vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

आपले जीवन जगताना !!!




चालू घडामोडींचे विश्लेषण

आपलं जीवन !
आपण आपल्या मनाला काही प्रश्न जरुर विचारलेच पाहिजेत !
आपण माणूस आहोत का ?
आपण आपल्यासाठी जगतो की समाजासाठी जगतो ?
खरंच आपलं आयुष्य हे कशासाठी आहे ?
आपली निर्मिती कशासाठी झाली आहे ?
आपल्या आयुष्याची दिशा काय  ? 
आपण आपल्यासाठी  काही वेळ देतो का ?
आपले खास कोण आहे का ?
आपण आपल्या मनाशी संवाद साधतो का ?
वरील प्रश्न  आपल्याला पडले नाहीत तर ?  मला वाटते आपल्या मनाशी बोलायला कमी पडतो आहोत. वरील प्रश्न 
विचारल्यानंतर क्षणभर शांतपणे एकांतात बसून काही संवाद आपण आपल्याशी करावेत ..आणि मग ..
आपण जन्माला आल्यापासून मृत्यू  येईपर्यंत काय करायचा निर्धार केला आहे व आपली आजवरची वाटचाल काय राहिली आहे.
खरेतर आपण   खूप मेहनत करतो ,खूप मोठी स्वप्न पाहतो , स्वप्नांना साकार  करण्यासाठी शिक्षण घेताना , नोकरी अगर व्यवसाय करताना भयंकर परिश्रम करत असतो . सर्वसाधारण लोकांची जी स्वप्न असतात तीच आपलीही स्वप्न असतात . 
छानसा /छानसी   जोडीदार, आपलं स्वतःचं टुमदार घर , घरात सगळ्या सुख सुविधा बर्यापैकी  चांगला बँक बॅलन्स, समाजात मानसन्मान ,प्रतिष्ठा  आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करुन ठेवायची धडपड  हो हेच आपण ठरवतो  ना ? मनाशी .. हे एकदम कॉमन आहे.
 आपण आपली  ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने काम करत असतो , न थकता, न चुकता ,न थांबता आपण परिश्रम करतो , एक एक गोष्ट आपण मिळवत जातो।  किंबहुना ते मला मिळालेच पाहिजे म्हणून कठोर मेहनत करत असतो .
 तारुण्यात असताना आपण शक्यतो मागे वळून पहात नाही, शरीराला नेमकं काय हवंय ? काय नको ? याचाही  विचार आपण  करत नाही ,  घरदार ,गाडी बंगला  ,नोकरचाकर , सगळं ऐश्वर्य प्राप्त करतो .. आणि यासाठी कधी लोण काढून तर कधी हाप्त्यावर  एक एक साहित्य घेतो . पण त्याचा उपभोग घ्यायला घरीच नसतो कारण गाडीचा हप्ता, टिव्हीचा हाप्ता , घराचा हाप्ता ,दवाखाना व मुलांचे  शिक्षण  हे खर्च भागवण्यासाठी आपण अजून पळत असतो . होय मी मध्यमवर्गीय माणसाबद्दल बोलतोय...
 आणि या कामाच्या   धावपळीच्या जीवनात आपले आपल्या  शरीराकडे अनावधानाने किंवा पैशासाठी धावत असल्यामुळे दुर्लक्ष होतेच  यातूनही  . खूप पळून , आपण  बँक बॅलन्स करतोच बचत म्हणा  ! 
 , पण  सोबतीला अनुरुप असलेल्या आपल्यावर जीव लावणाऱ्या जोडीदारासाठी पुरेसा   वेळ देतो का ? , आपले मित्र ,नातेवाईक,  आपले आईवडील, आपली लहान मुले। यांनाही वेळ देतो का ? 
 पैसा जरुर कमावलाच पाहिजे पण आपल्यावर प्रेम करणारी जिवाभावाची नाती महत्वाची नाहीत का ?त्यांनाही वेळ देता आला पाहिजे.  जीवाभाची जी माणसे आहेत त्यांच्या बरोबर मनभरुन  बोलतो का ? 
 वेळ दिला पाहिजे .सुखाचे काही क्षण व्यतीत करता आले पाहिजेत ना ! 
आहो 
जग जिंकायला निघण्या अगोदर आपल्या शरीराची  काळजी, मनाचे समाधान आणि आपली जिवलग नाती जपायला हवीत ना ?  मनाशी कधीतरी संवाद साधायला हवा ना ?
 हे क्षणभंगुर आयुष्य  मनसोक्त जगायला नको का ? सगळा पैसा फक्त निवृत्तीसाठी आणि पुढील पिढ्यांसाठीच कमावला पाहिजे हा नियम आहे का ?  पुढच्या पिढीसाठी जरुर करुया , पण त्यांनाही काहीतरी करायला शिल्लक ठेवले पाहिजे ना ?
आपले जगणे आपण नको का शिकायला ?
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आपण प्रयत्न नको का करायला !
समुद्राच्या किनार्यावर फिरताना ओंजळभर वाळू हातात घ्यावी आणि ती वाळू आपल्या हातातून हळूहळू निसटत जावी , इतके आपले आयुष्य आपल्या हातातून निसटत असते हे कधी आपण ध्यानात घेणार ?
कदाचित आपल्याला सगळं कळतं पण तरीदेखील आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही .जगाची चिंता आणि जग काय म्हणेल यातच आपले अनमोल जीवन आपण खर्ची घालतो किंबहुना त्यातच आपला वेळ वाया घालवतो . बरोबर ना ?
 आपण आपल्या मनाशी कधीच आयुष्याची बेरीज किंवा वजाबाकी करत नाही.
 जीवन जगत असताना ,जबाबदारीची ओझी वाहताना , आपल्या शारीरिक व मानसिक गरजा हेही आपण विसरून जातो , धावपळीच्या जीवनात ,कधी आपण चिडचिड करतो कधी आपला पारा चढतो तर कधी आपण तहानभूक विसरून जातो . आणि आपल्या जीवनात जे सुखाचे ,समृद्धीचे ,भरभराटीचे, आनंदाचे, दिवस यावेत हे पाहिलेले असते ते बाजूलाच  रहाते आणि , बी.पी ,शुगर , वात ,पित्त ,स्थूलपणा असे नाना विकार वाढवत जातो , गाडी ,घोडे ,बँक बॅलन्स सगळे असूनसुद्धा मनाचे चैतन्य हरवले जाते आणि छानपैकी कितीही जगायचे म्हटले तरीदेखील पथ्थ पाणी आणि बंधनात आपले स्वपन आपण विसरून जातो . मला वाटते आयुष्य जगताना स्वतःला काही वेळ दिला पाहिजे, बचत करताना जीव मारुन जगण्या ऐवजी आनंदी  जगत  बचत केली पाहिजे.  मेहनतीने ,कष्टाने , पैसा कमावलाच पाहिजे पण तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी स्वतःसाठी खर्च सुद्धा केला पाहिजे आणि प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिकले पाहिजे. प्रेमाने माणसे जोडता आली पाहिजेत .मी या पृथ्वीवर कशासाठी आलोय, माझ्याकडून निसर्गाची अपेक्षा काय आहे. मला पाठिमागे काय ठेऊन जायचे आहे व सोबत काय घेऊन जायचे आहे. याचा सखोल विचार करुन साधक बाधक आयुष्य आपण कसे जगू शकतो ,हलकेफुलके  राहून उंच भरारी कशी  घेऊ शकतो  आणि मोठी स्वप्न पाहताना खूप मोठे व्हायचे आहे हे मनाशी ठरवून सुद्धा मी माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही ना ? मी माझ्यासाठी ईतरांचे नुकसान करतो का ? मी मला हवं ते मिळवताना मी ते आपुलकीने मिळवतो का याचाही विचार मनात आला पाहिजे . क्षणभंगुर आयुष्य पुन्हा नाही ,ते एकदाच आहे छानपैकी जगता आले पाहिजे, श्रीमंत  होताना ईतरांनाचा तळतळाट न घेता सरळमार्गी मी जगलं पाहिजे,  बघा नक्की तुम्हाला जिंकता येईल आणि यशस्वी होता येईल... तुम्हाला काय वाटते ,सुख कशात आहे, नक्की सांगा बरं ! 
 माझे जीवन जगण्याचे प्रयत्न ...
विजय पिसाळ नातेपुते... 9423613449
9665936949

४ टिप्पण्या: