vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ११ मे, २०१८

आयुष्याचे सार्थक कधी होईल

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

1 टिप्पणी: