vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

पद्मविभूषण मा . श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिसा निमित्त!


चालू घडामोडींचे विश्लेषण


पद्मविभूषण   मा .  श्री शरदचंद्रजी पवार साहेब.  तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ! 

साहेब. . . . . .  
शेकडो आरोप झेलत, कोणत्याही आरोपांना कवडीचीही किंमत न देता कामावर लक्ष केंद्रित करत,  मार्केटींग व  प्रसिद्धीचा विचार न करता काम करत रहाणे !
म्हणजे साहेब. 
 महाराष्ट्र 
राज्याचे उपमंत्री , राज्य   मंत्री , कॅबिनेट मंत्री  ते थेट चार वेळा मुख्यमंत्री फक्त साहेब. 
 भारत देशाचे संरक्षण मंत्री , 
लोकसभेचे विरोधी पक्ष नेता . 
नंतर कृषी , अन्न व नागरी पुरवठा मंत्री  अशी जबाबदारी फक्त साहेब 
 सलग ४७ वर्ष, विधानसभा , विधान परिषद,  लोकसभा व राज्यसभा अशी कारकीर्द. .  फक्त साहेब 

विरोधीपक्षात असतानाही वाजपेयींच्या   डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुख  फक्त साहेब. . 
कला , क्रीडा , नाट्य, 
संगीत, वाचन, याची आवड फक्त साहेब. . . 
मि शेतकरी , मि तुमचा लाभार्थी , 
हो साहेब  तुमच्या  दुरदृष्टीतील 
१००% अनुदानित फळबागा योजना  आम्हाला वरदान ठरली! 

आवाढव्य आकारमानाची मोठमोठी शेततळी ५० ते ७५% अनुदानित योजना दुष्काळी पट्ट्यातील लाखो शेतकर्यांना  करोडपती करून गेली ! 

३५ ते ७५ % अनुदानित ठिबक सिंचन योजना आम्हाला पीकांना  पाणी देण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी  मैलाचा दगड ठरली ,  
होय तुम्हीच शेकडो कांदाचाळी दिल्या ! 

नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन अर्थात Nhm मधुन कित्येक शेतकर्यांना जमिन डेव्हलपमेंट करून दिली . 
हो साहेब तुम्हीच  १२ % व्याज दराने मिळणारे पीक कर्ज  ४ % व पर्यंत आमच्या साठी उपलब्ध केले . 
आमच्या पाचवीला पुजलेला  दुष्काळ आला , रोगराई आली , गारपीट झाली ,  तेलकट रोगाने आम्ही बेजार झालो , तेंव्हा तुम्हीच आमचे बांधावर येऊन अश्रू पुसले , आधारवड बनून  मदत केली ,
जो देश तुम्ही केंद्रिय कृषी मंत्री होण्या अगोदर, गहू , तांदूळ आयात करत करत होता . 
 तुमच्या कुशल  धोरणामुळे   तोच माझा देश स्वतःची गरज भागवून निर्यातदार झाला . 
 तुम्हीच आमचा   कांदा , द्राक्ष, डाळिंब, पोपई, बोरे , केळी जगाच्या बाजारपेठेत पाठवली , आम्हाला पैसा मिळाला व देशाला बहुमोल असे परकीय चलन मिळाले . 
हो साहेब तुमच्यामुळेच,  
हिंजवडीत आयटी पार्क उभे  झाले हजारो इंजिनिअर कामाला लागले , तळेगाव एमआयडीसीत तुम्हीच  फ्लोरिकल्चर पार्क तयार केले व जगातील बाजारपेठेत  इथली  फुले जावू लागली . 
तुम्हीच नाला बंडिंग व  शेकडो धरणे बांधून या राज्यातील शेतीची व शहरांची तहान भागवली ,   देशात सर्वाधिक औद्योगिक वसाहती महाराष्ट्रात  तुम्हीच निर्माण केल्या ,  पिंपरी चिंचवड पासून, बारामती पर्यंत नजर टाकली तर लाखो लोक त्या ठिकाणी काम करताना दिसतात. 
राज्यातील साखर उद्योग,   आणि इथेनॉल व वाईन उद्योग याला चालना दिली ,   दुधाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरला आणला .  गावोगावी वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथालये दिली , त्यांना अनुदान दिले .  
शेतकर्यांना ,  कडबाकुट्टी , पेरणी  यंत्रे ,  मशागतीसाठी छोटे ट्रॅक्टर तुम्ही देऊन  आमचे कष्ट कमी केले , 
ऊस संशोधन केंद्र , डाळिंब संशोधन केंद्र, आंबा संशोधन केंद्र,  महाग्रेप या संस्था तुम्हीच निर्माण केल्या , 
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान विकसित करून दिले . 
भीमथडी जत्रेच्या माध्यमातून  लाखो महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला . 
 बारामती , पुणे  या ठिकाणी  शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले ,  शिक्षण क्षेत्रात तुम्ही  , आर्ट, सायन्स,  कॉमर्स, लॉ कॉलेज, डीएड, बीएड कॉले , तर काढलीच पण इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेज ते  मेडिकल कॉलेज पर्यंत तुम्ही सोयी निर्माण केल्या !
 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निर्माण केलेली रयत  शिक्षण संस्था तुम्ही त्याच तळमळीने वाढवली आणि टिकवली . 
तुम्ही क्रिकेट मध्ये आयपीएलची  २० -२० स्पर्धा सुरू करून भारताचे नाव जगात सर्वात पुढे केले ,  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना वानखेडे स्टेडियमचा चेहरामोहरा बदलला , बीसीसीआयचे अध्यक्ष असताना धोनी सारख्या कप्तानाला संधी देऊन  भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित केले ,  साहेब तुम्ही  आयसीसी चे अध्यक्ष असताना क्रिकेटमध्ये काही चांगले बदल घडवले .  
तुम्ही कुस्तीलाही न्याय दिला , तुम्ही कबड्डीलाही नावारूपाला आणले . 
पण साहेब तुमचे दुर्दैव  या कपाळकरंट्या मातीत तुम्ही जन्माला आला . . 
तुम्ही जर गुजरात, युपी , बिहार,  आंध्र अशा राज्यात जन्माला आला असता तर तुम्हाला त्या जनतेने डोक्यावर घेतले असते पण या मातीला छत्रपती शिवरायांचे पासून  फुटीचा , व परक्यांची चाकरी करण्याचा शाप आहे व तो पुसणे कठिण आहे .  तुम्ही निर्माण केलेल्या संस्थामध्ये शिक्षण घेतील, तुम्ही निर्माण केलेल्या कारखान्यात,  आयटी पार्कमध्ये नोकरी करतील पण मराठी लोक परकीयांचे गोडवे गातील हा गुण या मातीचा आहे . 
देशातील कित्येक नेते असे असतील, त्यांनी साधी पीठाची गिरणी काढली नाही कि एकाही माणसाला रोजगार मिळवून दिला नाही ,  उलट लोकांनी निर्माण केलेले विकण्याचा सपाटा लावला तरीदेखील ते केवळ भाषणबाजी व संघटनेचे पाठबळावर खूप मोठे नेते असल्याचे भासवले जाते पण तुमच्या कर्तृत्वाला नावे ठेवून, बदनाम करून  , स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते पण इतिहासात तुमचे नाव सुवर्ण आक्षरांनी नोंदले जाईल हे मात्र नक्की ! 
लेखन. . विजय पिसाळ नातेपुते.  ९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा