भरते
 सर
मा. श्री एस एन डांगे सर 
मा. श्री.ए. ए.  स्वामी सर 
मा. श्री.ए. वाय सोनवणे सर 
मा. श्री . एस. एम कुचेकर सर 
मा. श्री एन. जे. जमदाडे सर
 विद्यमान मुख्यध्यापक 
मा. श्री. एन बी दिक्षित सर
मा. श्री. पी. वाय. बडवे सर
मा. सौ.एस. एस कुलकर्णी मॅडम ( एम. पी. के मॅडम )
मा. श्री. ए. के.  खडतरे सर 
मा. श्री. एच. आर. गोरे सर
मा. श्री. आबासाहेब देवकाते सर 
(वरिष्ठ लिपिक )
 या सर्वांचा सत्कार  मानपत्र,  मानाचा फेटा बांधून, हार व श्रीफळ आणि गुलाबपुष्प  देऊन  करण्यात आला .  विजय पिसाळ यांनी लिहलेल्या मानपत्रााचे वाचन श्री औदुंबर बुधावले सर यांनी केले .  
 तसेच त्या काळातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला .  
विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे प्रतिनिधी म्हणून 
जाकीर निठोरे , रविराज गायकवाड, किशोर ढवळे सौ. स्वाती कुचेकर, स्मिता कुलकर्णी , शमा मुल्ला , सारीका गांधी व स्वाती देशपांडे  यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली व शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या . 
 तसेच श्री.  विजय पिसाळ यांनी स्वतः  शाळेवर केलेल्या कवितेचे वाचण करून  शाळेतील आठवणी कवितेतून जाग्या केल्या . 
डॉ. बा. ज दाते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन बी दीक्षित सर,  प्रा.श्री एस एस  शिंदे सर, सहशिक्षक श्री पी वाय बडवे सर व सौ.  एस एस कुलकर्णी मॅडम  यांनी त्याकाळातील शाळेतील सर्व आठवणीही  अनुभवकथन केल्या  व सर्वांना मंत्रमुग्ध केले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन औदुंबर बुधावले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नारायण काळे यांनी मानले . 
 शाळेतील  कार्यक्रमाची  सांगता जनगनमन या  राष्ट्रगिताने करण्यात आली व त्यानंतर सर्व शिक्षकांचे हस्ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना गुलाबपुष्प देऊन शाळेतून  निरोप दिला . श्री रविराज गायकवाड यांनी सर्वांना सातारी कंदी पेढ्यांचे वाटप करून सर्वांचे तोंड गोड केले .  त्यांतर वन भोजनासाठी व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी  सर्वांनी मौजे खुडूस ता . माळशिरस या निसर्ग पर्यटनस्थळाला भेट दिली व मौजे खूडूस येथे छानपैकी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि एकमेकांचा परिचय करून देत फोटोशेशनही केले . आणि दिवसभराचे सर्व कार्यक्रम आनंदाने पार पाडत परत कधीतरी असेच एकत्र येऊया व एकमेकांच्या संपर्कात राहुया असे म्हणून सह्रदय वातावरणात सायंकाळी ५ वा . एकमेकांचा निरोप घेतला .  
सदर कार्यक्रमाला सन १९९२/१९९३ बॅचचे खालील  विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या . 
विजय पिसाळ,  सुखदेव ननवरे , सचिन दोशी , स्वप्नील गांधी, रमेश राऊत, राहूल बोत्रे, रविंद्र दावडा, जितेंद्र साळी, नितीन पाठक, नारायण काळे, संदीप गटकुळ, सुरेश बापु पांढरे , अरूण पांढरे, संतोष पागे, दिपक दळवी, समिर सोरटे, अजिंक्य व्होरा , सुधीर काळे, शिवाजी सोरटे, विशाल भंडारी , ज्ञानदेव ननवरे , विठ्ठल रुपनवर, राजवल्ली नदाफ, संतोष कुलकर्णी , रविंद्र बरडकर, विनोद रुपनवर, अशोक डोंबाळे, जावेद शेख, बापुराव रुपनवर, चेतन लाळगे, सुदर्शन बनसोडे , सुरेश गणपत पांढरे , अजय होळ, जाकीर निठोरे, दादा बनसोडे , तुळशीराम राऊत, सचिन डफळ, प्रज्योत डुडू, विशाल दोशी , सत्यजित दोशी , सुभाष पिसे , जयंत चिंचकर, सुनिल महामुनी , नितीन पवार, सतिष बरडकर, किशोर ढवळे , नानासाहेब गोरवे, शिवाजी सावंत, रविराज गायकवाड  , संतोष साळुंखे  , 
उषा ढवळे , मनिषा ठोंबरे , शैलजा लाळगे, परवीन तांबोळी , संयोगिता डुडू, दिपाली इंगोले , निता भरते, सुजाता गांधी, मधुमती झगडे , सारिका गांधी, शैला जाडकर, सुनिता दोशी  , स्मिता कुलकर्णी  , अनुजा गांधी, स्वाती दोशी , दिपाली टकले, शमा मुल्ला , स्वाती देशपांडे , स्मिता शहा , सुरेखा पदमन, पौर्णिमा दळवी, स्वाती कुचेकर, दिपाली उराडे , रुपाली भरते, हेमा भरते हे सर्वजण उपस्थित होते . 
सदर स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी , दाते प्रशाला मित्र मैत्रिणी परिवार व स्नेहमेळावा संयोजन समितीने आहोरात्र परिश्रम घेतले . या मध्ये नियोजनाची संपुर्ण जबाबदारी विजय पिसाळ यांनी पार पाडली तर सुखदेव ननवरे , सचिन दोशी  , समिर सोरटे, जितेंद्र साळी, राहूल बोत्रे, जयंत चिंचकर, या सर्वांनी मोलाची साथ दिली . 
मानपत्र लेखन व शब्दांकन आणि कविता लेखन व वाचन श्री  विजय पिसाळ यांनी केले तर मानपत्राचे डिझाईन करून घेण्यााचे  व  सौजन्य श्री रविराज रामराव गायकवाड यांनी स्वखर्चाने केले ,  अशा प्रकारे सन १९९२/१९९३ वर्षीच्या १०च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा गुरूजनांचे उपस्थित पार पडला !